Skip to main content

Full text of "Lavand-aachii Maasolii"

See other formats


(॥५॥४/८॥२5७/१|_ 
(_|3२,र 


0) 192667 


/ ४०६6] 
॥४७-4/॥५] 


017--881--5-8-74--15,000 
0511.111. (1 0/]1२१७1॥१ 11117२617१ 


९811 [६०. १ भजन 0065801 ०. ?& 0५ 12-१८ 
*॥(॥0४ शा 

रि पश, ७. भा. 

1'1(]2 


९6 ०७-१ (५७८७ : 


गृषा उ ७०0 आठ्पयात ७९ एलपलालत ला ७" ७लणिलट प८ वद्चाल 189 ॥ 010 ७९100%. 


ठवणाची मासोळी 


स्वतंत्र सामाजिक कादंबरी 


किंमत ४॥ रुपये 


: प्रकाहक 4 

दा. ना. माघे, बी. ए. 

कूल अँड कालेज बुकस्टॉल 
कोल्हापूर. 


प्रथमावृत्ति : बषे-प्रतिपदा १८८३ 
सवे हक्क स्वाधीन 


: मुद्रक : 
चिं. पां. मोडक 
समन्वय मुद्रणालय, 
१९६ /६९ सदाशिब पेठ, पुणें 


लघणाची मासोळी । होय जरी जिव्हाळी । 
तरी जळी ना वेगळी । न जिथे जेवी ।। 


रघू कुठंतरी शून्याकडे दृष्टि लावून ताडताड चालला होता. मोठा गांडी- 
रस्ता सोडून त्यानं कॅनॉलच्या कडेची पायवाट धरली. डोक्यावर अजून ऊन 
रणरणत होत. इतक्या उनांतनं बाहेर पडायला वास्तविक आता कैऱ्याचे 
दिवससुद्धा उरले नव्हते. जोडीला कुणी नव्हतं. किती लाज जायचं आहे याचा 
पत्ता असल्याचं चिन्ह दिसत नव्हतं. त्याच्या चालण्याला कसलं बंधन नव्हतं. 
अंगांत एक रेघारेघाच्या कापडाच हात धुलाइचं दडकं अन्‌ वबिटकी विजार; 
डोक्याला घामानं मेणचटलेली टोपी अन्‌ पायांत जुनाट गांबठी वबहाणा-अद्या 
वेष्ांत तो भरकटत होता. अन्‌ त्याला पाहून कुणीहि गांवकऱ्यानं म्हटलं असतं, 
६ पोरगं घरांतून पळून चाललेल दिसतंयू-- ? 


---पळून जायचा विचार खूच्या डोक्यांत आला नव्हता असं नाहीं. पण 
बारा वर्षीच्या पोराच्या डोक्यांत पळायचं आलं तरी ते जाऊन जाणार कुटं? 
--दहा-पांच मैलांच्या पलीकडे त्याची धांब जाणं शक्‍य नव्हतं. आणि पळून 
जाऊन हवं ते साधणार असतं, तर तें करायलाहि रघूची ना नव्ह्ती. पप 
पण ते साधायचं नाहीं हृ रथूला ठाऊक होतं. 


रघूला जे साधायला हवं होतं तें अगदी साधं होतं. चार दिवसांपूर्वीच 
सातबीच्या परीक्षेचा निकाल लागून रघू व्ह. फा. झाला होता. त्याच्या 
निकालाविषर्यी कुणाच्याच मनांत दका नव्हती, चांगला पंचावन्न टक्के मार्क 
मिळवून तो पास झाला होता. परीक्षसाठी सातारला जाऊन आल्यापासून 
त्यानं पुढच्या शिक्षणाचा ध्यास धेतला होता. परीक्षेच्या वेळेळा “ एका वषात 
तीन इयत्ता ', “ चार वर्षात मॅट्कि ? या क्लासवाल्याच्या जाहिरातींनी, आपल्या 
शिक्षणाची कांहींतरी साय झाली पाहिजे-हीच त्याची तळमळ वाढठी होती. 


र लवणाची मासोळी 


ती गोष्ट रघूनं एकदा आपल्या वडलांच्याजवळ कादून पाहली. पण कृष्णं- 
भटानी गरगर डोळे फिरवून त्याला गप्प बसवले. रघूनं आपल्या आईजवळ 
हृद्ट घेतला. रखमात्राइनं'त्यातल्या त्यात सायीची वेळ बघून, “ पोराची होस, 
त्याची हुषारी, आपलं मेळं जन्माचं दळिद्र ? या साऱ्याचा पाढा मटजींपुढं 
वाचला. पण “' त्यातलं काही व्हायचं नाही ?? या एका वाक्याच्या पलीकड 
कृष्णंभटजी नी आपली मजल जाऊं दिली नाही. “ बायकांचा जन्म मेला अस- 
लाच ? म्हणून रखमाब्राइनीं दांन दिवस उपास काढला, कृष्णंभटजी घरात 
असायची वेळ रघून बाहेर काढायला सुरुवात केली. कृष्णंभटजी मात्र ठरल्या- 
प्रमाण घरच किंबा आमत्रणाच अन्न पोटात पडल्याबरोबर इनामदाराच्याकड'चा 
ब्रिजिकचा डाव खेळायचा क्रम न चुकता पाळीत होते. हें असच किती दिवस 
चालायचे होते कुणास ठाऊक १-पण खूच्या निकालाच्या आधी दोन दिवस 
कुष्णभटांना वाचा फुटली, 

:: चिरिजीव कुठ आहेत १? अलीकडे जेमतांना सुद्दा घरात दिसेनासे 
“झालित १ ? 

६ सुट्टीचच दिवस आहेत. लवकर जेवून घेतो. जात असेल कुठ खेळाय- 
'बिळायळा, त्यान तरी काय करायच आता ? ” 

“ घरांत बसून कांही. रूपावली, समासचक्र याचं अध्ययन केलं तर १ 
बापाच्या झोळींत धांडा पडेल वाटतं ? तुम्हीच त्याचे फार लाड करतां-- ? 

:: घाठ काय करायचं ते पहाटेच करून टाकतो. ते चुकवीत नाहीं रघू 
अन्‌ पोरवय आहे -- थोर्ड' खेळावंसं वाटायचंच --- ?? 

:: असं खेळत रहायला इनामदार नार्दी लागून राहिला आम्ही. कळायला 
हवे आता -- लहान नाही काही-” ” 

:£६ लहानच नाहींतर काय ! असं कितीसं वय आहे त्याचं १ परवा तर 
बारावे सरल, त्यानं काय करायचं या वयात ? 

६ या वयात मी ल्ल लावायला जात होतो. मुहूर्ताच्या दिवसात तेबडेच 
पांच-दहा रुपये आणि दहा-बीस खण-नारळ पदरांत पडतात. यांना कारही 
मिळवायला नको अन्‌ शिकायला जायला पैसे मात्र दवेत, आणायचे कुणाच्या 


ब्रापाचे ? ?? 


लवणाची मासोळी ३ 


4.७५ ७0 ७१ हव उत 9 लट हक अन का का का अक कळ शरा ह छळ कळा क कक १७ ७७ छा का क छा त्रा झा आरा कक शा का क छळ. क ७ झा छा का एक का का क्क 9 25 क आ. अभ झळ 


: घोर आहे अजून-कळत नाहीं त्याला. समजाऊन सागितल्यावर--- ?! 

५६६ सुमजाऊन काय सांगायचं त्यांत १? आपलं आपण सारं ओळखायला 
हवं. तुमचीच फूस असते. परवां त्या तात्यांच्याकडे आमंत्रण होत. “ साफ 
ज्ञाणार नाह ? म्हणून सांगितलं. मलाच जावं लागलं-- ? 

“८ माझ चुकल असलं तर त्याबद्दल त्याला बोळ लावायला नकोत. पण 
त्या तात्याच्या घरांत त्याला सारी * भट - भट ? म्हणून चिडवतात. पोराच्या 
जातीला एवढे “ मड ? अन्‌ ' गृहस्थ ? असे फरक केलेले आवडत नाहींत. 
आपली एक आहेच जन्माची भटकी. मिळालं पोराला शिकायला तर त्याची 
तरी सुटणूक होईल त्यातनं. मेळ उठावं त्यानं बोलाव-जणूं कांही याच्या घरच 
आम्ही फुकटाफुकटीच खाता. आहोत ! 

“ हे असलं बोलायच तर आधीच चांगला गृहस्थ पाहून द्यायला सांगा- 
यचं होतत बापाला. आमच्या घरात - भटाच्या घरात - आल्यावर भटकीच उणं 
कादून काय उपयोग ? दह्या पिढ्या झाल्या उपाध्येपणाच्या या गावाच्या सोमंत. 

“: माझ आता काय राहिलंय £ - माझा जन्मच गेला भटीण म्हणून घेण्यात. 
पण निदान पोराच्या पाठीमागं तरी तं नको अस मनात येतं राहून राहून-?' 

५८ तुमच्या मनांत यायला काय होतंय. दहा पिढयाची वृत्ति सोडायची -- 
म्हणजे आम्हांला गावात राहू देईल का कुणी १ ? 

८ मग काय - पोरानं अशीच भटकी करीत जन्म काढायचा १ अन्‌ त्यात 
तरी काय मिळतंय तं दिसतंयच की - दुकानदाराच्या वाणसामानासारखी 
आरद्वापक्षाच्या दक्षिगचीसुद्धां आतां उधारी ठेवायला लागलेत । अन्‌ ही 
सगळी म्हणे ग॒ह्स्थार्ची घरं- ? 

“ ते आमच आम्ही पाहून घेऊं. तुम्हांला दोन वेळेला कांही. कमी पडलं 
नाहीना? ?” 

५६ असं म्हटल्यावर बोलणंच खुटलं. चाललंच आहे. असेल नशिब्रांत तर 
या हामांत रघूचीही आहुति पडूं दे-? 

“ जेवताना असलं अभद्र बोललेलं मला खपायचं नाही. आपल्या निरं- 
न्ीबाना संध्याकाळीं घरांत बसायला सांगा, ” 

“ संध्याकाळचा तो अलीकडे ताठर्मीत जातो-?' 


डू लबणाची मासोळी, 

:: कांही नको तालमींत जायला, अन्‌ तिथ वाटेल त्या पोरात मिसळून 
ती शिवाशीव घरात कालवायला. आजपासून तालीम बंद. *? 

५ सांगत बापडी-? 

--अन्‌ त्या दिवर्शी संध्याकाळी रघूला तालीम चुकवून घरांत रहावं ळागठं. 
त्यानं चागल्या खरपूस माराचीसुद्धा तयारी केली होती. रखमाबाई हुकराला नवस 
बोळून बसली. रघू त्या दिवशीं घरी असूनही तिनं त्याला लबकर जेवायला 
घातलं, कृष्णमट आठ वाजून गेल्यावर घर्री परत आले; आणि त्यानीं 
इनामदाराकडे फराळ झाला म्हणून जेवायचं नसल्याचं सांगितलं. त्यानी 
रघूला हांक मारली. आता काय होणार या शंकेने, रखमाबाई दाराशी येऊन 
उभी राहिली, रघू मान खाली घाळून बापापुढे उभा राहिला, 

५: काय चिरंजीव, आज तालमीत गेला हातात कीं नाहीं? ” 

(न नाहीं. १) 

५६ हमासचक्र-रूपावर्लाचं कारही अध्ययन केलत का ? 

५६ पाठ झालींत दोन्ही. 

५८ आतां पुढं काय करायचा बेत आहे £ ?' 

* शिकायला जावसं वाटतंय 

५६ मग जा की. कशाला राहिला आहात घरात ? ” 

:: अजून उन्हाळ्याची सुट्टी आहे. शाळा भरायला एक आठवडा आहे. 
तबर काही जमलं तर-- 

८ मग-जमळ नाहीं का अजून १ तालमीत जाता रोज-तिथल्या पैल- 
वानानी पट्टी करून वर्गणी जमवली नाहीं का १ ” 

५ ते कसली पट्टी जमविणार १- गरीब आहेत सारे. ” 

५ अन्‌ तुम्ही काय असे कुबेराचे ब्राप लागून राहिलाय ? शिकायला 
जायचं म्हणजे काय तोंडाच्या गप्पा आहेत १ ? 

0550. 

५: आला का अं अं ? शिकायला जाता ना १ जा. तुम्हांला कुर्णी बांधून 
घातलं नाहीं. दाही दिशा मोकळ्या आहेत ! ” 

रखमाबाईला आतां राहवेना. नेहमींची मयोदा सोडून ती रघूदखत 
कृष्णंभटजींना म्हणाली “ एवढ्याद्या पोराला असं थोरामोठ्यासारखं लावून 


छवणाची मासोळी ष्‌ 
न कनककलललानिडरित ळा ममिनोलानन नल केलिमिनिभेनिनेहीडोडभमिबेजनरोड बद तति, 
“कशाला बोलायचं ? त्याला वाटायचच, आपल्या बरोबरीची मुल शिकायला 
चालली तर आपणही जावं. त्यांतून त्याचा नबर असतो वगोत नेहमी 
पहिला, प्यानं माग रहायचं आणि बाकीच्यांनी पुढं जायचं म्हणजे त्याला वाइट 
वाटायचंच. त्याची समजूत काढायची ते आपणच आपल्या पोराला असं 
बोलल्यावर? 

५६ या गावंढद्या गांवांत पहिला नंबर मिळवला म्हणून काय झालं ! बाहेर 
टिकायला पाहिजे ना £ फुकटच्या नाहीत या गाष्टी - ? 

:: चृण बाहर जायला मिळाल्याशिवाय तें कसं कळणार १ अन्‌ आई, 
नुसती काही ब्राह्मणाची अन्‌ पाटलार्ची मुलंच जात नाहींत तो गणपा चाभाराचा 
तायासुद्धा पास झाला तर शाहू बोर्डिंगांत शिकायला जाणार आहे. त्याला 
म्हणे फुकट शिकवतात तिथे, * 

“६ मग तुम्हीसुद्धा आमच्या पोर्टी यायच्या ऐवजी कुणा कृष्णा चांभाराच्या 
पार्टी जन्म घ्यायचा होतात ...नाहीं तर आतां दत्तक जा. ” 

“: त्याला काय हें बोलायचं १? आपलं ऐकलं तें त्यानं सांगितल. 

६ तेवढंच बरं नेमकं ऐकायला आल ? त्या तालमीत चालले असतील 
एकेक नेत. घरांत तोंड मुस्कट मारल्यासारखं करायचं अन्‌ बाहेर मार राजे- 
श्वराच्या गुट॒गुल गोष्टी चालायच्या. कळलीच शिरलाय घरांत--- ? 

६: मग त्यानं काय करायच तें तरी एकदां सांगून टाकावं ? ” 

: माझ्या शिस्तीन चालायचं असलं तर बघतां कांहीं योग जुळतोय का 
तं. पण याना स्वतःचे गुण उघळायचे असतील तर मात्र या घरांत पाणी 
प्यायला मिळायच नाहीं. एक पोरगा स्वर्गवासी झाला म्हणून अंघोळ करून 
मोकळा होईन. आहे का तयारी £ ?' 

:£६: पूण कशाची तयारी ? ” 


“: दुसरी कशाची १- चिरंजीवांना शिकायला जायचं आहे ना ? तुम्हां” 
लाही भटाची बायका म्हणून घ्यायचा कंटाळा आलाय-अंमलदाराची आई 
म्हणून मिरवायला पाहिज. करतां काय £-सारी लाज, अभिमान गुंडाळून 
ठेवणं आलं. आमच्या बापजाद्यांनी कर्धी म्हणून यजमानाकड तोंड पसरलं 
नव्हतं, पण चिरंजीवांच्या पायांत तें करणे भाग पडलं, ? 


द लवणाची मासोळी 

:. कुणाकडे पैसे-बिसे मागितळे काय ! आज शेटजींच्याकडे जायचं झालं: 
होतं वाटतं ! म्हणूनच वेळ लागला १-पण झाले ना कबूल £ ? 

: शोटजीकडं १ कशाला-कजञ मागायला £-या कृष्णभटानं जन्मांत पैच 
कर्ज काढलं नाहीं. लय़ा-मुंजींतले पंचे नेसून दिवस काढले पण अडक्याची 
उधारी नावावर चढूं दिली नाही. मान तोडला तरी कुणाच्या त्णांत पडणार 
नाही, अन्‌ असं क्रण काटून कधी शिक्षण झालंव १ उचळून दरमहा पंचवीस 
रुपये द्यायला कुणी हरीचे लाल या गांवांत नाहीत अन्‌ असले तरी त्यांची 
अजीजी करणारा हा कृष्णंभट नाही. ” 

“६ पुण मग-मग करायचं तरी काय झालंय ? ?? 

“ जं आजपर्यंत केलं नाहीं ते. सारी हयातभर बिजिकच्या डावात जरो- 
बरीचे जोडीदार म्हणून खेळला माडीला माडी लावून-यजमानक्रृत्याची वेळ 
सांडून एरग्वी मागणं मागितलं नाही. पण आज त्या अप्पा इनामदाराच्या 
पुढ दांत वेंगाडणं आले. त्यांना शब्द टाकलाय--- ? 

“६: पण ते काय करणार! ? 

“£ म॒झं पुरतं ऐकून तर घ्याल, त्यांचा बापू गेलीं दोन सालं एकटा राहिल 
होता. त्याला यंदा शिवपुरात ठेवायचा विचार आह अप्पाचा-- ? 

८. अग बाई, आणि तं कां £-इतक्या लाब एवढस पार--- ? 

६ हीं एवढीशी पोरेंच डोक्यावर बसून मिरे वाटतात काय झालं एक देव 
जाणे की तो बापू जाणे. कुणीं म्हणतात, त्याला हाटेलात खायचे, अच्यावच्या 
हिंडायचे नाद लागल, अभ्यास करीनासा झाला. कुणा म्हणतात आणखीन 
कांही-“- ? 

6 ळोकतांच्या तोंडाला कुणी हात लावायचा. पण इनामदार स्वतः--? 

“८ ते काय खरं असलं तरी गांवांत आपल्या तांडानं कबूल करणार 
आहेत थोडेच. ते म्हणतात मुलाला खानांवळीचं अन्न मानवत नार्ही, त्याच्या 
शाळेंत शिक्षणही यथातथाच आहे. एकूण काय त्याचा बेत चाललाय यंदा 
बापूला तिथं ठेवायचा नाही. अन्‌ एकटाही ठेवायचा नाहीं. त्यांचा विचार 
आहे आत्याबाईनीं शिवपुरला बिऱ्हाड करून रहाबं बापूच्या शिक्षणासाठी, 
तेव्हां, त्यांना शब्द टाकडाय. हे आमचे चिरंजीव-रघ्या तिथं राहून सगळा 
बाजारद्दाट बधीळ. आत्याबाईंच्या देवाधर्माला उपयोगी पडेल. तिथं त्याला 


लवणाची मासोळी ट्स 


* मा आ क अक आ आ ता आ मा अह. ह अ अह अड आ आह आढ. अड आढ. आऊ अह आ0 आ? आ अ आ आ ७8 2३ आ आ > हा आ अक आ. अह. 58, कक आहे... १ शन का करक अक अळा हि > 


जेबायळा घाला अन्‌ मग यांना काय शिकायचं तें शिकून दिव्रे लावूं द्यात. 
फीची नादारी मात्र अभ्यास नीट करून मिळवली पाहिजे, काय समजलं १ 
कुणाच्या पुढें नाहीं ती अप्पा इनामदारांच्या पुढं भीक मागितली, या उपर 
असेल तुमच्या नशिबात तसं-- ? 

“* पण हृ तरी नक्की झालंय ना ? का अजून त्यात काहा पण आहे १ 

माझ्याकडून मी शब्द टाकलाय. अन्‌ चार माणसांत तरी अप्पानी हो 
ला-हो म्हटलंय, तसे ते शब्दाचे धड आहेत--पण कुर्णी सागाव १? अजून 
तयांच्या घरांतच हाणामारी चालली आहे-- ? 

“ हूं आणखीन कसलं नसत विघ्न--? ? 

*' ब्रापूच्या मनात बिऱ्हाड करायचं नाही. अन्‌ शाळा तर मुळीच 
बदलायची नाहीं. अप्पांना तिचे नांव नकोयू एक तर चिरंजिवाना आधी 
गुण उधळलेत. एखाद्या हाटेलबाल्याचं नाहींतर पानपटद्टीकाल्याच देणंसुद्धा 
असेल. अन्‌ दुसर म्हणजे आपल्याच तालुक्‍याच्या गावांत राज गावच्या 
माणसांची वर्दळ ह्रघडीला चारदोन माणस उतरायला यायची इनामदाराचं 
घर म्हणून हक्कानं, घराची खानाग्ळ व्हायची, अन्‌ खर्चाला तरी कोण 
पुरवठी पडणार १ ? 

“ टडहा | त्यांत काय एवटं-.इनामदारांच्या घरचा हत्ती तो--- ?? 

: तोच पोसणे कठीण आहे. इथ खेड्यात राहून शाहस्च्या खर्चाची 
काय कल्पना येणार आहे १? जीव फेसाटीला येईल. अग्पा करताहेत तेंच. 
टीक; पण-पण त्यांच्यांत तिसरीच भानगड उमटली --_ ?? 

:: ती आणखी कसली ? एकदां मालकांनी टरवल्यावर--- 

मालकाला काण ठरवून देईल तर ना |! जसे आमचे चिरजीब तसंच 
ते. बापून्ची बह्दीण कमळी यंदा पांचबी पास झाली ना? ती हट्ट धरून 
घसली आहे-बापू नापास झाला तरी त्याला शिकायला ठेवताय-मी पाय 
झालं. मी पण शिकणार म्हणून---? 

नाहीं तरी ती पोरगीच हुशार आहे बापूपेक्षां-- ? 

“ हुषार असून काय करायचं १-पोरगी आहे ना £ ही पोरगी शिका- 
यला रहायची म्हणजे कठीणच झालं | त्यांतून ल्हान तरी आहे ? बारावे. 
चालूं आहे-नहाण येईल वर्षमरांत-अशा पोरीला बाहेर मांवी ठेवायची --_? 


।्ट लबणाची मासोळी 

८: घण आत्याबाई जाताहेत ना ? घरच केल्यावर बाहेर गांवचे काय 
आलंय ? त्यांतून आतां होताहेत कुठं लवकर पोरींची लग्न ! कायदासुद्धां 
स्झालाय्‌ ना-मग करायचं काय दोन बर्ष धरांत राहून १ ? 

“ वा |! वा ! तुम्ही तर मोठ्या सुधारकच व्हायला लागलात ! दोन 
सर्षात घरी आईच्या हाताखाली कराय--सवरायला शिकेल. बुक शिकून 
काय 'नबऱ्याला त्याचीं पानं वाढायची आहेत ताटांत १ * 

“ तो. कशाला पानं वाढील ? इथं नाहीं का घरांत ब्राह्मण १ तिला 
सासरही मिळायचं असंच थोरामोठ्यांचे. ताटावरनं पाटावर अन्‌ 
प्राटाबरने ताटावर ?? 

५६ म्हणून काय कुळाचार सोडायचा र? इनामदाराच्या ब्राधकांना कधी 
-रांगोळींतसुद्धा * श्री) काढायला आली नाही. आता काळ बदलला म्हणून 
झाल्या पाच इयत्ता गावातल्या गावात तेवढ्या पुरे! ” 

५६ घण तें आपल्याला काय करायचंय ? त्यांचं ते कांही कां ठरवीनातू्‌ ! 
-आपल्या रघूची सोय झाल्याशी आपल्याला कारण--- ?? 

“६ त्यातच तर सारं अडलंय ना |! आत्याबाई म्हणतात पोरीचं शिक्षण 
"पुरे. बापू म्हणतोय तिला न्यायचं नाही. अप्पा पेंचांत पडलेत-त्यानं सारा 
"“अेतंच फिसकटायचा--- 

: पण मग पेंच उरलाय कसला ? ?? 

“ कमळीची आई म्हणते एवढी मोठी पोरगी इथं खेड्यात रहायला 
नको. रस्त्यान जातां-येतां वार्टेतर्ळी वात्रट पोर काय हब त॑ बोलतात. त्या- 
'पेक्षा दाहरात जाऊन शिकली लयन होस्तवर तर तेवढच बरं, शिकलेली म्हणून 
घरही बरं मिळेल. अन्‌ इथं ब्राह्मण आहे त्यापेक्षा तिथं आत्याबाईच्य़ा द्वाता- 
-खालींच काहीं करायसवरायला शिकली तर शिकेल---?? 

६ म्हणजे अजून कांहींच पक्क नाही. सगळ दुसऱ्यांच्या हातांत-शंक- 
-राची मर्जी. एवढे कसतरी जमून रखघूच्या मनासारख झालं म्हणजे घर, * 

“ त्यापं होईल काहीतरी. पण तुमच्या चिरंजीबांना हं पटवून द्या; नाहींतर 
-सगळं सोडून आम्ही ठरबायचं आणि आयत्या वेळेला या बादशहाची मर्जी 
“फिरा यची-आपल्याला इनामदारांच्या इथं रह्दायचंच नाही म्हणून --? 


*लवणाची मासोळी ९ 


रघू हें सारं नुसतं ऐकत हाता. दोन दिवसांनीं त्याच्या परीक्षेचा निकाळ 
लागला अन्‌ त्याच्यानंतर एक-दोन दिवसांत इनामदारांचं बिऱ्हाड शिबपुरला 
व्हायचं नक्की झालं. तेव्हापासून रघूनं बाजूला सारळेला विचार त्याच्या 
डोक्यात घर करून राहिला. त्याच डोकं सुन्न झालं अन्‌ त्या भरांत तो ऐन 
उन्हाचा घरातून बाहेर पडून कनालच्या वाटेला लागला. शिकायला जायला 
मिळणार याचा आनंद मानावा की इनामदारांच्या घरांत राहायला लागणार 
याची खत करावी ह त्याचे त्यालाच कळेना कृष्णंभटांनी काढलेली शांका 
अगदी बरोबर होती, शिकायला जायचा बेत रघू करीत होता तेव्हा इनामदार 
त्याच्या ख्िसंगणतींत नव्हते. पण आतां इनामदाराचं धर आणि रघूचं शिक्षण 
यांचं जण कांही लय़ लागल्यासारखं ज्ञाल होतं आणि तंच त्याला जाचीत 
हात. त्याच्या बालवयात त्याला या विचारान असह्य वेदना होत हात्या. 
आतला ताप सहन करण्याची ताकद॒यावी म्हणूनच कीं काय तो उन्हांत 
भटकत हाता. 


> >< >< 


रघूची मुज त्याच्या सातव्या वर्षी इनामदाराच्या बापूबरोबर झाली. मुज 
म्हणज काय हे पुरतं कळायचंसद्धा त्याचे वय नव्हतं. त्या वळी आपली मुज 
इतर म्रुलांच्यापक्षा लवकर हांतय याचीच त्याला गंमत आणि अभिमान 
वाटला, त्याच्या आधीसुद्धा गांबांतले सारे लोक कोणत्या ना कोणत्या प्रसर्गी 
आपल्या बडलांच्या पायां पडतात, त्याना दाक्षिणा देतात, आईला फुकट खण 
मिळतात, आपल्याला वाणाचं खारीक-खोजर भरपूर मळत याचा आनद व्हायचा. 
“आम्ही ब्राह्मण आहोंत? ह सांगतांना त्याच्या सावळ्या चेहऱ्यावर तकतकी 
चढायची मीसुद्धा आतां दादांच्यासारखा ब्राह्मण जेवायला जाणार, लोक 
माझ्याही पाया पडतील-यांत कांहीतरी मान आहे, मोठेपणा आहे या 
क्रश्पनेनं तो खुषीत असायचा. 

---पण इनामदारांच्या इथं मुंजीची तयारी सुरू झाली तेव्हां त्याच्या या 
मानाच्या आणि मोठेपणाच्या कल्पनेला पहिला धक्का बसला. गव्हूेले करायसाठी 
रखमाभाईला बोलबायला म्हणून इनामदाराचा भाग्या गडी सकाळच्या प्रहरी 
आला, तो मुळी असं सांगतच आला कीं, '“ आत्याबाय म्हगाल्या, आता 


१० लवणाची मासोळी 
तुमाकडची मुंज बी आमच्या हतंच हुयाची हाय तर रघूला घिऊन येरवाळीच 
या. भटजींचा आज उपासच हाय जनू. ?? रघूला त्या निरोपांत कांही विरोष वाटलं 
नाहीं. पण श्राद्धपक्षांच्या आमंत्रणाशिवाय एरवी नुसतं फुकटांत जेवायला जाणं 
रखमाबाईला पसंत नसायचं. अन्‌ त्यांतून रघूला बरोबर न्यावसं तर तिला 
बाटत नव्हतं. पण तुळशीला पाणी घालून खघूचा भात चुलीवर ठेवायच्या 
आत दुसरं बेलावणं आलं, तेव्हां खट्टू होऊन तिला रघूला घेऊन इनाम- 
दाराकडं जावंच लागलं. तिथल्या त्या रगाड्यांत मुलाची पहिली जेवण व्हायला 
बारा वाजले. मधे एकदां “ भूक ” म्हणून खघूनं आईकडं पाहिलं. तेव्हा 
आत्याबाईनी ताडदेखलं “ झालंच हं पिठलं भात रघू *' म्हणून म्हटले 
आणे चार पावलं जाऊन हर्वेत मोठ्यानं सरजत्ती केळी, “' मेली भटांची 
जात सढा अन्नाला हावरलेली, त्यातून दुसऱ्याच्या घी असले की जास्तीच, 
अगदीं उष्टावणाच्या दिवसापासून दिकवून ठेवतात असे कार्ही-- ? 

रघूला भूक आवरली नाही म्हणून बारा बाजता तो पोटभर जेवला, पण 
त्याला त्या भाताची चव विचित्र लागळी रखमाबाईनं एकदा पदराने नाकाचा 
दोडा साफ करायचं निमित्त करून डोळे पुसले, पण त्या टिवद्षी आपला 
उपास असल्याचं सागून तिनं अन्नाला हात लावला नाहीं. तेवढ्यावरच तं 
निभावलं असतं तर कदाचित्‌ रखघूच्या मनांत कारही राहिलं नसते. पण 
गव्हल्याटा बसल्यावर गावातल्या यच्चयाबत्‌ ब्राह्मणाच्या बायकांची तोडे 
हातायेक्षाही अधिक झटझट चाळू लागलीं, अन्‌ त्याना पहिल्यादा कुठला विषय 
मिळाला झसला तर तो रघूच्या मुजीचा आणि रखमाबाईच्या सोंवळ्याचा -? 

५ रस्वमात्राइचं आपलं बर. कार्यात कार्य. खर्च नका कारही कराय- 
सवरायला नको. अन रघूला सातव तर आहे. पण आतांपास्नं आपली 
दक्षणा चाळू-हो म्हण्जे श्राद्वापश्नाला बाहेरचा दुसरा भट बोलवून बाटणी 
पडायला नको. आपलं उत्पन्न दुप्पर झाल ?' आत्याबाईनीं सुरुवात केली. 

“८ त्याच काय ? मटजीनी माया कमी का केली असेल १ रखमात्राइनीं 
थारात मुंजीचा बरार उडवून दिला असता. पण आमच्या इथे सांगायचं 
झालं कीं आत्याबाई, तुमच्या घरनंच मुंजीचे बिचारायचं झालं. इनामदारानी 
नुसती आपल्यापुरती ४ज करून कसं चालेल १ म्हणून रघूची मंज करून 
द्यायचं ठरवलं वाटतं. आणिक काय ती सातव्या वर्षापावतर लाभायची न 


ल॑वणाची मासोळी १९ 
लाभायची पहायचं नसतं ना ? ?? गांवच्या मास्तरीणब्ाईनं पुस्ती जोडली. 

५६ मला कांही त्यातलं ठाऊक नाहीं. पुरुष मंडळी बाहेरच्या बाहेर सगळं 
ठरवतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाण करायचं एवढ आपलं काम-?? रखमाबाईनं 
वित्रय बद करायसाठी म्हणून, पण खरं तेच सां गेतलं. 

“ ब्राकी तसं बघितलं तर रखमानाइईचा रघू म्हणजे आमच्या वसताच्या 
बरोबरीचा. आमचा बेत होता बसंताबरोबर त्याची मुंज लावून द्यायचा, पण 
आतां आत्याबाईच्या वाड्यातनं उठावणी झाल्यावर आमचा काय पाड' 
ळागणार-त्यांतून आमच्या वसंताची मंज काही आणखी दोन वषे तरी 
व्हायची नाहीं म्हणा, १? म स्तरीणबाईनं विषय चाळू ठेवायचा अन्‌ त्यातल्या 
त्यात आपला मोठेपणा सांगून घ्यायचा बेत साधला. 

: तुमचा बेत आम्हांला कळला असता तर आम्ही नसतां हा. तुमच्या 
आड' आलो. आम्हांला काय दोजारच्या वाडीतल्या जोशा डी दोन सूल होतांच 

त्यांतल्या एकाची मुंज लावून टिळी असती. बाकी आता तरी काय- 
तुम्हांला जोशांचं घर आहेच म्हणायच. आमचं काय १-आधी आपल्या 
उपाध्याचं पहायचं असा रिवाजच आहे. म्हणून अप्पाच्याकडून विषय कोटला. 
मटजीहि हा म्हणाले अन्‌ आपली बसल्या बैठकीला मुंज ठरटी--- ? 

: ब्राकी तुमच्या इथला उकाडाच मोठा आत्याबाई. त्यात आमच्या कासं- 
डीचा काय पाड' लागणार | आता काय मुंजीला बापूच्या मावशी येणार 
असतील ना ददैद्राबादकडच्या ! त्यांचा आपला संगळाच्या सगळा मोगलाई 
खाक्‍्या--- ?? 

“६ अहो पहिलं कार्य हं अप्पाच्या हातचं, येणार सगळी- यायला हवीतच, 
त्यासाठी सगळं त्यांच्या बरोबरीनं करायला लागतंय अप्पांना. नुसती पाचर 
रुपयांची बनात घेतली गड्याचा अन्‌ पद्ेवाल्याचा पोषाक करायसाठी, मावशीच्या 
ड्‌थन पट्टेवाले येणार-त्यांच्या पुटं आमच्या गडीमाणसाचं तरी उण दिसून 
कस चालेल १ ? 

“६ हो तर काय ! अहो तुमच्या इथलं काथ म्हटलं तरी खरं म्हणजे सार्‍्या' 
गांवाचंच कार्य हें आत्याबाई. दैद्रावादकरांच्यापुटं आपल्या गावच्या इनाम- 
दारांचं कांही उणं दिसतां कामा नये. आपल्या आपल्यांत असल तेव्हांच वेगळं, 
पण बाहेरचे पाहुणे म्हटले की गावाचं नोव राहिलं पाहिजे. बरं का रखमाबाई ! !” 


१२ लबणाची मासोळी 


'मास्तरीणबाई रखमाबाईकडे पहात आपल्या ल॒गड्याचा पोत न्याहाळूं लागली . 

रघूला मोठ्या बायकांचं हें बोलणं कांहीं फारसं कळलं नाही. पण त्या 
साऱ्यात आपल्या मुंजीचं नांव नुसतं निघायचं म्हणून निघालं, बाकी सगळं 
बोलणे इनामदाराच्यापुरत एवढ जाणवलं. पुनः एकदां आपल्या आईचं नांव 
निघाल्यावर त्याला बरं बाटलं, तवट्यात आव्याब्राईची गर्जना सुरू झाली. 

““ आता तूंच विषय काढलास एश्वदा म्हणून बर झाळं, नाही तर मला 
आपलं अशुद्ध न्‌ अवघड होऊन बसल होतं. पण आतां आलीच वेळ तर 
आपलं सागून टाकतं. रखमाबाई, तू आमच्या या वहिनीच्या बरोबरीन वाव- 
भार साऱ्या सुंजात देवका-मात्राभोजनाच्या वेळेला. तेव्हा हा पुरुषी मुकटा 
नको नेसूस बाई, मावशीची मडळी हंसतील. आतां मुंजीचा खर्च बांचलायच 
छंबीतेवी. तेबढा एक बायकांचा अंगभर मुकटा घ्यायला सांग नवऱ्याला, 

रखमाब्राई या माऱ्यानं चूर झाली होती. बाकीच्या बायका आत्याबाईच्या 
बोलण्याला साथ करोत आपापल्या परीनं उघड किंबा पदरांत तोंड लपवून 
हंसत होत्या, आत्याबाईना सांथ करणं ह! सगळ्या बायकांचा धर्म होता. 
कारण आपत्याबाईच बोलण म्हणजे ' हायकोर्टा 'चा निकाल होता. त्याच्यावर 
“अपीळ? नव्हतं. रघूला मात्र त्या बोलण्यान अन्‌ तोंड लपवून हसण्याने गुदमरून 
टाकल. सुंजीबद्दल कांई' तरी चमत्कारिक वाटू लागलं. 

>< >< >< 

रघूपक्षा इनामदाराचा बापू चांगला दीन वर्षानी मोठा होता. त्यामुळं 
खर म्हणजे त्याचे आणि बापूचे सवगडी वेगवेगळे असायचे. त्यांची घरंसुद्धा 
निरनिराळ्या आळ्यात होती. पण अगर्दी लहानपणापासून इनामदारांच्या 
इथल्या बििकच्या अडुथात कृष्णंभटाभरोबर जायची संवय झाली म्हणून 
असो की वर्षअखेरीं बापूर्ची पुस्तकं रघूला मिळूं लागलीं म्हणून असो, 
तिथ त्याची बापूबरोबर जोडी ठरून गेली, बापूला ही गोष्ट कर्धीच फारशी 
आवडली नव्हती, पण अप्पांच्या कचेरीत मार्डाला मांडी लावून बसणाऱ्या गुरु- 
जोंच्या मुलाला तो उघड-उघड डाफरू शकत नव्हता. सुरुवातीच्या त्याच्या युक्त्या 
वेगळ्या असत. शनवार रविवारी दुपारच्या वेळेला वडिलांनी बाद म्हणून 
-टाकलेल्या इस्पिटांच्या जोड्यांतून निरळून बावन पार्नी डावाचा अरासा जोड 
तयार करून त्याच्या जोरावर मुलांचा पत्त्यांचा अड्डा इनामदारांच्या वाड्या- 


ळबणाची मासोळी $:4 
दोजारच्या विठोन्नाच्या देवळात पडायचा, त्या डाबात रघूला सामावून घेताना 
बापूनं अन्‌ त्याच्या बरोबरीच्यानी त्याला घायकुतीला आणायचं. एक दिवस, 
असाच डाव पडला असताना खघूला कुणाच्या बाजूला घ्यायचा याचा बाद सुरू 
झाला. मास्तराचा बंडू म्हणाला, “' बापू , तुझ्यामुळ हा चिव्वुरडा रघ्या आपल्या 
डावात ठुड्बुडतो. त्याला हवं तर तुझ्या बाजूला घे, आमच्याकडं नकाच, ? 

:: त्र तर |! माझ्या बरोबर येतो म्हणे |! मी काय त्याला कडेवरन 
घेऊन येतोय्‌ थोडाच १ मी का म्हणून घेटैन त्याला १ म्हणजे आम्ही आपलं 
सारख दळत बसावं. तें काही नाही. आपण गुलाम टाकून गरी ठरवायचे-?”? 
बापू उसळून म्हणाला. 


“: मळा येतंय लाडीस -बघा तर खरं ” रखघूनं सांगायचा प्रयत्न केला. 

“ हो हो | तू मोठा शहाणाच लागून राहिलायस कीं नाही १-शाळे- 
तल्या पढदिल्या नंबराची ऐट इथ खेळताना नाही चालायची ब्चंमजी-इथं 
आम्ही सागू तसं खेळायच असल तर--?? 


€ 


“: तुम्ही खोट खेळता म्हणून होय १- बरे कारे चेडू -बापूला एक्क्या-< 
राजाच्या खुगा ठाऊक आहेत म्हणून त्याचा हुकूम सर होतो ? 

“ रघ्या, बदडून काढीन बघ. तुला काय करायचंय ? चामडा कुठला | ?? 

५ बाप्या, आम्हाला असं फसवतोस होय-थांब्र लेका * 

“' बोलायचं कारण नाहीं. पत्ते माझे आहेत. खेळायचं असलं तर 
मुकास्याने खेळा- 

“ तर तर-तुझ्या घरात डाव ठेवतात म्हणून पत्ते तुझे झाले वाटते- 
बिजिकचे सारे डाव पट्टी करून आणलेले असतात. आमचे काका पण 
पट्टी देतात--- * 

५८ मृग आणा जावा की डाव आपाल्या काकाच्याकडन-कर्धी आणला 
नाहींत तो आजपर्यंत १ ? 

बापू-जंडूची अशी जुंपलेळी बघून रघू घाबरला. त्याला वाटलं आपण 
बापूची युक्ति सांगितली म्हणून असं झालं; तर बेहूचीहि युक्ति फोडावी 
म्हणज़ञे फिटटफ'ट होऊन भांडण मिटेल अन्‌ त्यानं तोंड उघडलं. 


शड लवणाची मासोळी 


: बरं का बापू , तुला एक्क्या-रानाच्या खुणा ठाऊक आहेत त्री 
या बंडूची पण एक गमत आहे-तो कनी पान चोरून हुकूम मारतो अन्‌ डाव 
सर करतो--- 

: रघ्या लेका तुझी बाजू घेतली तर माझ्यावरच उलटलास होय १ कधी 
रे लेका, पान चोरून हुकूम मारला मीं ? खोट बोढतोत. थांब घर-आतां 
शुरुजीनाच सागता. ?? बड उसळून म्हणाला. 

“: तो तसलाच आहे. रे बंड्या. लेकाचा गुडध्याएवढा नाही तरी 
आमच्यात खेळायला पाहिजे अन्‌ वर आपल्या आपल्यांतच भांडण लावून 
द्यायळा बघतोय. ह्याला आपल्यातन हुसकून द्यायला हूवंय- ?” बापू-जंडूची 
एकी होऊन ते दोघेहि त्याच्यावर उसळले. 

रघूची पंचाइत झाली. तेवढ्यांत रामन एक शक्कल काढली. तो बापूच्या 
कानाला लागला. अन्‌ मंग बापू मोठेपणाचा आव आणून म्हणाला, “ जाऊं 
दे रे-लहान आहे अजून त्याला डावातली गंमत कळत नाहीं. पण रघ्यानं 
कुणाच्या बाजून खेळायचं याच भांडण नकोच मुळी. आपण आज सगळेजण 
गाढवान खेळू या. ?? अन्‌ असं म्हणता म्हणतां त्यानं बंडूला डोळा घातला. 
रघू आता आपल्याला खेळायला मिळणार या खुषीत होता. त्याचं लक्ष या 
डोळाडोळीकडे नव्हत. पानं वाटून झालीं. तेव्हां नेमके एके-राजे खघूच्या 
पानात येऊन बसले. अन्‌ डाव सपायच्या वेळेला रघू वीस पार्नी गाढव 
झाला, पुढच्या आरडा-ओरडीनं अन हुलडीनं काहीतरी भानगड झाली एवढ 
खघूच्या ध्यानात आळे. तो म्हणाला, “' तुम्ही कट करून मला जाडी पानं 
दिली. आता मी पिचतो-मग अधू या. ?? दुसऱ्या डावांतल्या पाहिल्या चार 
उताऱ्यात रघूच्या हातांतलीं पानं कमी झालीं. पण नंतर पुनः एकदां बाकीच्या 
साऱ्याकडे एकेका रंग!ची कटापी निघाली; अन्‌ रघू चांगला बत्तीस पार्नी 
गाढब व्हायचा रंग दिसूं लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षांत आलं अन्‌ तो 
ओरडला, “ पानं चोरून झक्कू देताय-रडीचा डाव खेळताय ?? अन्‌ त्यान 
पानं फेकून दिलीं, तसे सारेच त्याच्यावर उलटले आणि त्याला ' रडूबाई ? 
म्हणून खरोखर रडेपर्यंत चिडवून निघून गले. 

-_असले प्रसंग वरचेवर यायचे. रघूची स्थिति विचित्र झाली होती. 
'त्याने एक-दोनदां बापू-बंडूची संगत सोडायचा प्रयत्न केढा.. पण ग्रांवांतली 


लवणाची मासोळी १५ 
सारी ब्राह्मणांची मुल होतीं. या दोघाच्या गट्टींत-जापूच्या इनामदारीमुळं 
त्याच्याकडं मोहोळ जमायचं, तर बडूचे वडील मास्तर, त्याला दुखवून उपयोगी 
नाहीं म्हणून त्याला धरून रहायचं; या वृत्तीन त्यांच्याभोबती गराडा पडलेला 
असायचा. त्याना सोडून जायचं म्हणजे मराठ्यांच्या मुलात वावरायला हवं. 
ररक तर ही मुलं सुट्टीच्या दिवशीं हमखास बाजाराला किवा रानात जायची 
अन्‌ कधी त्याचा डाव पडलाच गावांत तर त्यात » 1 ८३"यारी-क्षा मोठे 
बाप्य असायचे. त्याच्यात डाळ शिजणं कठीणच. तरीसुद्धा रघून त्यांच्यात दोन- 
चारदा मिसळायचा प्रयत्न केला अन्‌ “असूं ग्रे-आलाया बामन तर येऊ यरे. ? 
म्हणून त्यानीद्वि रघूळा आपल्यात येऊ दिला पण नेमकी त्याच खेपेला ती 
गाष्ट कृष्णभटजीच्या कानावर गेली. बापू-बेडूला रघूची अडचण होत असली 
तरी त्यान दुसरीकडे रमावं हं त्यांना बर वाटल नाहीं. अन्‌ तोंडी लावण्याला 
रघ्या नसला तर आपसात भाडणं होतात हं त्याना जड वाटलं. म्हणून रव्या 
वाटल त्या पोरात मिसळल्याची गुणगुण भटजीच्या कानावर घालण्यात आली 
अनू या शिवाशिवीबह्दल दिक्षा म्हणून भटजींनी रघूला दिवस मावळल्यावर नदी- 
वरनं झोलेत्यानं यायळा लावून वर घरात आल्यावर यथास्थित प्रसाद दिला. 

त्यानंतरच्या एका वर्षी रघूला एक नवीन युक्ति सांपडली. चातुमीसात 
गावात कुणा कोरगावकरबुवारची कीर्तन सुरू झाली, संध्याकाळीं शाळा सुटली 
कीं थट रामाच्या देवळात कीतनाला जाऊन बसायला खून सुरूवात केली. 
रघधूच तोंडीलावणं सटल्यापासून बापू-बंडूला चुकल्या-चुकल्यासारखं व्हायला 
लागलं होतं. म्हणून त्यानीं पहिल्यांदा थोडीशी थट्टा करून पाहिली. आजोबा- 
सारखं कीतनाला जाऊन बसणं अन्‌ तेंहि जेबकईचा---पच्याचा डाव सोडून 
ह्या आचरटपणाबद्दल ते दोघे चिडवत होते. नंतर खूला त्या चिड'ण्याचं 
काहींच वाटलं नाहीं. पण हँ. आपल्यापेक्षा चिमुरड॑ कार्ट बघत नाहीं ह्याची 
बापू-बंडूला खंत वाटली, चीड आली, त्यांनी डोकी तलखपणानं काम करूं 
लागली, 

-ण्आणि त्यांना अचानक इवं होतं ते सांपडल. इनामदारांच्या अडुयांत 
बुवांच्या कीतेनावर टीका व्हायला सुरुवात झाली होती, कारण हरदासी 
आचरटपणाच्या परिचित कोट्या आणि सुधारणेवरची खमंग टीका ही 
कांही कोरगांवकरांच्या कीर्तनांत इनामदारकंपूला मुळींच मिळत नव्हती, बुवा 


१६ लवणाची मासोळीः 
बेदान्ताबद्दल बोलताना मूळ ग्रथांना घरून तेवटंच बोलत होते. इनामदाराच्या 
अडुथानं त्याचं कारण शोधून काढलं. बुवांची हातीघुती मुलगी अबू त्याच्या- 
बरार हिंडत हाती. हा मूर्तिमंत अनाचार वावरत असताना बुवांना अटी 
कडच्या ' सधारकी चोचल्यावर ? टीका करायला तोंड होतंच कुठे !--- आणि 
हा शोध लावतांनाच त्या अडुयात अंबूच्या चारित्र्याची चचो झाळी--ती. 
कुणाचा तरी हात धरून नक्का पळून जाणार |! कारण अक्षरा: बारा गावच 
पाणी ग्यालेली पोरगी ती. अप्पा इनामदार'नी आगि हासहो असं 
करणाऱ्यानी नक्का ठखून टाकलं. आणि त्यांतच बापू-बड्टला हवं होतं तं 
सांपडलं-- 

--- खर म्हणजे स्त्री-पुरुष संब्रधाची कल्पना येण्याचसुद्धा त्यांचं वय 
नव्हतं. पण खेड्याच्या वातावरणात “ च्यायला ? स्तोत्रानं कान इतक्या 
लहानपणापासून पवित्र व्हायळा लागतात, गावांतल्या “ भानगडी ? ची चर्चा 
इतक्ष्या राजरोस कानावर येते कीं बापू-बंडूना हव तें सापडले यात आश्चर्य 
वाटायचं काहीच कारण नाही. त्यांनी एके दिवशीं शाळतच जाहीर करून 
टाकलं कौ, रध्या नेबर एकचा इब्लिस-वय चारलेला आहे. ता कीतनाला जातो 
तो कथेची गोडी वाटते किंवा खडीसाखरेचा प्रसाद मिळतो म्हाणून नव्हे; तर 
त्याची नजर दुसरीकडे आहे. लेकाचा गुळाच्या ढेपीवर नजर ठेवून आहे 
सुंगळ्यासारखा. 


त्या माऱ्यानं रघू हादरला, रडवेला झाला कीतनाला जायचं बंद करावं 
असं एक वेळ त्याच्या मनात आलं, पण कीर्तनाला नाहीं गेलां तर हीं दोघं 
जास्तच चिडवतीळ म्हणून तो जात राहिला. मात्र त्या घाणेरड्या बोलण्यामुळं 
त्याच्या मनांत एक सदी कायमची बसली. स्त्री-पुरुष संबंध हा चेष्टेचा- 
चिडवण्याचा विषय आहे. त्याच्यांत कांहीतरी अमंगळ आहे. या कल्पनेने तो 
कुठल्याहि स्त्रोशीं बोलतांना दबकू लागला---दुरावलेला राहू लागला. 


बापू-बंडूची ती घाणेरडी थट्टा त्याला मधून मधून डिवचूं लागली, 
विनाकारण खुपूं लागली. पण तिच्याबद्दल कुणाशी--अगरदी आईपादीसुद्धा 
कांहीं बोलावं असंत्याला वाटेना. थट्टा आठवली कीं त्याला थोराड बांध्याची- 
काळसर अंबू दिसायंची-मग्र एकदम कसली तरी शिरशिरी यायची. डोळे 


लवणाची मासोळी १७ 
मिटायच-आईची प्रतिमा तरंगू लागायची पण अचानक आईची प्रतिमा- 
सद्धा नकोशी वाटायला लागठी अश्शी एक त्याची विचित्र अवस्था झाली. 
>< >< >< 

रघू सहावीत गेळा अन्‌ त्याच वर्षी बापू-बडू सातवीच्या परीक्षंत नापास 
झाले. पण नापास झाल्याबरोबर 'या व्ह. फा. त कांद्दी राम नाहीं; आप- 
ल्याला कुठं मास्तर व्हायचं आहे ? असं म्हणत त्यानी इग्रजी शिकायसाठी 
ताढुक्‍याच्या गावाला क्काम हलवला, आणि रघूच्या मागचा त्याचा भोंगा 
कमी झाला. त्यावेळीं कृप्णंमटजीनी त्याच्यामागे दुसरा उद्योग लावला. 
चातुर्मासांत ब्राह्मण? जेवायला जाणं, तुळशीची लं लावणं, लय़ातून अंतरपाट 
घरणं, हें तो करीतच होता; पण आतां सणासुदीच्या आदल्या दिवशी रानात 
जाऊन दुर्वा, दभ, बेल आणायचे कामही भटजीनीं त्याच्यावर सोपवून टाकलें. 
रघूळा या कामाचा तिटकारा होता असं नाही, उलट या रानांत खूप हिंडायला 
मिळायचं, जाभळा-बोरांच्या दिवसात मनमुराद फळं खायला मिळायची 
अनु याचा खूप आनद व्हायचा -पण शाळा चाळू असतांना असल्या पाय- 
पिटींत दोन तास खर्ची करणं त्याच्या जिवावर यायचे कारण त्याच्या अभि- 
मानाला कसलाहि डाग न लागणारी एक वस्तु त्याच्यापाशी होती ती म्हणजे 
त्याचा शाळंतळा पहिळा नंबर, कृप्णभटजीचीं किरकाळ कामे करून, अनेक- 
वेळा दुपारच्या आमंत्रणाचं जेवण देशस्थी उशीरात अवेळी उरकूनसुद्धां त्यानं 
शाळेंतला पहिला नंबर सोडला नव्हता. पुस्तकं नेहमींच चार-दोन कमी, 
इनामदारांच्या बापूनं गबाळेगणानं वापरून उरलेली, आगापिछा नसलेली 
असायचीं ! पण त्याची कदर न करता मेहनतीच्या आणि अकलेच्या भांड- 
बलावर त्यानं आपला गाडा रेटला होता. सातवीत गेल्यावर तर त्याची 
मोठी त्रेधा उडाली होतो. बिजिकच्या पोकाखातर मास्तरारनी मुलाचा अभ्यास 
करून घ्यायची सोपी याती काढली होती - त्याच्याच एका मित्रान लिहिललीं 
बहुतेक सगळ्या विषयांची प्रश्ोत्तर त्यांनीं क्रमिक पुस्तकांपेक्षा अधिक 
महत्वाची करून ठेवलीं होतीं ! अन्‌ परीक्षेत नापास झाल्याच्या तिरिमिरीत 
बापून नेमकी तेवढीच पुस्तक जाळून टाकलीं होती. आणि त्या पुस्तकांत 
नसलेले उत्तर मास्तरांना नुसत्या काना-मात्रेच्या फरकानंदेखीालळ चालत नव्हत. 
रघूची पंचाईत झाली. तेव्हां त्यानं शाळेतल्या एका मुलाचं पुस्तक मागून 

ळ. मा...२ 


शट लवणाची मासोळी 
आणून त्यातनं इतिहास-भूगोळ, दासत्राची सत्रंधच्यासत्रंध प्रक्षात्तर डढिहू 
काढण्याचा उद्योग केळा होता. 

त्याच्या वयाच्या मानानं अवजड' असलेल्या या महनतीच्या भरीला कृष्ण 
भटजीचीं वाढती कामं येऊन रघूच्या अभ्यासाला अडवण होऊं लागळी. पग 
कोणाजवळ बोलायची साय नव्हती, कोग्गववकगाणणटा कीर्तनानंतर त्याच 
आडदेशी बोलणं तुटक झाल होते आणि आडईपाशी योळून काहा. उपयोग 
व्हायचा नाही हेही कळून चुकळ होतं. खूच्या बाबतींत आणि विदोपतः 
त्याच्या अभ्यासाच्या बात्रतींत रखमाब्राईने चुकून एखादा इाब्द उच्वाग्ला 
तरी *“' तुम्हाला काय समजतय त्यांतळ ?* हे. भटजीचं उत्तर खूलासुद्ा 
अंगवळणी पडलं होतं. 

मात्र दभी-दुर्बोच्यासाठी रानं तुडवताना रथूला एक मोकळीक आपा- 
आप मिळाली. अडीअडवणींच्या जागतन आपल्याला हृव ते साहित्य 
जमवताना रघूला अनेकदा पंचाईत व्हायची; पण त्यावेळी जवळपास असलेल्या 
गुराख्याच्या किवा दोतकऱ्याच्या मुळात मिसळून त्याच्या मदतीनें आपलं 
काम करून घेताना रखघूळा “का रे ? म्हणणार कुणी नव्हतं. रवूळा असं 
कारही हवेस झाल की. त्यानं जवळ दिसेल त्याला हाक मारायची अन्‌ 
रघथूच्या वरोबरीच्या किंबा त्याच्यापेक्षा चार सहा वर्षानी माठ्या असलेल्या 
मुलानी ' देवाच्या कामात ? ' ब्रामनाच्या पोरा ला होसेने मदत करायची. 
त्या मदतीने म्हणा, की त्यांच्या कोशल्यानं म्हणा, रघू अशा मदतनीसाकडे 
मनोमन खंचला जायचा. त्यातल्या त्यात रग्या जाधवाचं अन्‌ खूत्र सूत 
खूप जमायचं. 

असाच एकदां रघू कनालजवळच्या वावराच्या बाधावर उंच असलेल्या 
बेलाच्या झाडाकडे पाहात उभा होता. खूप वेळ विचार करूनहि त्याला बेल 
काढायची युक्त सुचेना. लहान-सहान झाडावर चढायला तो कचरत नव्हता. 
यण हें झाड होतं खूप उंच आणि अगर्दी ब्रारीक, रघू इकडे तिकडे पाहूं 
लागला. अन्‌ त्याला हरून दूरवरनं रंग्या धावतच आला --- “ काय बामना, 
बेळ पायजे व्हय - मग असा का बावरलास - चढ कीं वर---? “' भीति वाटते 
रे ?' असं खूनं म्हणतांच “ हत्‌ ल्येका ! बामन त्यो बामन - नुसती तूंप-रोटी 
. खा.?? म्हणत रंग्या सरसर झाडावर चढला देखील. ' अरे हळू - बेतानं - 


लवगाची मासोळी १९ 
पड'श्ीलबिडशील---<? असं खूच्या तोंडात आलं, पण र्ग्याच्या ते गावीदी 
नव्हतं. वरनं सपूसप्‌ घेलाच्या बारक्या डहाळ्याच टाकायला त्यानं सुरुवात 
केली. “' पुरे-पुरे ” म्हणून रघू कटाळला - पण रग्याने चागला हलकासा 
भाराच खाली साठेपर्यंत आपलं काम चालूं ठेवलं, खालीं उतरल्यावर खघूनं 
रंग्याला बसवून घेतल --- 

६६ का र- फुरं नाय का झाला ? ? 

“६ पुरे की - त्याचा काय भारा बांधायचा आहे ---? 

£ पंग -आता जाऊं य्ये की मसराकडे---?” 

“६: बुस - जाशील आता. रग्या---? 

५ अरं बोळ की मदा - लाजतुयास का ब्रायकुवानी --? 

८ रंग्या, एवढा सरसर झाडावर चढलास, तुला भीति नाही कारे 
वाटली १? ?? 

“: छुल | मी काय तुझ्यावानी ब्रामन है व्हय असा भ्याला--? 

“* तर तर-ब्राह्मण नसलास म्हणून काय पडलास तर तुला लागायचं 
नाही १? 

““ तू असाच भ्याचास बामना - झाडावरन पडले तर लागल म्हून झाडा- 
वर चढायचाच न्हाइस - आर, चार-दान डाव पडल्याबिगर झाडावर चढाया 
इल कंदी £ ?? 

“६ झरे रंग्या -मी काय झाडावर चढत नाही ? पण असल्या बारीक अन्‌ 
अवघड झाडावर -- मुद्दाम पडायलाच चढायंच -- एखादी फादीगिंदी मोडली 
तर 22 

:: त्र काय हुईल ? जरा वाईच खरचढलं - रगात निगल - खरचाटलं 
तर त्ये बरे हुतं - रगात निगाल तर पुन्याच्यानं येतं --? 

*“ पण मुद्दाम का---१ ? 

:: अन्‌ म्या नसतो चडलां आज, तर बामना, तुला ह्यो बेलाचा पाला गा 
कसा गवसला असता £ अरं - रगात निगाळ तर चोकून टाकावं, जरा 
ख्रचाटलं तर पाला चोळावा - कुटंबी घावतो --? 

“६ कोणचा पाला १ मला दाखवून तरी ठेव-- ?? 


२० लवणाची मासोळी 

:८ अर त्यो माक्‍याचा पाला - कुटंबी असतुया -- त्येची काय आप्रुपाई 
हाय ? अन्‌ न्हाय घावला त्यो तर कनूचाबरी मऊसूत पाळा चोळावा - तुमी 
बामनाची पोरं लईच करत - अक्शी नाजूक नार- आमचं काय, आमी वारा 
पितो रानचा जल्मल्यापासनं--- ” 

रंग्या बोलायच्या रंगात आला. रघू मंत्रठुग्धासारखा ऐकत होता. 
खेड्यातल्या वातावरणातला मनमोकळेपणा अन्‌ अवगस्वळपणा आयपल्यांतही 
आहे असं तो समजत हाता. पण रंग्याच्या बोलण्यानं ता किंचित्‌ दुखावला - 
अन रग्याचं वर्म पकडावं म्हणून त्याला म्हणाला-- 

:: त्र तर ! काय सांगतोस रंग्या -म्हणे जन्मल्यापासनं रानना वारा 
पितो. जसा कार्ही रानांतच जन्माला आलास--- ? 

“६ तुला खरं न्हाई वाटत बामना ? अरं मागल्या सालालाच माझी आई 
पाटलाच्या मळ्यांतन भिम्याला धिऊन आली की--- ? 

“६ खर सांगतोस ? तुझी आई उघड्यावर बाळंतीण झाली १ ?? 

“ तशी पार उगड्यावर न्हाई रं. भांगळाया गेली हुती पाटलाच्या 
मळ्यात. पोटात वाईच कळ आली. तह्या शोबऱ्यांत गेली अन्‌ भात्यान 
हातरून पडली. अन्‌ सांजला भिम्याला पाटीत घाळून घरला आली.?? 

रघूला ही कथा नवीन होती. तो आश्चर्यानं थक्क झाला. रंग्याचं वम 
पकडायला म्हणून तो गेला अन्‌ स्वतःच गुरफटला. आपण ब्राह्मण म्हणजे 
कुणीतरी श्रष्ठ हा त्याच्यावर जन्मापासून झालेला संस्कार त्याला स्वस्थ बसूं 
देईना. त्याचा खरा खोटा अभिमान डिवचला गेला. कुठं तरी रंग्यापक्षां 
वरचढपणा दाखवलाच पाहिजे या हदृव्यासानं त्याने आपला ठेवणीतला 
विषय काढला -- 

“: ते बाकीचं कांही असू द रंग्या - पण यू असा जन्मभर म्हशी वळतच 
रहाणार का ! शाळेंत कां येत नाहीस ? ” 

“८ साळंत १ - अन्‌ ततं येऊन माज्या म्हशी कोन वळायचा ? हतं मी 
मसरांच्या पाठींत धापाटी घालतुया त्यो साळंत येऊनश्यान मीच मास्तराच्या 
धोपाट्या खावाव्यात व्हय ? वा र बामना-- ? 

: अरे पण शाळेंत शिकलास तर तुझाच फायदा होईल-- ?? 


लवणाची मासोळी २१ 

“ कशाचा फायदा १ तूं काय करतुयास १ झाडावरनं ब्येलाचा पाला 
काडाया न्हाई येत तुला अजून -. तू शिकला असचीळ गबतातला ग - पर ह्यो 
पठ्ठ्या बाटाचं सारच्या सारं गबात कापतो - अन्‌ मसर जोगावतो, तूंच साग 
की योक “ग? मोटा का सार गवात मोद ? ” 

ह्या अडाणी पोराची कशी समजत घालायची ते रघूळा कळेना. जाधाचं 
५ गवत ? गवतातला “ग? पेक्षा मोठं म्हणून त्यानं रघूला निदान बोलण्यात 
तरी हरवलं होतं. चाकोरीतून शिक्षणाचे पाठ घेणाऱ्या रधूजवळ असल्या तेढ्या 
व्यवहारज्ञानाला उत्तर नव्हतं, तो मुकाट्यानं बेल गोळा करून उठला. जणू 
गुदमरून टाकणाऱ्या रंग्याच्य़ा भिन्न सस्कृतीपासून तो दूर व्हायळा लागला 
होता. रंग्याच्या बोलण्यात कांहीं तरी चुकतं आहे, आपल्याला त॑ कळत नाही, 
म्हणून त्याचं आकर्षण वाटतंय, पण आपण आहां त्यात कातरी अधिक, 
वेगळं, चांगलं आहे या समजुतीनं खूला घट्ट कवटाळडं होत, 

--“खाण्यासवरण्याच्या, शिवारोबीच्या वरपेवर होणाऱ्या घरच्या -- 
दारच्या उललेखांना रघूच्या मनांत स्वतःच्या वेगळेपणाविपर्या, मोठेपणाविषरयी 
काही कल्पना पोसल्या होत्या; संस्कार रक्तात मिनून गेळे हाते ते त्याला 
नेहमीं जाणवत, जागवीत, सागत रद्दात, कीं त॒ रंग्या जाधवापेक्षा निराळा 
आहेस. पण हे निराळेपण बापू-बंडूच्या सहवासात, आठवणीत विरघळायचं. 
तिथ त्याचं भटपण त्याला थिटं करायचं, काळवंडायळा लागायचं - आणि 
या दुकलीचे आणि रंग्याच वर्तन याची तुलना तर त्याला खोड्यात पाडायची- 
बाबचळून टाकायची ---- 

>< > >< 

सातवीच्या वगीत गेल्यावर कृष्णंभटांर्न' रघूच्या माग आणखी एक व्याप 
लावून दिला. इनामदाराच्या इथ दररोज दुपारी पूजेला जायचं. त्यात त्याचा 
बोलायचा हेतु होता - आता हळूं हळूं चिरंजीवांनीं एकक गोष्टीचं ज्ञान मिळवाबं 
आणि आपल्याला वयोमानाप्रमाणं थोडासा विसावा द्यावा. सहर्जी साधणारं 
होतं तं म्हणजे जास्तीत जास्त दिवस रघूचं एक वेळचं जेवण जआाहेर पडेल 
आणि आपल्याला सकाळच्या बिजिकच्या डावांतनं रोजच्या रोज मधेच उठून 
यायला लागायचं नाही. अगदींच सणावाराची किंवा श्राद्धपक्षाची तीथ 
असेल तेवढ्यापुरतं बघतां येईल. 


२२ लवणाची मासोळी 

बापू नसताना इनामदाराच्या वाड्यात जायला एका अर्थी खूळा फारशी 
अडचण नव्हती. त्याच्याशीं कुरापत काढायला कोणी तिथं नव्ह्त. पण दुसरी- 
कड्डन रखघूळा शंका आढी आणि ती खरी झालीच. रघू पूजेला म्हणन इनाम- 
दाराच्या घरी जाऊ लागला तरी पूजेच्या आ'बींच्या आणि इतर धऱ्याच गाष्टी 
त्याला कराव्या लाग लागल्या. ऐन स्वयंपाकात असताना आत्याबा ईना गाड 
तेल, नाहींतर खोबर, वेलदोडे संपल्याचं आढळून यायचं, आणि रघूळा 
सोंवळ्याच्या लगोटीनिशी उघड्या अंगानं वाण्याच्या दुकानात चक्कर टाकून 
यायळा लागायचं. अन्‌ हे पूजेच्या 'आधी झालं असळं तर आत्याबाइनी “ कुठं 
तरी वेंधळ्यासारख बघत चिधोबिंधीवर पायर दिला असक्लील ? म्हणून 
त्याळा पुष्कळ वेळा दुसऱ्यांदा अंथोळ करायला लावायचो. 

आत्यावार्ईच्या कामाची ही पद्धति आणि हा वरचप्मा सगळ्याच्या परि- 
चयाचा होता पण अप्पा इनामदाराना आपल्या ब्रिजिकच्या डावापुठे घरांत 
लक्ष घालायला सवड नव्हतो आणि काहीं बाबतींत आपण ' जुन्या वळणाला 
धरून आहोत ? हें सागणं त्याना सोयीचं वाटायचं. त्यांपैकी एक बाबत 
म्हणजे होतां होइतो. बायकोशी न बोलणं ही होती. त्यामुळे सहाजिकच सव 
व्यवहार आत्याबाईच्या मार्पीत आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे चाळायचे. खघूला 
त्याचीच धास्ती वाटत हाती. पण अप्पाचं मत होते, सगळा घरचा गाडा 
आत्याबराह चालवतात त्यामुळं आपल्याला तेवढीच माकळीक मिळत. त्यानुळं 
आपल्या अभ्यासाची सबब रघूळा त्याच्याजवळ सागता येत नसे. एक वेळ 
त्याच्या मनात आलं कीं, बापूच्या आईला सागून पहावं. पण इनामदारीणवाईची 
स्थिति त्याच्या डोळ्यापुढे होतीच. कधी आत्याबाई स्वयंपाकघरात गुंतलल्या 
असताना किंवा देवदर्शांनाला बाहेर गेल्यावर इनामदारीणब्राईनी आप्पाच्या- 
जबळ एखाद्या विषयाचं बोळण काढलंच तर अप्पानी म्हणावं, “' काय हव 
नको तें आत्याबाईना सागा. तेवढाच त्यांना मोठेपणा, नाहीतरी त्याचं काय 
आहे. सारा संसार तुमचाच आहे - तरीसुद्धा एवढ्या आपुलकीने ती कष्ट 
उपसते - तिला न कळता कांहीं करायचं तुम्ही का मनांत आणावं १ तिनं 
मनात आणलं तर सासरकडनं वीस-पंचवीस रुपयाची पोटगी घेऊन उझर्टंही 
क्षेत्राच्या ठिकाणी “ हरि हरि ? म्हणत दिवस काढील, मग तुम्हाला तिची 
किंमत कळेल---?? 


टवशाची मासाळी २३ 


इनामदारीणबाड्ची ही. अवस्था गांबातल्या पोगसोगनासनुद्धा ठाऊक 
टोती. त्यातून रघू तर अधिक - उणा नेहमीच वाड्यात वावरणारा. पूर्वाच्या 
हकाकली सगळ्याच्या सगळ्या त्याळा ठाऊक नव्हत्या सन्‌ त्या त्याच्या 
आकलनाच्याही पळीकडच्या होत्या. तरी मधून मधून त्याच्या कानी माठ्या 
माणसाची बालणी यायची - त्यातळे मवळे मघळे कळतील तेवढे तुकड संदर्भान 
जुळवून त्यानं पाहिले होते. बापूची आई म्हणजे मागलाईतत्या कुणा जहा- 
गिरदाराची तिसरी की चनथी मुलगी -- तिच माहेरच नाव मनू पदावबाईत 
नाव कमावलेल्या इनामदारांच्या वाड्यात त्या जुन्या धाग्यान येऊन पडलो. 
तिळा कळायला लागायच्या आधीच आत्याबाई माहेरा बरेऊन राहिलेल्या. 
आप्या इनामदाराना लहानपणींच रनामटारीचं कर्तेपण मिळाल्या]ळ आणि 
या काळी काही न करता घरच्या कगगी भरत असल्यामुळें त्याच्या रिकाम- 
पणची एकुलती एक कामगिरी म्हणजे इनामदाराचा बंदा वाढवग. त्यामुळं 
बापूच्या आईची पहिल्यांदा बाजेशी जी ओळख झाली तिचा लोभ काहीं त्या 
बाजला सुटना, सोळा वषात म्हणज तिशीची झुळूक ळागते न लागते ताच 
इनामदारीण बाईची दहा बाळतपण झाली होती - त्यातून वाचली बापू अन्‌ 
कमळी हो दोघंच. पण त्यामुळ इनामदारीण बाईंच्या स्थितीत काहा फरक 
पडला नव्हता, उलट मूळ जजतक्या लवकर जाईल तितक्या प्रमाणात पुढची 
खेप जवळ यायची ! अद्या स्थितीत लहानपणी रवूळा बापूच्या आईची 
आळख राहिली ती नेहमी बाजेवर निजते ती बाई म्हणून, त्यावेळ! ती वाई 
म्हणज रघूला एक भयकर आळशी आणि निरुद्यांगी बाहू वाटायची. त्यात 
ठंच्या स्थूळ थलथलीत बाध्यापुळे तवी दिसायचीहा फार सुखावळेटी तिचं 
आत्याबाडनी केलेले वणन ऐकून तर खघूला हंस आवरेनासं झालं होत. 
चौथीच्या भूगोटात त्यान सिंघ - काठेवाडवी माहिती वाचटी होती. आत्या- 
वाडूना हा भूगोल केव्हा कळला होता कुगास ठाऊक: पण त्यांनीही नेमका 
यातला ठाब्दू वापरला होता - त्या म्हणाल्या, “' छवरातल्या आपल्या गावटी 
म्हशी - त्यांचं वेत दोन वर्षांनीं येतं. पण घरात ही कठली दैेद्राबादी का 
जाकराबरादा आणला आह तिच मात्र सारं वसावणी, *?  % 

त्यावळी अशा चरवर विनोदाचा विपय झालेडी ब्रापूची आई, समज 
येऊ लागला तशी खूला तिच्याबद्दल आपलकी वाटं लागली -- आलत्याबाईच 


२४ लवणाची मासोळी 
कांही तरी फटकळ बोलणं ऐकण्यापेक्षां आपल्याला काय हवं त बापूच्या 
आडेला मागितल तर ते लबकर मिळतं, निदानीं बोलणी खावी लागत 
नाहीत हें लहान-सहान प्रसगांनीं रघूला पटवून दिलं होतं. पूजेच्या वेळी 
एक-दोनदा बापूच्या आइकडं तडक रघू गेला होता. पण तिनं बघते? म्हटलेलं 
एकदा आत्याबाइच्या कानावर आलं आणि मग त्रिजली कडाडली, “ र्या, 
घरातलं काहीं पाहिजे असलं तर मला मागायचं हें का तुला ठाऊक नाहीं ! 
उगीच कशाला बापूच्या आईला त्रास देतोस १ -- जसा काहीं आज नवीनच 
आला आहेस वाड्यात --- २? 

तेव्हापासून खघूच्या तोंडाला खीळ बसली. रघू आत्याबा्ईशीं बोलायचा 
प्रसंग टाळतो हे इनामदारीणबार्ईच्या ध्यानांत आलं हात एवढ्याश्या लहान 
मुलाला त्रास नको म्हणून म्हणा कीं आपळी सात-आठ मुलं जगली नाहीत 
तर मुलं जगावीत किंवा जगायची नसठी तर होऊ तरी नयेत यासाठी 
देवाची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून म्हणा, सुरवातीला उभी होती 
तोपर्यंत बापूची आई पूजेची तयारी करून, गंध उगाळून ठेवायची. आत्या- 
बाईचं बोलणंसद्धा खाल तिनं त्या पायांत, “' एवढी तयारी कशाला करून 
द्यायला हूवी त्याला. भटाचं पोरगं बोठून चाळून पूजा करायळा बोलावलं, 
म्हणजे नुसतं देवाच्या डोक्यावर पाणी का ओतायचं त्यान - त्याची त्याला 
घेऊ दे तयारी करून. ?' पण ह सार बोलणं मनावर न घेता बापूची आई 
करायचं तेवढ करीत राहिली, आत्याचाईही एक-दोनदां बोळून गप्प बसल्या. 
कारण त्याना ठाऊक होतं की ही मिजास दोन-चार महिन्याच्यावर चालणार 
नाहीं, एकदा ही बाजेला खिळली कीं झकत भटाचं पोरटं सगळं आपल्या 
हातान करून घेईल, आणि जसजसे बापूच्या आईचे बाळंतपणाचे दिवस 
जवळ आले तसतद्या आत्याबाईही रघूला जास्ती जास्ती काम सागून, कांही 
ना कांही सागून उणं काढून बोळून घ्यायला लागल्या. 

बापूच्या आईच्या या बाळंतपणांत तर आलत्याबाईरनी रघूला हाताखालच्या 
गड्यासारखं वागवायला सुरुवात केली. सारं काढ्याचं सामान, वॉण्याच्या 
दुकानातलं अळोब-खोबरं, एवढंच नाहीं तर कुठला कुठला रानांतला बाभळीचा 
डिंक - सार आणायची कामगिरी, बापू असता तर जोडीला आला असता 
म्हणत म्हणत - रघूवर पडली, आणि चार-दोन पायल्याचं ओझं उरापाटी 


लवणाची मासोळी २प्‌ 
आणल्यावर त्याच्या हातावर एक किडकीशी खारीक पडली. भाग्या गडी 
घरांत असूनसुद्धा, त्याला ह्यांतठं समजायचं नाही म्हणून त्याची सुटका 
झाली होती. खारीक हातात पडल्यावर रघून न बघताच ती चड़ीच्या 
खिशात कांबळी, कारण मटाला “वाणांत कसल खारीक-स्थागरं मिळतं' तें 
आता सरावाने ठाऊक झालंच होतं. पण त्याची तक्रार त्याबद्दल नव्हतीच. 
या साऱ्या उद्योगात वेळ मोडून त्याच्या अभ्यासाची खोटी व्हायची; अन्‌ 
अभ्यास हेंच तर त्याच वम होते. 

पूजेचे करून मिळत होतं तोंवर खूचा पूजंत फारसा वेळ मोडत नव्हता. 
आता तो काळ जाऊन शिवाय भरीला ही वरची कामे आळी आणि 
दररोज सरासरीनं दीड-दोन तासाचा वेळ जाऊं लागला तव्हा रघूच्या 
मनावरचा बांध निघाला. तो कुगापार्शी काही बोलला नाहीं. पण कुणाला 
न सागतासवरता त्यानं एक दिवस पूजेला जायवंच अंद करून टाकळ -- 
संघ्याकाळी शातिपाठाच्या वळी कृष्णंमटाकडे आत्याबाईेनी तिख्थट मीठ 
लावून “ रपोट ? कळा 

“६ आतां तुम्हीच बघा गुरुजी, तसा लहान आहे अजून स्वू , पण त्याला 
आता एवढं कळूं नये का १९ घरात बाळंतीण आहे - माझी ताराबळ होते. 
इकडे तुम्ही काहो कमी जास्ती न म्हणता झातियाठाला येतायू अन्‌ आपलं 
दुपारच्या वेळेला देवांना तांब्याभर पाणी मिळूं नय ? ” 

:< म्हूणजे ? रघ्या आला नव्हता पूजेळा आज १ मला ठाऊक नाही-? 

'“: तसं त्यांचं चुकल असं मी म्हणत नाही. बापूची आड उभी होती 
नेतर सारी पूजेची तय्नारी करून देत होती, त्याची पूजा लवकर आटपत 
होतो. आता त्याचं त्याला करून घ्यावं लागत सगळे - पण मो तरा कुठे कुठ 
पुरवणी पडणार ? अजून कळत नसेल. तसं पोरवयच आहे त्याचं--- ” 

“६ म्हणून काय झाळ - लहान आहे का गघडो - सगळं करायला पाहिजे 
वेळेला ,! 

“६८ माझं तरी दुसरं काय म्हणणं - पण आता कायशी त्याची परीक्षा जवळ 
आली वाटतं - सातारला जायचा आहे ना यंदा - अभ्यास फार असतो वाटत? 
आम्हांला काय कळतेय त्यातलं. पण आपल देवाधर्माच पडले, त्यातून 
घरात बाळंतीण --- ?? 


२६ लवणाची मासोळी 
कसळे आले आहेत अभ्यास - चोचलच झालेत फार-- हीं रोजची काम 
करायचा नाहात तर काय नाकर ठेवायचे १ -- उद्या पाटवून दता त्याला, 
-ण्याणि श्ातिपाठासनं परत घरीं गेल्यात्ररावर भटजींनी रखघूच्या पाठीला 
हात घातला. काही न विचारता त्याला यथेच्छ बडवून काढला. अन्‌ मग 
त्याळा बालका केला. त्याचं म्हणण काहीसं पटळं असळे तरी तत ढाखवायची 
भटांची तयारी नव्ह्सी, “ सुकास्यानं उद्याथासने पूजेळा गेल पाहिज. मला 
पवा नाही शाळेची न्‌ त्या परीक्षेची, *? अक्षी तगटणी देऊन भटजी आधल्या 
उद्योगाला लागले. 


>< >< >< 


बापूच्या आईच्या या बाळंतपणाचाही दो [विकप्णं झाला अन्‌ तिनं 
बाज साडायच्या आत मुलानं इनामदाराचा वाडा सोडला. त्यावेळीं रघूच्या 
सातवीच्या वगात पूवेपरीक्षेच्या तयारीची झिमड चालली हाती; पण त्याच्या 
पाटीमागची इनामटाराच्या घरची पूजा सुटळी नव्हती. त्यातल्या त्यात 
अभ्यासाला सवड मिळावी म्हणून रघू पूजेला जायला उद्यीर करू लागला. 
बापूच्या आईनं त्याला हलकेच विचारलें, “' मुद्दाम उन करून का येतोस १ 
शाळा सुटल्याबरोबर अंघोळ करून यावं ?' खून सांगितलं, “' परीक्षेचा 
अभ्यास आहे. तो झाल्यावर आंघाळ करून निघतो, ?' बापूची आई अजून 
स्वयेयाकबर - देवघरात वावरायला लागली नव्ह्ती तिनं दान दिवस विचार 
करून आपल्याकडून तोड काढली. ?? सवू, त शाळा सडली की आघाळ 
करून यत जा. मी. कमळीला पूजेचे करून ठवायळा सांगते म्हणजे, तुझी 
चटकन सटका होऊन अभ्यासाला सवड दोइल. 

दुसऱ्या दिवशी कमळी सकाळच्या वेळी आईच्या सागण्याप्रमाण देव- 
घरात लडबुडूं लागडी, आईने तिळा आदल्या टिव्शी काय काय करायचं, 
कसं कसं सारं सामान जुळवून ठेवायचं, याची माहिती दिली होती. कमळीनं 
आपल्या परीनं फुलाची परडी, तबकात कापूर, उदबत्ती, नीराजन याची 
जुळणी कली, परकराचा काचा मारून गध उगळायाची तयारी झाली. 
कपाळावर चागळे घामाचे ओघळ लागेपर्यंत खसाखसा गंध उगाळलं अन्‌ 
ते थाटींत भरून हात स्वच्छ धुतले, कसाची बट डाव्या हातानं कपाळावरनं 


लवणाची मासोळी २७ 
मार्ग सारली अन्‌ सारं कारही आईनं सांगितलं तसं जमलंच अद्या समाधानानं 
कमरेवर रब्माईसारख दोन्ही हात ठेवून ती साऱ्या सरंजामाकडं फुललेल्या 
चेहेऱ्यानं पाहूं लागठी. 

“ अग बाई ! सारंच तुसळ केरात - अजून नेवद्याचं राहिळेच की. 
एवढ्यात ता आला तर - २' अस आपल्याद्यीच आईच्या पाक्तपणानं म्हणत 
ती पळत पळत स्वयपाक घरात गेळी. 

५ काय ग हो अवतार कमळे ? - आणि हे. गितोडे कसळे सगळ्या 
कथाळभर अन्‌ परकरावर - कुटं उघळळी होतीत सकाळच्या प्रह्री १---? 
आत्याबाई चुळीशी डाळ वेरीत वेरीत एकदम उसळल्या --- 

: उघळले नव्हते मी काही ! अस काय ग बोलतीस आत्या ! उघळायला 
झी काय गोठ्यातळी कालवड आहे १? ?' 

“६ ती बरी तुझ्यापेक्षा ! एकदा दाव्याला बाधून घातली की गप्प राहते. 
पण तं म्हणजे मुलखाची अवखळ झाली आहेस. शोभत नाही ह आतां - 
ओोरीच्या जातीला, लहान कां आहेस. वारावं सरेल वैशाखात---*? 

“ म्हणजे मी मोडी झालें होय £ वा ग आत्या - बापू माझ्या।क्षा तीन 
वर्षांनी माठा आहे - त्याला म्हणतेस, '।* माझं बाळ त - एवढ्यादया वयांत 
परक्या ठिकाणीं राहिल्यं.'? अन्‌ सत्रा नवस बोलतेस -- 

:- तर तर - त्याची बरोबरी करायला बघते - नक्षी काही भ'ऊबंदीण, पण 
आक्काबराई, तो आहे मुलगा. दोलतीचा खाबर आहे- तू जाशीळ पाय लावून 
आपल्या नवऱ्याच्या घरीं - ती एक काळजीच भरीला - अन्‌ त्यातन हा 
सअसळा अवतार-र-? 


५ कसला ग अवतार आत्या, काही तरी बोलणं काटतस अन्‌त्यात कामाचं 
ण्ल्या क डा स्नज य... 22 
कुठल्या कुठं राहून जातं 
५: त्र काय ? माटी कामाची पडलीस कीं नाहीं? कधी हाताखार्ठी 
सापडशीळ तर शप्पत, रामा-दावा-गाविदा-- ? 
५:६८ आज नाहीं ऐकून घ्यायची तुझ ब लणे; बरं का आत्या - आज खूप 
काम केलय मी--- ?? 


रट &वणाची मासोळी 

“६ काय दिवे लावलेस - कीं हें अंग अन्‌ परकर एवढं बरबटून घेतलंस 
याची संपादणी करायला लागलीस १-- चार अक्षरं आली कीं तांडानं चुरु 
चुरू करायला तेवढं तयार--- ? 

८६ मी तुझ्याशी बोलतच नाहीं. आईलाच -- ” 

“ हो. तेवढं निमित्त काहून तिला नका त्रास द्यायला - सांग काय 
असेल तं -- ?? 

£६ घोल तूं - बोल तूं १ आम्हीं एवढी पूजेची सारी तयारी करून ठेवावी 
अन्‌ नवेद्याला काय द्यायचं म्हणून विचारायला आलें तर-- ? 

“€ कार्टे, तुळा कुणी सागितले होते हे नसते उपद्व्याप १? कशाला गेलीस 
कडमडायळा त्या देवघरात १- सारी शिवाशिबी करून ठेवली असशील--- ?? 

“६ उगीच बघायच्या आ्थाच कारही तरी बाळे नकोस आत्या -- मी अंग 
धुवून, लांध बसून सारे केलंय - गध सुद्धां उगाळून ठेवलंय-- ? 

*' त्याचाच सारा राडा वाटतं हा अंगावरचा. जसं काही येतेय सारं ! 
कुगी सांगितलं होतं तुला ? घेतलं असतं त्या रघ्य़ानं उगाळून - का त्यानंच 
सोडला हुकूम तुला १? मेळा भट तो भट पण त्याची फारच मिजास झालीय 
आतांशी -- आता बोल कीं. गप्य कां खेटरं मारल्यासारखी -- परधार्जीण 
कुठली ! 

“ त्यानं कांहीं मला सांगितलं नव्हतं - उगीच कां त्याला बोलतेस काहींच्या 
बाही. मला नेवेद्याचं सागतेस का आईला विचारू 

:: तर तर. त्याची कड घेतो आहे - कोण ग तो तुझा १? अन्‌ म्हणे 
आईला विचारू का- जशी काही तुझी आईच करती आहे सगळे- 

६ घोळ तूं - बोळ हवी तशी - मी आपली आईलाच विचारतं- 

कमळी रडकुंडीला येऊन बाहेर जायच्या तयारींत होती. तेवढ्यात तो 
सारा गलका ऐकून तिची आईच तिथें आली अन्‌ काय झालं याची चोकशी 
करूं लागली. 

५६ डोवटीं आलंच ना तुझ्यापर्यंत ! मी तरो काय करूं बाई -ही तुझी 
छेक बघ - फार शहाणी झाली आहे आज. कुउं देवाच्या पूजेवे करीत बसली 


लवणाची मासोळी २९ 
होती. त्याचं काय म्हणा -- चागलंच ते अन्‌ यायलाही हबं - पण हा असा 
अवतार करून घेतलाय म्हणून त्याच्याजद्दळ जरा विचारलं तर त्या ख्याची 
कड घेऊन माझ्यावर वसावसा ओरडायला लागली, संभाळ ग बाई हिला - 
आता लहान का आहे - या बयात आमच्या मंगळागौरी संपल्या होत्या “ 
पण हिला कारह्दी सुमार नाही. कशाला निघाली त्या भटाच्या पोराच्या पुढे 
पुढं करायला कुणास ठाऊक--- ?? 

“ काही तरीच आपलं - तिचं बय केवरं, ती केवढी - ती काय पुढं 
पुढं करणार आहे ! ---? 

:: अग, तुला आपली लेक लहान दिसायचीच |! पण जगाला का ती 
लहान वाटणार आहे ! देवाला गेले तर मला विचारतात जायका - कमळीला 
न्हाण आलं का म्हणून ? लम्नाचा बेत कधींचा १ ? 

:£८ टूटशा -- काय तरी विचारणं - त्याला ना आगा ना पिछा--- 

:£ आगा - पिछा आणखी कसला असायला हवा - ही एवदी वाढलेली 
दिसते ना आहे ना गांवाला -- मग लोकं विचारयचीच. अन्‌ नाहीं विचारलं 
लोकानी, तरी मी म्हणते, आपलं आपण समजून नको का वागायला आता - 
काय हिचं अडलं होते म्हणून गेली ते पूज़ेवं करून ठेवायला ? त्याने सांगितलं 
असेल अन्‌ लगेच लागली ही तो म्हणेल तशी नाचायला --- ? 

६ तो कुठला सागतोय - त्याची परीक्षा आली ना आता म्हणून मीच 
कमळीला सागितडं होतं - तेवढं पूजेचे करून ठेवीत जा म्हणून हिलाही 
यायला हवेच कीं हें सगळे आता हळूं हळू --?” 

“ काय ! तूं सागितलंस £ मग माझ बोलण खेटलं. हिला यायला हवं 
म्हणून का हिनं भटाच्या पाराला पूजेचं करून द्यायचं ! म्हणजे न्नागळीच 
राहील आमची शोभा ! आधींच बाप-लेक दोघेही वाटेल तस वागता-- 
बोलताहेतच. तो कृष्णंभट तर मेळा तुझ्या बाळंतपणावरनं अप्पाना वाटेल 
तसं बोलला परवा -- जणूं कांदी याच्या पडशींतले डाळ-तादूळ मागत होतां 
आम्ही तुझं पोट-पाणी पिकलं तर. अन्‌ त्याचाच लेक तो र्या. मेल 
तोही अगदीं बापाच्या वर कडी - उमट आहे. त्याला ही कमळी पूजचं करून 
देणार - नको ग बाई - त्याच्या परीस माझ्या हाताखाठी स्वयपाकपाणी 
शिकू देत--- ?? 


३० लवणाची मासोळी 


६६ स्वयंपाकपाणी शिकायला हवच - शिकेल आपल्या हाताखाली. पण 
रघू कांही तसा वाईट नाहीं हो - पोरगं इतकी कामं करून अभ्यास करतं -- 
हुशार आहे म्हणून निभते त्याचं त्याला. आतां त्याची परीक्षा आली 
म्हणून तर-- धी; 

“ घरचीच अशी सामील झाल्यावर मी काय बोलणार भाई ! पण सागून 
ठेवतं आपली - काळ्या दगडावरची रघ समज - त्या पोट्यांच्या गरिबीच्या 
मुद्रेर जाऊं नकोस -- त्याचीं लक्षणं काही ठीक नाटीत-- ? 

५६ आपल्याला काय करायचंय त्याच्या लक्षणाशीं - आपल्या इथे तो 
नीट वागतोय ना - आहे सध्या त्याची अडचण तेव्हा होईल तेवटं करावं. 
उचळून थोडेच देतोय आपण त्याला--- ? 

“६ कशी बाई तुला एवढी त्याची भुरळ पडली कोण जाणे ! पण माझं 
ऐकून ठेव - तो भट अन त्याचं तं पोरगं - दोघंही अगर्दी इब्लीस आहेत. 
उद्यां टस होईनासं झालं तर 'तुमची कमळी द्या, म्हणायला कमी करायचे 
नाहींत जाप-लक दोघेही; बरं का - सावध ऐस. 

८६ कांहीतरी आपलं मनांत आणायचं - कमळे, तू कशाला मोठ्या 
माणसाची बोलणी ऐकत उभी राहिलीस, तुला काय पाहिजे आता ? 

:६ झो कांहीं तुमची बोलणी ऐकायला आले नव्हते - नेवेद्याला काय 
ठेवायचं तेवढं मला सांगा--?” 

८ म्हणजे अजून ठेवलं नाहींस का १ - जा ठेव जा एक गुळाचा खडा 
डब्यातला --? 

कमळी तिथनं निसटली. तिनं गुळाचा खडा देवघरात नेऊन ठेवला तेव्हा 
रघूनं देवांना पाणी घाळून ते पुसायळा सुरवात सुद्धा केली होती. आत 
आत्याचं अन्‌ आईचं बोलणं चाललेल अजून ऐकूं येत होतं -- ' केव्हा आलास ? 
म्हणून रघूळा विचारावं असं मनांत येऊनसुद्धा कमळी मुकाऱ्यानं गुळाचा 
नेवेद्य ठेवून तिथनं बाहेर पडली. तिच्या चेहेऱ्यावर एकदम लाज आली -- 
आत्याबाईनी सावध करायसाठी म्हणून उच्चारलेल्या विचारानं कमळीला 
निराळ्या जगात आणून सोडलं, रघू - खूर्शी आपलं लयन होईल काय १--- 
पण छे या विचारांत सरळ ती सांपडर्ल ।नव्हूती. खेडेम्ांवच्या चालीप्रमाणं --- 


लवणाची मासोळी ३१ 
ब्लोलण्याच्या वहिबाटीत लय़ाचा विपय येणं ही चीज कमळीला नवी नव्ह्ती --- 
पण ही त्यात सापडली ती. तिरकसपरणे - तिळा हेका आली रघूने आत्या- 
आर्टैच बोलणं किती ऐकलं कुणास ठाऊक ? - त्याने तं लय़ाबदलचं ऐकलं 
असळ तर - खरच का तो कर्धी आईला विचारील - हो आडेलाच -- 
कारण अप्या -- आत्याशी तो बोलतच नाहीं - की त्याचे वडीलच अप्यांना 
सागून टाकतोल - मग मात्र-र्‍ 
>< ज्र >< 

स्टेशानपळीकडच्या टकडीआड सूयाचे निबर बुडायला लागळं होत. मारग- 
पुढे माणसाचा पायरव अजित्रात ऐकायला येत नव्ह्ता. कनालकाठच्या पाऊल 
वाटेवर अघार साकळाथळा लागला होता. रघूनं चमकून माग पुढे पादिलं. 
फलांगाच्या दगडानं त्याला सागितलं, नुसत्या कनालचे अंतर दोन मेळ काटलं 
होत. एकदम भानावर आल्यासारखा होऊन खून तोंड फिरबळ अन॒ उलट 
दिशेन ता घरी परतायला लागला. 


घराच्या दिशेने रघू निघाला तरी घर म्हणताच त्याळा वडलांची कोयिष्ट 
मति अन्‌ श्राद्ध-पक्षाची आमत्रण याचीच आठवण झाली. अन्‌ त्या श्राद्ध- 
पक्षाच्या जेवगासाठीं जायच ते उजाड बाडे, पडकीं घरं - अन्‌ तो लाचारी, 
अजीजी - काय हं असंच चालायच - सारखं सारखं हृंच करीत कायमचं 
रहायचं. हें नको हात खघूला याच्याहून कांहींतरी वेंगळ होतं. पाहिला नंबर 
मिळवणाऱ्या मुलाची उमेद निराळी होती - पण त्या उमेदीपा्शीही उभे ठाकले 
त्याचे तेच कोपेष्ट बडील - एकटे नव्हे - त्याच्या पुढें ताडू ताड बोलणारी 
आल्याबाई, दुस्वास करणारा बापू - याच्या घरात चोवीस न चोबीस तास 
काढायचे - वर्षानुवषष काढायची -- 

भरकटतां भरकटतां रघूच्या डोळ्यांपुढून आठवणींत राहण्यासारखे होते 
तेवटे प्रसंग येऊन गेले तरी त्यांची तीव्रता त्याच्या भटकण्यांत व्यत्यय यावा 
इतक्या रीताने जाणवली नव्ह्ती. पण या सगळ्यांतून वर्षानुवषे आत्याबाईच्या 
हाताखालीं राहण्याचा विचार आल्यावर मात्र त्याची घरीं वळलेली पावलं- 
सुद्धां क्षणभर थबकली. रघूने त्या दिवर्शींच आत्याबाईचं सारे बोलणं ऐकलं 
होतं, त्यावेळींच त्याच्या मनात आलं होतं, सरळ पूजा अधवट सोडून तरातरा 


२२ लटवणाची मासोळी 
स्वयपाक धरत जाऊन अत्याबाईच्या पुढं उभं रहाव अन त्याना ताड्ताडू 
बोळून व्याबं - काय बोळून घ्यावं हे त्यानं ठरवल नव्हत - पग काही तरी - 
आत्याब्रादच्यापक्षाही जास्त आवाज चढवून बोलन घ्यावं असं त्याच्या 
मनात आलं - काय बोलायचं हं ठरवताना मात्र त्याच्या डोळ्यापुट कृष्णं- 
भटजी अन्‌ त्याचा तो पाठीवर वळ उठवणारा मार आला. आपण काहीं 
बोलला तरी आत्याबाई कांगावा करणार - “' कमळीला मागणी घातली - 
चक्क तिचा हात कीं हा घरला ? असं म्हणायला आत्याबाई आणि तं खरं 
मानायला आपले वडील दोघंही मार्ग घेणार नाहींत. या भीतीनंच त्या दिवशी 
सगळे ऐकूनसद्धां मनातल्या मनांत जळफळत खूनं ग्काट्यानं पूजा उरकली. 
पण आता ती आठवण आल्यावर मात्र क्षणभर थजकून रघू जो पुनः 
चालायला लागला तो अंधाराची पर्वा न करता - त्यादेळीं कुणालाही वाटलं 
असतं काळोख पडल्यामुळं बामनाचं पोरगं घाबरून भराभरां निघालंय - पण 
त्याला भीतीचं किंबा कशाचं भानच नव्हतं - आपण आत्याबाईना काय 
बोलायचा बेत रचीत हातो याची आठवण होऊन तो ता यिंजू लागला होता. 
सातवीच्या परीक्षेत दोनदां नापास होणाऱ्या बापूयेक्षा किवा त्याच्यासारख्याच 
दुसऱ्या एखाद्या इनामदारापेक्षां आपल्यासारखा हुषार नवरा कमळीला 
मिळाला तर तें निदान तिला सुखाचं होईल - पण ह्या जुळणींतलं कमळीचं 
सुतव ही आपली बाबत नव्हे म्हणून तेवढा माग रघू पुसून टाकायला तयार 
झाला होता. त्याला एवढच वाटूं लागलं कीं अशी काय मिजास या इनाम- 
दाराना लागून राहिली आहे की त्यानी वेळी अवेळी भटाचं पारं म्हणून 
माझा पाणउतारा करावा अन्‌ माझ्याशी कमळीचं लग्न व्हायचं म्हणज मोठं 
ऑरिष्ट मानावं. एवढा उणेपणा कसला आला आहे ? सारा उपहास अपमान 
गिळीन -- कोरगावकर बुवानीं कीतनांत सांगितलं होतं ना की, रोंकरानं विष 
पचवलं - तस सारं पचवीन अन्‌ यांना समजून येईल कीं रघू म्हणजे कांही - 
मधेच एका वस्तीबरचं कुत्रं भुकलं - रातकिड्यांची किरेरे आवाजी जोरात 
ऐकू येऊं लागळी कनॉलकांठची पायवाट संपत आल्याची रघूळा जाणीव झाली. 
रघू म्हणजे कांहीं तसा स्वझाळू नव्हे पण शंकराच्या विषाच्या निमित्तानं कोर- 
गांवकर बुवांची आठवण होताच त्याला अंबूवरनं जापूनं कलेल्या थट्टेची आठवण 
झाली - अंबू आणि कमळी - कमळी तर रोज घरांत राहणार, बापू पहारा 


लवणाची मासोळी २३ 
करणार आणि आत्याबाई कुमाडं रचणार. पुनः त्याचं मन धादरटासारखं 
घाबरायला लागलं, आपला सद्रा घामानं मिजतोयू की काय अशी इंका 
आली, त्या भरांत त्यानं छातीशी हात नेला. जानवं हाताला लागतांच 
त्यानं एकदम चमकून डावीकडे पाहिलं. कनाल संपून गाववाटेला लागलं की 
मर्धेचे एक जुनाट वड लागायचा. त्याच्याबद्दलच्या बऱ्याच आख्यायिका 
होत्या. त्या वडाच्या जवळ आपण आलोय हें ओळखून खूनं हातांतलछं 
जानवं फिरवून बह्मणाठ पकडली. अन्‌ तोंडानं ' राम ?) ' राम ' म्हणायला 
सुरवात केली. 


बडाच्या पलीकडे आल्यावर रघूला आपले पाय भेंडाळून गेल्याची 
पहिल्यांदा कल्पना आली, जाता-येता सहा मेडांच्यावरची एकंदर मजल 
त्याच्या आंबाक्यांतली नव्ह्ती. अजून जबळ जबळ एक मैल अंतर काटायचं 
होतं. आठाचा सुमार तरी झाला असेल, केव्हां एकदा घर गाठतोय एवढंच 
उरलं - तसतसा रघू पावलं मोजीत चालूं लागला. त्याचं मन स्वच्छ झालं--- 
पार धुवून निघालं. उद्या काय होणार ह त्यानं ध्यानांतच घेतलं नार्ही. 
आतां या क्षणी घरी जाऊन पांचायचं अन्‌ दोन घास पोटांत ढकळून आडवं 
व्हायचं, एवढंच त्याला आठवत होतं--- 


अ 


शिवपुराच्या प्रथम दरीनानं रघूच्या मनावर अनुकूल परिगाम असा काहीं 
केला नाहीं. एका लहानश्या कां होईना पण संस्थानाची राजधानी असलेलं 
ते गांव, पावसाळ्याच्या पहिल्या ताडाला रघूच्या खेडेगांवाइतकच गलिच्छ 
दिसलं. चिखलाने बरबटलेले रस्ते, त्यांच्या अरुंदपणांत भर घालायला आलेले 
डाहरीपणाची मिज्ञास दाखवणारे दिव्यांचे खाज, माणसा-जनावरांच्या अनू 
कडेच्या दुकानाच्या गक्षीनं कोंदटपणांत पडणारी भर, ह्या सगळ्यानी सख्घूला 
अधिकच गुदमरून टाकलं. टांग्याच्या हादर्‍्यांनी : बेलगाडीच्या धकक्यांनाहि 
मागे पाडलं. अप्पार्नी त्यांतल्या त्यात स्वस्त आणि सोयीची म्हणून बोळकर्डी- 
तळी जागा बघितली होती. तिचा तडाखा टांग्यांतर्ली ओझीं मोठ्या रस्त्या- 
पासून साऱ्या बोळभर वाहून नेताना रघूला बसला. पण त्याच्या पाठोपाठ. 
शद्दरी माणसाच्या अगत्य-आतिथ्याच्या अभावाने आत्याबाईची नागी नरम 
झाली. मुद्दाम परंठिकाणीं आणून टाकलेला म्हणून बापू खटूट होताच -- 
अन्‌ त्या दोघाच्या विराधाला टिच्चून आलेली कमळी आपोआपच एकटी 
पडली होती. 

एकंदर्रीत चौघांच्या चार तऱ्हा असा प्रकार इनामदारांच्या बिऱ्हाडांत 
झाला असला तरी त्याच्यात एक साधारणपणा कळत-नकळत येत होता. 
अपरिचित शहरी रहाणीच्या हिसक्यानं आत्याबाईचा पहिला नूर पालटू लागला. 
त्यानंतर त्याना चिंता उरली ती उचलल्या खर्चाची | त्यांचं काळीज लख्ख 
व्हाव असा खर्च पावलोपावली होत होता. दहाची हिरवी नोट खेडगावांतल्या 
इनामदारांनासुद्धा आप्रुवाईची चीज बाटायची-पण इथं तिची बोलबोल म्हणतां 
चटणी उडायची ! आत्याबाईर्नी आपल्या हातानं कैक जाया-बापड्यांना 
: एवढ॑स ताक * म्हणून तपेल्या भरून दिलेल्या - पण इथं ताकाचं ते फुळक- 


लवणाची मासोळी ३५ 
बणी सुद्धां विकत आणायचं १ अश्शी आत्याबाइईच्या तोंडची यादी करायची 
तर ती एक कथाच होऊन बसेल. बापूच्या मनाविरुद्ध प्रत्येक गोष्ट घडत 
होती. आर्धी दोन वषाचे स्नेही सोबती सोडून अन्‌ तेंही बिऱ्हाडाचे 
लचांड धेऊन यावं लागलेल. पण याच खापर तरी निदान अप्पांच्या मार्थी 
फोडायला येत होते. त्यानं होऊन बृहस्टएतीच्या शहाणपणाचा आव आणून 
दोन्ही मोठीं हायस्कूलं सोडून खाजगी झासांत नांब घातलं - त॑ मात्र त्याचं 
त्यालाच अवघड झालं. पांचवीची परीक्षा पास व्हायची नाही हा हिशोब 
मुळांतच ठरलेला. पण या छासांत इंग्रजी शाळेची चव म्हणून नव्हतीच. सारी 
मुलं खेड्यावरने आलेली आणि तींही पैसे - वरध्रे बांचबा अन्‌ शिकून घ्या 
म्हणून हांवरलेली -- अगर्दी गांवंदळ, शाहरच्या बाऱ्यापासनं दूर, त्यांतल्या 
एकाशी ओळख करावी अस जापूला वाटेना. कमळीनं तोंडाचा फटकळपणा 
कितीही दाखवला तरी मनांतून ती चरकूनच होती. आत्या - आपूर्शी 
पटायचं नाहीं; रघूर्शी कांही बोलायचं नाही. करावं तरी काय £ - अन्‌ 
त्यांतनं खेडवळ पद्धतीनं केव्हा लग्नाची उचल घेऊन कुठं ढकळतील त्याचा 
नेम नार्ही, 

--"पण हे सारे इनामदारी ढंग झाळ. रघूला त्याच्याशीं कारही कर्तव्य 
नव्हतं. त्याला एकदां शिकायला मिळाल्यापासून त्याने ह्या घरांतल्या जाबींकडे 
लक्ष द्यायचं नाही असं ठरवून टाकलं. त्याला असमाधानी व्हायचं तसं 
कार्हींच कारण नव्हतं. पण कुणाला कशाचं अन्‌ कुणाला कशाचं - तर रघूला 
रिकामीच चिंता लागली, घरांतलीं पडतील तेवदीं कामं अन्‌ नुसत्या इंग्रजीचा 
टीचमर अभ्यास, यांना पुरून त्याचा बेळ उरू लागला. चार साडेचाराला 
दुपारचा चहा आवरला कीं पुढं रात्र पडेपर्यंत वेळ कसा घालवायचा हेंच 
त्याला कळेनासं होई. लहानपणापासून मित्रांच्या बाबतींत टक्केटोणपे खाऊन 
तो कांहींसा माणूसघाणाच बनू लागला होता अन्‌ नव्या ठिकार्णी आपल्या- 
सारखे मित्र तरी मिळताहेत सहजासहजीं थोडेच ! 

त्या रिकाम्या आणि आळशी अवबस्थंतून बाहेर पडण्यासाठी रघूने पुढ 
त्याचो संवय बनून गेलेली हुकमी युक्ति अंमलांत आणली, पांचाचा ठोका 
पडला कीं त्यानं बिस्दाडांतनं बाहेर पाऊल टाकायचं. खुणेसाठीं निरनिराळ्या 
अक्षरांत लिहिलेल्या पाट्या वाचीत किंवा घरांच्या वेगवेगळ्या दरवाजांच्या 


३६ लवणाची मासोळी: 
लकब्रा पहात तो एकेका रस्त्यानं रस्ता संपेपर्यंत किंवा पाय भेंडाळेपर्यंत 
भटकत जायचा, ही पाट्या वाचायची संवय तर त्यांच्या अंगी इतकीं भिनून 
गेली कीं कुठल्याही ठिकाणाचा पत्ता तो पाटीच्या खुणेनं सांगायचा. पुण्यात 
गेल्यावर त्याला अप्पा बळवत चौक किंबा टिळक रोड यांनी कांही बोध 
व्हायचा नाही पण मोडी पाटी किंवा डा. गुण्याचा रस्ता असलाच शाब्दप्रयोग 
करून आपल्या मित्राच्या थट्टेचा विषय व्हायचा. 

असाच भटकत भटकत रघू शिवपुस्व्या मागच्या रस्त्यानं दूरवर गेला अन्‌. 
चिंचेच्या बनांत जाऊन थाबला, तिथं एकदम माणसाचा पायरव वाढलेला 
दिसला म्हणून बनांत शिरून पायवाटेनं त्यानं पुढं जाऊन पाहिलं. चौकशी 
केल्यावर आपण तिथल्या प्रसिद्ध गणपतीच्या दवळापार्शी आलां हे त्याला 
कळलं - चागल्या ठाकठीक पोझाखातर्ली सुशिक्षित माणस॑ भाविकपणानं 
गणपर्तांच्या दर्शनाला आलेली पाहून त्याला उगीचच गमत बाटली. तसं 
त्याच्या मनात देवाघर्माविषर्यी अजून कारही विपरीत आलं नव्हत - उलट 
मिक्षुकी बातावरणांत त्याची श्रद्धा पोसलेली होती, त्यानं अगदीं झुद्ध भावानं 
गणपर्ताचं दर्शन घेतलं. तरीसद्धां त्याला कांहीतरी खटकल्यासारख॑ वाटतच 
राहिलं. काय तें त्याला समजेना --- 

तसं पाहिलं तर त्याला शिवपुरांत अनेक गोष्टी खटकल्या होत्या. शह- 
राच्या म्हणून त्यानं ज्या कल्पना केला होत्या त्याच्याशी कशाचाच मेळ बसत 
नव्हता. गावात अजून विजेला ठिकाणा नव्हता. आपलं पहिलं ठिकाण यापक्षां 
लाखपटीनं चांगलं हें बापूनं त्याला अनेकदा ऐकबल होतं - रघूच्या आयुष्यांत 
अजून दुसरं शहरच आलं नव्हतं - तरी त्याला आपलं कांहींतरी वाटायचं ! 
संस्थानची राजधानी म्हणून काहीतरी वेगळं दिसायला पाहिजे अशी आपली 
त्याची समजूत होती; पण इथं तर एका राजवाड्याशिवाय सगळा मामला 
खेडेगाधीच दिसत होता. त्यानं भूगोलात इथल्या मिलचे नांब वाचलं हातं 
पण मुंबईच्या गिरण्याची चित्रं पाहिली होती त्याच्यासारखं इथं काहीं नव्हूतं-- 
शिवपूर म्हणजे त्याच्या हिदोबी कोरं पुस्तक होतं. 

रघूला त्या गणपतीची झालेली माहिती त्याच्या उपयोगी पडठी तीही 
अगदी अचानकपणे, त्याला जी गोष्ट खटकत होती, तीच आत्याबाईना 
समाधान' देत होती. तिथल्या भाविकपणाच्या एकंदर कातावरणानं आत्य़ाबाईंना 


'ढबणाची मासोळी ३७ 
त्यांतल्या त्यांत बरं वाटायचं. श्रावणाचा महिना आला तसा त्या भाविक- 
पणाला बहर आला आणि आत्याबाईर्नी गणपतीला जायचा बेत ठरवला. 
नेहमीप्रमाणं बापूनं हुडूूत केलं. कमळीला भटकायला हवं होतं पण तिला 
तरी वाट कुठं ठाऊक होती ? रखघूनं त्या दोषींना बार्गंत गणपतीला न्यायचं 
कबूल केळं, आत्याबाईना तेवढंच बरं वाटलं 

नाहींतरी अलीकडे रघू फारच निवळायला लागला होता. दुपारच्या 
चेळेला तो कांहीतरी संस्कृत पाठ करीत असलेला दिसायचा. त्यामुळं एकतर 
कमळीला लुडबुडायला बाब मिळायचा नाही आणि आत्याबाईंच्या कानावर 
अनायास देवाची चार अक्षरं पडायर्ची. नाहीतरी उपाध्याचा - या खेपेला 
आत्याबाई भटाचा म्हणाल्या नाहींत - मुलगा आपल्या बळणावबर गेल्याशिवाय 
रहायचा नाहीं. त्याच्या त्या पाठांतरानं कमळीला मात्र उगीच गुदमरल्यासारखं 
व्हायला लागलं. तेव्हां तिन विचारलं, “' रघू , तुम्हाला तिसरीतच संस्कृतचा 
अभ्यास असता का रे ? '' खघूनं सांगितलं, “' अभ्यासासाठी नाही, पण 
एक काम आहे म्हणून गीता पाठ करता आहे” मात्र काय काम आहे याची 
त्यानं दाद लागू दिली नाहीं, नियमानं गीतेचे तीन अध्याय पाठ करून खघूनं 
गीता-जयेतीच्या दिवशीं गीता पाठाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि शुद्ध वाणीने 
आपला पाठ म्हणून एक गीतेचं पुस्तक आणि तीन रुपये रोख तो घरी 
शब्रेऊन आला. 

स्वतःच्या कमाईचे ते पहिले तीन रुपये घेऊन येतांना रघूला आतेदाय 
आनंद झाला, गीता-पाठ म्हणण्यांत रघूची धार्मिक भावना उचंबळून आठी 
किंबा आपण उपाध्ये म्हणून हँ त्याला करावंसं बाटलं अद्यांतला भाग नव्हता. 
त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं तीन रुपयांच्या रोख बक्षिसानं. आपल्या 
शिक्षणाला असलेला इनामदारांचा आधार केव्हा एकदम सुटेल त्याचा नेम 
नाहीं अशी भीति नेहमीं रघूला वाटायची. आणि आपले बडील सध्यां 
देतात ते चार-पांच रुपयेसुद्धां इनामदारांच्या घराबरोबर सुटणार या- 
विषयी त्याला हेका नव्हती. असं झालं तर काय करायचं हँ त्यानं ठरवलं 
होतं असं नाही. पण शिवपुरांत आल्यापासून आपण कांहींतरी पाय हालवीत 
असावं असं त्याच्या मनाने घेतलं होतं. दहा-अकराच्या सुमाराला “' उ 
भवती ?? करणारीं बरोबरीची मुलं, दर रविवारी ' प्रभाते मर्नी ' म्हणून 


- लवणाची मासोळी 
आश्रमांतून बाहेर पडडून मिक्षा मागणारे विद्यार्थी यांच्याकडे पाहिलं कीं 
रघूला विलक्षण लाज वाटायची, यांच्यापेक्षा दोन वेळ आयतं जेवण मिळून 
आपण शिकतांय्‌ - ते किती सुस्थितीत. या स्थितीला जाऊनसुद्धां आपलं. 
शिकणं पुरं करायची तयारी असायला पाहिजे -- केवळ मिळतं आहे म्हणून 
स्वस्थ रहाण्यांत काय अर्थ आहे १ वयाला न क्षेपणारे हे विचार रघू पचवीत 
होता; अन्‌ झापल्याला झेपेल तेवढं तरी करायला लागायचं हं त्यानं ठरवलं 
होतं. म्हणूनच गीतापाठाचं आपल्या आवाक्यांतलं काम केल्यावर मिळालेलं. 
बक्षीस घेऊन तो खुधरीनं घरी आला. 

£ कसलं रे नवं पुस्तक आणलंस ! अन्‌ पैसे कुठनं घेतलेस १ *? 

“६ बघ की ! पैसे देऊन नाही. आणलं कांहीं. त्याच्याबरोबर पैसे पण 
आणले आहेत--- 

कमळीला गंमत वाटली, पैसे न देतां पुस्तक अन्‌ वर पैसे ! त्या बक्षिसाची 
हकीकत ऐकून तिनं आत्याला हांक मारली -- 

£ काय म्हणतीस कमळे - पुस्तक ? मला काय त्यांतळं कळतय-- ! ? 

५६: अग, रघूनं गीता आणली. त्याला बक्षीस मिळाली अन्‌ पैसे पण-- 

“ बक्षीस १ - अन्‌ आधीं नाही बोलला त्याच्याबद्दल-- ” 

“ आता तर मिळालं. आर्धी कसं बोलणार-- १ ? 

: बरं झालं -- बापूला शीक म्हणावं असलं काहीं तरी - ?' आत्याबाहे 
कधी नाहीं त्या बापूच्या उलट आणि खूबद्दल बरं बोलल्या -- 

“६ त्याला काय करायचंय असलं शिकून--- 

£ त्यांत बाईट काय आहे ? चागलं देवाधमोचं-- 

९ ते मला तरी कुठं कळतंय आत्याबाई - मी आपला बक्षिसाच्या आशोनं 
गीता पाठ करीत होतो झालं-- ?? 

“ हात मेल्या; केलं सवरलैस सगळे - आणि आतां असं बोलून आपल्या 
हातानं त्याच्यावर पाणी ओततोस होय ? सरळ आपला म्हणतोस बक्षिसाच्या 
आद्ोनं केले-- ? 

६६ मृग त्यांत काय बिघडलं १ मला पैसे हवे होते - तेवढेच फीला उप- 
यामा पडतील म्हणून केली धडपड--- ? 


लवणाची मासोळी ३९ 


“ म्हणजे ! त्या तीन रुपड्यांसाठीं का एवहं रक्त आटवलंस - काय तरी 
अगोचरपणा -- इश्रं काथ तुला कमी पडलं होतं £ पण म्हणतात ना शेळी 
जाते जिवानिर्शी--- *? 

“८: तसं नाहीं आत्याबाई - तुम्ही सगळं करताहांतच. पण उगीच तरी 
किती म्हणून भार टाकायचा १ आपलं होईल तेवढं करावे --- ?? 

“६६: आतां कर हवी तशी तोंडदेखली संपादणी, जा मेल्या; तूं असाच-! 

पण रघूनं आत्याबाईचं हें शेवटचं बोलणं पुरतं ऐकलं सुद्धां नाहीं. तो 
आफ्ल्याच नादांत होता. “ आपर्ल॑ होइल तेवढं करावं ? हें त्याने आत्या- 
बाईना समजुतीकरतां सागितलं होत - पण त्याचा अर्थ या तीन रूपयांच्या 
बक्षिसापेक्षां फार वेगळा होता हें रघूशिवाय इतर कुणालाच ठाऊक नव्हते. 
त्यान पोस्टाच्या बॅकेत पंचवीस रुपये शिलूक टाकळे होते हं खघूचं खास 
शुपित होतं खाजगी क्लासांत नाव घातल्यावर नादारी मिळण्याचा प्रश्न 
नव्हता. म्हणून एकदा नांव घाळून झाल्यावर कृष्णंभटजीर्नी कुरकुरत कां 
होईना रघूला फी पुरते चार-पाच रुपये द्रमहा पाठवायला सुरुवात केली होती. 
पण त पैस जसेच्यातसे फासाठीं म्हणून खचून टाकायचं रघूच्या जिवावर 
आलं होतं. त्यानं भोत भीत आपल्या मास्तराजवळ विषय काढून पाहिला. 
छझुासला जाऊन महिना होऊन गेला होता. रघूनं विचारलं त्याला आाठ दिवस 
होऊन गेल्यावर त्याच्या मास्तरानी एक दिवस तो बिषय काढला - ?? मग 
काय जोशी, क्लासची फी देणं तुला परवडणार नाहीं म्हणतोस £ ” 

५६ होय सर, वडलानीं सागितलं होतं, नादारी मिळवून शिकणार असलास 
तरच शिकायला जा -- ?? 

६६ मग नांव घालायच्या वेळींच तसं सागितले असतंस तर तब्हांच्या तेव्हां 
तुला सांगून टाकलं असत -- खाजगी क्लासात रे कसली नादारी ? ?? 

६: नांव घालतांना तसं वाटलं नाहीं. मला ते ठाऊकच नव्हतं. ? 

“६: मृग आता गेले की नाही तुझे पाच रुपये फुकट, आर्थी विचारलं 
असतंस तर ते वांचळे नसते का १ ? 

६ हो पण--भं...अं...?? 

६ क  अडखळतोस का ? --्बोलना ? 


४० लवबणाची मासोळी 


भाक शा ला ला काका आ आ वह क ७७ आकडी शा का का भा अड 9 ७ हा ७७ काया का ला आ शा का ला का ळा का का का ७७% ७ का अ कका भक क शका कत आह शात धक कि 


५: पैसे बांचले असते पण शिकायचं राहिलं असते ना--- ! 

६६ तुला दोन्ही हवंय होय ? -- पण फुकट कोंण शिकवील ? माझा हा 
पोटाचा धंदा आहे-- ” 

८६ हू मला वाटलं होतं मराठी शाळेत माझा पहिला नबर होता. तसाच 
इथं बर नंभर राहिला तर नादारी ---?? 

५ खरंच का तुला शिकायचं आहे - १? इथं नादारी नाही. पण तुला जर 
खरोखरीच शिकायची इतकी इच्छा आहे तर त्यासाठी कष्ट करशील १ 

५६८ हो मला झेपण्यासारखे वाटेल ते कष्ट करीन.? 

५६ तर मग उद्यांपासून ळछासच्या आधी तासभर येऊन घरांत पाणी भरून 
ठेवीत जा. आमच्या इथंही अडचण आहे. तेवढं केलंस तर तुझ्याकडून फी 
घेणार नाही. ? 

५६ त्यांत काय अवघड आहे |! आमच्या गांबी तर नदीचं पाणी आणत्रं 
लागतं - इथं नुसतं नळाचं भरायचं. पण तेवढ्यासाठी तीन रुपये ! ?? 

५ जास्त चौकशी करूं नकोस; काम कर आणि शिक्न घे. 

--आणि अशा रीतीनं रघून दरमहा तीन रुपये वाचवायला सुरुवात केली. 
पण ही गोष्ट त्यानं कुगालाच सांगितली नव्हती. इनामदारांच्या इथे कळलं 
तर बापू टिंगल करील; दुसऱ्याच्या घरचं काम धरल्याबद्दळ आत्याबाई 
फाडून खातील अशी भीति होतीच. पण त्याशिवाय म्हणजे ही गोष्ट 
आपल्या वडलांच्या कानांवर जाऊन या निमित्तानं त्यांच्याकडून येणारे चार 
“णा पांच रुपये बंद व्हायचे. खघूला ते व्हायला नको होतं. त्यानं मुकाट्यानं 
बँकेत पैसे ठेवायला सुरुवात केली. पण हे पैसे सांठवतांना आपण वडलांना 
फसवतो किंवा कमाई करतो अश्यी त्याला कोणतीच जाणीव नव्हती. घरचेच पैसे 
बडलांच्या ऐवर्जी आपण ठेवता एवढं तो मानी - त्यांत कमाईच समाधान 
नव्हतं; ते त्याला गीता-पाठाच्या बक्षिसानं मिळवून दिलं. त्या समाधानांत 
बापूनं केलेली गीता-पाठाची थट्टाही रघूनं मनावर घेतली नाही. अंथरुणाला 
पाठ लावल्यावर रात्री त्याचे डोळे भरून आले. खूप वेळ झाप आली 
नाहीं - आपण कांहीतरी करूं शकतो, कांहीं तरी करून दाखवणार आहोत. 
नक्कीच आजपासून आपल्या नव्या पऐेळूला सुरुवात झाली, असं खुप खुप 
त्याच्या मनांत येत राहिलं--- 

>< >< >< 


-ढबणाची मासोळी डर 

हायस्कूलच्या बातावरणांत आल्यावर खघुच्या जीवनाला शहरीपणाचा 
खराखुरा स्प होऊं लागला. अर्ध्या फलांगाबर घर असलं तरी सायकलशिवाय 
अडून रहाणारी श्रीमंत, ब्यापारी-अधिकाऱ्यांची मुले, नादारीसाठीं उभ्या 
राहून इझनावारी पातळं वापरणाऱ्या मुली, तीन विषयांत कसेबसे पास होऊन 
क्रिकेट-फूटनॉलच्या जिवावर वरच्या वर्गात चढणारे खेळाडू आणि यांपैकीं 
कार्हीही भांडवल जवळ नसतांना आगाऊपणा करून पुढे रहाणारे भीरवे- अशा 
निरनिराळ्या विद्यार्थ्याच्या जगांत रघूला चकल्याचकल्यासारख वाटायचं 
पहिल्यांदा, याच्या उलट बापू मात्र खुर्षीत आला होता. आतां खर खरं 
शिवपुरांत राहिल्यासारखं वाटतंय अस म्हणायला त्यानं सुरुवात केळी. पण 
त्यांतही थोडीशी फसगंमत झाली होतीच. मुली आअतलेल्या तुकडीत नांव 
घातलं गेल्यामुळं रघूला गुदमुरल्यासारखं व्हायचं तर बापू कांहींतरी खटपट 
लटपट करून आपलं नांब मुलींच्या तुकर्डीत बदळून घेण्यासाठी आटापिटा 
करीत होता. 

* रव्या लेका, तूं माझ्या वगीत असतास म्हणजे बरं झालं असत. आपण 
तुकड्याची अदळाबद्दल केली असती. 

:६ हो, छान झालं असतं - पण तूं पडलास एक वर्ष नं पुढं--' 

कमळीने मर्धेच विचारलं. “' एवढ काय गुपित चाललंय रे £ ” 

“ कांही नाहीं, तुला काय कळतयं त्यांतलं-- 

“ तर तर. तुलाच सार कळतं जसं कांही -तूं साग रे खू” 

“६ रघ्या, फोडायचंनार्ही बरंका? 

“: बरं आहे. मी पण येतं पुढच्या वर्षी तुमच्या हायस्कुलांत - मग तरी 
सगळ कळेल की नाही -- 

:: चल | तुला कोण येऊं देतंय हायस्कुलांत - बरी आहेस त्या गर्ल्स 
स्कुलात आहेस तीच. उगीच मुलाच्या शाळेंत मिरवायला नको.” 

£: घण बापू; अश्या सगळ्याच मुली गर्ल्स स्कुलात गेल्या तर मग तुझे रे 
कसं व्हायचं १ ?? 

“ रष्या, लेका, तुला काहीं अकल नाहीं. नुसता परीक्षेत नंबर मिळव तूं. 
पण बाकी सगळं शून्य -- 


४२ लवणाची मासोळी 

६ महणजे १ तुमच्या हायस्कुलात बाकीच्या मुली येतातच ना-- ? मग मी 
पण येणारच पुढच्या वर्षी ---?” 

“ बरं बरं, बघता येईल पुढच्या पुढं--- ” म्हणत जापूनं पाय काढला. 

“ अन्‌ रघू, काय म्हणालास रे तूं मधार्शी ! सगळ्या मुली गर्ल्स 
स्कुलांत गेल्या तर बापूस कसं व्हायचं --म्हणजे रे काय १ ?? 

“६ तूं लहान आहेस कमल - तुला नाहीं त॑ कळायचे --? 

“बा! बा ! आतां हायस्कुलांत गेल्यावर तूं सुद्धा बापूसारखे बोलायला 
श्विकलास वाटतं रघू £ म्हणे मी लहान आहे | म्हटलं मीसुद्धा आतां पातळं 
नेसायला लागलें आहे. आत्याबाई तर घरांतसुद्धा पातळंच नेसली पाहिजेत 
म्हणतात -- एवढी मोठी दिसायला लागलें. अगर्दी घोडी वाढले असं रोज 
म्हणतात वाटेल त॑ जसं - कांही तुला एकूच येत नाही --?? 

“६ आत्याबाईना तूं मोठी दिसतेस, पण अजून --?? 

५८ मृग काय तुला न्‌ बापूला मी मोठी दिसत नाहीं--? 

:६ तसं नव्हे ग. पण -- पण ते तुला कळायचं नाही. ?' 

“६: आणि तुला तेवढे कळायला लागलं वाटतं ? असा. कितीसा मोठा 
आहेस तूं माझ्यापेक्षा १? पण तं राहूं दे - नसलं आम्हांल्ल कळत तर नको 
कळूं देत. पण मी विचारते त॑ तर सागशील १ ? 

र्ट काय १ 99 

:६ तुमच्या वगात मुली आहेत का रे? ” 

५ हे. आहेत कीं दोन--? 

“: केवढ्या १ माझ्याएवढ्या १ की. ' ते? कळायएवद्या १ ” 

“८ अं £ तुझ्यापक्षा मोठ्या आहेत ---!? 

6 अन्‌ भापूच्या वगोत £ ? 

६ त्याच्या वगात आहेत. पण त्याच्या तुकडीत नाहींत-- ?? 

“६ तरीच ! कळलं मला बापूला मुलींच्या तुकडींत जायचं असेल-- 
होय की नाहीं ? - त्याचंच एवढ गुपित चाललं होतं वाटतं ? ” 

££ पण तं तुला कसं कळलं? ? 

“ तूं नाहींना सांगितलंस - मग आतां कशाला विचारतोस ? ? 


लवणाची मासोळी श्दे 

“ असं काय कमल ! साग ना - नाहींतर तूं त्याला चिडवायला जाशील 
अनू मींच तुला सगळं सागितलं म्हणून बापू माझ्यावर रागावेल-- ?? 

“ पण तूं सांगितलं नाहींस तर तुला त्याची भीति का १? 

“६ जसं कांहीं बापूचं वागणं तुला ठाऊकच नाहीं-- 

“6 मला कांहीं तुमच्या शाळेंतनं कळलं नाही. आमच्या वबगोत बापट 
नावाची एक मुलगी आहे. तिची बहीण हायस्कुलांत पाचवीत आहे असं ती 
म्हणाली, तेव्हां मी. पण सागितलं माझा भाऊ पाचबीत आहे म्हणून --? 

६ पण यानं तुला बापूचं गुपित कसं कळलं £ ?? 

££: आमच्या शाळेंतली बापट म्हणाळी की, तिच्या जहिणीच्या वगोत कोणी 
इनामदार म्हणून नवा मुलगा आलाय. तो दुसऱ्या तुकडीत नाव असतांना 
बाहिणांच्या वर्गोत येऊन अगदीं तिच्या पाठीमागच्या जबराकावर बसला होता 
दोन-तीनदां. पण तो माझा भाऊ नसेल अस ती म्हणाली --?* 

“: म्हणजे तो बाणू नसेल असच तर ती म्हणाली ना-- ? 

“ हो, म्हणाली ती माझ्याजवळ तसं. पण मला एवढं कळत नाहीं 
होय £ - भ्राकी तूं नाहींच म्हणतोस बापूसारखं - पण माझ्याजवळ दुसरी 
एक गमतसुद्धा आहे बापूची --?' कमळी पटकन्‌ बापूच्या वह्याच्या कोनाड्या- 
कड गेली आणि तिनं बापूच्या दोन बह्या हुडकून काढल्या. रघू नुसता बघत 
साईला होता 

(६ हूँ बघ आपूच्या वहीत काय आहे. अश्लीच दिसते कारे ती बापट 
बापूच्या वगोतली १ *? व्हीतलं एका मुलीचं चित्र दाखवीत कमळीनं विचारलं. 
रघून त्या चित्राकडं उगीच पाहल्यासारख केलं-- 

छ्ट्‌ र इतिहासांतलं नूरजद्दानचं चित्र आहे 
मला बनवतोस होय -- 

रघू कमळीला जनवत होता की नाही. कोणास ठाऊक !!' पण बापूच्या 
1चेत्रकलेचा तो नमुना पाहून रघू चकित झाला होता. त्या चित्राला नूरजहा- 
नच म्हणा, मस्तानीचं म्हणा की यमू बापटचं म्हणा त्यामुळं कांहीं सुद्धां 
फरक पडला नसता. कारण एक माणसाचा वाटणारा चेहेरा आणि तो चेहेरा 
बाईंचा आहे हें सांगणारे केस आणि कुंकवाचा टिळा यांच्याखरीज त्यांत 


डड लवणाची मासोळी 
दुसरं काहींच नव्हतं, पण बापू मुलीची चित्रं काढण्याच्या नादाला लागला, 
मुलींच्या तुकडीत जाण्याच्या आटोकाट प्रयत्न करूं लागला, आणि कमळीच्या 
म्हणण्याप्रमाणं म्हणजे मुलींच्या पाठीमागच्या बाकावर बसू लागला - या 
सार्‍्याचं रघूला आश्चर्य बाटलं. अंबुच्या नांबार्शी दहा वर्षाच्या रघूची जोडणी 
करण्याची मस्करी करणारा बापू - तोच का बापू तीन वर्षे शहरात राहून 
वेगळा झाला होता १ इतका बेगळा झाला होता १ - छे £ कृष्णी बोरगांव- 
करणीच्या तमाशांतल्या लावण्या हावभाबासाहेत म्हणणारा बापू सरळ रेषेत 
चालला होता पण ती सरळ रेषा रघूच्या दृष्टांत आली नव्हती, त्याने ध्यानांत 
बरेतळा नव्हती. 

पण रघूला त्याच्याहिपेक्षा आश्चर्ये वाटलं तं कमळीच्या ज्ञानाचं. “मी 
आतां पातळ नेठायला लागलें? म्हणणारी कमळी, रघूला आपल्या इंग्रजी 
अभ्यासाच्या शंका विचारणाऱ्या निरागस कमळीहून निश्चित वेगळी होती. 
रघू-जापूंचे बोलळणच काय पण त्याहून अधिक आपल्याला कळतं हँ दाखवि- 
'ण्यासाठी तिनं बापूच्या बह्यांची घेतलेली दखल ही नुसत्या बहीण-भावांच्या 
स्पर्धेयेक्षां अधिक होती. सतत एकत्र रहाण्यानं तिच्या बाध्यांत पडूं लागलेला 
फरक जसा रघूच्या नजरेत भरला नाहीं तसाच स्त्रो-पुरुष भेदाच्या जाणिवेचा 
भाग तिच्या मनांत रुजला आहे हद्दी रघूच्या मित्र्या, आखडत्या स्वभावाला 
“कळलं नाहीं. आत्याबाईच्या पहाऱ्याची रेवडी उडवणारी कमळी नुसती आात्या- 
बाईच्या फाजील चिकित्सेखोरपणाला डिवचीत होती असं रघू मानायचा. 
त्यामुळें आत्याजाईनी कमळीला कधी “' रघूला वरचेवर किती त्रास देतेस ?” 
असं म्हटलं की रघूनं सावरून ध्यायचे --- 

५: त्यांत कसला आला आहे त्रास आत्याबाई - तेवढीच माझी उजळणी 
पण होऊन जाते --”' 

£: पण एखाद्या वेळी बापूला विचारावं - तोही इंग्रजी शिकतो ना £ ? 

५: ल्याला कधीं वेळ असतो का आत्या--- ? तो कर्धी सागतो का मला 
कांहीं १ - शाळा सुटी कीं घराला पाय लावून जातो. जात असेल त्या - ? 
कमळीनं बापूला चिडवायचं. 

६६ कमळे, तुला माझी चौकशी करायचं काम नार्दी - तुला कारही इथं 
माझी जबानी घ्यायला ठेवलं नाहीं. ? 


लवणाची मासोळी ४५६ 


आहा क..७॥.या आ आ ह हळ ७0 आ. ला आड अह आकि ७७ आ हळ आद आहा आक ळा अ का का करा का ७ का अ आा ळा अ ७» ह? आ झा ह) आ अ मक आ हा ७१8 अ >). 48 अश शक 


५६ बुघितलंस आत्या ? - अन्‌ ह्याला येतंय काय मला सागायला £ ? 

६६ चोबडेपणा करू नकोस - तुला काय कळतयं माझ्या अभ्यासांतलं १ *? 

“६ शणिताच्या पंपरावरचा भोपळा दिसतो म्हटलं आम्हाला -- अन्‌ 
मास्तरांनी बारे इनामदार म्हणून लिहिलंय तेंसुद्धा--? 


“: असूं देत जा ! कसली ती तिमाहीची परीक्षा अन्‌ तिचे माक ! प्रत्येक 
न त च. ऱ्च २ शच 
वेळेला पास होऊन मला नादारी थोडीच मागायची आहे ? आपली वार्षिक 
पदरांत पडली का झालं--- 


-ण्शेवटीं बापूनं खूच्या नादारीला टोमणा मारलाच. पण तो लागलाः 
रघूपेक्षांही कमळीला. ती कांही. तरी उसळून बोलणार होती. तेवढांत 
आत्याबाईरनी अरे-अर करून ती कळवबडी सोडवली. पण खूला हं 
सगळं जास्त जास्त अवघड वाटूं लागल. त्याचा कहर झाला गणपतीच्या 
दिवसात. बापू काही तरी निमित्त काढून गावच्या जत्रेला निघून गेला. कमळीला 
रात्रीच्या वळीं मेळा कसला असतो तां पहायची हुक्की आली. आत्याबाईनी 
घालायचा तेवढा मोडता घातला. पण रघूबरोबर येणार नसला तर चार 
घरांपलीकडच्या मैत्रिणींबरोबर एकटीनं जायची कमळीनं तयारी केली. आत्या- 
बाईनी नाइलाजानं रघूला तिच्याबरोबर जायला सांगितलं. तोंडाला रंग फासून 
नाच - गाणी - संवाद करणाऱ्या मुलामुलींचं हदव्य दोघानीही नवीन होतं. 
त्यांतलं आहिल्योद्वाराचं दुय पाहून तर कमळीला फारच गंमत वाटठी अन्‌ 
रात्री अकरा वाजता परत येतांना अधाऱ्या रस्त्यावर ठेंच लागली तेव्हां तिनं 
मला भीति वाटतें म्हणून सरळ रघूचं बोट घट्ट धरलं. 


त्याच वेळीं रघू आहिल्योद्वाराचं हृर्य आठवून जुन्या कवितेची ओळ 
गुणगुणत होता - “ अहिल्या शिळा राघव सुक्त केली ? कमळीने त्याची बोटं 
अधिक घट्ट धरीत विचारलं “ खरंच का रे?? 

“अ; काय १? 

: कुठं काय ? - तुझी तंद्री लागली वाटतं अजून. म्हटलं अहिल्येचं नाटक 
मधाशींच संपून गेलं - कीं स्वतःच नांब रघू आहे म्हणून--- ?? 

£ म्हणून काय £ ” 


डप &वणाची मासोळी 

“£ मला काय ठाऊक ? मी काय मेळ्यांतली तरी आहिल्या थोडीच 
आहईे--१ ? 

“ काय बोलतीस तें कळतंय का ? ? 

“ अहं !- मला कुठं अजून कळायला लागलंय £?? या कमळीच्या शेवटच्या 
चाक्‍्याबरोबर रघूच्या बोटांतनं शिरशिरी उठून गेली अन्‌ तो आपली बोटं 
मोकळीं करायच्या नादाला लागला. पण कमळीची पकड' अधिकच घट्ट झाली 
अन्‌ ती म्हणाली ““ मला भीति वाटते ना-- 

दुसऱ्या दिवशीं खूप उशिरा उठल्यावर मेळ्यात काय पाहिलं याची आच्या- 
बाईनी कसून चौकशी केली अन्‌ सारं देवाधर्माचं होतं हे ऐकून त्यांना समा- 
धान वाटलं. त्याचा फायदा घेऊन कमळीन लगेच विचारलं, “ आत्या - आज 
पण जाऊं का आम्हीं मेळ्याला ---!' 

“६ आज पुनः कशाला ! काल पाहिलंस ना एकदा ? ?' 

४८ अग पण आज दुसरा मेळा बघूं. गणपती पुढच्या मेळ्यात सारं देवाचंच 
असतं - छान छान आख्यानं कीर्तनासारखीच--- ? 

“< आज मा नार्ही बुवा येणार - ?? खून सागून टाकलं-- 

“६ का रं ? जानात का देवाचंच असलं तर - मीसुद्धा येईन-- 

५८ अहे - रोज जाग्रणं करून अभ्यास बुडतो. उशिरा उठल्यावर मग 
सारा दिवस आळसांत जाता - अन्‌ आत्याबाई, काल कमल भ्याली वाटेत.?? 

“६६ होय ग कमळे १ - अन्‌ मला सांगितलं सुद्धा नाहींस १? तरी मी 
म्हणत होतं एवढ्या न्ह्ात्याधुत्या पोरीर्नी रात्री - अपरात्री एकटं हिंडणं 
बरं नव्हे. 

८: पुण मी कुठं एकटी गेळें होते काल १ * 

“ तरीसुद्धा थ्याळीस ना १ कांही नको जायला--- ? 

:££ अग पण ठेच लागली म्हणून ? 

६६ म्हृणून काय झालं ? नुसतीच ठेच असली म्हणजे बरं ! कुठं वाटेत 
कांही असळं बिसलं तर. परकं गांव - आपल्याला नाद्दी ठाऊक. “ राम 
£ राम ? तरी म्हणालीस का तोंडानं ! - आधी मला लिंबू उतरून 
टाकूं दे वा, 


18 


लवणाची मासोळी ४७ 
“६: अग मी नाहीं म्हट्लं तरी रघू रामाचीच कबिता म्हणत होता - अन्‌ 
रस्त्याला कसली आठीत भुतं-बितं. रोज तर आम्ही तिथने शाळेत जातो. 
“ तुझं शाळेंतलं शहाणपण राहू दे - कांहीं नको जायला ! ? 
आमचं आपलं सदा असंच ! ?' कमळीनं आत्याबाईच्य़ाकडे पाठ 
फिरवून रघूकडे विचित्र नजरेनं पाहिलं. 


>< >< >< 


कमळीच्या नजरेनं रधू घरांत गडञडून गेला होता. खरं म्हणजे इनाम- 
दाराच्या वाड्यात पूजा करताना आत्याभाईनी जी मुक्‍ताफळं उघळली होती, 
आणि त्यावेळच्या तिरमिररींत तो आत्याबाईना अ॑काही बोळून दाखवणार 
होता त्याच्या सदर्भात बास्ताविक त्याला कमळीच्या पुढच्या पावलाने बरं 
वाटायला हवं होतं. भटाच्या पोराबद्दल इनामदारांच्या मुलीला वाटूं लागलेली 
आपयुळ्की ही त्याला संधि वाटायला हवी होती - पण रघूच्या बागण्यांत ही 
दृष्टीच नव्हती त्याला इनामदाराकडून होणारी अवहेलना नको होती, त्याची 
बरोबरी करावयाची होती पण ती बराबरी प्रत्यक्ष व्यक्‍्भ होण्याचा संभव 
आंख तो गडबडला, त्याच्या न्यूनगंडानं त्याला गोगलगायीसारखं अंग 
डरयताचन घ्यायची संबयच झाली होती. आणि या संवयीनं त्याला अगदी 
सामान्य बाबीसुद्धा असामान्य अडचणीच्या वाटायच्या. त्याच्या झाळेचेच 
पहा ना वास्तविक हायस्कुलातून खळ गेंद्रिंग, दर तासाला बदलणारे 
शिक्षक या अगदी सामान्य बाबी - पण त्याचंसुद्धां रघूला कांहींतरी विशेष, 
आपल्याला अपरिचित ससं वाटायचं ! 

खेडेगावच्या संवयीप्रमाणं रघूला शाळा म्हणजे अभ्यास करायचं ठिकाण 
एवढच वाटायचं. खेडेगांवच्या इतर मुलांनाही शेतीची, मजुरीची, घरची कामं 
असल्यामुळं शाळेंत अभ्यासाव्यातिरिक्त इतर कांही करायचं असतं याची फारशी 
जाणीव नव्हती. पण पहिल्या नंजराच्या अभिमानाने त्याला सववत्र आघाडीवर 
राहिलं पाहिजे असं नुसतं वाटायचं आणि ते जमायचं नाही; याचा जाणीव 
होऊन तो खंत करायचा. त्यांवून रघूच्या एका मास्तरांची अभ्यासाव्यतिरिक्त 
इतर गोष्टींची चौकशी करण्याची पद्धति रघूला फारच अडचणीची वाटायची. 
त्यावेळेला * ही कटकट कशाला ' असंसुद्धां त्याला व्हायचे. 


शट लवणाची मासोळी 


एका सोमवारी रघूच्या त्या साने मास्तरांनी इंग्रजीच्या तासाला पुस्तक 
टेबलावर ठेवून एकदम दुसराच विषय काढळा, आदल्या दिवशीं वाडीच्या 
टीमबरोबर झालेल्या क्रिकटच्या सामन्याच्या गप्पा सुरू करप्यांत आल्या --- 

“ काय घाटे, काय खेळलास काल ! हायस्कुलचं नांव घालवलंस. ? 

“ नाहीं सर - माझी जागा स्पिलची. मळा उगीच लॉगला ठेवलं पळाय- 
साठीं - म्हणून कच सुटला, 

“६ ळॉगला ठेवलं म्हणून कच सुटला - अन्‌ बॅटिंग करतांना १ ? 

“ खाटा एल्‌. बी. डब्ल्यू दिला अंपायरनं. ? 

: कशावरनं ? तुला संवय आहे पाय मधे घाळून चेंडू अडवायची.? 

६६ घण काल मी मर्धे पाय घातला नव्हता सर - वाटेल त्याला विचारा ?? 

“ बुघ हं - हरशील |--? 

५६ मुळींच नाही - वाटेल त्याला विचारा --?' 

“६ काय रे जोशी - काल घाट्यानं मधे पाय घातला होता कीं नाहीं १ ” 

-णरघू गडबडला. आवंढा गिळीत त्यान सागितलं “मला ठाऊक नाही -- 
मी काल मंचला आला नव्हता. *? 

6: मुचला आला नव्हतास ? मग काय करीत होतास £ गजगे खेळत होतास??? 

सारा वर्ग हशानं दुमदुमून गेला, रघूनं आपण अभ्यास करीत होतां, 
आपल्याला क्रिकेटमधल काहीं कळत नाहीं हं सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा 
त्याची आणखी टिंगल सुरू झाली. नुसत्या पुस्तकी शिक्षणाने भागणार नाहीं 
हें पटविण्यासाठी सान्याचे साऱ्या हायस्कुलळा तांडपाठ असलेले चुटक म्हणून 
झाले. त्या चुटक्यातल्या थट्टूचा विषय रघू जोशी झाला अन्‌ त्याला ती थट्टा 
लागली. सान्याच्याविषर्या त्याच्या मनात अदी - नव्हे भीति घर करून 
राहिली -- 

तरी त्याला बराह्रचं जग पहायची इच्छा झाल्याशिवाय रादलढी नाहीं. 
कालांतरानं रघूचा साने मास्तरांच्याविषयींचा ग्रहह्रि बदलला. त्यांनी प्रसंगानं 
रघूची कितीहि रेवडी उडवली असली तरी आपल्या शाळेंत नांव काढणारा 
हा विद्यार्थी त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणांतून निसटला नव्हता, त्याला अधिकाधिक 


लवणाची मासोळी ९ 
घडवून साकार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्याभांबतीं, वगातून बाहेर 
पडतांना नहर्मी पाच-पंचवीस विद्यार्थ्यांचा घोळका असायचा. मंटिकच्या 
वर्गोतून असेच एकदा बाहर पडल्यावर साने मास्तर रघूची नित्रंधाची वही 
मुलांना दाखवोत सांगत होते, “' पहा - पहा, ह्‌ पांचर्वीतल्या मुलाचं अक्षर 
आणि इंग्रजी. तुम्ही अजून कुत्र्या-मांजराचे पाय काढता आणि “ ए ? कुठ 
घालायचं अन्‌ “* दि ' कुठं, हे सागावं लागतं - एक दिवस त्याच्या नित्रंघाची 
कापी करायला सांगणार आहे मी सगळ्या माटिकच्या वर्गाला ---?) 

-ज्"्पण ही साने मास्तरांची सहानुभूति रघूला फार उशीरां कळली. 
त्याच्या आधी परीटघडीचा इार्ट-कोट आणि ऐटबाज टोपी घालून 
रुबाबांत बावरणाऱ्या सान्यांच्यापक्षां कळकटलेले घोतर, विटलेला लांज, बंद 
गळ्याचा कोट आणि चिरफळ्या गेळला रुमाल सांवरीत येणारे फाटक गुरुजी 
त्याला आवडायचे. फाटक रघूच्या वर्गाला मराठी शिकवायचे, त्यांचा मूळचा 
विषय गणित; पण मराठी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय असतो याचा शोध 
अनेक शाळातून लागलेला नसतो. गणित, भूगोळ इतकच काय, पण डोईंग- 
तालीम यांच्या शिक्षकांच्या शिलकी तासात मराठीला बसवायचं. या जमान्यांत 
फाटकांच्या माथी रघूच्या वर्गाचं मराठो आल होतं. ते सरळ रघूला पुस्तक 
वाचायला सांगत -- कुणी “ समजलं नार्ही ? म्हटलं तर आपण एकदा वाचून 
दाखवीत - पण ते गद्याचा धडा असेल तेव्हाच. पद्याचा सारा भार खघूवर 
पडायचा. :' २ पंतांना केकावठीतला उतारा तर खूच्या कायमच्या 
आठवणींतला होऊन बसला --- 

“£ अजामिळ, अघासुर, त्रजवधू बकी पिंगळा 
अशा गति दिली उरे तृण न भेटता इंगळा, 

या पंक्‍्तीशीं रघूदेखीलळ अडखळला होता. बाकीच्या मुलांनी अर्थाच्या 
नादी लागण्यापेक्षां शोवटच्या * इंगळा ? शब्दावरनं ' इंगळे ? नावाच्या मुला- 
वरून बाक बडवण्यांत वेळ काढला. रघू कोरगांबकरबुवबांच्या कीतनांतढी 
सारी शिदोरी विस्कटीत होता, अन्‌ त्याची आठवण पुरती काम करूं लागे- 
पर्यंत फाटक गुरुजी उपरण्यानं कपाळावरचा घाम पुशीत केव्हां एकदाचा तास 
संपतो याची बाट पद्दात होते. 

ल. मा.., 


५० लवणांची मासोळी 

खरं म्हणज असल्या लहान सहान प्रसंगांची आठवण रघूला राहूं नये. 
त्यानं वाचलेल्या कोणत्याही मोठ्या माणसाच्या चरित्रात असली हकीकत 
आली नव्ह्ती, कदाचित्‌ या क्षुलक प्रसंगाच्या स्मरणातच रखघूचा सामान्यपणा 
साठवळेला असल. त्याची उजळणी तो कर्ची कर्धी करायचा तेव्हां त्याची 
स्वूय थट्टा व्हायची. पण रघूचा आपला तिसराच पथ. तो या थट्टा 
करणाऱ्यानाहो गंभीरपणे सागायचा-- “' तुम्हाला नाहींच पटायचं. पण 
त्याचं कारण मी नव्हे. तुम्हाला कोणत्याही गोष्टीकडे पोटतिडकीनं अन्‌ 
गभीरपणं पहायची संवयच नार्ही. थट्टा करतां, हसता त्या वेळी सुद्धा तुम्ही 
मनापासून थटा करता, हसता, कीं नाही हु तुमचं तुम्हालाच सांगता येणार 
नाही. आमच्या बापूची तऱ्हा ! मोठ्या ऐटीनं क्रिकेट खेळायला निघाला -- 
पण काय केले त्यान ? - पहिला चेट्ट शिवण धरून जोरात फेकायचा, 
दुसऱ्या खेपेला बोटं वेडींबाकडी फिरवून ब्रेक पडतोय्‌ कीं नाहीं तें पहायचा 
अन्‌ पाच मिनिटानी पड्‌ बाधून विक्रेट-कौपिंगचा ढंग करायला लागायचा -- 
झा वृत्तीनं मरळेल्याचगा समुदायात कसलीही पोटतिडीक असणारा मनुष्य 
विक्षितत ठरावचाच, मला त्याचं काही वाटत नाहीं आशा -- ?? 

पण त्याच्या या विश्षिप्रपणणाचा उद्धार त्याच्या आवडत्या फाटक 
गुरुजीनी सुद्धा केला होता. केकावलीच्या त्या ओळींचं स्पष्टीकरण परीक्षेच्या 
पेपरात लिहताना रघून सब्धच्या सर्भघ विंगळा नायकिगीची कथा उतरली 
होती. तिच्याब्रदूल फाटकांनीं रघूला चागलंच सुनावलं होतं. एकतर रघूला 
सारासार विचार नव्हता. त्यान चार माकीसाठी आठ ओळी लिहायच्या 
सोडून उगीचच इतका मजकूर भरकटला होता. नुसता वेळेचा अपव्यय आणि 
त्यातून शाळेतल्या मुलानं, पिंगळा असली म्हणून काय झालं, नायकिणीची 
गोष्ट लिहिण हा तर अक्भग्य अपरा होता. 

> > >< 


मॅट्रिकच्या आदल्या वर्षी रघूला कांतिलाल नांवाचा नवा स्नेहा अचानक 
मिळाला. कातिलाल नापास झाला होता अन्‌ त्याचं उटद्टं त्याला काढायचं होतं. 
प्रत्येक विषयाची मिळतील तितकी गाइड्स अन्‌ नोट्स विकत घेग, चार प्रबुख 
विषयांच्या शिकवण्या ठेवणे, स्वतःचा ऐसपैस बंगला असतांना बोर्डिंगांत 


लबणाची मासोळी ५१ 
अभ्यासासाठी वतंत्र खोली घेणं - असा विस्तृत आराखडा आखून कातिलाल 
अभ्यासासाठी हुशार नोडीदार शोधीत होता. त्यानं रघूला हेरळं. किरकोळ 
मदतीत आपली निदान पुस्तकांची अडचण मिट्ते आहे हें पाहून खघूनं 
त्याच्याबरोबर अभ्यास करायचं कबूल केलं. 


नुसती बाचायला पुस्तकं मिळतील ही रघूची कल्पना खोटी ठरली. नव्या 
वर्षांधरोबर नवीं पुस्तकं हा कांतिळलालचा सोपा हिशेब असल्यानं त्यानं सारीं 
जुनीं पुस्तकं रघूळा बक्षीस देऊन टाकली. त्याच्या नोट्स उतरून घ्यायला 
सोपं पडावं म्हणून डझनभर नोटबुक “ जादा ' विकत घेऊन दिलीं. रघू या 
औदार्यांनं पार थक्क झाला. कातिलालच्या खेळत्या व्यापारी वैभवानं बापू 
इनामदाराची साठवणीची श्रोमती पार फिकी पडली. चार दिवस अभ्यास 
केल्यावर पांचव्या दिवशी कांतिलालला कंटाळा आला अनू त्यानं रघूला ओढून 
आपल्याबरोबर सिनेमाला नेलं. 


आजपर्यंत रघून इनामदारांच्या मंडळींबरोबर दोन-चार खेळ पाहिले होते. 
पण ते सारे धार्मिक आणि तीन आण्यांच्या पिटाच्या जागेंत बसून. आज 
कातिलालनं त्याला नेलं त॑ एकदम गादीच्या खुर्चीवर, बारा-बारा आण्याची 
तिकिटं काढून - धमाल हाणामारीचा “ प्यारी मोहब्बत ? हा फियरलेस 
माधुरीचा चित्रपट पहायला. हाणामारीच्या प्रसंगाच्या वेळीं कांतिळाळ मुठी 
वळून “ वार ! पट्ठे ! * म्हणून शाबासकी देत होता. नटीच्या अंगोपांगाच्या 
दर्शनाचा प्रसंग आला कीं मुद्दाम पुढे वाकत ' मस्त,' ' चक? अस कांही 
उच्चारीत होता. नाचणाऱ्या बाईनं हीरोच्या दोस्ताला डोळे मारीत गिरका 
घेतली अन्‌ ओठाचा चंबू करीत ती त्याला बिलगली तेव्हा कातिलालने 
स्वतःच्या हातांनी आपलीच छाती घट्ट आवळून धरली. एकदम दिवे ढागले 
तेव्हा जणू आपल्या आळिंगनात खरोखर असलेली नटी निसटून गेली इतक्या 
कळवळ्यानं कांतिलाल रघूला म्हणाला “' साले, ऐन वेळेला लाईट पाडून 
पिक्चर संपवतात--- ? 


रघूनं त्या रात्री कांतिलालच्या खोलीत बोडिंगांतच झोपायचं असं अगो- 
दर ठरलेलं होतं. रस्त्याच्या वळणावर येतांच कांतिलालनं खोलीची किली 
रघूच्या हातांत टाकून सायकल बंगल्याकडे वळवण्याची तयारी केली, तेव्हा 


५२ लवणाची मासोळी 
रघूला हा असं कां करतो ते कळेना. शेवटी कांतिळालनं या अजागळ 
किंबा वेड पांघरणाऱ्या स्कालरची समजूत पटविली. “असला मस्त चित्रपट 
पाहिल्यावर धोर्डिंगातल्या ब्रह्मचारी खालींत झाप येणं राक्य नसतं जोशीबुवा. 
आज मी बंगल्यांत जाणार, माझी बायको बाट पहात असेल --? 


रघूला कातिलाल हें एक नवं कोडं वाटलं. कातिलालनं आपल्या आयु- 
ष्यातळे वाटेल ते तपशील रघूला चार दिवसांत ऐकवले होते, पण त्यांत लयन 
झाल्याची वाता नव्हती -- उलट ही शांकासुद्धां येऊं नये अश्या रीतीनं तो 
शाळेंत वागायचा, मुलींच्या बाकावर “ओ मिस, गिव्ह मी अ किस) या 
चालीची वाक्यं लिहिण्यात त्याचा हातखंडा होता. खोलींत त्यान खास दोस्ता- 
करिता म्हणून आपलं फ्रेंच फोटोचे पाकीटही उघडून दाखविलं होतं - लग्न 
झाल्यामुळं या मलाची वृत्ति अशी झाळी असेल का १ -- रघूला हशंका आली. 
मनांत तुलना होऊं लागली, रघूच्या खाती कातिळाल आणि बापू दोघेहि 
श्रीमंतच. पण बापूचा ढंगसुद्धा कातिलालच्या पुढं फिका पडला. यमू बापटवर 
मनोमन एकतर्फी ' प्रेम ? करणारा बापू, खुष्ींत असला म्हणजे रघूला शांका 
विचारायचा “ पण ती पडली कोकणस्थ अन्‌ मी देस्थ - हें कसं जुळायचं रे१ 
असली वेडगळ दांका कातिलालनं कधींच उच्चारली नसती. 


--कांतिलालच्या या साऱ्या लफड्यांतून त्याच्या बरोबर अभ्यास करणं 
हें एक दिव्य होते. त्यातून त्याला मागच्या दोन वर्षीतल्या गोष्टी समजावून 
द्याव्या लागायच्या, त्यातूनही वेळ काढून थोडा स्वतःचा म्हणून अभ्यास 
करायचा बेत रघूनं केला, कीं पैशाचा चह्ापाण्याचा हात थोडा आणखी सैल 
सोडून रघूला ' दोस्ताखातर ? बरोबरीनं अभ्यास करायचा आग्रह - हृषद्ट 
कांतिलालनं धरायचा अन्‌ उपकाराच्या आझ्याची जाणाव असलेला रघू त्या 
हट्टाला बळी पडायचा-- 


याचा परिणाम व्हायचा तोच झाला. सहामाहींत रघूचा नंबर तिसरा 
गेला अन्‌ त्याची स्लॉलरदिप गेला, अन्‌ पुढारलेल्या जातिबाहेरचा, स्व 
विषयांत पास होणारा एकमेव विद्यार्थी म्हणून कांतिळालला राखीव स्कालर- 
शिप मिळाली. रघूला धक्का बसला. बंगल्यांत रह्ाणाऱ्या कातिलालची जन्म- 
जात आणि मिक्षांदेही करणाऱ्या रघूची जन्म-जञात याचा प्रत्यक्ष परिस्थितीशी 


लछवणाची मासोळी ५३ 
कसलाच मेळ नव्हता हें डोळे उघडे असणाऱ्या कुगालाही समजलं असतं--- 
समजावं ही रघूची अपक्ता होती, पण त्याच्या आवडत्या साने मास्तरांनी- 
सुद्धा त्याला “ तुझं बरोबर आहे. ? असं म्हटलं नाही. ' चुकल कुठें ' तेंहि 
त्याना सांगतां येईना. त्यासी सगळा प्रकार थद्रेवारी नेऊन फुंकर घालण्याचा 
प्रयत्न कला. स्कालरशिप गेली तर नादारी मिळेळ हा दिलासा -पण तो 
जखमेवरूया मिठासारखा झोंबणारा अन्‌ शोबटीं, “गो, एन्जाय युवर 
दिवाळी ?' म्हणून त्याला जवळजवळ या विषयात पुनः बोळू नको 
असंच सुचवलं -- 

“ गंमती कर --गो - एंजांय्‌? हे साने मास्तराचे शब्द रिवन्नपणें घोळवीत 
रघू आपल्या गांवी आला. चार वाजायची वेळ, कृष्णंभटजी हमखास इनाम- 
दारांच्या इथल्या निजिकच्या अडुघांत रंगलेले असणार तेव्हां फारा दिवसांनीं 
आपण आईशी मनमुराद बोलूं, आापल मन उघड करू, असा बेत रघू 
आखीत होता. दाराशी त्याचे पाऊल वाजलं आणि ' कोण आहे? ? म्हाणून 
कृष्णंभटजींचा करडया सुरातला प्रश्न त्यानं ऐकला. रघू चरकला. हातपाय 
स्वच्छ धुवून तो आला तेवढ्यात कृष्णभटजी पुनः कडाडले - “' परीक्षा 
होऊन इतके दिवस झाले - काय दिवे लावीत होतात माग राहून ? शहरांत 
खुशाल उंडगायची संवय झाली असेल. पाठीमागं कांहीं घरची काळजी १ 
इकडं आईबाप जिवंत आहेत की--- 

:: आताच आलाय ना तो - त्याळा काय ठाऊक इकडचं ? नाहीतर 
मुळींच राहिला नसता - असेल कांहीतरी शाळेचंच, म्हणून राहिला असेल 
चार दिवस. ?? क्षीण स्वरांत रखमाबाईचा आवाज आला. 

“ तर तर, साऱ्या परीक्षा आवरल्यावर मुद्दाम याच्यासाठी कामं काढलीं 
असतील शाळेनं - की रंगरंगोटीच्या कामावर देखरेख करण्यासाठी मुकादम 
नेमलं होतं तुमच्या चिरंजीवांना--१ ?? 

“ आई, कुठं आहेस तूं १--काय होतंय तुला ? ?? 

“६ बा | फार लबकर आठवण झाली मातोश्रींची. हो ! - फारच 
छवकर, कृष्णाबराईवर पाचायच्या आत---? 


“ दादा -- ?” रघू एकदम ओरडला. असा ओरडला की, रघू नसून 


षड लवणाची मासोळी 
दुसराच कोणी तर घरात शिरला नाहीं ना असं वाटावं. त्याच्या त्या विचित्र 
ओरडण्यानं कृष्षणभटजीसुद्दा एकदम गप्प झाले. 

: ये बाळ रघू, दमला असशील - बैस इथं माझ्याजवळ - उन्हातनं 
आलास त्यानं दिसत नसेल, इथं आहे मी कोपऱ्यात --?? 

चांचपडत रघू अंधाऱ्या माजघरातल्या शेवटच्या खांबापार्शी पाचला. 
त्याच्या शेजारीं अंथरूणावर रखमाबाई पडली होती. रघूनं तिच्या अंगाला 
हात लावला अन्‌ * काय ह्या ताप ? म्हणून चटकन्‌ मागं घेतला. रखमा- 
बाईच्या जवळ रघू गेला तेव्हाच कृष्णंभटजींनी माजघरातलं आपलं पाऊल 
बाहेर काढलं. “ मी आता बाहेर जाऊन येता. ” एवढंच त्यानीं सोपा 
उतरताना हवेत सांगून टाकलं. थोडा वेळ रघू तिथं सुन्न बसून होता. 
आपलं मन उघडं करायचं बाजूलाच राहिलं - आता हे सगळं ठीक होईपर्यंत 
शिवपुराची आठवणही येऊन उपयोगी नाही हे त्यानं ओळखलं, आपला 
अशक्त हात त्याच्या पाठीवरून फिरवीत रखमाबाई म्हणाली, “ तू दमून 
आलास, पण तुलाच सांगायचं आलं - दिंक्यावर लाह्याची पुरचुंडी आहे, 
त्यांतल्या लाह्या घेऊन खा आणि थोडासा चह्ा कर -- तुझ्य बरोबर मीही 
घेईन. ?' चहा पितां पिता रघूनं विचारळ, ““ आई किती दिवसापास्नं ग 
ताप येतोय १ मला पत्र पाठवून कळवलं कां नाहीं ? --मी आला. असता 
ताबडतोब. ?? 

“ अरे, त्यांत काय कळबायचं £! तुला उगीच काळजी कशाला ! तुझी 
परीक्षा आहे म्हणून पत्र आलं तेव्हां नुसती कणकणी येत होती. ऐन 
परीक्षेच्या वेळेला माझं अंथरुण पडलं. असेल मेला साधाच. होईल 
बरा - त्यांत काय आहे? ? 

“ असं कांही तरी सांगूं नकोस आई - माझ्या परीक्षेच्या आधीपासनं 
म्हणजे चांगले बारा-तेरा दिवस झाले की, औषध तरी कुणाचं देताहेत ना 
आणला होता का डॉक्‍टर १ ?? 

“६ एवढ्याश्या दुखण्याला डॉक्टर रे कशाला ? अन्‌ त्याची आणखी 
उसाभर कोणी करायची ! आठ दिवस घरांतनं बाहेर पडायलासुद्धां झालं 
नाहीं - काय जेबणापुरतं बाड्यांत जायचं तेवदंच--!? 


लघणाची मासोळी य 

“ म्हणून आतां मी आल्याबरोबर गेले वाटतं ? अन्‌ तेवढ्यासाठी माझ्या- 
बर राग. पण तूं इतकी आजारी असतांना औष्रधाची काहीसुद्धा चौकशी 
नाहों ना ! असंच आहे--? 

“ अरे असं काय बोलतोस. उतरेळ आता ताप - तूं आल्याधरोबर मठा 
हुशारी वाटायला लागली जघ. पड थोडा वेळ. दमडा असशील --- १ 

'* आ. पडेन संध्याकाळीं. मळा काय झालंय ? आधी तुझ्या औषधाचे 
काय ते सांग - काहींच कां घतलं नाहींस अजूनपर्यंत १-- ?? 

“: अरे नाहीं कस ? -- बापूच्या आईन मात्रा दिटी दोन दिवस. त्यानं 
कार्ही उतार पडेना, तसा कासाराकडचा काढा आणलाय आज चार दिवस -- २? 

६ त्याला काय औषध म्हणायचं २ - तो कासार सगळ्या ताणावर झापला 
एकच काढा देतो. बरं, त्यानं काही गुण पडता तर गोष्ट निराळी. पण ह्याना 
सगळं बिनपैशाचं अन्‌ बसल्या बैठकीला दवय ना? तें काही नाही. मी 
जातो उद्या सकाळीं अन्‌ घेऊन येतो डॉक्‍्टर--?? 

“* रघू , बाळ, माझ्याजवळ बोललास तेवढं पुरे. ह्याच्याजवळ असलं 
काही तरी म्हणशील अन्‌ उगीच बोलणी खाशील. ह्याची नाही श्रद्धा त्या 
डॉक्टरा-फिक्टरावर, उगीच काय करायचं खर्चोत पट्टून --?? 

“ डाक्टर नको असला तर निदान चागला यैद्य तरी आणायला हवाच. 
हवा तर वेद्य आणीन; पण मी उद्या जाणारच --?? 


“ बघू उद्यांचं उद्या - आता आर्था दमून आलायस, त्यात आणखी 
डोक्याला त्रास करून घेऊ नकोस अन्‌ त्यानाही आठ-दहा दिवस माझं 
सारं करावं लागलं -- त्यानं चिडचिडे झालेत. उगीच आजच्या आज आणखी 
भर घाडू नकास---?? 


दुसऱ्या दिवशीं रघूळा डाक्टर आणायला जायचं जमलं नाहीं. एक तर 
तो उठलाच थोडासा उशीरान. आणि त्याची नित्यकर्म आवरायच्या आत 
कृष्णेभटओंचा पाय बाहेर पडला, रघू कसंत्रसं जेवण उरकून रखमानराईच्या 
जवळ येऊन बसला. तिच्या तापांत उतार न पडता उलट तलखली वाढटी 
होती. रघूनं आरोग्यशास्त्राच्या सामान्य शालेय ज्ञानावरनं अनुमान काढलंहोतंकी 


५६ लवणाची मासोळी 
हा ताप कांडी साधा नाही बहुशः दोषी ताप - टॉयफाइड असावा. त्याबद्दल 
हयगय करून भागणार नाही. त्याला असं वाटायला लागलं तसा त्याला आपल्या 
वडिलाच्या एकंदर बेपवाइब्रदहह आणे आपण आल्यापासून बाहेरबाहेर रहाण्याच्या 
वृत्तीबद्दल मनोमन अतिदाय संताप आला, पण आईला त्रास व्हायला नको 
हणून, धडा करून सौम्ययणानं आपलं म्हणणं त्यानं कृष्णंभटजीच्या कानावर 
घातलं, मटजानी नेहमींच्या पद्धतीनं त्याला शहरात राहून “ रिंग फुटल्याचा ? 
खुलासा केला आणि वर ' उठल्या असल्या डाक्टर आणायला कुबेराचा 
खजिना घरात येऊन पडला नाहीं ' हंहो ऐकवलं. रघूने आपल्या परीने 
काळजी घेतली होती तरीही कृष्णंभटजींची बागी रखमाब्राईच्या कनांवर 
आदळून तिच्या काळजाला मिडली, तिनं एक वेळ रखघूला गप्प बसायला 
सांगितलं; पण एवीतेवी आडेला सारं कांही कळलेच हे समजल्यावर रखघूही 
हट्टाला पेटला. “ तुम्ही पाहिजे तर माझ दरमहाचे पाच रुपये बद करा - पण 
या वेळीं मी डोक्‍टर्ला घेऊन येणारच - ? त्यानं बडलाना निक्षून सागितले, 
कृष्णंभट त्राग्यानं बाहेर पडले. रघू ओटीवर फेऱ्या घालूं लागला --- 

त्या रात्री रखमाबाईच्या अंगाची तगमग होऊ लागळी., रघून घाबरून 
कृष्णंभटजींना जागं केलं. त्याना काय वाटलं कुणास ठाऊक ? - रात्री बारा 
वाजतां पाय धुवून कृष्णंभटजी हातात राखेची चिमूट घेऊन देवापुटें असले. 
अध्या तासानं त्यानी तो अगारा खूच्या हाती रखमाबाईच्या कगळाला 
लावला. पहाटें पहाटे मायलेकरांना थोडीशी झोप लागली. सकाळी उठल्या- 
बरोजर रघ कांहीं न बोलता कगडे करून तयार झाला. आणि त्यान दारांतनं 
बाहेर पडतांना “ डॉक्टरला घेऊन येतां ? एवढंच बडलांना सागितलं 

संध्याकाळी डोक्टरानी टोबयफाइडचं निदान पक्कं करून इजेकान दिलं 
घनं त्याच पाबळी आणखी एक फरी करून औषधं आणि मोसंबी आणली 
जाता-येताच्या दोन खेपात मिळून चाळीस मैलांची सायकलची रपेट होऊन 
रघूला दमल्यासारखं मुळीच वाटलं नाहीं. रात्री मात्र दोन घास पोटांत 
जातांच तो मरगळून पडला. 

चार दिवस डॉक्टरी औषधांचे सगळे सोहाळे झाले. त्यात कृष्णंभटजींनीं 
कांदीं लक्ष घातलं नाहीं. आणि होय-नको काहींच बोलले नाहींत. औषधाच्या 
भाटलीबरोधर मोसबी-मनुका अवितल्यावर त्यांनी 'चूपचाप गरगरा डोळे 


॑वबणाची मासोळी ५७ 
फिरवले आणि खूच्या माघारी ' श्रीमंती चोचले आले ?, “* खर्च बाढला ? 
-असले रखमाबाईला ऐकूं जातील असे शब्द पुटपुटूं लागले. 

इनामदारांच्या अडुथांत गेल्यावर बापूच्या आईनं रखमाधाईची चौकशी 
केली तव्हा “' आतां चिरंजीव आलेत, कर्ते झालेत, सगळं काही करताहेत, 
आम्ही खेडवळ ठरलोंय्‌ ? असं कांही तरी तिरसटपणें सांगितल्याचे रघूला 
पुढे खूप दिवसांनी कमळीकडून समजलं. 

--पण त्या वेळीं चार-सहा दिवस ओष्ध घेऊनसुद्धा रखमाबाईच्या 
दुखण्याचा काहीं मागला काटा दिसेना. एकवीस दिवसाची मुदत वाढून 
बेचाळीस दिवसावर जाते कीं काय अशी इंका येऊं लागली. रखमाबाई 
अगदीं निपचीत पडून होती. खूच्या तोडचं पाणी पळालं. त्यान आपला हेका 
गुंडाळून वडलांना कळवळून विचारलं, “ दादा, आतां कसं करायचे १--- 
अजून आडेचा ताप उतरत नाहीं --??) कृष्णंभटांनीं त्याला उत्तर दिलं नाहीं. 
पण पायांतला जाडा काढला आणि अडुघांत जायचा बेत रद्द केला. त्यांच्या 
ब्योलण्यात नसली तरी वागण्यात सहज दिसेल अशी चलबिचल झाली. 
दुसऱ्या दिवशीं सकाळीं त्यानी स्वतःच पूजेची सारी तयारी करून देवाला 
अभिब्रेक केला. संध्याकाळपर्यंत उतार पडलेला दिसेना, तेव्हां त बाहेर गेले 
अन्‌ परत आले ते कसलीशी पुडी घेऊन - ती पुडी त्यानी रधूला मधांतून 
-रखमाअइहला चाटवायला सांगितलं. 

दोन तासांनी रखमाबाईनं रघूला हांक मारली. आईच्या हांकेनं रघू 
खुळून चटकन्‌ उठला. आईला घाम आलाय हें कळल्यावर त्याला आणखी 
बर॑ वाटलं. कृष्णंभटजी शेजारीं येऊन उभे राहिले. खू उत्साहानं घाम पुस 
लागला. एक -- दोन - तीन करतां करतां पाठीखालच धोतर, पांघरूण, 
अंगावरचे सारे कपडे चिंतञ्र होऊन गेले. घरांतले होते तेबढे पंचे - धडपे 
पिळून काढले तरी धाम हटेना. रखमाबाई पुनः चिप्प पडल्या. घाम 
आल्यामुळे झाप लागली असेल असं एकदा वाटलं. पण ताोडावरची कळा 
चदळूं लागली, रघूला काय होतंय तें समजेना, कृष्णंभटजी घाबरून गेले. 
'थामाला खळ म्हणून पडेना, रात्रींच्या बेळीं जायचं तरी कुठं ! 

अखेरी भटजींनी शांबांतला टाणाटोणा वैद्यकी करणारा कासार आणि 
पूची आहू यांना घेऊन यायला खूला पिटाळला; आणि तिथंच पाट घेऊन 


५८ लवणाची मासोळी 


ब. ळळआलत्ाआाळ्ा्आाज्ञा ञाा्ला्कर्का्का्क्ा्गाका्ळात्रा् छक्का आ्शाशाश्रा्कीशा्शाग्ाा्शा चा शा ा का का का 98 आ ७ ह भाक 


त माळेचे मणी ओोटूं लागले. कासाराशी झालेल्या बोलण्यावरनं रघूला कळल 
की, ' घाम येण्यासाठी ? म्हणून एक खास पुडी गांवातला शिकलगार देतो 
याची माहिती मिळवून भटजीर्नी ती पुडी रखमाबाईला घाम येण्यासार्ठी 
दिली होती आणि तिचा परिणाम असा विपरीत झाला होता. बापूच्या 
आईनं अखेरीचा उपाय म्हणून रखमाबाईंच्या डोळ्यात अंजन घाठून पाहिलं 
आणि प्ळीनं दांतखीळ उघडून सूतशोखराची मात्रा चोळता येईल तितकी 
जिभेला चोळली. त्या वेदनेने रखमाबाईच्या तोंडून आवाज निघाला-- 


त्यानं साऱ्याना बरं वाटलं. 


-णत्यानेतर रखमाबाईला शुद्ध आली नाहीं, पहाटेच्या सुमाराला भिंतीला 
टकून बसल्या बसल्या न कळत रघूचा डोळा लागला होता. त्याला काही 
विचित्र स्वन पडायला सुरुवात झाली. सानेमास्तराशीं तो वाद करीत 
होता, विचित्र बिषय होता - काय होता ते रघूच्या ध्यानात आलं नार्ही -- 
त्यांत आपली आई कराला आठी १ गलका कोण करतंय १? - कुणीतरी 
त्याच्या खांद्याला धरून हळूंच हलवलं -- जागा झाल्यावर निमूटपणे सद्ऱ्याच्या 
बाहीला डोळे पुसून तो ' पुढच्या तयारींत ' सामील झाला-- 


७ ७ ७. 


५६ आज जेवणं झाल्यावर गणपतीच्या बार्गेत फिरायला जायची आठवणः 
आहे ना £ ? कमळीनं स्वयंपाकघराच्या दाराशी उभ राहून म्हटलं 

: अं ? काय १ मला कांही म्हणालीस १ ?? 

£ छान | दुसरं कुणी आहे तरी का घरात १ ? 

: बापू अन्‌ आत्याबाई कुठं गेढींत १-- 

५: त्याचासुद्धा पत्ता नाही का? बापू गेलाय शिकवणीला चार वाजतांच' 
अन्‌ आत्या उपास सोडायच्या आधी दुेवदरांन करून यायला गेली आहे---?? 

“६ अरेच्या | माझ्या ध्यानांतच आलं नाहीं. 

: कसं येईल १--स्कालर लोक ना |! आतापासून आपलं युनिव्हर्सिटीला 
कळवून ठवलं पाहिजे -साऱ्या बल्षिसांची अन्‌ स्कोलटररिपाची पुरचुंडी बांधून 
ठेवायला -- म्हणजे मागाहून त्या बरिचारीची धादल व्हायला नको. ?? कमळीनं 
रघूची खूप थट्टा करण्याचा प्रयत्न केटा. पण खरं म्हणजे ती मनांतठी भीति. 
लपवायला पहात होती. आईच्या मृत्यूपासून रघूच्या मूळच्या गंभीर आणि. 
आंखडलेल्या वृत्तीत एका तऱ्हेच्या गूटतेची भर पडली हाती, तो काणाशींच 
घडसा बोलायचा नाही, एखादा नाद धेऊन बसला म्हणजे त्याला बाकी 
कशाची झुद्ध राहायची नाही. वास्तविक * आई वेगळं पोरं? म्हणून आत्या- 
बाईंसुद्धां त्याच्याकड पूर्वीहतक्‍्या करडेपणानं पहायच्या नाहींत. बापू परीक्षेला 
न बसल्यामुळं त्याचा जोडीदार झाला होता अन्‌ सहाजिकच त्यालाही रघूची 
अभ्यासांत थोडीफार मदत होत होती. कमळीची मूळची माया सतराव्या 
वषांच्या मुग्धतेनं माहरत होती -पण हे सारं कांही. आपल्या वक्षेब्राहेस्चं 
आहे अशी रघूची वागणूक होत होती. जणं आईच्या मृत्यूने त्याचे आपल्या 


६० लवणाची मासोळी 
गांबाशीं असलेले सारे पाश तोडले होते. वरवर सारं पहिल्यासारखं चाललेलं 
दिसत होतं तरी ते तसं नाही याची निश्चित जाणीब कमळीला होती; आणि 
तिलाच ती आता विशेष करून टांचीत होती--- 


कमळीच्या त्या थट्टेबर रघू नुसता पोकळ हसला होता. त्याला आपण 
काही| उत्तर देलं पाहिजे असं वाटलं नाही कीं त्या थट्टेत गुदगुदल्याही झाल्या 
नाहींत - तेवढ्यांत आत्याबाई आल्या म्हणून तो विषय आपोआप संपला 
'एवढंच, जेवण झाल्यावर कमळीनं आत्याला सहजी म्हणून विचारलं, -- 

“६ आत्या, आज सोमवार आहे तेव्हा आम्ही बागेत जाऊन येऊं काय !?? 

“८ सी येणार नाहीं हं कमळे. उगीच मला गोवूं नकोस---?”' बापून 
आत्याबाई बोलायच्या आत सागून टाकलं -- 

“६ तुळा काणी ये म्हटलंय १ संबयच आहे मधें नाक खुपसायची--- ” 
कमळीन टोमणा मारला--- 

: मग विचारलंस कशाला आत्याला आम्ही जाऊं का म्हणून १ 

“८ पण आम्ही म्हणजे मी अन्‌ तूं असं कोणी सागितलं तुला ---?? 

५६: अस्सं - आज जोडीने बार्गत जाऊन नवस बोलायचा आहे वाटतं-- 
तरीच आज माझी अडचण झाली --? 

:: बाप्या - तुझ्या जिभेला काहीं हाड £ - जातीय आपली पोरगी देवाला 
-रघूच्या सोबतीने तर--?' आत्याञनाईनी बापूला चापला. 

“: आता आम्ही बाइट झालोय. यंदा ती दोघं पास झालीं अन्‌ मी आपला 
परीक्षेला बसलो नाहीं ना---?! 

“ त्याला लोकानी काय करावे ? ” 

बापू्न आणखी कांही बोलायच्या आंत कमळी घरांतून आहेर पडली 
-अन्‌ रघूलाही मग बाहेर पडावंच लागलं. गावाच्या बाहेर पडेपर्यंत माररे 
वळून न पाहता कमळी पुढं चालली होती, अन्‌ रघू जेवण अंगावर आल्या- 
सारखा रेंगाळत हळूहळू चालला होता. ओढ्याच्या पुलावर गेल्यावर कमळी 
हुरश करीत कड्यावर बसली. रघू तिथं येऊन पोचला तरी तिनं उठायची 
कांहीं हालचाल केली नार्ही. 


लवणाची मासोळी क. 

“६ ब्राग अजून दीड मैल आहे आणि तिथनं परत घरीं यायचं आहे-- 
याची आठवण आहे ना १ ?? खूनं उभ्याउभ्या विचारलं. 

“६ घण मी म्हणते दीड मैल जा आणि पुनः तितकंच परतून या. ?? 
एवढा व्याप हवा कशाला १ 

: ब्रागंत जायचा भेत माझा नव्ह्ता--” 


:£६ मृग माझा होता तो माझ्या मनासारखाच होऊं दे कीं. बागेचं आपलं 
निमित्त होतं फिरायला जायला मिळावं म्हणून. इथंच बसू या थोडा वेळ अन्‌ 
मग जाऊं परत ---? 

“ छान ! म्हणजे माझी चागलीच होईल - आधीं जापूनं काडी लावून 
दिलीच आहे, ---? 

५६६ पण सांगतंय कोण घरांत--१ ? 

“६ वा |! आत्याबाइईनीं प्रसाद आणायला पेसे दिळे आहेत ना. अन्‌ मी 
म्हणता. एवढं खोटं कशासार्ठी १ ” 

“ त्यात काय झालं - म्हणच आहे ना ऑल इज फेअर---?” 

“ ते काही मळा कळत नाहीं. तुला यायचं नसलं तर थांब इथंच. मी 
येता ताडू ताड जाऊन --? 

५: त्याच्यापेक्षा मी बरोबर नको असं सरळ सांगितलंस तर---?” 

“६ असं कर्धी मी म्हटलंय ! तुझ्याच मनांत यायचं दिसत नाही--?” 

“ हो, पुनः खापर माझ्यावरच. चालवा आतांपासून हुकमत --?' 

£ तूं काय म्हणतीस तें मला कळत नाहीं --- ? 

“६ कळेल कशाला ? वेड घेऊन पेडगांवला गेल्यावर --? 

५६: आता मात्र तुझ्या या उखाण्यापुढ हद्द झाली ! म्हणणे तरी 
काय तुझं १ 

£: सराळं रामायण ऐकलं तरी रामाची सीता कोण हें आहेच--?? 

कमळीशी बाद करण्यात अथे नाही असे समजून रघू चाळू लागला. 
कमळीही त्याच्या बरोबरीनं चाळू लागली, परतून निघेपर्यंत दोबंहो कांही 
बोलली नाहींत. पुलाजवळ आल्यावर कमळी रडकुंडीच्या सुरांत म्हणाली; 
“६ माझं चुकलं का ! रागवायच नाही इं--?”? 


द्र लवणाची मासोळी 

“ हुं तूं काय चालवलयंस अलीकडं १ माझ्याशी बोलतांना अधांत्री हृर्वेत 
बोलल्यासारखी काय बोलतेस - तुझ्या मनांत तरी काय आहे ! कमल -- 
तुझ्या बोलण्यानं मला गुदमरल्यासारखं होत--' 

“६ याच्यापेक्षा उघड मला कसं अन्‌ किती सागतां येईल १ - पण मला 
वाटलं--?? 

रघू अधिकच ग्रदमरला. त्याला कमळीचे म्हणणं कळलं नव्हतं म्हणून 
नव्हे तर तिला स्पष्ट बोलायला सागून आपली सुटका करून घेता येईल असं 
चाटत होत ते साघलं नाही म्हणून. आता हा वाढता कुंटपणा नको या 
विचाराने त्यानं निराळा मार्ग स्वीकारला आणि तो कमळीकडं रोखून पहात 
तिला म्हणाला --- 

८६६ कमल, मला तुझ आश्चये वाटतं. शाळेतला अभ्यास करीत आनंदात 
दिवस काढायचे सोडून तूं असले विचार डोक्यांत का आणावेस £ तुला 
आठवतं ? - बापूनं आपल्या वहीत यमू बापटचं चित्र काढलं ती “ गमत ? 
मला दाखवताना तूं किती सरळ आणि शुद्ध होतीस ! तो सरळपणा आणि 
मोकळेपणा सोडून तूंही असल्या फदांत पडशीळ असं मला वाटलं नव्हतं. या 
वयांत लय्ला-प्रेमाचे विचार, हे चाळे कशाला करायला हवेत १ तूं सुद्धां 
अशी बापूसारखी पोखरून जाशील अशी कल्पना तरी आली असती 
का कुणाला १? ?? 

“: हीच ना माझी किंमत १ मी सुद्धा बापूसारखी पोखरून गेलेली ठरले 
ना ! बापूनं यमू बापटचं चित्र काढलं तेव्हा तो केवढा होता अन्‌ आता मी 
केवढी आहें ? पण मीच वेडी, पोखरलेली --- ?? कमळीने आपलं रड कस- 
बस आवरून धरल होत. 

“ रागाऊं नकोस कमल. तुला पोखरलेली म्हटल ते लागटपर्णे - तुला 
दुखवाव म्हणून नाहीं, तो शब्द तूं मनावर घेऊ नकोस. पण तू माझा विचार 
करीत नाहींस - तुमच्या घरीं मी आश्रित म्हणून राहिलो आहे. माझ्याबद्दल 
नसती शका कोणाच्या मनांत आली तरी माझी स्थिति काय होईल ! भिस्तरा 
गुंडाळून रस्त्यावर उघडं पडावं लागेल, वर अपवाद येतील ते वेगळेच. 
आधींच बापूची नजर उणे पहायला टपलेठी असते - हें काय तुला 
ठाऊक नारह्दी £ ? 


लवणाची मासोळी ६३ 

:€ पण - पण, आतांच कोण याची जाहिरात करतंय १? - नुसतं आपण 
दोघंच असताना मनसुद्धा मोकळं करायचं नाही का १ ?? 

“६ तेबडं सुद्धां मळा झेपणार नाहीं कमल - सुदैवानं तुला माझ्या स्थितीचा 
अनुभव नाही - तं तुला कळत नाही हृंच चागलं -- ? 

“क्‍क्य्यानेतर दोघंही काही न बोलतां घर्री परतळीं कमळीशीं बोलताना 
रघूने असहायता आणि भीति याचा उच्चार केळा हाता -तो खोटा 
नव्हता, त्याच्या स्वभावातच, व्यवहारी जगाला हवा असतो तितका, कामा- 
पुरतासुद्धा खोटेपणा नव्हता. किंबहुना आजच्या कमळीच्या बोलण्यानं त्याचं 
त्यालाच एक सत्य कळून चुकलं, “ उद्या लयन होइनासं झालं तर तुमची 
कमळी द्या म्हणतील.!? अश्या अर्थाच्या आल्याबाईच्या प्रहारानं तिरामेरी 
आलेला रघू आपण कमळीशीं लय़ करण्याच्या योग्यतचे ठरू अशी जिहृ 
एकेकाळी बाळगून होता, त्या वेळीं फक्त आपल' अपमान करणारा इनामदार 
मंडळी त्याला दिसत होती. जेव्हा जेव्हा तो प्रसंग त्याला आठवायचा 
तेव्हा तेव्हा त्याच्या डोळ्यांपुढं कांही चित्रे तरळायला लागायची. या साऱ्याच 
चित्राचा एक विशेष असा होता कीं त्यांत त्याला कमळी आपली बायको 
झाळी असून आपण मोठ्या ऐट्बाजपर्णे संसार करता आहांत अस त्याला 
दिसायचं. पण या साऱ्याची सुरुवात कुठ अन॒ कशी होते याचा मात्र 
मागमूस नसायचा, पहिलीं पानं फाटून गेलेल्या कादंबरीसारखी ही हकीकत 
त्याला सखद वाटायची ! 


आजच्या प्रसंगाने त्याला नवी जाणीव झाली ती सुरवातीच्या मागमूस 
नसलेल्या भागाबद्दल ! हा विचार आपण कधींच कसा केला नाहीं याचे त्याला 
आश्चर्य वाटलं. या वर्षात कमळीनं त्याची नेहमी येक्षा अधिक कळकळीनं चौकशी 
चालवली होती, त्याची प्रत्येक गरज ती आर्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करीत 
होती; याची जाणीव खूला नव्हती असं नाहीं. पण त्यानं या साऱ्याचा एकच 
अर्थ केला होता. गतवर्षीपर्यत आपण नुसते आश्रित होता; यंदा आईवेगळं 
पोर ही आपल्या स्थितींत भर पडली म्हणून - म्हगून हें सारं होतंय. आगि 
या अनाथ संगोपनाच्या सहानुभूतीनं तो थोडाफार आठुरला होता. कमळीच्या 
कळकळीचा अर्ध आपण केला त्याहून वेगळा आहे हँ कळल्यावर मात्र त्याची 


दड लवणाची मासोळी 


“आ. अ ७ क अ आरा आ करा करा आ. आ. ७४७३ अध. ७७ & “4 आहे म्हा का हा आ को. आ ७. 2१ कक ह्या आळ ५७ ० अ 90 का हक आऊ हक का &७ ॥% ५ ७० ७७ ७ की हा आ अ) ळा कक 


स्थिति विचित्र झाली. व्यवहारतः ह निंग फुटल तर त्यांचं सारं खापर आपल्या 
माथी फुटेल ही अस्फुट असलेली भीति आज कमळीशी बोलतांना सहजी 
व्यक्त झाली -- 


तत्त्वतः त्याने स्वत.ला प्रेमाच्या 'चाळ्या'पासून अलिप्त ठेवलं होतं. त्याला 
कांही विदोष प्रयत्न करावा लागला अस नाही. अबूच्या नांबानं झालेल्या थट्टे- 
पासून त्याच्या मनांत या विषयाची एक तऱ्हेनं अढी बसलेलीच होती. दरिव- 
पुरांत आल्यावर अभ्यासाच्या चाकोरींत स्वतःला जुपून घेतल्यावर त्याला 
मोकळा वेळ फारसा मिळतच नव्हता. अभ्यामान आपल्याला कांही तरी मोठ 
प्राप्त करून घ्यायचं आहे अशी एक समजून मनाशी बाळगून तो एकमार्गी 
रहाणीनं रहात होता. 


कमळीबद्दळ किंवा स्त्रीबद्दल त्याच्या मनात विचारच येऊं नयेत अशी 
विकृति त्याच्यात नव्हती. पण त्या विचारात स्त्रीप्रेमापेक्षां स्वतःच्या स्थितीची 
उन्नति हा भागच आधिक प्रभावी ठरायचा. कमळीसंबंर्धींची जुनी जिह॒ 
आठवली तरी तिचं वळण बदललेलं होतं. त्याला कमळी हवीशी वाटली तरी 
ती तिच्या स्वतःच्या इच्छेखातर नव्हे. बापू-आत्याबाई या इनामदारीच्या 
अकोतल्या मंडळींनी त्याला कमळीबद्दळ विचारलं असतं तर -- पण पांच 
बर्धे इनामदाराच्या घरांत राहून त्याला एवढं कळून चुकलं कीं त्या आढ्या- 
खालीं राहूनसुद्धा बापूची आई अन्‌ कमळी ही दोन नुसती मुकी जनावरं 
आहेत - आपल्या ढळढळीत दारिद्री भटकीपेक्षां त्यांची मिळमिळीत इनाम- 
दारी जास्त भयानक आहे. अश्या स्थितीत कमळीने मन मोकळं करणं याला 
काय अर्थ होता £ - तिच्या त्या विचित्र स्थितीत रघूला कमळीबद्दल सहानु- 
भूति, करुणा वाटायची पण तिथ्याबद्दलची जिह्य वितळून जायची | --- 


नाहीं म्हटलं तरी त्या दिवर्शीच्या कमळीच्या बोलण्याने रघूला पंचांत 
टाकलं होतं. आपल्यासारखीच पिचून जाणारी व्यक्ति म्हणून, तिच्या 
गोडव्यानं, तिच्या आईपासून चालत आलेल्या मायेच्या वृत्तीनं, रघूचे मन 
कमळीकडं ओढ घ्यायचं. कशाला उगीच भट-इनामदार, गरीब-श्रीमंत 
यांच्या बांध्यांत पडावं, आपल्यापुरतं जेवढं जुळेल तेवढं करून टाकावं असा 
एक विचार यायचा. पण दुसरीकडे बापूचं टोचून बोलणं, कांतिलालची 


लवणाची मासोळी ६५ 
हशा झक ग भाळ ह हक बहा कड आड झिड व्या “७ आ का अ आढ, ७ झा आ ७७ 5 ळा आ ७» 08 अ 89 &७ &७ 6७ धळ अ5 90. 5 5 गरळ अ? अक ७ अ हक वह कक ७७ हक शि झग कयी 
स्कॉलरारीप, असल्या गोष्टी आठवल्या कीं त्याला वाटायचं आपण ऐके 
माणूस-कुठल्या झाडाचा पाला. कुठंही कसाही झडून गेला, पायदळीं तुडवला 
तरी त्याची काय चिंता आहे. कशाला स्वतःला नुसतं एक व्याक्ति म्हणून 
महृत्त्व द्यायचं-जेवायचं अन जगायचं काम काय जनावरं करीत नाहीत--- ? 
त्यांत कसलं स्वारस्य आहे £ -- माणुसकीने आपल्या स्थितीची जाणीव ठेंवूज़ 
तिच्यांतून वर येण्याची घडपड केली तरच आपल्या श्िक्षणाला,. हुशारीला 
कांहीं मोल येईल. अक्या तऱ्हेनं पेंचांत पडल्यावर रघू हतत्रुद्ध होऊन जायचा. 
हें की ते, याचा [नकाल त्याला करतां यायचा नाही अन्‌ मग त्यातून सुटका 
करून घध्यायसारठीं - पण याला तो सुटका करून घेणं म्हणायचा मात्र नाही -- 
चाळू घडीचं आपलं काम फक्त अभ्यास करून रहायचं अशी समजूत करून 
घ्यायचा-- 


>< >< >< 


फक्त अभ्यास करीत रहायचं असं रघूनं ठरवलं तरी तें त्याला जमण्या- 
सारखं नव्हतं. भट़िकच्या वर्गोत आल्यानंतर रिप॒ व्हून॒ विकलप्रमाणं अभ्यास 
या चीजेची जाणीव होऊन खडबडून जागे होणारे बापूसारखे अनेक विद्यार्थी 
असतात. त्यांच्या भाषेत बारा तास, चौदा तास अक्षी अभ्यासाची मोजदाद 
सुरू होते. जाग्रणाचा मोसम म्हणतात तो चाळू होतो -- पण रघूला या सग- 
ळ्याचा पत्ता असण्याचं कारण नव्हतं. वर्गात होणाऱ्या अभ्यासाला वेळच्या 
वेळी जुजजी उजळणीची जोड' देऊन त्याचं काम भागत असे. त्यामुळ घरची 
“लफडी? विसरण्यासाठी अभ्यासांत डुबून जायच असा बेत केला तरी तो पार 
पडत नव्हता. 

रिक्राम्या बेळेचा उपयोग कसा करायचा याच्या चिंतेत असतांना र्घूला 
लहानपणची लवणानंद स्वामीची एक गाष्ट आठवली. लहानद्या जखमे- 
पासून कुठल्याही मोठ्या आजारापर्येत साऱ्या आधिव्याधीवर मिठाचा 
उपाय सुचवणाऱ्या त्या स्वामीबद्दल रघूला लहानपणीं मोठं कोतुक वाटलं होतं. 
असा एखादा सर्वकप्र उपाय आपल्यालाही सांपडला तर १ - त्याच त्यालाच 
इसूं आलं - जरथमेवर मिठाचा उपाय सुचवणारे स्वामी आणि जखमेधर मीठ 
चोळणं ही म्हण सचवणारा व्यवहार -- यांत आपल्याला सामान्यांच्या व्यवहारा- 

ल. मा...५ 


६६ लबणाची मासाळी 


वरच विश्वास ठेवला पाहिजे ह सांगायला नको होते. पुढे कालेजांत असतांना 
वासुदेवराव पटबर्धनांच्या “ वेडे व्हा ? या शब्दप्रयोगाची माहिती झाल्याबर 
त्याला आपल्या सामान्याच्या निर्णयाचंही असंच हसू आलं होतं - पण या वेळी 
आपल्याजवळ अशी काही तरी जडीबुटी असावी असा मोह व्हायचा. 

-ण"्पण रघ विचाराच्या आहारी फ'र दिवस गेला नाहीं. मनात कांही 
खळबळ झाली की दूरबर फिरून यायचे हा त्याचा बिनपैशांचा उपाय 
ठरलेला होता तो आपोआप लाज लाब फिरायला जाऊं लागला -- फिरण्यात 
चांगळे दोन अडीच तास मोडायचे अन शिवाय पाय मेंडाळून दमून आलें 
म्हणजे रात्री निवात झाप लागायची. त्याच्या या फिरण्याच्या वेडाची 
: आख्या 'च होऊन वसली. बापूनं सुरळातीला त्याला “' काय पेन्शनरा- 
सारखा फिरायला जातोस ?' म्हणून चिडवले आणि त्याचा परिणाम 
होत नाहीसं पाहिल्यावर बापूच्या थट्टेळा नेहमीचं बळणं लागलं ---“' फिरायला 
जाऊन हली डोळ्याचा व्यायाम घेतोस वाटतं १ ” या वाक्याच्या भरील 
तो डोळे मिचकावीत कमळीला म्हणाला, “' बघा बहिणाबाई, असा बाहेरच्या 
ब्यायाम ध्यायची संवय झाली म्हणजे लाजचं पाहून त्याला ' दूर दृष्टि ? येईल 
अन्‌ जवळचं दिसनासं होइल - बाकी आमच्या दृष्टाने त॑ काहीं वाईट 
माही म्हणा - पण तुमचा आपला नवस तो---? 

आपल्या फिरण्याचाही असा अनर्थकारक संबंध जोडतां येतो याची 
रघूला गंमत वाटली. त्यानं बापूला उत्तर द्यायचंच सोडल आणि आपला क्रम 
चालू ठेवला. त्याच्या कार्नी आलं होतं की एका कालेजचे प्रिन्सिशळ गावांतून 
काळेजला चार मैल रोज चालत जात असत. तेवढंच डोक्यात घेऊन त्यानं 
रोज चालत जायचा सराव करायचा असं ठरवलं. संध्याकाळचा त्याचा मोचा 
माठ्या रस्त्याकडे वळला. तरोबर कोणी नसलं तरी वाटेंत एखादा ओळखीचा 
विद्यार्थी भेटून त्याच्या मिडेखातर अलीकडे थाबायला लागायचा प्रसंग 
एक-दोनदा आल्यावर त्याने मुख्य रस्ता सोडून दिला अन्‌ तो आडवाटेनं 
शेतातून चालत जाऊं लागला. दररोज तो चार मैलाचा टप्पा गाठून मागं 
परतायचा 

तसं पाहिलं तर माठ्रिकच्या वगोत जायच्या आधीपासूनच रघूच्या डोक्यांत 
कुलिजजे विचार येऊं लागल होते. मटद्रिकपर्यतचं शिक्षण खेडेगांवच्य़ा मुलालाच 


ललघणाची मासोळी ६७ 
काय पण मोठ्या मोठ्या माणसांना सुद्धां मालाचा टप्या वाटत असला तरी 
शहरच्या बाताबरणांत त्याला कांही किंमत उरत नाही हं रघूला कळून चुकडे 
होते. खेड्यांतल्या मुलानं सहर्जी व्ह. फा. ची परीक्षा द्यावी तितक्‍याच सहूज- 
पणें शहरांत मंट्रिकची परीक्षा होऊन जाते. तिला काहीं महत्व उरत नाहीं. 
खेड्यांत मुलाला ही परीक्षा पदरात पडायला उचलून खर्च करावा लागतो, 
त्याची फेसाटी उडते; हा विचार नोकरीच्या किंवा लायकीच्या क्षेत्रात बसत 
नाहीं. म्हणून हा जादा वाटणारा भुर्देड हिशेबांत न घेणं अबघड वाटलं तरी 
कटु सत्य म्हणून पचवलं पाहिजे याची जाणीव रघूला झाली होती. त्यामुळंच 
मट्रिक झाल्यावर आपण शतकृत्य करणार या पाच वषीपूर्वीच्या स्वम्तांतून जागा 
होऊन तो खडतर वस्तुस्थितीला तोड देण्याच्या तयारीत होता. काहीं झालं 
तरी मंट्रिकपाशीं न थांबता पुढं जाण्याची हिंमत बांधायची या विचारानं तो 
मनाशी आखणी करीत होता पण “' हे कसं जुळगार १ ” हा प्रश्नच त्याच्यार 
पुढ सारखा उभा रहायचा. 

: कसं जुळणार १ हा प्रश्न मनांत बागवीत रघू परत फिरायचा तेव्हां 
मात्र तो खरोखरी स्वझाळू व्हायला लागायचा, कोणातरी मोठ्या माणसाशी 
ओळख होईल, त्याच्याकडून आपल्या हुशारीमुळें आपण होऊन मार्गदर्शन 
होईल. मदत करा ? म्हूणायची बेळ आपल्यावर यायचीच नाही. मात्र ह 
कसं घडल याची चिकेत्सा न करतां रघू समाधानानं घरांत पाऊल टाकायचा. 

प्रिलिमिनरी परीक्षा झाल्यावर तो या स्वप्तांतून जागा झाला. आपले 
बडील परीक्षेच्या फीसाठीं एक रकमेन बीस रुपये नुसत्या पत्रावर पाठवतील 
असं त्याला वाटेना. म्हणून परीक्षेनंतरच्या रिकाम्या आठवड्यात तो आपल्या 
गाबी आला. आई गेल्यापासून त्याला स्वतःचं घरसुद्धां परकंच वाटूं लागल 
होत. तसं वाटायला खघूच्या वाटणीच्या आलेली त्याच्या वडलांची करडी 
चागणूक आणि आईच्या आजारातली त्याची आरंभींची भबेपवांई हीच केवळ 
कारणीभूत नव्हती. गांवातले शिष्ट लोक खूच्प़ा कानी जाईल अशा बेताने, 
त्याच्याबद्दल सहानुभूति दाखवीत कुजबुजत असत---“' कृष्णंभटजी भाकरीची 
सोय व्हावी म्हणून मुलगी मिळाली तर दुसरं लयन करणार आहेत. चार-पांचर्शे 
रूपये द्यायची तयारीसद्धां आहे त्याची ?' आणखी वर मायेची पांखर 
घालण्याच्या मिषानं भर घाळीत--- “' आतां हा रू आलाय लज्लाला - चांगला 


दट लबणाची मासोळी 
शिकला सवरलेला मुलगा -- त्याला हुंडा देऊन मुली येतील - पण ते सोडून 
या पन्नाशीच्या घरात आलेल्या म्हाताऱ्यानं--?? रघूनं ही सारी कुजबूज 
मनावर घेतली नव्हती, बडलांची अश्यी माया त्याला कर्धी लागलीच 
नव्हती की दुसरं लगन केलं तर ती दुरावेल अशी धास्ती पडाबी. पण त्याला 
आतां ही कुजबूज आठवी ती अगदीं वेगळ्या संदभात - खरोखरच 
वडलाच्या मनात लय़ाबिभ्ासा्ठी चार-पाचर्दा रुपये खर्चायचे असले तर 
आपल्या फीचे पेसे ते सहजासहजी द्यायचे नाहींत. नुसत्या पत्रावर तर मुळींच 
पाठवायचे नाहींत म्हणून तो तातडीनं गांवी आला. 


रघू घरी आला त्यावेळीं कृष्णंभटजी कसली तरी पोथी बाचीत घरांतच 
बसले होते. जाकी आता त्यात कारही विशेष नव्हतं. घरात भटजी अन्‌ खूचा 
धाकटा भाऊ -- बाळ होता. रघूच्या आईन तो इंग्रजी शाळेंत शिकायला गेल्यावर 
या बाळाला जन्म दिलेला, त्याच्या जन्माबरोबरच आईला दुखणं लागलेलं--- 
पण तिनं ते कुणालाही मरपर्येत कळूं दिलं नाहीं बाळ तर जन्मतः रोगा. त्याच्या 
खस्ता काढण्यात कृष्णभटजींना घर सोडतांच येत नव्हतं. कर्धीकर्धी त्राग्यानं ते 
म्हणायचे देखील -- “ नसती पीडा कुर्णी सागितली होती £ - एकदा संपूनही 
जात नाहीं |! ? पण असं म्हटलं तरी भटजी बाळची होईल तितकी काळजी 
घ्यायचे. त्याला जवळ झोपवूनच ते पोथी वाचीत असले होते, 


परीक्षेला जवळ जवळ दोन महिने अवकाश असतांना रघू असा अचानक 
आलेला पाहून भटर्जीच्या काळजांत चरकले. मुकाट्यानं पोथी मिटून त्यांनी 
आपल्या हातानं - आयुष्यात पहिल्यादाच - रघूला चहा करून दिला. तेबढ 
होईपर्यंत भटजींच्या मनांत अनेक दांका आल्या होत्या. आई गेल्यापासून 
रघूर्ची हाड दिसायला लागलींच होती. एनवेळीं प्रकति बिघडून परीक्षेचा फाम 
मिळत नाहीं म्हणून तर हा परत आला नाहीं ना ? आणि याच्याही पुढची 
भयानक इंका म्हणजे यानं आई गेल्यावर अभ्यासच टाकला नाहीं ना? 
मागच्या वर्षी थातुरमातुर करून वर चढला असेल पण यंदा भाडं फुटून गेलं 
असेळ का १ त्याला एकदम गांगरून टाकायला नको म्हणून भटजींनी अगर्दी 
सोम्यपर्णे विचारलं--- 


“ असा एकाएकी कां आल'स ? पत्रत्रित्र न पाठवतां ! तूं माटरिक व्हायला 


.लवणाची मासोळी ६९ 
कजर्‍यकयाकास््लुव्िसस्सवत्सतत्सससस.्‌गनिख्क्खप्रार 11111. १ 1 1111 111111 1र्‍11111_11ृ11111_1ृ_11र्‍र्‍1र्‍1र्‍ 0.10, 
पाहिजे. कशाची काळजी करूं नकोस. यंदां अभ्यास झाला नसला तरी मनाला 
ळावून घेऊ नकोस--? 

“६ तसं नाही दादा ---? 

:६ तू कांहीं लपवू नकोस. मी पंचांगात पाहिलंय; आपला साडसाती आहे 
सध्या. येईल त्याला पाठ दिलो पाहिजे, तुझ्यावर तर आतां सारं कांहीं 
आहे ___ 32) 

रघूला त॑ बोलणं समजेना. त्यानं एकदम सागून टाकलं “ फोरमचे पैसे 
न्यायला आलाय मा. मधे एकदा घरी यावंसं वाटलं -- ”? 

“५ ये की. - पण तुला फाम मिळाला ना? * 

:: अजून मिळाला नाही. पण त्यात काय आहे. पहिला नाहीं तर दुसरा 
नभर येईल माझा. निकाल लागल्याबरोबर पैसे भरायला हवेत मग वेळ 
मिळायचा नाही म्हणून आर्धा आला --? 

“ बरं झाले आलास ते. अलीकडे बाळ तुझी आठवण काढतो ---? 

आणि दुसऱ्या दिवशी रघूनं मीत भोत फॉर्मसाठीं बीस रुपये मागितले 
तेव्हा भटजींनी त्याच्या हातावर पंचवीस रुपय ठेवळ “' आतां ऐन परी- 
क्षेच्या वेळी तब्येतीचे हाल करून घेऊं नकोस. दूघबिध घेत जा. त्या घरांत 
तुला काम पडत असलं तर या दोन महिन्यापुरता वेगळो खाली घेऊन रहा 
अन्‌ खानावळोंत जेवून अभ्यास कर. मा. पैसे पाठवीन. *' खूचे डोळे 
'पाणावले. त्याला कळेना आपण कुणाशी बोलता. आहोंत. चटकन्‌ तोंड 
फिखून त्यानं नाक पुसण्याचं निमित्त कलं अन्‌ मग तो अडखळत म्हणाला, 

“ तिथं काहीं त्रास नाहीं. खानावळींतल्या जेवणानंच प्रकृति बिघडेल 
एखादवेळी. चागलं चाललंय माझं, आणि त्यानी आतां इतकी पाच बघ केलंय 
तर उगीच दोन महिन्यासाठी त्यांना अनू आपल्याला अपवाद कशाला १ 
तुम्ही काही काळजी करू नका दादा. 

परत जातांना रघू एका निराळ्या जगांत बावरत होता. वडलांच्या 
अचानक सहानुभूतीनं त्याला अस्मान ठेंगणे केलं होतं. कॉलेजांत कसं जायचं 
ही दोका आतां त्यानं डोक्यांतून काढून टाकळी. आपण कालेजांत जाणारच. 
फक्त कोणत्या हाच प्रश्न उरलाय. अशा आनंदांत गुरफटून तो शिवपूरच्या 
इद्दींत शिरला. 


७० लवणाची मासोळी! 
१८७५५५७ ५७ ७99 “5 55 4७% &5 8. अड 95 “5 ७5 7 आ झा. 88 5 95 ७0 क ७0 0 ७ ७७ ७७ ह 85 ७5 ॥७ 35 88) ४ 08 अह झड गक आह धाड अठ भा ७७ आ 15 क क डर क्क 

परीक्षा संपल्यावर तो आठवणीनं कांहींजणांना भेटला. त्यांत अर्थातच 
सानमास्तर होते, त्यानी स्वभावाप्रमाणं रघूची थट्टा केली. 

:: आतां कसली तक्रार आहे ? गाणिताचे पेपर दीडशे मार्काचेच काँ 
असतात ? संबंध मार्क मिळवायला आणखी पेपर हवे होते £ 

:£६ आतां तक्रार नाहीं कसलीसुद्धां--- 

:: मग ? सो व्हाट ! आता शाळा संपठी. शाळेतल्या मास्तराकडे का 
आलास ? नाऊ गो टु प्रोफसर्स. पुढं जाव; रंगाळतोस कां १ 

:६ पुण पुढे कुठं जायचं १? मी गरीब आहे---?? 

“६ हातू रड्या ! नो गरीब - तुला कोण थाबवणार आहे ? चल नी 
इथनं. पुनः इथ परत येऊं नकोस. * 

“ इथं परत येऊं नकोस म्हणून सांगताय सर - पण कुठं जाऊ तं मात्र 
सांगत नाहीं--- ” 

५६ ती कोपऱ्यांतली काठी इकडं आण अघूं ?? 

£ कशाला ? मळा मार द्यायला १ ?? 

“: तुझी काय भीति आहे का मला ? पण मार कशाला द्यायचा ?-- 
तुझ्या हातातच देतो ती काठी - अजून तुला आधार हवासा वाटतोय. 
कुठं जायचं ते दुसऱ्यांनी सागायला हवंय - अन्‌ म्हणे स्कॉठर पहिल्या 
नेबरचा ] नो गुड्‌-नो गुड. ? 

--त्या वेळेला तिथल्या काळेजांत उणीपुरी तीनशों मुलं होती. एवदथाशा' 
लहान कॉलेजांत आपल्या स्कालरनं जावं असं सान्याना वाटत नव्हतं. पण 
त्यांच्या सांगण्याची तऱ्हा निराळी होती. '' अरे आपल्या हायस्कूलनं या 
कॉलेजच्या क्रिकेट टीमला मारा दिला. तिथं तूं जाणार ! अन्‌ किती दिवस १ 
गणिताचा विद्यार्थी तूं. तुला तर सायन्सकडेच जायला हवं. मग दोन वर्षोरनी 
जायचं ते आतांच कां जात नाहींस ? पुण्याला तुला भरपूर स्कॉलरशिप 
मिळेल. नवं वातावरण आढळेल. इथं वासरांत लंगडी गाय ठरतोयस. तिथं 
दंड थोपटावे लागतील, जा. पुनः येऊं नकोस इथं-- ? 

आणि पुनः परत यायचं नाही. अश्या इव्यासाने त्यानं पाच वषीपूर्वी ज्या' 
उत्साहान शिवपुरात प्रवेश केला होता त्याच उत्साहानं बाहेर पाऊल टाकलं. 

>< >< >< 


लवणाची मासोळी ७१ 
इ ७७ ॥४'॥0) ७ 80 ह की करी आळा ७७% ७ करि क कॅहली की भांआ्रा कॉ या का अ आ ७5 80 48 ता अ) का ५७ ॥8 कर ७ का किड विक किड हळ "क्क "हळ वळ कक क किक हळ कळ कळ 

जुळैची पंघरा तारीख उल्टून गेली तसा रघू अधिकाधिक अस्वस्थ होऊं 
लागला. अजून स्कॉलरशिपचा निकाल बोडोबर लागला नव्हता. त्यानं धीट- 
पणानं ऑफिसांत चौकशी केली तेव्हां तिथल्या अपरिचित कारकुनानं “ जो्डांवर 
लागेल तेव्हां पहा ? असं त्याला पूर्वीच बजावलं होतं. घरून कृष्णंभटजी चे 
दोन-तीन पत्रं येऊन पडली हाती. अजून निकाल लागला नार्ही हाच मजकूर 
त्यांना पुनः पुनः कळवतांना रघूच्या जिवावर येत होत. कृष्णंभटजींची काळजी 
एक तऱ्हेची होती; रघूची दुसऱ्या तऱ्हेची होती. “ शिवपुरांत राहिलास 
तर थोड्या खर्चात कसं तरी करता येईल. मी निमतील तितके पैसे पाठवीन? 
असं कृष्णेभटजींच म्हणणं होते तर “ पुण्यात जास्त सवळत मिळून सोय 
होईल ? असं सागून रघूनं ठरल्याप्रमाण आपला पुण्याला जायचा बेत तडीला 
नेला होता. 

पुण्यांत पाऊळ '1/ 74'बून रघूला पावलोपावली मयसभची अन्‌ 
ल॑केतल्या सोन्याच्या विटाची आठवण होत होती पुण्याला ज तोस तर उतर- 
णार कुठं, रहायची सोय काय हे प्रश्न बडलानीं विचारले तेव्हा रघूला उगीचच 
अडचणी टाकणारे वाटले होते. स्टेशनवर उतरून कालजच्या जवळ झाल्यावर 
त्याची जागेसाठी भ्रमती सुरू झाली. त्यावेळेला रिक आसपास पाच 
पंचवीस बगले तरी केवळ विद्याश्यासाठीं खोल्या भाड्यान देणारे असे होते 
पण त्यांतून हिंडतां हिंडता तीस रुपये - चाळास रुपये टम ही भाड्याची 
भाषा ऐकून रघूची छाती दडपली होती. याच पावली परतून शिवपूरला जावं 
असंसुद्धा त्याच्या मनात आलं. अखेरी त्याला एक ओळखीचा चेहरा 
दिसला. आपल्याकडे निरखून पहाणारा हा गबाळा मुलगा कण म्हणून त्रे 
तरुणही खोलीच्या दाराशी थबकला; अन्‌ तो थावलेला बघून रघूने धाडस 
केलं--'“' तुम्ही सांगलीचे ना हो? ? 

६६ हो |! काय पाहिजे तुम्हांला ? इथं नवीन आलाय का? ?? 


“ हो. आतांच येताय; खोली हुडकायची आहे. पण आता टागेवाला 
थांबायला तयार नाही. थोडा वेळ माझ सामान ठेवूं का तुमच्या खोलींत? 

६६ ठेवा ना. इथं खोल्यांना तोटा नार्ही. हवं तर आता खोडी मिळेल 
तुम्हांला याच जंगल्यांत-- 


७२ लवणाची मासोळी 


धळ ७७ ७७०७0 काळा 0्आळ्ग्आ्ग्ा््गागाा्भागाभाकाल्ा भावा्याचाचाशाकात्रात &1॥&ा.या.ा,॥॥शककक 
“ तशा खोल्या पाहिल्यात मीं. पण माझं थोडं वेगळं आहे --- 
६६ क आहे. ठेवा तुमचं सामान इथ-- 


स्वोलींत सामान ठेवून, तिथेच चहा घेतां घेतां त्यांसी एकमेकांची ओळख 
करून घेतली. आपल्या केंद्रातून पहिल्या आलेला जोशी तो हाच हें कळल्यावर 
चेंदू बापटला गंमत वाटली. “' मग तुम्हो आमच्या शाळेचेच विद्यार्थी तर ! 
हवं तितके दिवस इथे रहा - तुमच्याजद्दळ पुष्कळ ऐकलंय मी---? 

रघूला मात्र मोठ्या रस्त्याला फिरायला जातांना कधी मर्धी दिसणाऱ्या 
तरुणाच नांव चंदू बापट आहे यापेक्षा अधिक सुगावा लागला नाहीं. त्याला 
आपल्याबद्दल पुष्कळ ऐकायला कुठून मिळालं हे तर मुळींच समजलं ना 
चंदूचे बोलणं थट्रेबारी न्यावं म्हणून ता म्हणाला, “ पुण्या जाटिरात लवकर 
होते अस म्हणतात; पण स्टेशनवर उतरताच ती होईल असं वाटलं 

“ ही जाहिरात पुण्यातली नाही. शिवपुरांतळीच आहे. अन्‌ तिचं श्रेय 
माझ्या बहिणीला आहे. ? 

“ पण माझी तर तिथल्या एकाही मुलीशी आळख नाही --- ”' 

“ तुम्ही खाटं बोलताय असं मी पाहिल्या भेटींतच तरी म्हणत नाहीं 
पण मला वाटत, तम्हाला यम वायट निदान नावानं तरी ठाऊक आहे. *? 

“६ त्या तर आमच्या वगातच होत्या गेल्या वर्धी-- 


मग झालं तर. तिनंच तुमच्याविषप्री आमच्या घरात सागितलं होतं. 
तुम्ही अडचणींतनं सुद्दा कसा वर नंघर राखीत होतात हे आमच्या इथे 
सगळ्यांना टाऊक आहे--- 
“ मला मात्र तुमची कांहींच माहिती नव्हती. केवळ रस्त्याबर पाहिलेलं--- 
एवढथाशा घाग्यानं मी तुम्हाला त्रास देतो. आहे. पण तुम्ही एकटेच 
आहांत इथं १ ?? 


*“ मग ! अहो, आता माहिती झाल्यावर तरी सरळ विचारा कीं -- यमू 
शिवपुरातच कालेजात जाणार आहे - तिला काय करायचं इथं येऊन १ ? 


छवगाची मासोळी ७३ 
“ तसं नव्हे - मी म्हणणार होतां खोलींत तुम्ही एकटेच आहांत काय १ 
एवढी भाडी आहेत इथं - माझ्यासारख्याची पंचाईतच ---!? 


“६ ह्या बंगल्यांतल्या खोल्या त्यांतल्या त्यांत स्वस्त आहेत. जिमखान्याच्या 
बाजूला गेलं म्हणजे बारा-बारा, पंधघरा-पंधरा रुपये दरमहा घेतात खोलीला. 
तुम्ही इथे अडचण मानूं नका. मला भाडं देणारा जोडीदार घेतलाच पाहिजे 
असं नार्ही. तुम्हांला वाटलं तर इथंच रहा. तुमच्या अभ्पासाला अडचण 
होणार नसली तर माझी कांहीच हृरकत नाहीं-- 


“: निदान दुसरी सोय होईपर्यंत तरी इथे रहातो. स्कॉलरशिप मिळाली 
की माझ्या वाटणीचं भाडंसुद्धा देईन. तसाच नाहीं रहाणार मी--? 


८ तृ काय तुम्हाला हवं ते करा, स्कॉलरारिप मिळेपर्यंत आणखी काही हवं 
नका झालं तर संकोच न मानतां सागत चला ---? 

तेव्हांपासून रघू , चंदू बापटाच्या खोलींत रहात होता. विद्यार्थ्यीच्या खोलीचे 
म्हणून जे नियम होते त्यामुळं रथूला हातानं स्वय्रेंपाक करण्याचा ञेत सोडून 
द्यावा लागला. काय करायचं याची पिता बापटनं दोघांचा ड्रा चाळू 
करून साड'वली होती. खूला महिनाभर मुकाट्यानं रहावं लागळ अजून 
स्काठरशिपचा निकालसुद्धा नाहीं. खोलीचं भाडं सोडलं तरी निदान 
खालेल्या अन्नाचे पैसे द्यायला हवेत हो रुखरुख त्याला टोचीत होती. अन्‌ 
चैदू बापट त्याबद्दल एक अक्षराने त्रोळत नव्हता म्हणून रघूची रुखरुख 
बाढली होती अन्‌ स्कालरशिपचा निकाल बोडावर लागत नव्हता. 


>< >< >< 


रघूच्या आवडीचा विष्रय़ गणित. बायनॉमियळू थिअरम आणि नाइन 
पॉइट सर्केळ यासारख्या रुक्ष आणि अडचणीच्या वाटणाऱ्या भागांशी तो 
मोठ्या हुरूपानं समरसून जायचा. बुद्धीचे कडे-कंगोरे घासून काढायला 
गगितासारखा विषय नाहीं म्हणून त्यात रमण्यातला आनंद घेण्याची त्याला 
मौज, वाटायची. अत्यांच्या ' प्रेमवीर ' सिनेमांतली विनोदी समीकरणं 
याहूनसुद्धा त्याचा गणितावरचा लोम ढळला नाही. अशा स्थितीत त्याचं 


लक्ष काव्या-वाडयययाकडे वळलं त॑ निराळ्याच कारणानं. शाळेत असतांना 


७४ लवणांची मासोळी 


बा आ ॥७ ७५ ७5 99 ७8 98 5 भा 48 55 0४ ७8 ॥॥ ७ ७0 ७ ७७ ७7 ७७ ७६ ७ आ ॥॥ ७७ आआआ) अ) क 90 ७) ७७ ७ 89 आ 5) 1590 भा हड ल क क कळशडाकरिवी 


इंग्रजी आणि शास्त्राखेरोज बाकीच्या सगळ्या विषयांचा मराठींतनं अभ्यास 
करतांना त्याची एक पद्धत बसून गेली होती. सारेच विषय इंप्रजींतून 
करण्याची पाळी आल्यावर ती पद्धत निरुपय्रोगी ठरली, त्यांतल्या त्गात 
इंग्रजी आणि संस्कृत या विषयांनीं त्याचं डोकं फोडलं. सहामाहीत इंग्रजींत 
कसेबसे पासापुरते आणि संस्कृतात स्कालरला लाजिरवाणे वाटणारे पन्नास 
टक्के मार्क पाहिल्यावर रघूला हादरा बसल. संस्कृतच्या इंग्रजीकरणाला तर 
कांही घरबंधच नव्हता. ' मदिराक्षी ' आणि ' रंमोरु ' सारखी स्त्रीचं रमणीय 
वर्णन करणारी विशेषण इंग्रजी भाषांतरांत “ वाइन आईड वन्‌ अण्ड प्लन्टेन्‌ 
थाईड टू ?? असल्या हास्यास्पद दाब्दप्रयोगांनीं व्यक्‍त केल्याशिवाय त्या 
शब्दाचा अथे कळला असा परीक्षकाला पुरावा मिळत नार्ही. हा शोध 
वाडय़याचं अगदीं जुजबी प्रेम असलेल्याळासद्धा हैराण करणारा होता. पण 
तो पचवल्याशिबाय गति नव्हती. इंग्रजीची सामग्री कालेजच्या मानाने कमी 
पडणारी होती. तिची भरपाई करण्यासाठीं एफ्‌. वायूच्या दुसऱ्या सहामादी- 
पासून नियमितपणे रघू काळेजच्या लायबरींत जाऊं लागला, 

सवसाधारणपणं इंग्रजीचं शान वाढावे म्हणून रघूनं अवातर वाचन 
करायला सुरवात केली. कानन डायलपासून सुरवात करून दरराज कमीत कमी 
शभर ते दीडशे पानं वाचायचीच अश्या हव्यासानं तो रेटून बसूं लागला. 
कानन्‌ डायलची गोडी लवकरच संपली. तरी वाचनाचं क्षेत्र कादंअऱ्यांचच 
राहिलं - डिकन्सच्या ' टेळ आफ टू सटीज्‌ ' ची संक्षित आवृत्ति खूनं 
माद्रिकच्या वेळीं रोपेड रीडिंगच टेक्स्ट म्हणून वाचली होती. त्या धोरणान त्यान 
डिकन्सला हात घातला, पिकविकच्या गंमतीनं त्याची डिकन्सची गोडी वाढली. 
पण त्याला खरं वेड लावलं तें डेव्हिड कापरफील्डनं. लहानपणी सावत्रपणाच्या 
चरकांत सापडलेली, पावाच्या तुकड्यासाठीं बणवण हिंडाब लागणारी, कोवळ्या 
वयांत कारखान्यात राबणारी डिकन्सच्या कादंबऱ्यांतली अनाथ मुलं - त्याच 
तं जीवनचित्रण वाचून रघूला लाज वाटली. आपण गरीब, हालांत दिवस 
काढणारे असं स्वतःला म्हणतो, पण यांच्या पासंगाला तरी आपले दाल 
पुरतील का ? स्वतंत्र देशांतल्या मुलांचीसद्धां अश्शी स्थिति असू शकते 
तर - की पारतंत्र्यानं आपल्याला इतकं परावलंबी करूय ठेवलंय १ या पराव- 
लंबनांत एवदीशी खोट पडली कीं आपल्याला अन्याय - अन्याय म्हणून 


लवणाची मासोळी ७५ 
भुई घोपटावी लागते ? पांच वर्षे इनामदारांच्या कुटुंबांत आणि आतां चेदू 
बापटाच्या खोलींत राहून आपल्याला जो विषाद वाटतो त्याला कांहीं कारण 
आहे का? इतक्या सह्दजपणें आपली जी भलीबुरी सोय होत आली आहे तिला 
गरिजींतले हाळ म्हणणं हं कितीसं योग्य ठरेल १ आपला ब्राह्मणी पिंडच आयतोबाचा 
आणि सखास्थ्याचा आहे म्हणून तर दी आपल्या मनाची उलाघाल होत नाहीं १ 
असा विचार करायला लागलं कीं रघूळा सुचेनासं होई आणि हा विचारच 
नको म्हणून तो आणखी खूप वाचायला लागे. पण वाचन सुरू झालं कीं 
असे विचार मनांत आल्यदीबाय रहात ना म्हणून त्यानं त्राग्यानं डिकन्स 
मधेच टाकून दिला ! 

गाल्सवर्दीच्या आधुनिक कार्दबऱ्याचं आक्षण रघूला का वाटलं कोणास 
ठाऊक ? कदाचित्‌ * फासाइट सागा ? च्या प्रचंडपणांत त्याचं मूळ असू 
ठाकेळ. मॅन ओफ प्रॉपर्टी वाचतांना रघू रागानं हिरवानिळा झाला. त्यातला 
तो आकषक म्हातारा, त्याची करुणापूर्ति सून आयरिन्‌ यासारख्या रमणीय 
चित्रांचं भानच त्याला राहिलं नाही. कादंबरीच्या नावाशी एकरूप झालेला 
सोम्स तेवढा रघूच्या मनावर ठसळा. श्रीमंतीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट 
आपली करूं पहाणारा, तिच्यावर आपला हक्क प्रस्थापित करणारा सोम्स 
म्हणजे रघूला आपल्या परिवय्रातला खेडेगांवी इनामदार वाट्ला, हीं 
मग्रूर माणसं - पेशाशिवाय काही न ओळखणारी माणसं, याना माणसं तरी' 
का म्हणायचं १ सोम्सच्या जीवनाचं वर्गन वाचल्यावर रघूला वाटल 
संस्कृत कवि भोळे तरी म्हटले पाहिजेत किंबा लाचार तरी म्हटले पाहिजेत. 
ठांगारचेष्टा करून सवरून नंतर मात्र दाकुतलेलळा न ओळखणारा दुष्यन्त -- 
महाभारतकारानं त्याचं केलं तंच वर्णन खर - काळिदासानं उगीच त्याच्यावर 
दुवीसाच्य़ा शापाचे पांघरूण घातलं. कथा-कादंमर्‍्यांच्या जगातनं रघू 
नकळत प्रत्यक्षात आला आणि त्याला अचानक आपल्या जंगल्याची एक. 
आख्यायिका आठवली. त्या बंगल्यांत हली एक एकाक्ष इसम माळ्याचं अन्‌ 
विद्यार्थ्याच्या हरकाम्याचं काम करीत होता तो कुणालाही एवढ्या तेवढ्यावरून 
टाकून बोलायचा अन्‌ त्याच्या बोलण्याचं पाठूपद असायचं “' कां १ लई माज 
आलाया पैक्याचा १ ? त्या पालुपदाच्या बुडाशी ती आख्यायिका होती. या 
एकाक्षाच्या आधी एक जाई बंगल्यातलीं काम करीत असे. तिथं रहाणाच्या' 


७६ ळवणाची मासोळी 
अह ७७ ह शद च धा भाऊ ७0 भा. 08 ह ७8 ७8. /03. 69 3६ 000 0) झह छा ग्रा धड ४ ७७ ७६ अश यो. हत डा ०५३ हड अ झा धाड. 38 ७७ धा 0७ ५5 वड. ७७.५७ भकला_ ७ क अ अ7त्रकडी 
संचाविश्ी उलटून एक-दोन मुलाचे बाप झालेल्या बाप्या विद्यार्थ्यांना कुर्णी 
सागितलं - निदान ते तसे म्हणत होत म्हणे - की या बंगल्यांतून बायका 
कामं धरतात तीं “ अवांतर ? कमाई करायसाठी. त्या माहितीने या उपाशी 
बाप्यातला उपाशी पुरुष जागा झाला आणि त्यानी त्या जाईला रात्रींची भांडी 
सकाळीं बिघडतात तेव्हा ती रात्रींच्या रात्री घासून टाक म्हणून सांगितलं 
आणि नंतर थोड्याच दिवसानी पन्नाशी उलटलेली ती बाई या बाप्यांच्या 
खोलींतून शंख करीत बाहेर आली. त्यावेळीं एका हातानं तिच्या हातात नोटा 
देत दुसऱ्या हातानं तिचं तोंड बंद करण्याचाही प्रयोग झाला. अन्‌ तेव्हां- 
पासून हा उमंट एकाक्ष माळी बंगल्यातळ काम पाहूं लागला. साम्स आपल्या 
बायकोवर अत्याचार करतो ही हकीकत वाचताना रघूला आठवली ती या 
म्हाताऱ्या माळगीची हकीगत. पण हे चित्र फार थोडा वेळ टिकल झ्या 
रनामदारी वातावरणाशी आपण याची सागड घातळी हाता ते बातावरण कां 
विसरावं याची त्याला खंत वाटली. आयरिनूचं दुसऱ्यावर प्रेम होतं म्हणून 
सोम्सच्या वागणुकीला अत्याचार म्हणायचं ? वर्षानुवध इनामदारांच्या घरची 
बाज अढवणारी बपूचा आई तरी काय़ वेगळी होती ? साऱ्या जन्मात नबऱ्या- 
शिवाय दुसऱ्या पुरुषाचा बारा न लागलेली ती बाई -- तिचा त्थिति आयरिन- 
पक्षादी करुणास्पद नव्हती का? आणि ही सारी ईश्वरी कृपा म्हणून अंग 
झाडून मोकळे होगारे अप्या इनामदार -- सोम्सच्या कड'वटपणापेक्षा हा 
इनामदारी गुळचटपगा अधिक भयानक होता. बापूची आई भरल्या कुंकवानं 
जगत हाती ती मरण येत नाहीं म्हणून, यापेक्षा जिवंत मरण म्हणतात तें 
वेगळं काय असू शकगार ? प्रत्येक मतुष्यच स्त्रीला अशी ' संपत्ती *ची बाज 
समजत नाहीं का ? असल्या विचाराचे तुबळ सुरूं झाल की रघूला वाटायचं 
कुठून झक मारली आणि या कादअऱ्याच्या नादाला लागलां. 

अशी अवस्था झाली तरी रघूच्या वाचनाचा परिणाम व्हायचा तोच 
झाला. अतिवाचनानं डोळे दुखवू. लागळे आणि त्या दुखऱ्या डोळ्यांनीच 
इंटरच्य़ा सहामाहीचे पेपर कसेअसे लिहून तो घरी परत आला. इंग्रजी 
'सुधारण्यासाठीं म्हणून जो नाद त्यानं लावून घेतला त्यानं त्याच्या नेमलेल्या 
अभ्यासाचं खोजरं केलं होतं. सट्टींत बाकीचे विद्यार्थी जादा अभ्यासाला 
म्हणून पुण्यांत राहिले असतांना, रघूळा मात्र मागं पडलेला अभ्यास भरून 


लवणाची मासोळी ७७ 
काढावयाचा विचारसुद्धा बाजूला टाकून, डाक्‍्टरी सल्ल्याप्रमाणं सक्तीची 
विश्रांति घेण भाग पडलं होतं. त्याच्या येण्यान कृष्णंभटजींना आश्चवये तर 
वाटलंच; पण ते थोडेसे खट्ट्टही झाले 


>९ >< >< 


आश्चिनाचा दुसरा पंधरवडा म्हणजे भटजीना गदींचा असायचा. पाहू 
मागाहून; करूं सबडीनं म्हणून मार्ग टाकलेले पक्ष घाईन उरकण्याची या वेळीं 
रीघ लागलेली असायची, पण रघू आल्यावर आठवडा झाला तरीं भटजीच्या- 
कडे कोणी आलं नाही. त्याचा सारा वेळ घरात बाळाचं करण्यात आणि 
जुन्या पोथ्या वाचण्यांत जायचा. इनामदाराचा अड्डा बंद झाला होता. कृष्णं- 
भटजी संध्याकाळच्या वेळी बाहेर पडलेच तर कृष्णेवर संध्या उरकून येण्या- 
पुरते बाहेर रहायचे. रघूश्शी बोलताना ते कांही संबध नसताना '' तूं पुण्याला 
गेलास तंच बरं झाले ? असं म्हणाले, पण आपल्या बदललेल्या स्थितीविषरयीं 
त्यानी अक्षर उच्चारलं नाहीं. रघूलाही विचारण्याचे धाडस झालं नाही. 
जनी स्थिति राहिली नसली तरी एखादवेळी “' तुझा बाप गेला नाहीं 
अजून घरची काळजी करायला २? हे शब्द ऐकायला मिळतील अशी खूला 
भीति होती. किरकिऱ्या बाळानं मात्र एकदा खघूला सांगितलं होतं, “' दादा 
भांडले; खूप खूप मोठ भांडले. ?” पण कुणार्शी ते त्याला सागतां आलं 
नाही. इनामदाराचा जापू एक दिवस अंगावरनं गेला तरी त्याने रघूकड 
पाहिलंच नाहीं अशा दंगानं पुढं चालायला सुरवात केली, 


हळूहळू दिवाळी आली तशी भटजींची उलाघाल वाढली. रोजचा भात 
उकडायचं किंबा भाकरी भाजायचं काम अंगवळणी पडलं असल तरी सणाला 
काय करायचं ते त्यांना समजेना, रघूच्या दुखऱ्या डोळ्यामुळं त्यानं चुलीपार्शी 
जाण्याचा प्रश्नच नव्हता. बाळाचा इट्ट पुरवण्यासाठी त्याला चार आण्यांची 
दारू आणन दिली तर त्याचा दिवाळीच्या फराळासाठी इद्ट चाळू झाला 
५६ दिवाळीच्या मुहूर्तानं सारं बिसरून जाऊं. तुम्ही फराळाला इकडं या ?”? 
असा निरोप इनामदारांच्या अन्‌ मास्तरांच्या घरून भटजींना पोचला होता. 
पण त्यांचा पीळ कायम होता. बाळाचा हट्ट आवरण्याच्या पढीकडे तो जाऊं 
लागला तेव्हां भटजींनी आपल्या ठेवणींतळा एक रुपया काढून खघूला 


49्ट लबणाची मासोळी 
सांगितलं, “' बाहेर जाऊन त्याला कारही तरी खायला घेऊन ये ? बाळानंही 
आपला हृट्ट पुढं चालबला, “' मला बिकट - मुरंभी नकोत - दिवाळीचं 
हवंय. *' “' आण जा त्य़ाला काय हब ते - पण निदानी ब्राह्मणांच्या 
'हाटेलांतलं तरी आण ?? भटजींनी हतबुद्धपर्णे रघूला सांगितले. ते हाटेलांतले 
चिवडा लाडू भटजींच्या घरात आले. आणि मुलाच्या हृट्टाखातर भटडीर्मी 
आपलं तोंडसुद्धा विटाळलं 

-र्‍र्‍त्यानंतर मात्र त्यार्नी र्वक घेऊन तीन दिवस कडक उपास केला. 
शेकराला महारुद्र केला हाटेलचं खाण्यांत जे काही पाप घडलं असेल तें धुवून 
निघावे म्हणून करायचे तेवढे सोपस्कार केले. हा सारा प्रकार पाहून खघूनं 
धाडस करून विचारलं, “ गांबात काय जिनसल्यं १ ?? 

“ अरे चालायचंच ! त्यात काय विरोष आहे १ तूं कशाला लक्ष 
घालतोस १ ” 

“६ घरवा बापू अंगावरनं गेला तरी बोलला नाहीं - इतकं कायर झालंय £ ? 

५ व्हायच काय ? तो तरी इनामदाराचाच पोरगा ना. वाडा आहे. सार 
घर पोकळ झालं तरी अजून मिजास उतरत नाही -- ? 


“६ आपल्याला त्याच्या इनामदारीशीं अन्‌ पोकळपणाशी काय करायचं 
आहे १ ? 

५६ कांहीं नाही. - आतां त्याच्याशीच काय पण साऱ्या ब्राह्मण आळीरशी 
आपल्याला कांही कततंब्य नाहीं. ?? 

“५ मला अजून समजत नाही. बाळ म्हणत होता. तुमचं माठ भांडण 
झालं. कुणाशी अन्‌ कशासाठी £ *' खघूच्या मनांत वेगळीच शेका आली. 
कमळीने किंबा बापूनं काहीं घोटाळा करून आपल्या नावाशी तर चिकटवून 
दिला नसेल, अन्‌ त्यांत इनामदारांना अप्रमान वाटला असेल. खाल्ल्या 
घरचे वासे मोजल्याबद्दल त्यांसी भटजींना बोळ लाबला असेल अन्‌ वडलांनी 
तिरीमिरीनं इनामदारांच्या पोकळपणाचा फुगा चार माणसांत फोडला असेल. 
-आपणच का या साऱ्याच कारण | 

-“णारघूचा अंदाज सपशेल चुकला होता. त्याची बुद्धिमत्ता कितीही तीत्र 


लबणाची मासोळी ७९ 
असली तरी एका गोष्टींत त्याला कर्थीच अंदाज बाधता आला नाहीं ते 
म्हणजे स्वतःचे महत्त्व किंबा गौणपणा, एखादी बिपरीत गोष्ट घइलेली दिसली 
की त्याला शका य्रायची, हें. आपल्यामुळे तर झालं नाहीं ना ! स्वत.च्या 

हत्वाच्या बाबतीत त्याचा अंदाज असा चालायचा तर एखादी विशेष 
नावाजण्यासारखी गोष्ट घडली कीं तिच्यात आपला कांही संजंध असणं शक्‍य 
नाही हें त्याच ठरलेलं मत असायचं. मॅट्रिकच्या वेळींच ' हायस्कूल चा 
विद्यार्थी पहिळा आला एवढे कळाल्यावर त्याच्या डोळ्यापुढे नांबे आली 
होतीं, ती गोखले आणि भावे या आपल्या प्रतिस्पध्यीची. रघू जोशी सुद्धा 
'पहिळा येऊं शकेल ह वर्तमानपत्रांत वाचल्यावरही त्याला लवकर पटल नव्हतं - 
एवढच काय पण आपलें अंदाज चुकतात हे कळल्यावरही चुकीच्या अंदाजांनीं 
गोंधळून जायचं हा त्याचा धमच झाला होता. 


कृष्णंभटजीरनी सागितल्यावर त्याची खात्री पटली. साऱ्या ब्राह्मणआळीर्शी 
भटजानी आपण होऊन असहकार पुकारला होता; आणि तोंही एका वेळेवर 
आणललं जेवण सुद्धा दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवण्याची पाळी आली होती 
अश्या वेळी, काळेजात शिकायला राहिला तरी खून भटजच्याकडून पूर्वीच्या 
पाच रुपयापेक्षा अधिक मदतीची अपेक्षा केली नव्हती. पण त्याच्याच मनानं 
घेतलं; वेळ-वखत आहे, कमी अधिक पैश्याची गरज लागेल, दुसरा मुल्गाही 
वाटेल त्याक्षणी डाक्टग्ला आमंत्रण देणारा ! त्यासाठीं पैसा हवा, म्हणून 
त्यानी एकच गाष्ट केली, साऱ्या ब्राह्मषमञाळीकडे आपल्या बाकीची 
मागणी केली. 


---त्याच्या या मागणीत लाचारी, उणेपणा किंवा काही विपरीत नव्हूर्त. 
इनामदारापासून महारा-पोरापर्यंत भटजीरनीं कुणाकडेही धमकृत्य केलं तरी ते 
त्याबद्दल जेवढी कर्मीत कमी असेल तेवढीच दक्षिगा सागीत. पण गेल्या 
पांच-सहा वर्षोत अस व्हायला लागलं होतं की ही कर्मीत कमी दक्षिणा सुद्धां 
भटजीच्या पदरात पडेनाशी झाली. त्यांनीं विचारलच तर “' देऊन टाकू 
एकदम वर्ष अखेरी गुऱ्हाळावर; रोख पेसा दिसतोय कुठं ! ” अस कांहीं 
तरी उत्तर मिळू लागल. रखमाबाई जित्रत होती तोंबर विरोधीभक्तीनं म्हणा, 
घरचं पहावं लागत नव्हतं म्हणून म्हणा कीं तशी मोठीशी गरजच पडली 


८० लबणाची मासोळी 
नव्हती म्हणून म्हणा, भटडजार्नी या बाबतींत अवाक्षर उच्चारलं नव्हतं. पण 
रघूच्या शिक्षणासाठी पे-पैची काळजी करावीशी वाटूं लागली अन्‌ मग 
मटजीरनी साऱ्या ब्राह्मण आळीची सभा घेऊन आपल्या बाकीची गाष्ट काढली. 

““ मागली जाकी ? भटजी, तुम्ही अगदी कच्छ्या - मारवाड्याची भाषा 
बोलायला लागलात कीं - तुम्ही काय धमाचा असा विक्रा करता १ 
मास्तरांनी आपलं ज्ञान उपयोगांत आणलं. 

५ जाऊं द्या हो ? इनामदारांनीं सारवासारव करीत म्हटल, '' भटजी, 
नड असली तर पांच-पचवीस रुपये मागा. तुमचा रघू पुण्याला राहिलाय 
ते आम्हाला ठाऊक आहे - पण ही असली भाषा वापरून गुरुमुख 
विटाळूं नका. ?? 

: ते काय म्हणून ? ? असं म्हणत भटजीनीं आपल्या चोपडींतून नाव- 
निशीवार बाकीचे आंकडे वाचायलाच सुरवात केळी. प्रत्यकाची अब्रू अशी 
वेशीवर आल्यामुळं तोंडं उतरली तरी एका भटाचा हा उमटपणा सहन 
करायला जमलेले हरळींच्या मुळीचे घनी तयार नव्हते बोलणं वाढत गेलं तसं 
भटजींनी निक्षून सांगितलं “' मागची सारी बाकी चुकती झाल्याशिवाय 
कुणाच्याही घरांत धर्मकृत्याला पाय टाकणार नाहीं. ?” त्याचं रहातं घर एका 
ब्राह्मणाचं होतं ते सुद्धा सोडून ते विठोबाच्या देवळांतल्या झोरीत बिऱ्हाड 
घेऊन राहिले. 

आपल्या वडलांच्या स्वाभिमानाचा आणि हिठोत्री वृत्तीचा अभिमान 
घरावा की, क्षक भांडण काढून उगीच गांवच्या ब्राह्मणा्शी वाकडे होऊं 
नका असं त्याना सांगावं, हें रघूला उमगेना. कारही तरी विचारायला पाहिजे 
म्हणून तो म्हणाला, “' पण दादा, इतक्या पायरीला यायला अशी बाकी 
तरी किती निघाली १ ? 

£ थोडी नाहीं - झाली चुकून वखूल तर तुला कुणाकडं तोड न वेंगडता 
सारे शिक्षण पुरं करतां येईल. हाडाची काडं नाही करावी लागणार, चांगली 
नऊशे रुपये बाकी आहे पंश्रा घरांची मिळून - अन्‌ तीसुद्धा वरचेवर ' पुढ 
बघू ? असं म्हणायला लागले तेव्हां मी टिपून ठेवायला लागला तिथपासूनची . 
आधीची सारी शालीच आहे कृष्णार्पण 1---? 


लवणाची मासोळी ८१ 

: नऊशे रुपय £ चांगला सावकारीसारखा आकडा दिसतोयू्‌ कीं --? 

“ त्याला मी काय करू ? मी काय सावकारी केटीय्‌ की व्याज आकारल्य १ 
या अप्पा इनामदाराकडंच चारशे रुपये नक्त आहेत. त्या आत्याबाईंची ब्रतं 
केलीं त्याचा पैसा दिला नाही सारे श्राद्षपक्ष उधार - अनंताच्या पूजेला 
तासभर उद्लीर झाला तर ठणाणा करतो; पण ताम्हनात कर्धी ताबडा पेसा 
ठेवीत नाहीं. न्हाव्या-भमटापासनं याची उघारी. आपल्या इनामदारीचा 
तोरा मात्र मिरवायला हवा---?? 

“६ पुण निदान त्याची तरी बाकी काढायला नको होती दादा. नाहीं 
म्हटलं तरी पाच वषे त्याच्या घरी राहिलांय मी-ाऱ?' 

“ हो -- अन्‌ मीसुद्धा जेवलो ढोन वषे ते विसरला नाहीं मी - अन्नाची 
हरामी करायइतका माजला नाही मी रघू -- ? 

“८ मृग असं कसं केटंत-- १ ?? 

“ हू तूं विचारतोस १ त्या आत्याबाईंच्या दाताखाली पांच वर्ष काढल्यावर १ 
ती नसताना इथला नमुना काय होता तो मी पाहिला आहे. घरच्या अड- 
चणीत इनामदारानं जेवायला बोलावलं म्हणून मी जाऊं लागलां तेंच चुकले--- 
लाब राहून जो चागुलपणा होता तो गमावला. घरच्या हरकामाचा गडी करून 
टाकला त्याने मला. रानात मळणीकडे जा, वाण्याकडचच सामान आणा, 
म्हशीच्या धारा काढा - काय वाटेल ती काम करून घेतलीं माझ्याकडनं. त्या 
कामाचा हिशेब घरला असता एक गडी दोन वेळचं जेवून वरखर्चाला पगार 
घेतल्याशेवाय राहिला नसता. पण ते काढायच नाहीं १ - कां तर “गुरुजी ' 
' उपाध्ये ) हीं नावं गोड लागतात म्हणून, पन्नाशी उलटल्यावर इथं माझी 
ही अवस्था तर तिकडे तर काय तुला अन्नाच्या एकेका कणासाठी नाचचलं 
असेल. पण ती कार्म अन्‌ ती जवणं - आपल्या भटकीच्या बाहेरची म्हणून 
विसरून जायचं एवढंच ! त्याचा उच्चारच करायचा नाहीं.? 

“८ घण ते तरी उच्चार करणारच ना १ ? 


८८ अजून राहिलेत असं तुला बाटलं काय £ अत्याबाईंनं त्याचं करायचं 
तेवढं रामायण केलं - तूं पुण्याला हविकायला गेलास म्हणून माझे हात 
आमाळाला लागलेत म्हणण्याप्यत मजल गेठी.?* 


ल. मा...६ 


८२ ळवणाची मासाळी 

6 त्याचा याच्याशी काय संबरंधघ--? 

“ खर दुखणं तंच आहे रघू - तूं मट्रिक होऊन थांबला नाहींस. कुठं 
नापास न होतां पुढं निघालास, भटाचा मुलगा असूनसुद्धा. अन्‌ हे इनामदार 
जमीनदार - याचीं मुलं शिकवण्या ठेवून, बिऱ्हाडं करून, कज काढून ऐटीत 

हून सुद्धां कशींबशीं दोन वर्षात एकेक यत्ता वर चढतात. त्यामुळे तर 
सारा जळफळाट अन्‌ झाला बाकीशी त्यांचा संबध जोडला. ' आमच्यावर 
भटकीच्या बराक्या काढून आता काय पोराला विलायतेला पाठवणार आहे 
वाटतं. अदी मुक्‍ताफळं उधळली .?? 

: कसली कुचकीं मन आहेत इथली. भट आणि ग्रहूस्थ, देशस्थ आगि 
कोकणस्थ - साघे ब्राह्मण म्हणून मिरवणंसुद्धा आजच्या काळांत शोभत नाहीं 
तिथ हे असले बारकावे डोक्यात घेऊन बसतात. पायाखालचं दिसत नाही. !! 

५: घायाखालचे दिसायला नजर खालीं असावी लागते स्घू -याचे डोळे 
फिरतात आभाळात. पायाखाली आहेच बापजाद्यांनीं मिळवून ठेवलेली हरळीची 
मुळी ! याना काय कारण चिंता करायचं १ ?? 

५६ त्यांच्या चिंतेशी. आपल्याला काय करायचंय म्हणा ! पण आतां तुम्ही 
कसं करणार दादा ? ही सारी घर सुटल्यावर--- 

५६ नाहीं तर याच्या उधारीवर माझं चालणार आहे थोडच १ गावची 
जोसकी आहे. शेतकरी अडाणी पण तो आठवणीनं नव्याचं शेर मापटं आणून 
देतो. पंचागात नुसता पेरणी मळणाचा बरा दिवस पाहिला तर त्याबद्दल तो 
पैसा सुपारी द्यायला विसरत नाही, मला कांही कमी पडायच नाहीं. तुझं 
शिक्षण सपेपर्यंत दोन-तीन वर्षे कशींही निभवून नेईन मी. तूं मात्र इकडची 
कांही काळजी करू नकोस--- 

र > >< 

कृप्णेभटजींनी रघूळा इकडची काहीं काळजी करूं नकोस म्हणून सांगितलं 
होतं तरी पुण्याला आल्यावर त्याच्या डोळ्यापुढं देवळाच्या ओरींतलळं आपलं 
घरकुल उभं राहिलं. जिद्दीनं मिळेल त्या पशा-पावशेरावर एकभुक्त राहून 
जगणारे वडील, कशाचीच जाणीब नसली तरी आजारान हैराग झालला बाळ 


ळबणाची मासोळी ८३ 
><“आपल्या शिक्षणावर बांधलेल्या त्यांच्या आश्या - त्या दडपणानं प्रत्रच्या 
दबलेला दुञळा रघू वास्तविक खचचूनच जायचा. पण त्यानं हिंमत बाघली. 
आपल्या दुखऱ्या डोळ्याची पर्बा न करतां मोठ्या उमेदी बाळगल्या. सारी 
हयात इनामदारांच्या अड्ड्याबर घालवलेल्या आपल्या वडलांच्या स्वभावांतल्या 
जाणवलेल्या पालटानं, त्याच्या जिद्दीनं, स्वाभिमानानं, पिळानं रघूला अवसान 
चढलं, त्या भरांत डाक्‍टराच्या सल्ला त्यानं धुडकावून दिला-- ? 


महिनाभर रघून नेटानं नेमलेल्या पुस्तकाचा अभ्यास केला, अबातर 
वाचन बंद केलं. डोळ्यापुढं अक्षर नाचली तरी आपोआप झाप लागेपर्यंत 
वाचत रहायचं हा त्याचा क्रम होऊन बसला. झांपता झोंपता पुस्तक हातातनं 
गळून पडायचं. मिटलेल्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहायच्या हा प्रकार 
पाहून बापटानं त्याला एक-दोनदां त्याच्या दुखऱ्या डोळ्यांची आठवण करून 
दिली. पण खूने त्याकडे लक्ष दिलं नाही. व्हायचा तोच परिणाम झाला. 
डोळे दिवसा चुरचुरायळा लागले. बापटानं त्याच्या हातातलं पुस्तक फेकून 
त्याला दवाखान्यात नेला. चष्मा घेतला पाहिजे हें तर आलंच; पण निदान 
महिनाभर तरी बाचन पूर्णपणे बद॒ ठेवलं पाहिजे असं डोक्टरानीं निक्षून 
सागितलं. बापटानं त्याना रघूचा हट्टीपणा सागितला. त्यानीं सरळ डोळ्यात 
अँट्रोपिन घाळून रघूला परत पाठवला आणि दररोज तोच प्रयोग करण्यासाठी 
बापटाजवळ ट्थूब देऊन ठेवली. 


रघूचा पराभव झाला. वाचन बंद झाल्यावर विचारानं त्याचं डोकं 
भणभणूं लागलं, बापट बिचारा सीनियरला होता तरी वेळात वेळ काटून 
त्याला तासभर इंटरचीं पुस्तकं वाचून दाखवू लागला. या कोवळ्या मुलाच्या 
मनावर परिणाम होऊं नये म्हणून कुणाची पर्वा न करणारा पाडरंग सावत- 
सुद्धा मधून मधून त्याच्याशीं इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागला. 


या सहानुभूतीनं रघू जास्तीच हळवा झाला. बापटाचा पुष्कळसा वेळ 
प्रॅक्टिकटूमुळ कॉलेजात जायचा, पण सावत मात्र ऐन मोसमातसुद्धा रघूजबळ 
हवा तितका वेळ बसायला तयार असे. खघूनं विचारायच्या आधींच त्यानं 
सांगून टाकलं “' माझ्या टर्म्स मागच्याच वर्षी भरलेल्या आहेत. मला 
कॉलेजांत गेळंच पाहिजे असं नाहीं, ?? रघू नको नको म्हणत असतांना सुद्ध] 


टडं लवणाची मासोळी 
त्यानं रघूळा आपल्या रतिबातलं दूध मायला सुरुवात केली, त्याची स्थिति 
गरिबीची आहे हें रघूला ठाऊक होतं. त्यामुळं तो जास्तच बुचकळ्यात पडला. 
पाडूरंग सावत रघूचं समाधान करण्यासाठी त्याला सांगूं लागला --- 

“ जोशी -- तुम्ही आता काळजी करायचं सोडून द्या. काळजी करून 
का आता काहीं होणार आहे ? शक्‍तीचा अपव्यय करून एकदा डोळे 
निघडवून घेतलत एवढ्यावरनं राहाणे व्हा -- ? 

:: घण मी तरी काय करूं ? इंग्रजी कच्चं पडलं - स्लालराशीप जायची 
भीति वाटली, त्यामुळे जास्त वाचन कराव लागलं. याला तुम्ही वबडेपणा 
म्हणाल काय १ ?? 

“८ अगदी आद्ध वेडेपणा - ? पांडुरंग सांबताचा तूळचा पिड उसळला. 
“६: जास्त वाचन केलेत अन्‌ त्याचा परिणाम काय झाला तो तुम्हीच पहा ना! 
तुम्हीं ताकर्दाच्या बाहेर श्रम करायला नको होत. ? 

:: घग मीं काय करायला हव होतं १---आता असा पंगु होऊन पडलों 
आहे तव्हां मी चुकळों असं प्रत्येकजण म्हणणारच - पण माझं काय चुकलं 
आणि काय बरोबर झाल असत हें मात्र सागणारं भेटणार नाहीं. ? रघूच्या 
स्वरात चिडकेपणापेक्षाही असहायता अधिक होती. 

पाडुरंग सावंताचा स्वर पुनः बदलला. तो समजावणीच्या सुरात सागू 
लागला, “' तुम्हाला ज॑ बरोबर वाटलं तेच तुम्ही केलत जोशी. पण तुम्ही 
स्थोलात दिरला नाहींत - तो तुमचा दोष नाही, तुमच्या ब्राह्मणी पिडाचा 
दोष आहे अस म्हटलं तर तुम्हाला कट्टू वाटेळ, हा सावंत अखेर जातीवर 
आला असं सुद्धा तुम्ही उघड नाही तरी मनात म्हणाल, पण मी सांगता तेंच 
खरं आहे. उदहरणानं सांगायचं तर मी म्हणेन तुम्हा ब्राह्मणांना नुसतं 
जमिनीवर डोलणारं पीक आणि त्याचं मोजमाप ठाऊक असतं, त्यासाठी 
करावी लागणारी जमिनीची नांगरट - मेहनत - तिच्या पोटात शिरण्याची 
किमया ठाऊक नसते. *? 

: तुमचं उदाहरण अरांबर असेल - पण मी पडलां ब्राह्मण तेव्हा या 
उदाहरणापंक्षां सरळ मुळांत तुम्हांला काय म्हणायचे आहे तेंच सागा ना ---?? 

“६ हूंच पहा - मी इतकं सांगितलं तरी माझं उदाहरण कांद्दी तुम्हांला 


छब्रणाची मासोळी टप्‌ 
आवडलेलं दिसत नाहीं जोशी. तुम्हाला हव तं सुद्धां मी सागेन पण कुणास 
ठाऊक ते तरी तुम्हांला पचेल कीं नार्ही ---?? 

“ नाहीं पचलं तर तुम्ही सक्ति थोडीच करणार आहात -- 

५ तुमचं बाचनाचं वेड, स्कालरशिप टिकवण्यासाठी इंग्रजी सुधारण्याची 
घडपड, या साऱ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूं - तुम्ही कर्धी असा विचार 
केलात का १ आपलें इंग्रजी कच्चं राहिलंच का १ ” सावंतानं क्षणभर रघूकडं 
पाहिलं - तो गप्प राहून नुसता ऐकत होता त्याला धक्का देण्यासाठीं सावंत 
'एकदम म्हणाला--“' जोशी, या साऱ्याच मूळ दारिद्यात ! ?? 

८ हृ तुमचं नेहमींचं तत्त्वज्ञान आलं. मला ते अर्थकारण -- राजकारण 
कांहीं नका. दारिद्याचा आणि इंग्रजी कच्चं राहण्याचा संबंध काय ? ? 

६ संजेध आहे, पण तो कर्धी तुर्म्ही ध्यानांत घेतलाच नाहीं. म्हणून मी 
म्हणाला तुम्ही खोलांत शिरला नाही. अहो, तुमचं इंग्रजी कच्चं राहिलं, कारण 
सातवी होईपर्यंत तुमच्या डोक्यात इंग्रजी शिकायचा विचारच आला नसेल. 
नंतर तुम्ही घाईनं एका वर्षोत तीन यत्ता केल्यात पण आर्धी तीन बघ इंग्रजी 
शाळेच्या व्राताबरणांत राहून, सावकाशीनं इंग्रजीचा पाया पक्षा करणारे दुसरे 
अनेक होत त्यांना ती अनुकूलता होती. आणि तुमच्या दारिद्यामुळं 
तुम्हांला नव्हती - म्हणून हें तुलनेनं जाणवणारं अंतर आतां एकदम उठून 
दिसायला लागलं. तें भरून काढायसाठी तुम्ही अति श्रम केलेत आणि 
आणखी संकटात पडलात. म्हणून मी म्हणतो याचं मूळ दारिद्यांत आहे हें 
विसरून तुम्ही नसती वरवरची इग्रजीपुरती मलमपट्टी करायला निघालात हें 
प्चुकलं 99 

५: समजा, तुमजं म्हणणे खरं मानलं तरी त्यावर उपाय काय ? ? 

५६ दारिद्याविरुद्ध झगडायला त'कद्‌ वाढवायच्या ऐवर्जी ती गमावणं हा 
तरी स्थास नव्हे. तुम्हां-आम्हा गरिबांना जगात रहायचं असलं तर निदानी 
आपली इारीरप्रकृति धड ठेवल्याशिवाय कांहीही करता येणार नाहीं. तेंच 
आपलं हक्काचं भाडवल. 

५: त्यालाही पैसा लागतो अन्‌ तिथंच सारं नडत. हें ब्हिशस्‌ सर्कल-- 
बातचक्र आहे. यांतून उपाय निघत नाहीं सावंत - ? खुनं खिनपर्णे 


८६ लबणाची मासोळी 
व दतितेनिनेसलमिनननमोर न नरयोनोलनडनर कित नादनन 
अनुमान काढलं. सावंत गप्प राहिला. रघूच्या मनोवृत्तींत त्याला कांहीही 
सागितलं तरी तो आपल्या मूळपदावर आल्याशिवाय रहायचा नाही हैं 
सावतानं ओळखलं अन्‌ तेवढ्यापुरतं त॑ बोलणं संपलं. शेबर्टी आपलंच म्हणणं 
खरं टरलं याचं वाटायचं तेवढं समाधान मात्र रघूला लाभलं. 

जानेबारीच्या सुरुवातीला डोळ्याना चष्मा लावून रघून जुजबी वाचन सरू 
केलं, पण जुजत्नी म्हटलं तरी परीक्षेची ताराख समोर दिसत असताना रघू- 
सारख्याकडून व्हायचा तितका अतिरक होत राहिलाच. ब्रापटने त्याला एक- 
दोनदा सांगून पाहिलं. पण तो याच्यापेक्षां अधिक कांहीं करण्याच्या वृत्तींतला 
नव्हता. पांडुरंग सावंतानं मात्र आपला स्वतःचा खास उपाय योजला. त्यानं 
रघूर्ची पुस्तकच उचळून आपल्या टूंकेत कुलपांत ठेवून दिली रघू अगदींच 
अजीजीला आला तेव्हा त्यानं रघूची थट्टा करायला सरुवात केली--- 

“६: असं रडू रडूं काय करतांय जोशीबुबा ! यंदाची परीक्षा तुम्हाला लाभत 
नाही असं समजा कां. 

८“: समजून वषे काहीं भरून येत नाहीं. *! 

६ हात्याच्या ! एका वर्षासाठी इतकी मुळमुळशाई। ! राव तुम्हांला आता 
मातर या सावंताची शिकवणीच धरायला पाहिजे. ”? 

“६ ती कशाची ! ?? 

“ कशाची ? तुम्हांला काय एक म्हणून शिकवून भागणार आहे. गप बसा 
राव - तुम्हाला ठाऊक आहे इंटर सायन्स होऊन मला चार वर्षे झालीत. पण 
अजून माझी एस्‌. ई. चालली आहे. तुमच्यासारखं हळहळत बसलो. असता 
तर मागच्या वर्षींच इंजिनेयर झालो नाही म्हणून रडून रडून माझे डोळ 
फुटले असते--?) 

“६ तुम्हाला असेल तकी सवड'--- ? 

“६: बा जोशीबुवा |! माझी नव्यानं ओळख झाल्यासारखं बोलतांय्‌ कीं 1' 
मी तर खानदेशांतला मोठा कपाशीचा जमीनदारच पडलोय की -नाहीं का? 
दिसेल तें रिवार आमचंच. फकस्त आमच्या आई-वडलाला त्या शिवारांतः 
रोजानं काम करावं लागतं, एवढंच | अन्‌ त्यांनीं मला बँकेत खातं उघडून. 
दिलंय्‌ - पण तिथे चेक बटत नाहींत त्यांतच सारं नडल्य ! ? 


लबणाची मासोळी ८७ 
५“: खरंच का सावंत तुमचे आई-वडील शेतभजूर आहेत १ मग 
तुमचं चालतं तरी कसं £१ ” सावंतानं कडवट विनोदानं सांगितलेल्या हकी- 
कतीनं रघू स्वतःला विसरळा, आपल्या तात्या चाभाराहून फारश्या वेगळ्या 
स्थितीत नसलेल्य़ा, पण आरामात रहाणाऱ्या सांवतानं त्याला खंचलं. 

“६ चालतं कसं ? असं वळणावर या की. चालवायचं ठरवलं म्हणजे सगळं 
चालतं. उगीच नाहीं तुमच्या कालेजातल्या पाटलाचं कॅनव्हसिंग केलं मागच्या 
वर्षी, दोन महिने त्याच्या नांवावर छुबातलं जेवण सटल--- ?? 

“ घण तवढ्यानं काय भागणार १? ?? 

“: तेवढ्यानं ? चार महिन्याच्या दुधाचे पैसे निघाले. पण तो आपला 
एक भाग झाला. मंट्रिक झाल्याबरोबर श्रीमंताची मुलगी सागून आली. साऱ्या 
शिक्षणाचा खर्च करायच्या अटीवर मुलगी न बघता लय़ करून टाकलं. अन्‌ 
शिक्षण संपेपर्यंत त्यांनी आपली लेक संभाळली पाहिजे दं पण त्यांना सागितलं.? 

“६ ते तुमच्या समाजात शक्‍य असेल. प्रत्येकाचं अस जमणार आहे थोडंच ! 
तुम्ही नश्ाबबान्‌ आहांत त्या वाबजतींत. 

“: इतकी घाई नको जोशीबुवा. मी नशिबाला पुरून उरलोय. मागच्या 
सालीं नापास झाल्यावर सासरा म्हणायला लागला “ आम्हीं पाच वर्षे खच 
केला - आमची जत्राबदारी संपली ! पण सासरा वकील असला तरी मी 
त्याचा जावई होऊन राहिलेला. मी सांगितलं रिक्षण संपायची अट आहे. 
ती पुरी झाली तर ठीक. नाहींतर माझं मी बघून घेईन. पण मंग तुमच्या 
मुलीचा मी कोणी नळे. * 

“: पण असं करणं बरं का ? त्या मुलीचा काय अपराच १ ? 

“ तृ मळा ठाऊक नार्ही. लय़ाच्या आधी कुठं मी तिचं रंगरूप बघितले 
होतं तर आता अपराध बघायला जाऊं १ जोशीबुवा, जगात अडचणीत 
पडलेली माणसं खूप असतात. त्या साऱ्यांच्या अडचणींतनं आपण वाट काढू 
असला मीपणा कशाला हवाय १ सासऱ्याचं भाडण झालं अन्‌ माझा त्या 
घराशी संबंध उरला नाहीं, *? 

“ मग आता यंदा काय करताय १ * 

'। युंदा करायचं काब १? नशिबवान आहे ना मी |! नशिबाला वळबायचं 


८८ लबणाची मासोळी 
काम माझं, आमच्या मराठासमाजाच्या एक-दोन संस्था आहेत त्यांच्याकडे 
बिळे लावले. चार दान, रावसहेभ-रावबहादूर होऊन बसलेले लठ्ठ 
पगाराच अधिकारी गाठले, अन्‌ प्रत्येकाला सांगितलं “ तुमच्याकडून मिळेल 
तेवदीच मदत ? - असे बक्कळ दोन बघ पुरतील इतके पेसे काढले. त्याच्यावर 
चाळू आहे आमचं नशीब, ? 

५६६ घण अशी मदत मागण्यात तरी लाचारीच नाहो का? ? 


£६ ळाचारी १ - गारबाला लाचारी नसते उगीच काहीं तरी वेडगळ 
कल्पनांनी डोकं बिघडवून घेऊं नका. त्यात फायदा तर काहीं नाहींच अन्‌ 
यांत हो कसली लाचारी ? ह्या संस्था, हे रावसाहेब, रावबहादूर ह्यांनी तरी 
पैसा आणला कुठनं £ यांच्या घरी कारही पैशांची झाड नाहींत. तुमच्या - 
आमच्यापार्शी नाही तो पैसा याच्याजवळ जमून किडत पडलेला आहे. 
त्यांनीं तरी घाम थोडाच गाळलायू्‌ १ कुठंतरी वशिल्यानं नोकरा मिळवून 
किंवा कंत्राट साधून यानी आयता मिळबलेला पैसा. आपणही त्यांच्याच 
पावलावर पाऊल टाकून आयता मिळवायचा. पैसा सांठवायचा जिनका 
त्याना हक्क तितकाच तो त्याच्याकडून काढायचा आपला हक्क. हक्कात कसली 
लाचारी १ "? 


८८६ 


छेः ! मला हृ काहीच समजत नाहीं. 


“£: समजत नार्ही म्हणून तर तुमचे असे हाल होतात. गरित्री आहे म्हणुन 
असं कुद्रून, आंखडून भागत नाहीं जोशी. तुमच्यासारखा राहिला असतो 
तर यावेळपर्येत मी हास्पिटलांतच काय पण आंकारेश्वरावरसुद्धां पॉचला 
असता. पण मी ठरवून टाकलंय. सारा खटाटोप करायचा आपल्या सुखा- 
साठी; तर ते मिळायला आधी प्रकृति घड ठेवली पाहजे. म्हणून दोरभर 
दूध घेता. रोज मी. तुमच्यासारखा विचार करीत रहायचं म्हणजे अनेक 
मध्यमवर्गीय कुटंबांनासुद्धां दररोज दोरभराचा रतीब परवडत नाही म्हणून 
हळहळायचं. पण माझ्या इळहळण्यानं ना त्यांना दूध मिळणार ना माझा 
प्रकृति सुधारणार, म्हणून पैसे आहेत तंवर व्यवस्थित रहायचं अन्‌ ते संपले 
कीं मिळवायच्या - म्हणजे श्रीमंत कूळ गांठायच्या-उद्योगाला लागायच. असे 
राहिल्य़ादिवाय निभाव लागत नाहीं जोशीबुवा-- ” 


लबणाची मासोळी ८९ 
६ निमाव लागत नाहीं याचा तर मी अनुभवच घेतो आहे पण तुमच्या 
पद्धतीनं वागायला सुद्धां मनाचा तयारी असायला पाहिजे. ? 


“: असायला पाहिजे! ती करावी लागते तुमच्या सारख्यांना. तुम्हा पांटर- 
पेशांत आणि आमच्यात फरक आहे तो हाच जोशीबुवा. तुम्हाला वेळेला 
जेवायला कमी पडलं तरी डबा वाढवायला तुम्ही काही बापटाला सागणार 
नाहीं. कां ? तर तो वेळच्या वळी पैसे भागवतो आणि तुम्ही स्कॉलरशिप 
आल्यावर आपल्या बाटणीचे पैसे देता म्हणन १? असं का? तुम्हा पादरपशांची 
ही सवयच आहे. पोटांत आग पडली तरी बाहेरून मजवानीच जवण झाल्याचा 
आव आणायचा. आमच्यांतले शाण्णव कुळीचे, गोबरा पाळायसार्ठी उजाडा- 
यच्या आंत पाणी भरतात त्यातलाच प्रकार |! तुम्हाला वाटत यानं दर्जा 
रहातो. सहाजिक आहे. म्हणा - अन्नाच्या घासासाठी घाम गाळून तो 
मिळवलाय कधी तुर्म्ही १ दरिद्री म्हणता पण वेळेला खुर्य-दोरी हातात 
घेऊन शोतात जायचो कर्धी ताकद झालीय तुमची १ तुमच दास्यि आह तें 
आयतं खाण्यात आहे. खऱ्या उपाशी पोटी निस्मंग व्हायची वेळ कशी येते 
सी तुम्ही पाहिलेलीच नाहीं - पहायची रग नाहीं तुमच्यात--” ? 


या वर्षांबानं रघू थिजून गेळा. डिकन्सच्या कादंबऱ्या वाचून वाटलेली 
हळहळ त्याला आठवली. त्या पुस्तकाहून हें जिवंत जिणे कायर बगळे होत १ 
आपल्या रेजारचे हृ दृशय आपण अजून पाहिलेल नाही. याची त्याला खंत 
वाटली तो थोडाफार शरमूनच म्हणाला, '' सावंत - खरं आहे तुम्ही म्हणतां 
ते. अशी अवस्था सुदैवान म्हणा माझ्या कीं दु्दैवान म्हणा, टप्प्याच्या पली- 
कड'ची आहे. पण तुम्ही हे सगळं पाहिलं आहे, अनुभवलं आहे. तुम्ही काय 
कराल १ - काय करणार आहांत या दारिद्यावर तोडगा १--' 


५ मरो १ - मी तोडगा करणार १ ?? सावंत खो खो हसू लागला. 
८६ जोशीबुवा, बोलतांनासुद्दा तुमच्या तोडी ' तोडगा ' येतो. पण या गोष्टीवर 
देवा तोडगे नसतात. उपाय असतात - निदान आहेत असं म्हणतात. 
पण मो त्या वाटेला जाणारा महापुरुष किंबा द्रष्टा पुढारी नाहीं. माझी कुवत 
मळा ठाऊक आहे - माझ्यापुरतं मी ठरवून टाकलय. तिसऱ्या वर्गीत पास 
होऊन पदवी पदरांत पडली कीं माझी वाट मोकळी झाली, त्यानंतर चांगली 


९० लवणाची मासोळी 
बाळ शा ७5 ७ छा ग ह क त्या ॥ळ का क ७ अका ल्या ७७ ह अक करक क अत क [का [जा ७७0) ७ म ह हक आड अळा का कका क अक के स त आक धळ धक क क ब छा कळे, लक मळते 

नोकरी मिळवून, आजपर्यंतचे सारं विसरून जायचे एवढंच माझे काम-- 
तितकीच माझी ताकद.” 


६ निदान तेवढं तरी तुम्हांठा शक्य आहे. आधी इंजिनियरला नोकरी 
चटकन्‌ मिळते अन्‌ त्यातून तुम्हांला जातीचा फायदाही मिळेल, ? 

: माझ्या जातीचा भाव आतां तुम्हांला आठवतोय जोशी. पण त्याच्या- 
बरोबर दवही ध्यानांत टेबा कीं भर बाराच्या खानदेशी उन्हात अजून माझे 
आई-बाप कारड्या चटणी-भाकरीसाठी राबतात तेही माझ्या जातीचे आहेत 
म्हणूनच पांढरपेशे असते तर कर्मीत कमी मधुकरी मागून, नाहीं तर मिक्षुकी 
करून राहिले असते. त्याच्या या कष्टाचा फायदा मला मिळेल असं कर्थी 
तुम्हांला वाटेळ का १ मी त्याना या सगळ्या आठवणी विसरायला लावणार 
आहे. त्यासाठी मळा मिळेळ ती ऐशी-नव्वद रुपयांची नोकरी पत्करून 
भागणार नाही. निदान दोन-अडीचदोची तरी मिळवली पाहिजे. तेवढ्या- 
करता आतांपर्यंत पाहिली तशीं आणखीन दहा-वीस रावन्हादूर-दिवाण- 
बहाटूरांचीं घरं पाहीन -- वशिले लावीन. पण मला हव तं मिळबल्याशेवाय 
रहाणार नाही. 

£ मिळवाल बुवा - अगदीं राक्य आहे. ? एवढच रघू म्हणाला. 
सावतानं सहर्जी बोलताना केलेला मिक्षुकाचा उल्लेख खोलवर जाऊन त्याला 
झांबला होता. तो सुन्न झाला. सावंताळा चमत्कारिक वाटलं. तो पुनः म्हणाला. 

“६ माझ पुराण नुसतं ऐकून * तथास्तु ? म्हणायसाठी नाहीं सांगितलं मी 
जोशी. तुमच्यासाठी दोतं तं सारं. तुम्ही आपल्या मानापमानाच्या भलत्या 
कल्पना सोडून द्या. कतेंच्याच्या भलत्याच स्वम्तांत रगू नका. बरे दिवस 
आल्यावर स्वप्न रंगवायला हवी तितकी सवड मिळल. त्या वेळी आठवण 
राहिली तर खुद्याल स्व रंगवा. पण ही वेळ आपल्या पायाला चटके 
असण्याची आहे. या वेळीं पायापुरती वहाण शोधली पाहिजे--? 

५ म्हृणजे मीं काय करावे अस तुमच म्हणणं १ * 

“६ तुमचे डोळे अजून चागले जरे झाले नाहींत. उगाच माझ्याकडची 
पुस्तकं मागून ते जास्त बिघडवून घेऊ नका. आता. जानेबारी महिनासुद्धा 
संपत आलाय. तेव्हां येदां इंटर व्हायचा नाद सोडून द्या - गांबाला जाऊन 


लवणाची मासोळी ९१ 
मो नळ नळा ल जमला प रवव नमन शकि डव निनिनोनननत निक कललीनहादमारी मात डोलान लीत 
आराम करा. डोळे आणि प्रकृति सुधारा. आणि पुढच्या वर्षी नव्या दमानं 
अभ्यासाला लागा. ?! 

हें सारं ऐकून घेतल्यावर रघू तेवढ्यापुरता उठून आपल्या खोलींत 
आला. सावताच म्हणणं त्यावेळेपुरतं कितीही पटलं तरी एकदम उठून गावाला 
जायचा त्याला धीर होईना. परीक्षा संपायच्या आधी आपण गावीं गेलेलं 
बडलाना खपणार नाहीं ह त्यानं ओळखलं. रिकामं बसून वेळ काढायचा, 
त्यापेक्षा निदान्‌ दुसरा वर्ग मिळवायचा रुखुटुकू प्रयत्न तरी करावा म्हणून 
त्यानं शिकस्त केली. 

मोठ्या आडोनं तो परीक्षेला गेला, साने मास्तरांच्या आवडत्या सायन्सच्या 
विद्याथ्यांचा मनोभंग आदल्या वर्षांच झाला होता. स्कालररिपच्या गरजेनं 
त्याला आर्टसकडे वळवलं होतं. बी. ए. ला गणित घेऊं असं स्वतःचं समाधान 
त्या वेळी त्यानं केलं होतं. गणित हा हातचा विषय म्हणून त्यानं इंग्रजी-संस्कृत- 
वर भर दिला. दोन पेपर लिहून आल्यावर त्यानं सारी रात्र डोळ्याना विश्रांति 
दिली, दुसऱ्या दिवशीं भूमितीचा पेपर हाती पडताच त्याच्या डोळ्यांपुढे 
काजवे चमकले. घन-त्रिकोणाच्या आडव्या उभ्या रंघा काढताना त्याचा 
हात थरथरला. सुन्नपण त्यानं प्रश्षपात्रिककडे पहायला सुरुवात केली. 

दुसऱ्या दिवशी एम्‌. एस्‌. एम्‌. च्या डचाव डचाव करणाऱ्या गाडीनं 
रघूचे ओझं पुनश्च सातारा जिल्ह्यांत आणून टाकलं. पुणे साडताना एकाही 
माणसाशी तो धडपणे बोलला नव्हता. त्यानं घरच्या पत्त्यावर पत्र पाठवाव 
म्हणून बापटानं त्याला पुनः पुनः सागितलं, पण रघू त्याला नुसत 'हो? सुद्धां 
म्हणाला नाही. 

>< >< >< ्ं 

सुट्टांचे टोन महिने रघूनं डोळे दुखण्याच्या सबञीवर घरांत चसून काढले, 
सकाळी दोन तास आणि संध्याकाळीं अधघा-पाऊण तास कृष्णेच्या डोहात 
डुंबून डोळ्याना थंडावा आणायचा म्हणून लेबढा वेळ तो बाहेर काढीत असे. 
बाकीच्या बळांत किरकिऱ्या बाळाशी खेळावं, त्याळा इसापत्रीति किंवा 
रामायण-महाभारतांतल्या गोष्टी सांगाब्यात, फारच झालं तर जुना पत्त्यांचा 
जोड काढून वेळखाऊ पेशन्सचा डाव मांडावा आणि कुणीक्रडून एक 


२९२ लवणांची मासोळी 
दिवसाची विश्रांति पदरांत पडली असे समाधान मानाव, असा क्रम चालला 
होता. खेडगावच्या टीचभर जगांत देखील काय चाललंय याची दखल त्यानं 
बेतली नाही. 

जून महिना उजाडला तशी कृष्णंभटर्जीची गडबड सुरू झाली. “ खू, तू 
आतां पुढे काय करणार ? पुण्याला रहायची साय होईला का? किती 
पैसे लागतील ? ?' अशा चौकशा करायला त्यांसी सुरुवात केली. रघूनं 
८ इतक्यातच काय गडबड आहे? हूं ठरवलेलं उत्तर दिल, त्याच्या कोशांतनं 
: पुर्ण ? हा शब्दच निघून गेला होता. बंगल्यांतल्या एका खोलींत दोन वर्षे 
अलिप्तपणे राहून आणि त्यापेक्षां त्या रहाण्याचा पारिणाम अनुभवून तो थंड 
झाला होता. हजारा विद्यार्थ्याच्या गर्दीत तो कुणाचाही जिव्हाळा कमावू 
शकला नव्हता. पाण्यात पोहून कोरडे रहाण्याचा हा प्रयोग आपल्याला 
मानवणारा नाहीं आणि त्याहिपक्षां परवडणारा नाही ह त्याचं मत पक्कं झालं 
होतं. वघ्राची हजिरी भरून झालीच आहे, तर आतां कशाला खचात आणि 
दगदर्गात पडा ! या वृत्तीनं त्यानं ' पुढचा ? विचार करायचंच सोडून 
दिलं होतं. 

पण खघूनं विचार करायचे सोडलं असलं तरी त्याव्याबद्दलवा विचार 
इतर पुषकळजग करीत होते. पुण्याच्या अलिप्त जीवनाशी अगर्दी कगरेषत 
विरोध करणारी चौकसखोरी, खेडेगावांत हमेशा आढळतेच. त्यातून भटजींचं 
घर तर बापाचा पीळ आणि लेकाची हुघारी य़ा दोहींमुळे डोळ्यावर आलेलं. 
“' आतां भटाच पोर घरात राहिलं ?? इथपासून ते *' स्वतंत्र राहून मजा 
करण्यात दिवस घालबळे असतील अन्‌ आतां डोळ्य़ाच्या आजाराचं निमित्त 
सागून मारज्रासारच चालवली आहे '' इथपर्यंतची वेगवेगळी मतं इनाम- 
दाराच्या अडुत्रात नित्य नव्या जोमान तयार होऊन ठेबलीं जायचो. ती 
भटजींना तर ऐकायला मिळायरचींच पण त्यांतून रघूही सुटला नव्हूता. खू 
नदीत डुंबत असतां एक दिवस इनामदाराचा भाग्या गडी पाण्यावर 
आणलेल्या आपल्या म्हसराना म्हणून म्हणूं लागला, “ हीं मसरं बसून असून 
किस्ती असक्याल पान्यांत ? पान्यातलं मसरू कबातरी भाईर याचेच. उगी 
पान्यांत ठिवून घा शेर दूद देतया म्हणून कशाला सांगावं ! आपली ती 
शेराची कासंडी खंगळून ठेवावी.?? रघूला त्या वेळीं या आगापीछा नसलेल्या 


लवणाची मासोळी ९्रे 
बोलण्याची गंमत वाटी आणि म्हणूनच तें त्याच्या लक्षात राहिलं. 
आपल्याशी त्याचा बादरायण संबंध असेल अकद्षीसुद्धा दोका आली नाहीं. 
पण भटजींनी कॉलेज उघडायच्या वेळीं त्याला निक्षून सागितलं, “' तूं वाटेल 
तें कर, पण आता गावात राहूं नकोस. नसता अभ्यास करायचा असला 
तरा कुठे शहरात जाऊन कर. तूं इथे राहिलास तर तुझं डिभ्षण संपलं. 
भटाचं नाक खाढीं झालं म्हणन मला गावातले लोक बेजार करतील. आताच 
मी जिकीरीला आलाय - ? 

:: बर; जाईन मी लबकरच. पण आधी माझे डोळे तरी पुरते बर होऊ 
द्यात, ? एवढ बोळून रघू गप्प बरसला. इतके दिवस घरात बसून तरी भागत 
होत. आता घरात सारखा डोळ्यापुढ दिसळा तर वडील पुनः तोच विषय 
केव्हा काढतील याचा नेम नाही म्हणून रघू गुपचूप काखोटीला एक पुस्तक 
मारून फिरायच्या निमित्तानं लाब कुठल्या तरी शेतात जाऊन बसू लागला. 
पेरण्याच्या तयारीत असलेल्या लांकाच्या हालचाली निरखून पहाण्यात त्यानं 
वेळ घालवायला सुरुवात केळी. मृग सपला तरी अजून पावसान तोंड पाडलं 
नव्हतं. ऊन तावत होतं. जितकं रान तापेळ तितका पाऊस लवकर सुरू 
होइल अद्या आदोनं दोतकरी त्या भर उन्हात मेहनतीचा नेट करायचे. 
अंगातन घामाच्या धारा वहात असताना नागराचं तास धरून मागन संथपणे 
चालणाऱ्या त्या खऱ्याखुऱ्या भूदेवाना पाहिलं कीं खूला पाडुरंग सावताचं 
बोलणे वरचेवर आठवायचं; मनात खूपशी खळबळ व्हायची आणि मग त्यानं 
तोंड फिरवून 'वेणीसंहारा?चं पुस्तक उघडायच. 

कर्ण-अश्वत्थाम्याचं भांडण वाचायला रघूने सुरुबात केली, जुन्या क्रमिक 
पुस्तकात त्यानं त्या उताऱ्याचं परझुरामतात्यानी केळेळ भाषातर वाचलं होतं. 
त्या वेळीं न उलगडलेला अर्थ आता साकार होऊन नाचू लागला. “' दूत 
असेन किंबा दूतपुत्र असेन ?? म्हणणारा कण आणि “ हूं पहा, जानवं तोडून 
ब्राह्मण्य फेकून दिलं ? म्हणणारा अश्वत्थामा - दोघांच्याही बोलण्यातली धार 
रघूच्या काळज्ञाला कापून जायला लागली. पुप्कळदा त्याला कर्णाच्या जार्गी 
पांडुरंग सावंत आणि अश्वत्थाम्याच्या ज्ञागी स्वतःहून वेगळा असलेला रघू 
जोशी दिसला, पण त्या वेगळ्या दिसण्यानंच त्याला विषण्ण केलं. रघूला असं 
होणं जमेल का ! जानवं तोडून ब्राह्मण्य तुटलं असं आज कोणी - निदान 


९ लवणाची मासोळी 
ज्यांचा संबध पोचतो ते, मानणं शक्‍य आहे का १ पांडुरंग सांवताबरोबरचा 
रघू लस व्हायचा. असलेल्या खघूच्या जोडीला ताया चांभार यायचा. त्यानं 
मागल्या वर्षा मंद्रिकची परीक्षा पास झाल्यावर ' सत्कार ' देऊन, आतां 
मुंबईला पोस्टांत नोकरी करायला जातों म्हणून सांगितलेलं आठवायच. 
मिळालेल्या अपयशापार्शी आजला पूर्णविराम द्यावा अशी इच्छा प्रबल झाली. 
इतक्या उद्योरा केसरीत आलेल्या आडगांवच्या शाळेतल्या ' वँटिड !च्या एक- 
दोन जाहिराती पाहून रघूनं आपल्याकडून गुपचूप अजेही करून टाकले. 


त्याच्या या नसत्या उद्योगाचा मटजींना सगावा लागला; आणि त्यांनी 
आपला जुना रुद्रावतार रथरूला दाखवला तेव्हां तो थक्क झाला. आपलं हे 
करणं भटर्जींनाच काय गावांतसद्धां कुगाला कळेळ अशी त्याला होका आली 
नव्हती. पण इंग्रजी पत्ता लिहिलेली पाकिटं ही. खेडेगांबच्या पोस्टांत सहजी 
आढळणारी चीज नव्हती. त्यामुळं पोस्टाचा चाजे असलेल्या मास्तरार्नी ती 
पाकिटं पाहिली तेव्हा बाजूळा ठेवून दिली आणि आपल्या हस्तकौशल्यानं तीं 
उघडून वंडूकडून मजकूर समजून घेतल्यावर दुसऱ्या दिवशीं रवाना केली. 
त्यानतर सहाजिकच अडुघांत चचा. झाली. “' भटाचं पोर कॉलेजांत गुण 
उधळून आलंय नक्कीच, आता सारं संपलं, लागलंय अज खरडायला--- ?? 
या चर्चचा वास भटजींना लागला होता. 


बडलाच्या रागावण्यापेक्षां त्यांना झालेला ताप रघूला अधिक जाणवला, 
आपण वडलाना अपकार मात्र करू शकल! म्हणून स्वतःवरच संतापून तो भरकटत 
दूरवर गेळा. कुटं चाललाय याला त्याचे भान नव्हतं. पण इतक्या लांब 
आपल्याला ओळखणारं कुणी भेटणार नाही, कुगीही आपल्याला हृटकणार 
नाहीं असं समजून तो तंद्रीत चालला होता. 

: रघुनाथ? या अपरिचित हांकेनं तो थबकला. 


थोड्या अंतरावर, विहिरीच्या धावेवर उभा राहिलेला पैलवानी थाटाचा 
एक ग्रहस्थ हाकेबरोंजरच हात हालवून रघूळा बोलवीत होता. जवळ गेल्यावर 
सुद्धा रघूनं त्याला ओळखलं नाहीं. “ कां ! “ईं निरखून बगतुयास १? अन्‌ 
असा बावरलास गा कशापाई £ - दयेरांत राहून पार वळख इसरलास वाटं ? 
,पेलवानानं रघूवर सखत्ती केली अन्‌ खसकन त्याच्या दंडाला धरून आपल्या- 


छवणाची मासोळी ९५ 
जवळ बसवलं. त्याने सांगितल्यावर रघूला कळलं की आपला लहानपणाचा 
भैतर रंग्या - आतां रंगराव पैलवान होऊन आपल्या शेजारीं बसला आहे. 

“६ काय मर्दा - इक्ता कसा रं गावाला इसारलास १ आनू ही काच 
क्रशाला लावलीयास डोळ्याला म्हाताऱ्यावानी १ त्वाड आखडू नगस. साग 
सारं भधैेजवार. ध्ये, पान घ्ये अदुगर. आन्‌ मग साग दमानं --? 

“: मरी पान खात नाहीं पैलवान---? 

“ छळू ! मला साग]ुयास ! पान खात न्हाहूस तर काय पाडरी बिडी 
बडतुस व्हय ! मजीपार्शी विडी-भिडी गवसायची नाय. होव तर चिलीम 
दोन-- ” 

“ नाही नाही. मी ओढत नाही काही. * 

“. तुला झालया तरी काय रघुनाथ १? पान खायाचं न्हाई, तंबाकू बडायची 
न्हाई - मग तू करतुस तरी काय १ अजून काय शाळेतलं प्वारच र्‍्हाईलास 
जनू ! मजीपार्शी न्हाइ चालायचा असला नाजूक नखरा. पान तरो खायाच 
'पायजेस तू--- ? 

रघूनं चाचरत चाचरत अखेरीला पान घेतल, अन्‌ त्याचा अगदीं नाजुक 
नरम बायकी विडा करून तोंडांत घातला. 

“: काय पान खातुयास त्येका १? बायात्रापड्या लावत्यात तसा मच्या 
बोटानं एवडासा चुना काय लावलास - इक्ता कसा र नाजूक तूं १”? 

:£६ मुळा संवय नाही पैलवान -- ? 

:£: आता कवा हुयाची -- म्हातारा झाल्यावर ! बरं, त्ये ऱ्हाऊं दे, लई 
दिसांनीं मिळालायास तर बोल तरी सार. झालं न्हवं का आता शिकून सारं 
यास - फ्यास ? आता कामाला कुठं जाणार हैस १”? 

अजून शिक्षण संपलं नाहीं हृ खूनं सागितल्यावर रंगरावानं त्याच्या 
पाटीवर चांगलीच थाप मारली. अन्‌ मग खघूला कळलं कां रंगरावानं आता 
मास्तराचा मळा कला होता; त्याच्या घरातून रघूचं शिक्षण संपल्याची बातमी 
रंगरावाला लागली होती. आता तो कुठं तरी नोकरी धरील हॅ सुद्धा कळलं 
होतं. रघूनं त्याला समजावून सागितल्यावर त्यान आपलं भाअडं मन उघडं 
केलं, “ म्या म्हटलं रघूचं शिकायच झालं. ब्येस झालं. आता चागली 


९६ लवणाची मासाळी 
चाकरी लागल; बान लर्ईच कष्ट काढलं. त्येला वाईच इसावा मिळल रघूकडनं. 
झकास बंड लावून लगीन थ्री हुईल, आन्‌ मग कवा तरी जुना मैतर म्हनून 
आपल्य" गाववाल्याकड सिनिमा - जत्रा बगाया जायाला 'गावल मला. तूं 
कुटंब ग्येळास तरी कुस्त्यांचा फड असला कामा ततं याचाच, पर तूं 
ह्ये र आक्रीच सागतुयास--“ 


घेळवान, तुम्ही करताय माम्तराचा मळा. त्याचं चामच कसं आहे तें 
काय तुम्हांला ठाऊक नार्ही. ? तम्ही त्याचं म्ट्ण॥ खर धरायचं नव्हतं -- 


त्य॑ ठाव हुत र मला, पर म्या म्हटल त्यच्यात कशाला खाट असतया १ 
मला न्हाइ उमागला त्येचा बरामनी तिदा---? 

: नाही उमगला तंच बरं. पण तुमचं टीक चाललंय ना पैलवान ? ? 

५६६ आमचे कःय नागर गस्यांचं ? आामच कान वाकड करनार हाय १९ 
याक वावार सुटल तर दुसर करायच. मागच्या सालचा मालक म्हनाला, 'रग्या 
तुज्या पेलळवानकीन पिकाची अब्दा हुतीया ? म्या त्या वक्‍तीच ताडावर 
सांगितलं - हावं नर उब्या पिकाची खोती घ्या त्रसल्या भेठकीला, पर माजी 
पेलवानकी काडायचं काम न्हाई ! * 

५: हच चागळं पैलवान अंगात ताकद आहे तंवर कुणाचं “* अरे ? म्हणून 
घ्यायचं कारण पडत नाही तम्हाल 


“६ वा र मदा ! तूं योक बामन भटलास मळा चांगला म्हननारा, न्हाइ तर 
सारी ' टग्या ? म्हनत्यात. पर तूं रं असा का ? तुला काडू तरी झाल्यावानी 
आज सारं बोलतुयास ? आरं - तुरं करायचं सोडून ह्ये कुटं शिकलास ? 
का द्येगात ऱ्हाऊन गावाला परका झालायास १ *? 


: तसं नाही पैलवान. पण कारही झालं तरी आज तुम्ही आपल्या पायावर 
उभं राहून संसार चालवताय्‌ - मी मात्र अजून दुसऱ्यावर अवलंबून आहे.” 
“६: छळ | मी पायावर हुबा ऱ्हाता अन्‌ तू काय डोक्यावर ? काईंच्या 
ब्राईच बोळतुयात. आरं आमची घाब बाढापावतर. आम्हीं कंदी म्होरं 
बगितलंच न्हाइ. तूं तर मर्दो शिकून म्होरं निगालास. गावचा योक गडी 
. अन्‌ ह्या रुग्याचा मैतर फुड चालल म्हून मी मिशीवर पीळ भरून ताठपनी 


लवणाची मासोळी ९७ 
सांगतुया साऱ्यास्नी - अन्‌ तूंच असा कान का पाडतुयास १ कशापाई रं 
ह्य चागलं न्हव रघुनाथ, * 

रंगराबाच्या बोलण्यांत अज्ञान आणि अमिमान यांचं विचित्र मिश्रण रघूला 
दिसलं. आपला मित्र शिकून मोठा होतोय एवढीच बाज त्याच्या अभिमानाला 
पुरेशी होती. तो काय शिकतोय, कसा शिकतोय्‌ याचा गंध त्याळा नध्हता 
अन्‌ त्याची जरूरही नव्हती. तेवढ्यावरच तो रघूची कुठलीही अडचण किंवा 
सबब महत्त्वाची मानायळा तयार नव्हता. त्याच्या वृत्तीत खडेगांवच्या 
निरागसपणाच। एक पेळू रघूला दिसला. रंगरावाच्या निरागसपणांत, कृष्ण- 
भटजींच्या निषोणीच्या सांगण्यात आणि टवाळखोर गांवगाड्याच्या चर्चेत - 
सववत्र साधारण एकच भाग होता. तो म्हणजे खेडेगांवातला मुलगा 
दिकायला बाहेर पडला म्हणजे चांगली चाकरी लागायसाठी हवं तेवदं 
शिकायचा अन्‌ मग चाकरी लागून * मोठा ? झाला म्हणजे कधीतरी सणा- 
सुदीला गांवांत दिसायचा, असं झालं कीं त्यानं गांवाचे, घराचं नाव काढलं ! 
त्यात थोडासाही फरक पडला तर पोरगं शहरात राहून वाया गेलं ! 


म्हणूनच रघूला फार दिवस आपल्या गांवांत रहाता आलं नार्ही. जुले 
महिन्यांत शरिवपुरला जायचा त्याचा बेत पक्का झाला. आणि त्या वेळीं त्याला 
आठवलं कीं, बापटानं आपल्याला पत्र पाठवायला पुनः पुनः बजावलं होतं. 
आजपर्यंत एका शब्दानं त्यानं आपल्या डोळ्याबद्दळ किंवा पुढच्या कार्यक्रमा- 
बद्दल चंदूला कळवलं नव्हतं. आता तीन महिने होऊन गेल्यावर अचानक 
गरजेच्या वेळीं त्याला लिहिळ तर तो. काय म्हूणेळ ? दोन वर्षे त्याच्या 
सहवासांत राहून, त्याच्या मदतीचा घ्यायचा तितका फायदा घेतल्याबर 
त्याला साधं तीन पेशाचं कार्डही आपण टाकलं नाहीं याबद्दल तो काय म्हणत 
असेल १ 


पण जितक्या सहनपणें हे विचार मनांत आले तितक्याच सहजपणे रघूनं 
ते काढून टाकले. तो श्रीमंतांचा मुलगा. त्याला कह्ाला आपली आठवण 
होते आहे ? आपण गरजू म्हणून लिहिणार आहोत. पांडुरंग सावंतान त्याला 
एकदा सांगितलं होतं. 'तुमचा कंपॉनियन बापट चांगला श्रीमंत दिसतो -- 
त्याच्याकडून मिळेल ती मदत खुशाल ध्या. तुम्हांला क्ासच्यासारख्या श्रीमंत 
ल, मा... ७ 


र्ट लवणाची मासोळी 
क न ल वतत काता तहात ताया ताता कलक 
मुली सांगून आल्या नाहीत तरी निदान श्रीमंत मित्र तरी आहेत - आप- 
ल्याला कर्तव्य आहे श्रीमंतीशी - ? रघूनं चटकन्‌ चंदू बापटाला पत्र लि 
आपण येंत असल्याचं कळवून टाकलं. त्याचं उत्तर आल नाही तरी त्यानं पर्वा 
केली नाहीं. समक्ष गाठ पडल तेव्हा पहाता येईल म्हणन निघायची तयारी 
केटी, भटजींनी हातावर ठेवलेल्या नोटा किती आहेत हे संद्ठा न पहातां 
त्यान त्या खिश्यात कोबल्या. 


>< > >< 
चार दिवस सकाळ-संध्याकाळ निरनिराळ्या खानावळांतल्या अन्नाची 


चब घण्यांचा प्रयोग खून केला आणि खानावळीतळ॑ अन्न हें आपल्यासाठी 
नाही अस ठरवून टाकलं. मेन-रोडच्या एका वाड्यातली स्वाळी धेऊन त्यानं 
जुजबी सामान जमवळं आणि स्वावलबनाची कास घरून स्वतःच मनपसंत 
जेवण वनवून टाकण्याचं नक्की केळ. यंदा वेळ भरपूर आहे - उगीच कल्ाला 
खानावळीची भर करायपी असं समाधान त्याने मानलं. खर म्हणजे सुग्वबस्तु 
माणसाच्या वृत्तीनं दुसरे काहींही कश न करतां रहाण्याची अजून त्याची 
तयारीच झाली नव्हती --- 

कॉलेजात जायची काहीही आवद्यकता नव्ह्ती, तरी निदान वगोत अभ्यास 
कुठवर आलेत ते पाहून याव म्हणन त्याने काळेजवर एक चक्कर टाकली. तास 
चाळू होते. आपोआप त्याची पावलं जिमखान्याच्या दइमारतीकड वळली. थाडा 
बेळ वर्तमानपत्राची चाळवाचाळव करण्यात त्यानं मन रमवलं,. परकपणाच्या 
जागिवेनं तो चुळबुळत होता. आपण इथं का, अद्यी कोणी चौकशी तर 
करणार नाहींना, या डांकेनं तो मधून मधून चोहीकडे पहात होता. आणि 
त्याच वेळीं कोणी तरी ओळखीचे भेटून बोलायला मिळेल अशी आशा त्याला 
वाटत होती. असाच तो इकडे तिक्रडे पहाताना करमच्या टेबलापाशी बसलेल्या 
तीन मुलांचे लक्ष त्याच्याकडे गेल. ती मुळं जणूं त्याचं वाचन संपायची 
बाटच पहात होती “' काय मिस्टर, येगार काय १? एक जागा रिकामी 


येता की. पण माझा खेळ ब्रेताचाच आहे. 
“६ इथ कोण चेम्पियन्‌ लागून राहिलाय ? या तर खरे--? 


छवणाची मासोळी ९९ 


रघूनं मोकळी खुर्ची पटकावली. त्यांचा खेळे सुरू झाला. सारेच नवथर; 
त्यामुळं खेळापेक्षा उत्साहच जास्त होता. पण रघूला हवा तसा बेळ चालला 
होता. मोठ्या म्जंत आठ-नऊ डावात एक गेम कशीबशी संपली. तेवढ्यांत 
दुसऱ्या तासाची घंटा झाली. गडबडीन ती एफ्‌. वायू. मधली * बाबळटे 
तासाला निघून गेलीं. अन्‌ सुटलेल्या मुलाचा लोंढा जिमखान्याच्या इमारती- 
कडे वळल्याचा गोंगाट ऐकूं येऊं लागला. आता नक्कीच कोणीतरी ओळखीचे 
भेटेल - पण कोण भेटेळ १ त्याच्याशी काब बोलायचं हें रू आपल्याशीच 
ठरवीत होता. 

तेवढ्यांत करमच्या टेबलळाकडे यायळा निघालेला चार मुळीचा घोळका 
मधेच थाबून हटक्या आवाजात आपसात कुजवुजूं लागला. त्याची अडचण 
आओळखून म्हणा की स्वतःच अडचणल्यासारखा होऊन म्हणा, रघू आपल्या 
खुर्चीबरून उठून दुसरीकडे जायला निघाला. 

“ तुमचं आधी कुगाशी खेळायचे ठरलंय का जोशो १---तसं असलं तर 
आम्ही बतेमानपत्र वाचता -- 

“ नाहीं - तस नाहीं काही. मी उगीचच बसला होता. ”' कशीवर्शी 
दान वाक्यें बाळून खू वर्तमानपत्राच्या बाजूला पुनः सटकला. त्यान यमू 
बापटळा ओळ'वबलं होतं तरी तिच्याशी तआ्रोलावं की नाहीं याबद्दल त्याचं 
काही ठरलं नव्हतं. वतमानपत्राचं निमित्त केळं तरी त्याचं लक्ष करमच्या 
टेबळलाकडे होतं. 


६८ ब्र 


रं बाई बापट, तू विचारल्याबरोबर करम मिळाला. नाहींतर 
आपण आलेल्या दिसला की मुलाच्या खेळाला जोर चढतो -- ? 

“६ अग पण तो काय एकटाच खेळणार होता ? * 

५६ तें नको सांगूस - पार्टनर येनोय्‌ म्हणून पीसेस्‌ लावण्यात वेळ काढायचा 
अन्‌ दिसेल त्या दुसऱ्या विद्यार्थ्याला - “ किती वेळ लावलास पार्दनर ? 
म्हणत हाक मारायची. हूँ जसं कांही तुला ठाऊकच नाही? 


६ घण ह्या मात्र बापटनं विचारल्याबरांबर उठून ग्रेळा - काय ग, 'सुश्या 
ओळखीचा आहे वाटतं यमे ? ” ' | १४ 


१०० लवणाची मासोळी 

“६ योंपंत होतीस कीं काय १ का अगदीं नावाप्रमाणं उषास्वम रंगवीत 
हातीस £ ?? 

८६६ ओळख तुझी - अन्‌ स्व मी कशाला रंगवूं ? * 

£: मग बिचारलंस कसं ओळखीचा आहे का म्हणून ?१ मी सरळ त्याला 
जोशी म्हणून नांवानंच हाक मारली होती. ?? 

£ खरंच का त्याचं नाव जोशी आहे? मला वाटलं कुणाचंही नाव ठाऊक 
नसल कीं त्याला “ जोशी ? किंबा ' कुलकर्णी ' म्हणून हांक मारली तर ती 
बहुदा बरोबर ठरते, म्हणून तूं म्हणाली असशील --- ? 

£६ शहाणीच आहेस |! बाकी तूं आलीस परगावासनं; तुला काय ठाऊक 
म्हणा | तो आमच्या शाळेंतला स्कॉलर होता. अन्‌ दोन वर्षे पुण्याला 
आमच्या चंदूच्या खोलींतच कभ्पॅनियन्‌ म्हणून रहात होता-- 

“ इतकं सगळं सागितलंस - पण तुझी ओळ्ख किती आहे तं कळलं 
नाहीं अजून, कां कार्ही-- ” 


८६ माझी ओळख ? माहिती आहे मला अन्‌ त्यालाही - यालाच ओळख 
म्हणणार असलीस तर खूप जुनी आहे. 


६ मृग येंदा या कॉलेजांत आलाय वाट्तं पुनः ! कोणत्या वर्गात 
आहेगतो? ? 


“: इतकी माहिती हवी असली तर तुझी तूंच विचार ना. बोल्वूं का 
त्याला इकडं १? मला काहीं ठाऊक नाहीं. आज तर मा पहाते आहें 
इथं पहिल्यांदा-- ? 

“: मार थापा--- ? 


त्याच्या या हलक्या आवाजातल्या गप्पा किती वेळ चालल्या असत्या 
कोंगास ठाऊक. पण तेवढ्यात एक विद्यार्थी मोठ्यानं म्हणाला “' अहो, 
तुम्हांला गप्पाच मारायच्या असल्या तर तेबढा बोर्ड मोकळा करूनद्या ना 
आम्हांला ?? “ वा | आम्ही अजून खेळायला सुरुवातसुद्धां केली नाहीं -- ” 
त्यांचा -खेळ सुरू झाला. तो चिवचिवाट थांबलेला पाहून रघूनं पुनः 'टाइम्स? 
मध्यें डोकं खुपसून वाचण्याचे ढोंग चाठू केलं. 


ल्वणाची मासोळी १०१ 

मधली सुट्टी संपून तासाच्या ओढीनं जाणारे विद्यार्थी निघून गेल्यावर, 
जिमखान्यांतल्या भकास शांततेचा कंटाळा येऊन, रखघूनं आतां गांबांत परत 
जायला निघावं म्हणून टाइम्सला रजा दिली. करमच्या टेबलाजबळ यमू 
बापट एकटीच बसलेली होती. रघूळा निघालेला पाहून, तीही गडबडीन 
'पुस्तक॑ गोळा करून उठळी अन्‌ तसं करताकरताच तिनं बोलायला 
सुरवात केळी --- 

५: हृ हा काय जोशी १? तुमच्यासाठी मी थांबले अन्‌ तुम्ही आपले 
परस्परच निघालां १ ?” 

“६ मळा वाटलं - तुम्हांला तास नाही म्हणून तुम्ही थांबलाय्‌ ? 

“: नाहीं कसा पण आज मारली तासाला बुट्टी ? 

माझ्यासाठी काय १? अस विचारायचं खूच्या जिभेवर आलं होतं; 
'पण त्यानं प्रत्यक्षात विचारलं, “' कसला तास होता ? ?' 

“ सिव्हिक्सचा. माझ्याजवळ नोटस आहेत मागल्या वर्षांच्या --?? 

५६ म्हणजे तुम्हीही यंदा इंटरलाच आहात १ ? 

६ हो, नाही तर काय, माझ्यासाठी बी. ए. ला सिव्हिक्त थांडच 
नेमणार आहेत ! आमचे काय १ - एका वषोत इंटर थोडच जमतंय 
आम्हाला | ?” 

रघू चरकला. ही पोरटी मनापासून बोलत आहे कीं आपल्या वमांवर घाव 
घालायसाठी साळसूदपणे धका देते आहे ? --त्याला कळेना. त्यानं नुसता 
हुंकार भरला अन्‌ मग कांही तरी विचारायचं म्हणून यमूला विचारलं 

“ चंदू कुठं आहे हलली ! मी त्याला लिहिलं होते - पण त्याचं क!ही उत्तर 
आलं नाही - ” 


“६ तो केव्हांच पुण्याला गेला, एम्‌, एस्सीच्या टमस्‌ भरायसाठीं. तुमचं 
पत्र आलं तेव्हां तो इथं नव्हताच - मग उत्तर कसा पाठवगार १? पण 
फार लवकर पाठवलंत हो पत्र १? इथे होता तंबर तो वाट पहात होता --?” 


“ नाही जमलं आधीं - लिहायला कांही मजकूरच नव्हता. इथं य्रायचं 
ठरल्यावर आठवणीनं पाठवलं - ?? 


१०२ लवणाची मासोळी 
दड लिम वि हह डगि तमो नोन कसनन 

६ पण पत्रात लिहिलं तसे आमच्याकडे आलां कां नाहीत ? मी वाचलं 
होतं तुमचं पत्र. बाटलं तुम्ही उतरायळाच याल --? 

“६ पण चंदूचं पत्न आलं नाहीं. तेव्हां तो इथं नसेल - मग कशाला 
उगीचच - म्हणन नाहीं आला, झालं ?? 

 महूणजे चंदू नसला तर आम्ही सगळे ' उगीचच ? होय ? ह चांग- 
ल॑च म्हणायचं ! ?? 

: तसं नाहीं हो- ?” पण याच्यापुढ काय सांगायचं ते न सुचून खून 
विषय बदलला, “' पण आता तुम्हाला तास नाहीं ना १-- मग इथं कशाला 
नसायचं त्यापेक्षां चालतच जाऊंया। ना गावात. बोलत बोलत चालताना 
काटी तेवढं वाटायचं नाही 

£६ इतक्‍या लांबवर तुम्ही चालणार १ ? 


:६ त्यांत काय आहे ? अगदींच मेणाची बाहुली नाहीं मी. फार तर 
आज संध्याकाळच्या फिरण्याला चाट. 


आणि तीं दोघं जिमखान्यांतून बाहेर पडलीं. कॉलेजच्या फाटकातून बाहेर 
पडेपर्येत काहीच न बोलता अंतर ठेवून दोघही चालत होर्ती. रस्त्याला 
लागल्यावर वाट पाहून यमूनंच सुरुवात केली. 


“ चंदूनं सांगितलं तुमच्याबद्दळ सगळं. आतां डोळे पुरते बरे झालेत 
ना ? यंदासुद्धां थोडा बेताने अभ्यास करा - नाहीतर करून ठवाल काहा 
तरी घांटाळा 

“८ छु: | यंदा घोटाळा-बिटाळा काहीं नाही. येंदारची पुस्तकं सुद्धा 
अजून पाहिली नाहींत. ?' रघून सफाईनं थाप मारटी. 

6 हें दुसऱ्या कुणाला सागा. मागच्या वर्षी पुस्तकं दडवून ठेवल्यावर 
तुम्हीं काय काय केलंत तं सगळं चंदूनं सांगितलंय ? 

८६ मागच्या वर्षीचे मागच्या वर्षी खतम्‌. पण्याबरोजरच तें सगळं मुळा- 
मुठेंत सोडून दिलं. यंदा मीं फार मोठा घडा घेतलाय. कोणचीं पुस्तकं नेम- 
ठींत तेसुद्धा अजून ठाऊक नाही. मला. कुणाला तरी विचाराव म्हणून 
कॉलेजवर आलों होतो. 


लढवणाची मासोळी १०३ 

“ खोटं बोलायची अन्‌ थापा मारायची संवय नसली म्हणजे हे अस 
होते. ?? म्हणून यमू मनापासून हसली. “' अहो, पुस्तकांच्या याद्या गावा- 
तल्या पुस्तकांच्या दुकानांतसद्धा पहायला मिळतात. त्यासाठी चार मेल लांब 
कालेजवर खेप टाकावी लागत नाहीं. ? 

“: घण दुकानात नुसत्या याद्या मिळतील अभ्यास किती झालेत, प्रोफेसर 
कशावर भर देताहेत, याचाही सुगावा असलेला बरं असतं. ? 

“: पण तसुद्धां बंगल्यावर आला असतात तर कळलं नसतं का ? इथं 
: कुणी तरी ? भेटेल अद्यी कल्पना करायची. पण चंदूची ओळख, माझा 
भाऊ म्हणून काढल्यावरसुद्धा बंगल्यावर यायचे नाही - मी खूप रागावणार 
आहे तुमच्यावर, ? 

८“ ळान ! मळा थापा मारायला येत नाहीत असं मघाशी उगीचच 
म्हणालात. पण ते आतां तुमच्या बावरतीनं मात्र खरं झालंय. रागावणारी 
माणसं आधी सांगून रागावतात हं मी प्रथमच ऐकतोय आज आणि इथं 
सुद्धा ' कुणीतरी २ भेटायचं त्या तुम्हीच भेटलात की--?' 

“: घरं बरं ! पुरे झाली संपादणी, आता मात्र बगल्यावर आलं पाहिजे- 

“८: आता म्हणजे कर्धी १ मी तर आजच बंगल्यावर येणार होता. !? 

“६ त ठाऊक आहे मला - इतक्या दिवसात आलात तसेच ना? ? 

“८ अहो मळा इथं येऊन पुरते आठ टिवससुंद्धा झाले नाहीत. ” 

“< शावात आल्यावर आमच्याकड यायला तेवढे दिवस पुरत नाहींत 
वाटतं ? - आज सत्रब चालायची नार्ही. ?) 

५८ सज कुठली १? मी तर आजच येणार म्हणून तुम्हांला सांगितलं. 
आता थोडे का दिवस झालेत कॉलेज सुरू होऊन. निदान एकदां 
पुस्तकं तरी पाहिलीं पाहिजेत - ? 

“ म्हणजे तुम्ही येणार त आपल्या पुस्तकांच्या कामासाठी; असंच 
ना ? पण-- 

“ त॑ आपलं निमित्त दो. तुमच्या बंगल्यावर काय काम आहे म्ह्णून 
कुणी विचारलं तर सागायला तरी काहीं हवंना ! 


१०४ लवणाची मासोळी 

:£ विचारणार कोण ? आतां माझ्या बरांबरच चला -- पण पुस्तका- 
बिस्तकांना हात लावायचा नाही. फारतर लाबून दाखवीन. नाहीतर 
तिथंच माझ्या खोलीची लायब्ररी करून वाचीत बसाल - ?/ 

“ ती भीतीच नको मुळीं - मी तू) तरी अभ्यास असा फारसा करणार 
नाहीं. तुमच्यासारख्याच्या नोट्सबर भागवणार आहें. ? 

“बवा! वा! ---आमच्यासारख्यांच्या नोट्स !  एकलं कुर्णी तर 
चांगलीच होईल माझी ! पण असं थट्टेवारी नेऊन चालणार नाहीं. यंदा 
मला नोट्स दिल्या पाहिजेत अन्‌ दुसऱ्या टमला माझ्या डिफिकल्टीज पण 
सोडवल्या पाहिजेत - चंदू इथ नसला तरी मी काहीं ' उगीचच ? आपला 
हक्क सोडणार नाही. ” 

रघू यावर काहीं तरी उत्तर देणार हाता. बोलत बोलत तीं दोघ गावापाशी 
आठी होती. तेवढ्यात कॉलेज सट्टून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्याच्या सायकली 
जवळ आल्याचा आवाज आला. रघूला न ओळखणारे एक-दाधे नुसतेच 
£ आहे वुव्वा ! ? म्हणून सटकले. करमच्या खेळातलं त्रिकूट आले त्यासी 
मार्ग वळून पहायचा सपाटा लावला, आणखी कोंगी म्हणालं, “' झाज 
गाडीचा पास विसरला वार्त - अरेर, पाय दुखायला लागळे असतील ? 
सायकलींची माळ सपता संपता एकजण म्हणाला, “' अश्या वेळेला तेवढी 
आमची सायकल नेमकी पंक्चर व्हायची नाही. 

£ काय आहेत तरी रत्नं |! '? यमू तिटकाऱ्याने म्हणाली. रघू काहीच 
न बोलता नुसतं थोडासा हसला. रस्त फुरायची वेळ आल्यावर रघूर्ची पावल 
आपोआप गावातल्या आपल्या खोलीच्या दिशेने वळली तेव्हां यमू म्हणाली, 
:: आमचा बंगला त्या बाजूला नाही हंसुद्धां विसरलांत काय १ ? 

५ अरा - माझं लक्षच नव्हतं.?? म्हणत तो तिच्या बंगल्याकडे वळला. 

> >< >< 

त्या दिवर्शी रात्री यमूनं दिलेल्या ' मर्चेट आफ व्हेनिस "ची जाडजूड प्रत 
बाचायळा उधडल्यावर रघून एका दमात सगळाच्या सगळा पहिला अंक 
वाचून सपवला धावत्या वाचनात नाटकाचा आशय पुरेसा समजणार नाही 
ही कल्पना असूनही त्यानं ठिपण्या-अनुबादांच्या भागाकडे वळायच नाहीं 


लवणाची मासोळी १०५ 
असं ठरवलं होतं. अंक पुरा झाल्यावर ' आज एवढा श्रीगणेशा पुरे ' म्हणून 
त्यानं मजकुराचा भाग उलटून टाकला. मागपुढं पानं उलटायचा उगीच चाळा 
चालवला. सुरुवातीच्या कोऱ्या पानावर कोरून उजबीकडे कलत्या बायकी 
अक्षरांत काढलेलं ' यमुना बापट हं नाव निरखून पहाण्यात चार-पाच 
मिनिटं घालवली, अक्षराच्या वळणाचा आणि स्वभावाचा संग्रंध असतो 
असं एक मत त्यानं ऐकलं होतं. त्या मताची आठवण यपमूच्या अक्षराचं 
वळण न्याहाळताना व्हावी याची रघूला गंमत वाटली, बहुतेक साऱ्या मुलींची 
अक्षरं उजबीकडे कलती असतात म्हणजे त्याचे स्वभावही एकसारखेच असतात 
का ? आणि तेही अक्षराच्या वळणाप्रमाण उजबीकडे कलते १ - पण 
उजबीकडे म्हणजे कुशीकडे ? -- राजकारणातल्या डाव्या-उजव्याचा उच्चार 
त्या काळात व्हायळा ळागळा नव्हता. निदान प्रमुखपणे तरी मुळीच नव्हता. 
-- मग काय उजवीकडे म्हणय रगरूपातल्या उजवीकडे ? पण ही रंगरूपाची 
चिकित्सा तर बायक्राउक्षा पुरुषाच्या स्वमावा्शी अधिक जोडली जाणारी. 
उजवीकडे हें नक्कीच. हो; आयल्या बोलण्यात मसुळीचा, ब्रायकताचा विपय 
आला की वयन वाढणं, स्थळ पहाणं आणि लय़ होणे याशिवाय चर्चाच 
होऊं दकत नाही - आणि हिदुकल्पनेप्रमाणे स्त्रियांच्या उजव्या बाजूला 
नवऱ्याच -- पुरुपाचं स्थान असतं तेव्हा बायकराचा कल नेहमी उजवीकड - 
छेः ! काय वेडगळ कल्पना आहे ! रघूनं एकदम ते नावाचं पान झाकून 
चारपांच पानं उलटली. शोक्सप्रियरचा म्हटला जाणारा लाव्र केसाचा फोटो 
पहायला त्यानं सरुवात केली 

फोटो - दोक्सपियरचा फोटो - यपुना बापटच्या पु तकातळा फोटो की 
यमू बापटचा फोटो आणि पुस्तकातला - वहीतला फोटो, यमू आपटच्या 
बहींतला फोटो ऊर्फ * नूरजहान ? किंवा मस्तानी - पाठीमागच्या बाकावर 
बसायची घडयड - ' आयू लव्ह य्रू मिस्‌, गिव्ह मी अ किस्‌ ? - इव्दा ! 
माझा रुमाल पडला की बाकावर - अघ लेका कुणाला न सागता वाचून 
झाल्यावर रुमालानं पुसल - बाकावरचा खडूचा रग पुसला पण गालावर 
चढला - कोलिजात गेल्यावर ' शाळू * भरला बरं का - ' काय आहेत तरी 
रत्नं ) - मी कारही उगीचच आपला हक्क सोडणार नाही - ठण ठण ठण .. 

रघूनं राजवाड्यांतले बाराचे टोले ऐकले - कसली वाक्य अन्‌ चित्रं यांत 


१०६ ढवणाची मासोळी 
आपण गुरफटलो होता - झोंप लागली तरी केव्हा १ -- मग बाराचे टोले कसे 
ऐकायला आले ? अजून आपण कह्यात तरी गुरफटलोय्‌. असं म्हणत रघूनं 
सहजा चादर झटकडो अनू कूस बदलली. 

५ साहेब - टूध. ”” रघू खडबडून जागा झाला. दूध इतक्या लवकर 
कसं आलं ? का उठायलाच इतका उद्यार झाला ? डोळे चोळीत चोळीत त्यानं 
दार उघडलं. आठाचीं झक्क उन्हं बाहेर पसरली होती. घाईंधार्डनं दूध घेऊन, 
रघूनं सकाळच्या उद्योगाला सुरुवात केली. 

त्या दिवशी खूच सारं तंत्र बिघडलं. तो रहात होता त्या भागांत पहाटे 
पांचाला नळ येऊन उजडायच्या आत जात असे. बाहेरची सारी ऐट 
सांभाळतां स!भाळता रघूनं एक खाजगी वेळापत्रक ठरवून ठेवलं होते, 
पहाटेच्या वेळी, कुणाचीही वर्दळ नसताना, शातपणं आपल्या स्वयंपाक- 
दहयाण्याची भाडी घासून टाकायची अन्‌ कपडे धुऊन अंघोळ उरकायची. 
सकाळ-दुपारच्या अभ्यासाच्या घेठकींत दहा वाजता वेळ काढून स्वयुंपाक 
उरकायचा आणि संध्याकाळीं खूप लबकर बाहेर पडून भटकायचं. हा क्रम 
आज त्याला सोडायला हवा होता. कालच्या संब्रंध दिवसाच्या भांड्यांची 
रास पडली होती -- म्हणजे हाती तेवढी भाडी गुतून पडलीं होती. अघोळ 
राहून गेलेलो; रात्रीच्या अवेळीं झोंपनं डोळे तारवटलेले. अश्या स्थिनींत त्यानं 
कशीब्ली सकाळच्या चहाची व्यवस्था पार पाडळी, आता जवणाचे काव 
करावे याची विवंचना करीत तो आळसावून वळकटीला टेकून आढ्याकडे' 
स्वस्थ पहात राहिला. 

पावसाची उघडीप होती तरी कृप्णेला येऊन गेलेल्या पुरामुळे नदीला 
भरपूर पाणी होत. रघूनं कपडे गोळा करून नदीची वाट धरली. खूय 
दिवसासी दाहरात त्यानं खेडेगावच्या रहाणीचा माग पत्करला. नदीवर 
गेल्यावर आरामात तासभर पोहून, लाब भेलमर खाठीं जाऊन, चांगला दमून 
ता खोळीवर परत आला. पोहून आल्यावर त्याचा आळस निघाला. मेंदू 
काम करायला लागला. चहाचा आणखी एक डोस मारून त्यानं कपडे केले 
अन्‌ बाहेर पाऊल टाकलं. 

पण त्याला फार लाब जावं लागलंच नाही. राजवाड्यासमोरच्या चौकांत 
सायकलींना वाट देण्यासाठी तो उभा असतांना, सायकलवरनं कातिलाल 


लवणाची मासोळी १०७ 
येत असलेला त्याळा दिसला, त्यानं “ ए कात्या ? म्हणून खूप जोरानं हाक 
मारली, सायकल थांबवून कांतिलाल चहूकडे पाहूं लागला. तेवढ्यात खून 
त्याला गाठलं अन्‌ जोरात त्याच्या पाठीवर धाप मारली. 

“६ अरे - अरे कोण १ जोली का? ?? 

“: होय मीच, काव्या. माझ भूत नव्हे कारही .? 

“ पाठींत थाप मारलीस म्हणून लवकर ओळखलं. नाहींतर खूप बदल- 
लायस तूं, मी आपला बघतच राहिला असतो. इथं मला कात्या म्हणणारा 
कोण उपटला म्हणून, ? 

“६ का? नांवबिव बढललं आहेस काय १ - तस असलं तर सागून ठेव.?” 

:: जाव बदलायला मी काय पोरगी आहे १ ? 

“ तुझ्या बोलण्यात पोरयी आली तेव्हा तूं पोरगी नसून कात्याच आहेच 
याची शुका नको ?? 

:: चल |! माझी उगीच बदनामी करू नकास. मला हली कुगीच 'कांत्या? 
म्हणत नाहीं म्हणून आश्चर्य वाटल. 

८६ मृग काय म्हणतात रे तुला १ - रोमिओ १ ? 

“ ए माफ कर |! आता हं नवं नाव पाडं नकोस. आधीच सारेजण 
। शेठ ? म्हणून टिंगळ करताहेत. त्यात भर नको अन्‌ तूं रे कधी आलास ? 
करतोस काय १ काळेजात नांवबिव घालणार आहेस का नाही १ ” 

:: कांत्या, लेका, अश्शी कोरडी चौकशी करून सायकलवर टाग मारायचा' 
विचार असला तर तं काही जमायचं नाही, आधीच तुळा सागून ठेवता. 
इतक्‍या दिवसानी भेटलोयू आपण ---? 

“ अरे पण मला तासाला उद्यीर होतोय जोशी पहिला तास ढॉजिकचा 
असतां, त्यातच मी--?? 

५: कळलं कळलं ! लॉाजिकमध्य माल आंजझव्हेशन करतांना गचकलास 
असंच ना ! म्हणजे काय मागच्या वषी जूनियर इंटर संपवून यंदा तूं 
सीनियरला आहेस. मग कसली रे घाई तासाची १ ?? 

५६: आतां तूंच म्हणालास ना सीनियर आहे - तास चुकवून कस चालेल !?? 

६ हूं मळा सागतोस £ मागल्या वर्षीच्या नोट्स असतांना लाजिकती' 
मातब्बरी सांगूं नकोस १ ?१ 


९०ट लबणाची मासोळी 

“ अर पण तास चुकवून करायचं तरी काय १ ? 

“६ असा वळणावर ये - पण लेका, काय करायचं ते इथं रस्त्यावर उभं 
राहून सागायचं होय ! चल कुठं तरी भटाचं-उडप्याचं चागलं हाटेल असेल 
तिथं घेऊन चल. इतक्या दिवसानंतरची भेट चांगली चमचमीत ' सेलेब्रेट 
करूं अन्‌ मग सावकाश गप्पा मारीत ठरवूं काय करायचं ते --? 

“ ही काय वेळ का काय हॉटेलात जायचो जोशी. माझं जेवण झालंय 
घरांत. सेलेबेट काय पुनः करता येईल. ? 

“६ पुनः मी कर्धी नका म्हणतोय. पण आता सोडणार नाहीं. तुला 
खायचं नसलं तर मी खाता ते बघत बस - पण आजचा दिवस आहे तो 
तुला चुकवू देणार नाही. आता उगीच सजबी सागू नकोस. ?' असं म्हणत 
खघूनं त्याच्या सायकलीला हात घातला. 

कात्यानं कुरकुरत खूला उडप्याच्या हाटेलांत नेल. तिथें आरामात 
पाव-मिसळ, मसाला-घावन, काफी याच्यावर यथेच्छ ताव मारून ढकर 
दिला. कात्याला आग्रहकरून पाणी ग्लास घ्यायला लावला. ब्रापूच्या बातमी- 
पत्राने खूचे 'असं? झाल्याचं कात्यालठा आर्थीच समजलं होतं - त्यातला 
चाह्यात्‌ भाग काहून टाकून खूनं पुढल्या कार्यक्रमाची अगर्दी जुजत्री माहिती 
कात्याला दिली. 

५: मग यंदा आपली जोडी पुनः जमली की जोशा - आपण दोघं मिळून 
सुनः अभ्यास करू या. मागल्यासारखा . भाटू-रुसू मात्र नकोस हं. ? 

6 छट ! भाडायलळा काय आपण शाळू पोरं राहिलोय्‌ थोडेच, ? 

६: संग त्या बराप्याशा का अजून भाडण ? ?? 

६: माझं कुठं त्याच्याशीं माडण आहे १ तो माझ्याशी बोलायला देखील 
तयार नादीं. गावातल्या मोठ्या माणसांच्या भानगडीत आपण लक्ष घालायचं 
नाही. असं ठरवून वागायला त्याची तयारी अतली तर मी कधींच नाही 
म्हणणार नाही -- ” 

“ सांगूं का मी त्याला तते १ 

“ ते मग बघू पण तू कॉलेजात नांब केव्हा घालगार £ 

“६ पुण अभ्यास तरी बरोबर करायचा ना £ 


लवणाची मासोळी १०९ 

:: करूं ्या की ! तुझी खोली बो्डिंगातठीच ना ? येईन मी तिथे-- ? 

“ अं हुं - मीं बोर्डिग सोडलंय आतां. कोलिजच्या होस्टेलांत राहतो. 
जवायला गांवांत येतो. खोलीवर यायचं तर आत्ताच चल कीं माझ्या 
सायकलवरनं--- 

“ ठेका, एका सायकलवरनं दोघांनीं जायचं म्हणजे चांगलीच मिरवणूक 
बघतील की सगळीजणं--- ? 

“६ आतां कोण जघतयं ? गर्दीची वेळ तर निघून गेली. ? 

त्या दिवर्शी रघूनं पुनः कालेजची वारी केली. कातिलालच्या खालींत 
गेल्यावर दाघंही तिथें दमून पडले थोडा वेळ ““ आज सगळेच तास बुडणार 
बहुतेक ?! कांतिलळालनं रघूकडे बघून म्हटलं. “' मग त्यांत काय झाले १ तुला 
निमित्तच हवं असेल; ” रघूनं त्याला चिमटा घेतला, अन्‌ तास बुडबणारच 
असलास तर चल कीं - जिमखान्यांत तरी जाऊन बसूं. करमची एखादी गेम 
मारूं. म्हणजे तुला तास बुडवल्याची हुरहूर वाटायची नाहीं. ? 

“: करम खेळून तास बुडल्याची हुरहूर रे कशी जायची १ ? 

“६ जसा काही तूं मला ठाऊकच नाहींस कात्या. तुला तासाला कशा- 
साठी जायचं असतं तें मला कळत नाही. होय ? त्याची भरपाई होईल 
जिमखान्यात मधल्या सुट्टीच्या वेळी. तिथंही दर्शनाची सोय आहेच. मग 
उगीच रुखरुख कां? 

कारही तरी चिकटवूं नकोस माझ्या अंगाला. अन्‌ तूं एवढा सोवळा 
बामण जोशा, तुला रे काय आभच्या जिमखान्याची माहिती १ ? 

८: काल आलां होतो. अभ्यासाची चौकशी करायला. तेव्हां याच डाळां 
पाहून घेतलं सगळे. डायरेक्ट आन्झव्हेंदान्‌ ?? 

५६ म्हणजे माझं निमित्त करून तुलाच जिमखान्यांत जायचं आहे असं 
सरळ सांग की. अन्‌ कालेजांत नांब न घालतांच हे धंदे आतां करायला 
लागलास होय जोशा १ 

५६ घुंदे करणं हें दोठ लोकांचं काम. त्याच्यासाठी साधे किंबा प्रायश्चित्ताचे 
मुहूते सांगणं हें माझ्यासारख्या जोशाचं काम-- ? 

६ पण मग - इथं काय उगीचच माद्या मारीत बसायचं १ 


12 


११० लवणाची मासोळी 

“ माझया कशाला मारतोस ? पंधरा मिनिटांनी तास सुरू होईल. जा 
कीं तूं तासाला. मी इथं वाचीत बसतो कार्हीतरी; नाहींतर देतो. ताणून 
आरामात. ” 

“: काय॒वाचणार आहेस १ इंग्रजीचे पुस्तक देऊं ? मर्चेटे आफ्‌ 
व्हेनिस १ ? 

:£६ अ? नको. आता अभ्यासाकडे लक्ष लागणार आहे थोडंच ! 
मासिक -- बिसिक दे असल तर चाळायला, 

“ ती बघ टेबलावर ' चित्रा ? अन्‌ * फिल्म इंडिया ? पडली आहेत. बैस 
घेऊन त्याना. त्यातल्या नट्याशी गुलगुळ गोषी करीत. ? 

“६ लका, तसली *' प्यारी मोहब्बत ? करायला तुझी शिकवणी ठेवली 
ळारगेळ कांत्या. पण तूं तर तासाला निघालास. 

“ वाह्यात्‌ झालायस्‌ पुण्यात राहून - उगीच नार्ही त्राप्या सांगत. काय 
हव तै कर जा. ” 

>< >< >< 

बापू इनामदाराच्या खोलीत रात्री नऊच्या सुमाराला कातिळाळ आणि 
बापू कंटाळवाणे चेहेरे करून बसले होते. पीघातल्या थंडीच्या कडाक्यामुळं 
त्यासी खोलीचं दार बंद करून टाकलं असलं तरी त्याची नजर दारावरच 
खिळली होता अन्‌ थोडासाही आवाज आला तरी ते उत्सुकतेन डोळे 
विस्फकारीत होते. रघूचा अजून पत्ता नव्हता. अन्‌ तो आल्याशिवाय त्याच्या 
अभ्यासाची त्रैठक सुरू होत नव्हती. 

“* ह्या जोशाचा अभ्यासाला उपयोग होईल म्हणून ह्याच्या म्हणण्याप्रमाणं 
मी होस्टेलात रहायचं सोडून गांवात मुक्काम ठोकला - पण हा बाबा कर्धी 
म्हणून वेळेवर इथं यायचा नाहीं. अजून दुसरा अंक संपला नाही - अन्‌ 
नाटक तरी कसलं काढलंय रूक्ष आणि हाणामारीचं - म्हणे वणीसंह्वार. ? 
कांतिलालनं सुरुवात केली. 

: तूं कांही म्हण कांत्या, हा रघ्या पहिल्यापासने जिलंद्र - त्याच्यावर 
विश्वास म्हणून टाकायची सोय नार्ही. पुण्यासनं आल्यापासून तर फारच पुढं 
गेलाय, वाटल होतं इंटरळा गचकल्यावर ताळ्यावर येईल. पण नाहीं, भटाचा 
विश्वास घरण्यांत अथे नाही -- /? 


छवबणाची मासोळी १११ 

“६ हं मात्र कांहींतरी चिकटवतोयस तूं इनामदार - तुझ्या डोक्यातलं 
अजून तं गावाकडचं भांडण गेलेलं दिसत नाहीं. जोशा मात्र सगळं विसरून 
वागताय. तूं नाहीं त्या बाबतीत त्याला बोल लावू नकास-- ? 

: माझ्या मनात ते कांदीसुद्धां नव्हत. माझं म्हणण एवढंच, कीं हा रव्या 
सरळ असता तर एकदा मिळून अभ्यास करायचा ठरल्यावर यानं वेळेवर 
जायला नको का १ यांचा काही तरी डाव असला पाहिजे, ? 

“६ डाव कसला आला आहे ? गेला असेल करें तरी तंद्रींत भरकटत. त्याला 
यी सवयच आहे अन्‌ परीक्षेची भीति पग नाहीं. ? 


: अरे छोड यार ! परीक्षेची भाति नाही. आता त्या बाता सोडा. 
शाळेंतळी स्कालळरगिरी काळेजात टिकत नाहीं. त्यानंही खाललाय्‌ टप्पू चागलाच 
मागल्या वर्षी, आता त्याच्या-आपल्यात काही फरक नाहीं.” 

“: फरक नाहीं तर तोंड वाकडं करून का बसलायूस १-तूंच साग की 
संस्कृत त्याच्या एवजी - अन्‌ खोलीत कोंडून कशाला घेतोस १ त्याच्या - 
सारखा भटकत रहा की दोन दोन तास, ? 

“६ त्यात काय विदोप आहे १ आपण म्हटलं नव्हतं त्याला, की तुझ्याजवळ 
सायकल नाहीं तर आम्हीच येऊं हबं तर तुझ्या खोळीवर अभ्यासाला, पण 
त्याला काही ता तबार झाला नाही. लेकाचा खोलीवर तर कर्धी बोलवीत 
नाहींच, पण आपण होऊन येऊं म्हटलं तर काहीतरी निमित्त काढून आपणच 
आमच्याबरोबर चाळू लागतो. त्याच फिरायच वेडसुद्धा पांघरलेलं आहे--- ?? 

“६ छुटू, त्याची फिरायची संवय तर हायस्कूलपासूनची आहे अन्‌ खोलीला 
तो काय करणार ? वाड्याच्या मालकानं त्याला कालेजर्ची पोरं गोळा करायची 
नाहीं अल्ली अटच घातली खोली देतांना. ? 


५ जाऊं दे कांत्या. तूं म्हणतोस तसं कां होईना. आपल्याला काय 
करायचे आहे त्याच्या बाकीच्या गोष्टींशी - पण हा महाभाग यगार तरी 
केव्हा १ - थोडंसं संस्कृत येतंय्‌ म्हणून इंग्लंडच्या बादशहाचा भाव खातोय 

५६ इंग्लंडच्या बादशाहाची का रे आठवण झाली तुळा बापू £ ” खूनं 
दार उघडून आंत येतां येता विचारलं, 


११२ लवणाची मासोळी 

“६ या, या महाराज - आत्ता उगबलात होय ! तुझ्याबद्दलच बोलत होतो 
आम्ही - अगर्दी दांभर वर्षे आयुष्य आहे रघ्य़ा, तुला. ” 

*: ए बाप्या, असला भयंकर आशीवाद दिलास तर त्याच परिणाम तुल्म 
अन्‌ कात्याला - दोघानाही भोगावे लागतीळ बर का 

: कां रे ? चागलं म्हटल-- 

'। हो ! तोंडानं म्हणायला काय होतंय लेको तम्हाला, दांभर वर्षाचं आयुष्य: 
देऊन मोकळे व्हाल तुम्ही. चागला आशीवोद दिला म्हणून वर छाती फुगवून 
ऐंटीनं मिरवाल - पण तें निस्तरावं लागेल मला. तेव्हा मी रे काय करायचे ?? 

: कां ? एवढे क्रसले संकट पडलय १? 

६: संकट १ तुम्हा दोट-इनामदारांना काय बाबा ? डांभराच्या आयुष्यात 
व्यानाचा एकोत्रा मिळवायला हवा होता म्हणाल - पण मी शांभर वर्षे 
जगायचं म्हणजे तुम्हां दोघानाही मला दत्तक घेऊन सारी इस्टेट नांवावर 
करून द्यावी लागेल. 

: झले बहाद्दर ! आज्लीबीद दिला तर वर इस्टेट नावावर करून मागतोस 
अगदीं सरळ भटाला दिळी ओसरी अन्‌ - पण जाऊं दे ? रघ्या, लेका उशीर 
तरी किती करायचा ? का संस्कृत सांगायच म्हणून अगदीं शास्त्री-पंडिताचा 
भाव खातोस ? घड्याळांत बघ तरी एकदां -- ” 

“ साडेनऊसुद्धा झाले नाहींत अजून !' कुठं झालायू फार उशीर १ ? 

“६ हु आणस्री वर ! आता अभ्यास किती होणार १ साडेदहा शाले की 
अर्धी ओळ तशींच सोडून पुस्तक मिट्टून टाकतोस. वगोतले प्राफसरसुद्धा 
घंटा झाल्यावर वाक्य पुरं केल्याशिवाय तास सोडीत नाहींत कर्धी, पण, 
तूं मात्र --- ?? 

५६ झी प्रोफेसर झाल्यावर तसं मुळींच करणार नाही. मग तर झालं १? ?? 

:। छान ! आज वेळ कां झाला तेवढं मात्र अजून सांगितलं नाहींस - 
मुद्दा डावठून बेळ काढण्यात आतांच प्रांफेसर ज्ञालायत्‌, पण अशानं अभ्यास 
कसा व्हायचा महाराज ? ?? 

“६: होईल रे. तो काय आपल्या आधीं जन्मलाय्‌ थोडाच ? -मागल्या वर्षी 
तर पुस्तक नेमलं १ ?? 


लवणाची मासोळी ११२ 
वड कव तिल न 

“: अरे पण गरृहूस्था, तूं हातास तरी कुठं इतका वेळ £ ” 

६ कुठं होतो म्हणजे ? खोलीतच होतां - हरवलो. नव्हता. काही. पण 
फिरायला गेला होतो तिथे गप्पा मारल्या खूप वेळ, मग घरीं येऊन आमच्या 
अन्नपूर्णेची आराधना केली अन्‌ हातावर पाणी पडल्याबरोबर इकडे आलो.” 

“ तुझ्याशी ह्या दिवसांत खूप वेळ गप्पा मारणारा एबदा कोण भेटला, 
महापुरुष £ ? 

“६८ महा-पुरुष नव्ह्ता. महा-स्त्री म्हण हवं तर. ?? 

६६ म्हृणजे आतां ह्याही लफड्यांत पडलास का ? कोण होती रे १? आणि 
हली तुझे उद्योग तरी काय चाललेत; ?' 


:६ घा ! अगर्दी खरोखर दत्तक घेणार असल्यासारखी चौकशी चालवलीसे 
की. पण करतां काय ? उत्तरं दिलींच पाहिजेत, नाहीं तर “ चान्स ? जायचा. 
उद्योग नेहमीप्रमाणं; किरणे, गप्पा मारणे आणि इटरचा अभ्यास करणें. 
ल्फर्डी नाहीत - अन्‌ गप्पा मारायला भेटली होती ती बापट - अः'मच्या 
जुन्या कम्पनियनूपी बहीण. ? 

५६ बघ्रापट भेटली होती म्हणजे तुला दिवस पालटळा तरी कळायचं नाही 
विचारण्यात अर्थच नाहीं, इतक्या लवकर आलास कसा असंच विचारलं. 
पाहिज---?? 

५६ अगर्दी बरोजर बाप्या. तिच्या संस्कृतच्या दोका तुझ्यापेक्षाही आधिक 
असतात, त्याला मी काय करूं £ अन्‌ तुमच्यासारखा दररोजचा रतीन नसतो 
म्हणून गाठ पडली की पिळून काढते ती - पण आज तिथ्यापेक्षांही अननपूर्णनं, 
वेळ जास्त घेतला, ?? 

“: या दिवसात तिची रे मिजास कशाला ठेवतोस इतकी १ नसली वेळेवर 
जेवायला घालीत तर बदळून टाक---? 

“६ तेवढ्यासाठींच महाराज तुम्हाला म्हणता, निदान मुदत-दत्तक तरी 
घ्या - आमच्या अन्नपूर्णा असाच वेळ लागायचा, दुसरी सोय कांही माझ्या 
हातनं व्हायची नाहीं. 

“: जरा सरळ सांगितलंस तर---? 

ल. मा...८ 


११४ लवणाची मासोळी 

५६६: सरळ सांगता. माझी दोगडीची आराधना अन्‌ त्यासाठी करावी 
लागणारी पहाटेची उस्तवारी, याची सोय केलीत तर लवकर येईन किंबा जास्त 
वेळ थाबान माझं काय, उलट अरंच होईल. 

“: उलट ब्यरंच ! आता सांगतोस होय £ आम्ही समजत होतों तुझी अन्नपूर्णा 
म्हणजे असेल कुटली तरी खानावळ. आर्धी सागीतळ असतस तर इतके दिवस 
कयाला फुकट गेले असते. हा इनामदार महागऱ्या गुजराथी खानावळीत पंधरा 
रुपये भरतो अन्‌ एक पुरी मोडून दान घास भात चिवडून परत येतो. तो सरळ 
खोलीवर डत्रा मागवील. काय रे?” 

“८ मीं कधी नाहीं म्हटल होतं त्याला -- ” 

“ घरं झालं काँ. उद्यापासून माझीही अन्नपूर्णची शागिर्दी बंदू, उगीच 
बाईचा बडेजाव नको! ” 

“६: हूं सगळं झालं. पण जोशीबुवा आज कारही अभ्यासाला हात लावायचाय्‌ 
का नाहीं--? 

“£ आतां पावणेदहा वाजून गेलेत, आतां कसला अभ्यास होतोय , कांत्या 
आजचा दिवस भुताला, 

६ महणजे तुलाच ना बाप्या १ ) 

५६६: मुला कशाला ? सगळें तुझंच आख्यान चाललं होत आज ख्या, ? 

“< मझाडूं नका रे. दोघंही भुतं व्हा. चला आतां, डिस्पर्स-- 

$६ वा ! बा ! शेठ, आम्हाला एवीतेवी भुत ठरबलंच तुम्ही. तर आतां 
तुमची सुटका तशी व्हायची नाही. ही. भुते मानगुटीला बसणारी आहेत 
म्हटलं, अस्सल .सातारा जिल्ह्यातली. 

६ कां रे बाबांनो ! मी काय केलंय तुमचं ! ज्याचं करावं भलं --? 

५ हो हो. हृलवायाच्या घरावर - नव्हे, इनामदाराच्या डब्यावर तुळशी- 
सत्र ठेवून मोकळा झालास तूं कांत्या; पण मोही कच्च्या गुरूचा चेला नाहीं. 
तुंलो मोकळा सोडणार नाही आज. ? 

५ अरे पण ही दोघाची दोन बाजूनं दमदाटी कशासाठी ? ? 

“* सांगता वाटेनं - मुकाट्यानं चल आमच्याञजरोबर, आज या रव्याची नवी 
सोय केलीस तूं. तर त्याबद्दल सेलेबेट्‌ करायला नको का? ? 


लवणाची मासोळी ११५ 

“८ आत्तां ! दहावाजायच्या वेळेला ! काय खुळबिळ लागलंय का १ * 

“ हूं बघ, आम्हांला असं वेडं ठरवून कितीही राजेंद्राचा आव आणलास 
तरी आतां सुटका नाहीं. मुकाट्याने चल--- ? 

ते तिघेही घाईघाईने बाहेर पडले. तेवढ्यांत बापू कपडे करीत असतांना 
रघूनं त्याला दटावळच. “' बाप्या, तुला स्वेटर अन्‌ वूलनचा कोट दोन्ही 
कशाला हवेत रे ! एक कांही तरी मळा दे. मीच एकटा तेवढा थंडीनं कुड- 
कुटे होय.” वाटेतल्या हॉटेलांत कॉफीचा कार्यक्रम उरकून, तोंडांत मसाल्याचं 
पान भरून घाईघाईनं ते सिनेमाच्या थेटरापार्शी आले. खेळ सुरू व्हायला 
अर्धे मिनिटसुद्धां बाकी नव्हतं. 

मिळाली तीं स्टारची तिकीटं घेऊन, अंधार दाखवणाऱ्या बॅटरीला शिव्या 
देत त्यांनीं एकदांच्या रिकाम्या खुच्या गांठल्या. “ ब्रह्मचारी ? बोलपट सुरू 
होता. बोलपट सुरू होत असतांनाच कोत्यानं अन्‌ रघून जणू एक साथीनं 
एकमेकाच्या मांडीवर थाप मारली अन्‌ गुणगुणायला सुरुवात केळी, “* यमुना 
जळिं खेळूं खेळ कन्हय्या - का लाजतां १ 

सिनेमा संपल्यावर तिघेही बोलत बोलत राजवाड्याच्या चौकांत आले. 
रघूनं कात्याची मागची हकीकत सांगून थट्टा करायला सुरुवात केली, “' बघ 
दोठ, होस्टेळमध राहिला असतास तर आज घरी जायला निमित्त नसतं 
मिळालं, आज कसं आपोआप जमलं कीं नाह्ीं--- ? 

५६६ माझं ठीक आहे रे. आज हाल आहेत इनामदार लोकांचे, पडेल रात्र- 
भर तळमळत आपल्या खोलींत. ?? 

५: कांत्या, अगर्दी फसलास तूं. रघ्याचा बाण फुकट गेला. त्याला वाटलं 
होतं तुझी थट्टा केली म्हणजे तूं नेमका परत अहेर करशील. पण, उगी हृ 
रघू बाळ; मळा आठवण आहे हं - आज तूं फिरायला गेला होतास तेव्हां 
तुला कोण भेटलं होतं त्याची -- ?' 

:: अरेच्या | मी विसरला होता. काय जोशी, यमुना जळी--?? 


“ अरे चल | पाण्यांत पोहून कोरडं रहायची करामत मला येते हॅ कुठं 
तुम्हांला ठाऊक आहे--- ” 


६ पार थापा./ 


११६ लबणाची मासोळी 

६६ असं वेडबाकड बोलूं नका सकाळच्या प्रहरी - इंग्रजी पद्धतीन आता 
नवा दिवस सुरू झालाय्‌ - भारामात झोप काढूं या.?' 

“: अच्छा | - बाय, बाय.” 

>< >< >< 

“६: आज कुणीकडे दिवस उगवला ते॑बघायळा हवं होतं बुवा ! झाली 
म्हणायची सवड एकदाची आमच्याकडे यायला १ ? चंदू बापटानं हसत 
हसत रघूच्या पाठीवर थाप मारळी अन्‌ थोड्या दूरच्या खुर्चीवर बसायला 
निघाला असताना त्याला आपल्या दोजारी काचावर बसवल ? 

“: सवड काय, हवी तितकी असते. जूनियरच्या वर्षोत कसली आली 
आहे गडबड £ पण म्हटलं तुम्हीच आतां मोठे लोक झालात - आधीं नुसते 
बंगलेवाले होतात, ते आता गुरुवर्य होऊन कालेजांतल्या मोठेपणाची भर पडली 
ना? खून उलट आहेर केला. 

५८ हू तोडदेखलं बोलायचं सोडून दे आतां. मी रे कशानं मोठा झालां १ 
कॉलेजातळा डेमानस्टेटर म्हणजे कोणत्या झाडाचा पाला ! खरं मोठेपण' 
तुझंच जोशी--- ?” 

“वा! वा ! आतां काय पूर्वासारखं नुसतं चंदू राहो पण बापट 
म्हणन तरी भागणार आहे ! आता “ सर की लागु झाली तुमची अन्‌ त्यातून 
हे पुणं नव्हे - इथं स्टाफच्या खालींत बसणारा प्रत्येकजण साहेब---? 

५६ ते मळा ठाऊक नाहीं. पण जोशी तूं मात्र कहर केलास यंदां - नाव 
घातल्या घातल्याच सारी मंडळं अन्‌ असोसिएशन्स सरळ खिश्यांत घातलीस - 
तूं आतां सेक्रेटरी तरी किती ठिकाणचा झालाहेस अन्‌ आणखी होणार 
आहेस १ ? 

: त्याच्याबद्दल माझा कांही उद्गार झाला वाटतं तुमच्या स्टाफ्रूममध्ये १ 
हो, तेवढ्यावरनं ब्लक्‌ लिस्टात नाव जायला नको, ?? 

६ बलक लिस्ट कसलं आलंय रे |! पण आपली चर्चा झाली होती. हा 
जोशी कोण मधेच उपटला धूमकेतुसारखा प्रत्येक ठिकाणी --- ? 

: त्याला मी काय करू ! डिबेटिंगला कुणी उभंच रहात नव्हतं म्हणून 
नुसतं नांव दिलं अन्‌ फुकटांत निवडून आलां. संस्कृत आनरस घेणारा दुसरा 


वणाची मासोळी ११७ 
महाभाग नव्हता म्हणून संस्कृत असोशिएशन माझ्या गळ्यांत पडली. आणि 
सगळ्यात कहर झाला तो सातारा संघाचा |! ” 

:£६: आतां साग वाटेल तें बनवून |! ” 

६ बुनवत नाहीं, खरच सांगतां बापट, सातारा संघाची शिल्लक कुजत 
पडली आहे फार वर्षे असं प्राफेसरांनी सांगितलं अन ओढून ताणून सात 
विद्याथ्यीची सभा बोलावली, खरं म्हणजे आमचा इनामदारच संघाचा 
सेक्रेटरी व्हायचा, पण आर्थी वगाचे प्रतिनिधि घेतले, त्यांत तो अन्‌ इतर पांच 
गुंतले, शेवटी उरलो मो. एकटा म्हणून सेक्रेटरी झालो -- ? 

“: काहीं कां असेना, यंदां तुझे ग्रह जोरात आहेत. मजा आहे झालं. ?? 

“६: मजा तर आहेच. आपला सावंताशीं झालेला वाद आठवतो १-- 
त्यातल काहीं अनुभव इथंदी येणार असं वाटायला लागल्य 

: का १ इतक्यांतच तुला कुणा ब्लेझरचं कापड दाखवलं काय! ” 

“६ तिथपर्यंत गती झाली नाहीं अजून. पण एका महिन्यात आलेत ते 
अनुभवसुद्धां कांही कमी महत्त्वाचे नाहींत, त्यात माझीहि सोय-- 

५८ अस्सं | म्हणजे तूंही आतां सोवळा राहिला नाहींस तर ! मग त्यांतली 
मजा कळू दे की-- ?? 


“ छान ! तुम्हाला सगळं सांगून टाकलं म्हणजे झालंच, उद्यां त्टाफरूममर्थ्ये 
तुम्ही लोक माझा उद्धार करा-- 


“ तर तर - तूं अगर्दी साखरेची बाहुळीच पडलास ना ! चल, सांग 
सारं, इथं मी कॉलेजमधला “ डमन्‌' नाहीं. साधा माणूस आहे चंदू 
बापट नावाचा-- ? 

५६ सांगायला माझं काय ब्रिघडतंय म्हणा. लेखी पुरावा असेल तर ना ! 
आमच्या डिब्रेटिंगचा पहिला कार्यक्रम झाल्यावर मी चहाचं बिळु मागायला 
गेला हाटेलच्या भटाकडे, इतक्यांत काय गडबड आहे - उद्यां करूं सवडीनं 
तुम्हांला हवं तसं.' हळूंच सुपारीची पुढी मला देण्याच्या निमित्तान तो तौड' 
वाकवून म्हणाला. दुसऱ्या दिवशी मी बापूला पाठवला तरी त्यानं जिल 
दिलं नादीं. मीच पुनः गेलां तेव्हां त्यानं चागलं दुपटीचं बिळ माझ्या जवळ 


११८ लवणाची मासोळी 
दिळ अन्‌ खरा आंकडा किती तेंही सांगून टाकलं. मग “बिल असं कां १ ' 
म्हटल्यावर भट म्हणाला, 'लायब्ररीच्या कुलकणीसाहेबांनी सांगितलं तसं 
बनवलंय. ते म्हणालेत तुम्हांला सांगीन म्हणून-- 

“: कुलकर्ण्यांनं काय तुला पसैटेज्‌ मागितले कीं काय £ ? 

८ छु | त्याचा आग्रह एवढाच की माझी. जिल इतर सेक्रेंटरींच्यापेक्षा 
वेगळी झाली तर भट चढेल अन्‌ सेक्रेटरीचीही पंचाईत होईल. त्याने मला 
चांगलंच पेंचांत टाकलं ? 

“ तृंकसं १ * 

“ त्या शहाण्यानं लायनरीला म्हणून पुस्तकं घेतलीत त्यांतल्या कमिशनच्या 
ऐवजीं टेक्स्ट बुक आणलींत; अन्‌ मलाही तीं वापरायला देतोय ना तो 
हवी तेव्हां-- ? 

£ म्हणजे आतां * फाटल आफ्‌ अन्‌ एजल'ची कहाणी सुरू झाली म्हणायची, 
पण बेतानं पातकं कर रे बाबा, निदान अंगाशी तरी येऊ देऊं नकोस. ” 

: छट्‌ ! मी पातकं बितकं कांहीं करीत नाहीं. तसला भलताच गैरसमज 
करून घेऊं नका गुरुवये, मी सगळे विषं पचवतोय ---?? 

£: आणखीन पचवायचीही कांही भानगड आहेच का? 

“६ त्यांत भानगड कसली आली आहे ? मागच्या अनुभवानं धडा घेऊन 
मी भटाचं बिल बाबूनं परस्पर आफिसांत देऊन पैसे भटाला द्यावेत असं 
सांगून टाकलंय, माझा संतरंधच सहीच्या बाहर ठेवला नार्ही या साऱ्या 
प्रकरणाशी , 

५६ म्हणजे फुकटांत भटाला दुपटीचा लाभ. 

“ अं हं; तसा भट मोठा प्रामाणिक आहे. त्यानं मला सांगून टाकलंय, 
जोशी साहेब, गावांतनं वेळीं अवेळी यायला लागतं. तेव्हा दुपारचं जेवण, 
चहा याची आबाळ करूं नका. आपल्याकडे करीत चला. तुम्हाला सवलत 
देईन. सालअखेर एकदम बिल द्या. 

£ म्हणजे आतां तुझ्या पोटांतच पाप दडलंय म्हण की. 

५: म्हूणूनच म्हटलं ना, सगळे विष पचवतो आहे मा. ? 


लवणाची मासोळी १'१ ९. 
६ घुचव बाबा पुरतं पचव. पण मला आता झुबांत जायचं. आहे आहेर 
पडणार आहेस का माझ्याबरोबर? *? 
६६ मला थांबावं लागेलसं दिसतंय. तुम्हांला तरी काय़ एवढी घाई आहे!” 


:: माझी टेनिसची वेळ झाली. ?? बोलतां बोलतां चंदूने कपडे बदलले 
होते. “ तुला थाबायचं आहे कशासाठी £-- यमूकडे आला असलास तर 
इतक्यांत उपयोग नाहीं. ती गांबांतल्या होस्टेलमधल्या मुलींबरोबर सिनेमाला 
गेली आहे. 


*: झरेच्चा | म्हणजे मी उगीचच वाट पहात होतों म्हणायचा दुपारी, कॉलेजांत 
सांगायचं जमलं नाहीं त्याचा हा पारिणाम. ?? 

६ त्यामुळं तरी आमच्याकडे आलास ग्रहंस्था |! बैस हवं तर वाचीत इथंच 
ती परत यईपर्येत. नाहीं तरी असा काय उद्योग आहे ! 

£६६ तसच करतो. पण वरच्या खोलीत बसतो. म्हणजे तोपर्यत थोडासा 
अभ्यास तरी होऊन जाईल. * 


चदू निघून गेला आणि रघू सराइताप्रमाणे माडीवर यमूंच्या खोलीत 
जाऊन बसला. तिच्या पुस्तकांच्या रागेंतळीं सारी पुस्तकं एकवार नुसतीच 
धुंडाळून मग त्यानं त्यांतळं ' काव्यप्रकाश्या'चं पुस्तक हाती घेतळ अन्‌ 
खोलीचं दार ढकलून तो तिथल्या आरामखुर्चीबर झग लोटून वाचीत जसला. 
मधेच एकदा अंधार पडल्याची जाणीव झाल्यावर त्यानं दिवा लावला, पण 
तेवढ्यात आपल्याला बाचायचा कंटाळा आलाय असं त्याला वाटलं. म्हणून पुनः 
दिवा बंद करून तो नुसता डाळे मिटून खुर्चीवर पडून राहिला, 


चंदूला आपण जिमखाना-प्रकरणातली बहुतक सवे माहिती देऊन टाकली 
हे बरोबर केळं काँ चूक ? जेवणाच्या प्रकरणात भट मधल्या वेळच्या 
चहापाण्याच पैसे घेणार नाही म्हणत होता. पण त्याऐवजी आपणच पर्यायानं 
एक वेळचं जेवण पदरात पडायची सोय केढी - अर्थात्‌ सारं आडवळणानं 
सुचवीत, निमित्त काढून. पण चुकून भट फुटला किंवा चंदूनं जास्त चौकशी 
केली तर - तर सगळचं रहस्य उघडकीला यायचं. आणि मग |! पण कशाला 
उर्गीच उद्यांची पर्वा १ 


१२० ढवणाची मासोळी 

:६ आतां कशांळा उद्याची बात ५ ५ - कशाला ? कशाला ११ ?' थोडं 
-*मोठ्यानंच पण आपल्याशी गुणगुणत धाडकन्‌ खोलीचं दार उघडून यमू आंत 
आली अन्‌ येतां येतां तिनं गिरकीही घेतली असावी, तिनं बटण दाबून दिवा 
“लावला त्या वेळीं गिरकीच्या झपाट्यानं ओघळून डाव्या हातावर सावरलेला 
'पद्र तसाच अर्धबट स्थितीत होता, दिव्याचं बटण दाबतांना एकदम खुर्ची 
सरकवल्याचा आवाज झाला त्या आवाजानं किंचित्‌ दचकून यमूनं पदराचा 
हात छातीशी घट्ट धरळा, दिव्याच्या उजेडात तिन आरामखुर्चीवर डोळे 
मिटून पडलेला र्रू पाहिला. “ त्याचा खरोखरीच डोळा लागला आहे £ मग 
खुर्ची कशी सरकली ? आपली अस्ताव्यस्त स्थिति पाहून, यानं आधीच खोलींत 
येऊन असण्याची चूक केटी असं वाटून नंतर स्वत ळा सावरून धग्ण्यासाठी 
डोळे मिटून तर घेतले नाहींत ? ? यमूच्या कारही ध्यानांत येईना. या वेळी 
रघू आपल्या खोलीतच काय पण बंगल्याच्या आसपास देखील असेल अशी 
तिची कल्यना नव्हती. अनेक वेळां बोलावून सुद्धा तो आला नव्ह्ता. तसा 
बोलतांना गोड बोलायचा, पण येण्या-जाण्याच्या बात्रतींत सतरा पिंपळा- 
वरचा मुंजा झाला होता. त्याला लबकरच आपण चिडवू-डिंवचून ठेवूं 
अशी समजूत करून घेऊन यमूनं आजच्या कार्यक्रम(त भाग घतला हाता. तो 
रघू अशा अवस्थंत आणि इतक्या लवकर भेटलेला पाहून ती थोडीफार गडबडली. 


:: सिनेमा सुटायला इतका वेळ लागला आज १ ”? खून त्या चमत्कारिक 
शांततेचा कसातरी भंग केला. 


५ कां ! माझी उदढट तपासणी करताय्‌ काय ? पण आर्थी मला हे कळूं 
दे, की मी नसतांना, एकटेच माझ्या खोलींत अंधारांत काय म्हणून बसलात १ 
ही काय रीत साठी £ ?? यमूने एकदम बोलता बोलतां आवाजाची पट्टी बदलली, 


रघूला कळेना, हा यमूचा कोणता * मूड ? आहे. तो तसाच गप्प राहिला 
"अन्‌ मघाशी वेगळ काढून ठेवलेलं * काव्यप्रकाशा चं पुस्तक चाळवलं. 

“कां हो १ आतां कां चोरासारखे गप्प उभे राहिलात ? काय बेत 
होता आज ? आणि हीं माझी पुस्तकंही चाळलींत वाटतं - तीं कश्यासाठी? ? 
अजूनही यमूच्या आवाजांतला राग खराखुरा आहे कीं नुसता अविर्भाव आहे 
याचा रखघूळा उलगडा होईना; पण आतां गप्प असून भागणार नव्हूतं-- 


लछवणाची मासोळी १२१ 
“६ तुमचे बंधु कशांत जाईपयंत खालीच होता. नंतर मात्र उगीच वेळ 
कशाला फुकट घालवायचा म्हणून इथं येऊन ' काव्यप्रकाश ' बाचीत 
बसलो होता. कंटाळा आल्यावर दिवा बंद करून तसाच पडून राहिलो झाले. ?? 
८६ म्हणजे काय ? थांब्रायचंच तर दिवाणखान्यांत कां नाही. थाबलात १ 
इथं येऊन मी एकदम कपडे बदलणार होतें दिवा लावून पहायची बाद्धि झाली 
म्हणून बरं 

“: घर तर; येता मी आतां. आज तुमचा “ मूड ? ठीक दिसत नाही. 
उद्या येईन मी. ” 

८ कुळाला १? काय काम होतं माझ्याकडे £ ? 

“८ आज तुम्हाला सागून कांही उपयोग व्हायचा नाही. उगीच माझे 
काम वाया जायला नको 

“६ नसलं सागायचं तर नका सांगूं, पण असे वेळी वेळी माझ्या 
खोलीत बसलेलं मळा अन्‌ आमच्या बंगल्यांत कुणालाच खपणार नाही.? 

- रघू अधिक न बोलता तिथून बाहेर पडला. बाहेर कुठल्या तरी 

| वि | न ग । 
दुकानांतल्या मोठ्या घड्याळांत खणकन्‌ एकच ठोका पडलेला पाहून त्याने 
तिकडे पाहिलं - साडेआठ वाजून गेले होते. पहिल्या अन्‌ दुसऱ्या कोणत्याच 
खेळाच्या वळाश्ीं न जुळणार यमूचं तं येणं आणि नंतरच वागणं याचा 
विचार मनात येऊन तो चरकला -- आपण कुठल्या मा्गोला लागलां आहोत १ 

' रघूची लहर फिरून त्यानं पुनः तोड बळवलं अन्‌ तो जपूच्या बाजूला 
निघाला. जवळच त्याला बापू दिसला. त्याने बापूला थाबवलं. “' काय सेक्रेटरी 
महाराज, यावेळेला इथे कसे १ ? बापून त्याला खुर्षांत विचारलं. “' तुझ्या- 
कडच निघालो होतो. आज तब्बेत ठीक नाहीं तेव्हां तुझ्या अन्नदात्याकडे चव 
पालटायला याव असा विचार केला. ” खघूनं असं सांगितल्यावर तो अन्‌ बापू 
गांवांतल्या रस्त्याला लागले. जातां जाता बापूनं त्याला ऐकवले --- 

“ रघ्या, आतां उद्लीर खूप झालाय खानावळीत पांचेपर्येत नवाची 
वेळ येईल - अन्‌ मग तिथं काय १? भाताची थंड ढेकळच चिवडायला लागायची. 
त्याच्यापेक्षा दुसरा कांही तरी ब्रेत करूं्या. कुठं जायचं - बोल £ ? 

“: माझं काय ६ मला रुचिपालट हूवा - तूं म्हणशील तिथं मी येईन. 


१२२ लवणाची मासोळी 


“६ ते कळलं रे - पण कुठं जायचं तं ठरवशील की नाहीं १? आज तुला 
म्हणशील तिथं नेऊन गार करून टाकतो, ?? 

“€ भलत्याच खुर्षींत आलेले दिसतात इनामदार आज | पण बापू, इथं 
तूं कितीही उदार झालास तरी करून करून काय करणार ! त्याच 
खानावळी, तेंच अन्न - सगळीकडे ताकभात | पुण्यासारखी “ लकी 'ची सोय 
थोडीच आहे £ - शिवपूर आहे हें बोठून चाळून ! ?' 

६६ मला कुठं तुझी ' लकी न्‌ फिकी ' ठाऊक आहे? इथं काय हबंय तें 
बोल. खानावळीचं नांव काढू नकोस. आतां कुठल्या तरी हॉटेलांत 
जाऊंया- ? 

:६£ चल तर, पोस्टाच्या कोपऱ्यावरच्या नव्या हाटेलांत जाऊन झकास 
आम्लेट न्‌ पाव तरी खाऊया. 

“६ चळ, मजा करायची आहे आज-आजच |! कशाला उद्याची बात १ ?? 

“६ ब्राच्या, सिनेमाला जाऊन आलास वाटतं ! लेका, एकटाच गेलास- 
माझी कांहीं आठवण झाली नाही ना? ” 

“ अं-अं १ तुझी कशाला आठवण करायची बाबा आम्हीं १ - आतां 
तूच आठवड्यांतनं तीन तीन सिनेमा बघत असशील | कधी खास प्रोग्नाम 
ठरवलास तर साग मला - होईल का आमची आठवण १ * 

“८ अशी उडवबाउडबी करू नकोस. साग कीं कोणत्या खेळाला गेला 
होतास ते - ! 

“६ यांत कसली उडवाउडवी ? - गेलां होतो. चारच्या खेळाला, ”? 

£ आजच नेमका चारचा खेळ आठवला ? कां टग्ल बिरलं होत १ *? 

“£ तू काय म्हणतोयस्‌ ते मला कळत नाहीं. ? 

“६ ठेका, आज गांबांतलं होस्टेल सिनेमांत होतं म्हणे, म्हणून विचारलं 
की आजच नेमक कसं ठरवलंस १ ?! 

' तुला वेड लागलंय्‌ रघ्या. गांवांतल्या होस्टेलमधलं 'चिटपाखरूं सुद्धां 
नव्हतं चारच्या खेळाला | वाटेल त्याला विचार. ? 


>< >< >< > 


लवणाची मासोळी १२३ 

८ चेची छुक 'च॑ आधिकृत नामकरण आणि स्थापना झाली ती गेंदरिंगच्या 
वेळेला जेवण संपवून निरनिराळीं टोळकी निवान्त जागा शोधून आपापल्या 
छंदानुसार आराम करायला बसलीं त्यावेळी , पंढरपूरकर जोशी अन्‌ बडवे, बा्शींचा 
कुलकर्णी, बिळासकर पाटील, रघू अन्‌ इतर दोघं-तिघ यामी तिथं बैठक 
माडली. ““ आज सगळ्यांना सेक्रेटरीमह्वाराजांनी पट्टया दिल्या पाहूजेत *? 
बाशींकर कुलकर्णी म्हणाला. “ मग मागवा की -- नको कुणी म्हटलंय.' खूनं 
उत्तर दिलं. तितक्‍्यांत बिळासकर पाटील सरसाबला - “' ए॒ कुलकण्या, हलवा- 
याच्या घरावर तुळशीचं पान ठेवायचं तुझं कामच असलं तरी आज विकतच्या 
पट्टया आणायच्या नाहींत ?' सारेजण बिळासकराकंडे पाहू लागले - तेवळ्यांत 
त्यानं आपल्या वुलनच्या कोटांतळी खुतनीची नबी कारी चंची काढून मधोमध 
टाकली. “' उगीच लेकाच्यानो, काय करावं, कसं कराव - म्हणून बसला 
होतात, ध्या ही चंची अन्‌ खावा तोंडमभर पान. पन बायकी मिठ्ठ मिठ्ठ - 
एवढ एवढ चालायचं नाही. ह॒घसघशीत पान खाऊन पंचमाचा बरार 
मारला पाहिजे. ?' “ बारे पठ्ठे ? म्हणून रघूनं बिळासकर पाटलाच्या पाठीवर 
थाप मारली -- ?? भटा, तूं काय आशीर्वाद येऊन दक्षणा मागायच्या नादांत 
आहेस वाटतं. पर तें जमायच नाहीं हत॑'' तसं नव्हे रे; तुळा पट्ट म्हटलं 
तें उगीच कोरडा आशीवाद द्यायसाठी नाहीं - अगदीं पठ्ठे बरापूरावासारखा 
वळवर उभा राहिलास अन्‌ कसं करायचं काय करायचं त॑ सगळ्यांना 
दाखवलस.?' 

“६ मग त्यांत काय झालं ? त्यो पठ्ठे बापूराव आपल्या भागचाच नाहीं 
कारे भटा, पर तुला त्यो ठावं बरी नसल ” 

“ त्र तर. तुझेहि नांव बापू असलं तरीं पठ्ठे बापूराव तुझ्यापेक्षा मलाच! 
जवळचा आहे बरं कां पाटला --?? 

६ बरं, बरं; भांड्रे नकोस. आपल्या सातारा जिल्ह्यांतलाच आहे तो--” 

“६ हे दोघे सातारकर आतां एक झाले बरं का - आपणही कांद्दीतरी 
केलं पाहिजे.?' पंढरपूरकर जाशी धडव्याला म्हणाला. 

:£: आतां कांहीं करायची वेळ गेळी ग बये.” रघू चेश्ेनं म्हणाला. 

“६६ आमच्या बापूरावानं आघाडी मारळी. आजपासनं आपल्या ग्रुपच' 
नांव ' चंची छुज ? ठरलं बरं का मंडळी. चंची छुबांत सातारा-सालापूर 


१२४ लवणाची मासोळी 
-असली गटबाजी करायची नाही. तर पंढऱ्या तुझा खास पंढरपुरा अंकोळी 
पुडी मिसळून टाक आमच्या सातारी जर्द्यात. ? 

:£ बस्‌. बस्‌. ठरलं - चंची छन शिंदानाद. ?? 

अशा रीतीनं चैची-छुवाची स्थापना झाली असली तरी तो प्रत्यक्षांत खूप 
दिवसांपासून अस्तित्वात होता. त्याचं कारणही साधं होतं, नुसता पास कोर्स 
घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक तास तरी रोजचा मोकळा असायचा अन्‌ आनस- 
कोसवाल्याना सुद्धा मधून मधून अधघले-मधले तास मोकळे सांपडायचे. 
त्याची बैठक कर्धा ना कधी बसूं लागली सक्रटरी झाल्यापासन रघूची अन्‌ या 
लोकांची चांगली पछान झाली होती तोही त्याच्यात मिसळू लागला. 

पंढरपूरकर जोशाचा आपटे म्हणून एक श्रीमत मित्र होता. तो या कंपूंत 
कधी असायचा नाही कारण नसताना च्या झुजराच्या पानावर त्यानं एकदा 
टीका करून या गलिच्छ आणि असस्कृत संवयावर टीका केली. तव्हां पंदरपूर- 
कराला त्याच्या मेत्रीबद्दल धारेवर घरण्यांत आलं. आपट्यांत याही खोड्या 
होत्याच. तो नेहमी आपल्या श्रीमंतीच्या बडेजावांत आणि नटवबेपणांत गुंग 
असायचा. श्रीमंत म्हणूनच तो क्रिकेट खेळायला जायचा. ब्रेटिंग करतांना 
चार चेट्ट सरळ सोडून द्यायचा अन्‌ पांचव्याला धडपडत बट लागलीच तर 
हमखास कच उडायचा. फिल्डिंगला मिड्‌ओफशिवाय दुसरीकडे उभा राहायचा 
नाहीं. वळायचं त्याच्या जिवावर यायचं. बोलण्यांत मात्र कसल्या तरी 
डिफिकल्ट कचच्या आणि संचरी-दाफू-संचर्राच्या गप्पा नेहर्मी यायच्या. 
कुठल्याशा छुबच्या मंचबद्दल बोलल्याशिवाय आपट्याचे क्रिकेट पुराण कर्धी 
संपायचं नाही. पंढरपूरकराला आपट्याच्या या थापेञ्ञाजीबद्दल पुष्कळदा 
कंपूंत तोंड द्यावं लागायच. त्यानं एक-दोनदा ' यंदा तो फार्मात नाहीं. 
म्हणून सारवासारव करायचा प्रयत्न केला, तेव्हां तर त्याची रेबडीच 
उडवण्यात आली. रघूनं तर “' पंढर्‍्या, लेका तूं सुद्धा त्याच्या नादान-- 
वाण नाही तर सगुण लागून - बंडलं मारायळा लागलास. ?' झाल. त्या 
दिवस"यप्सून आपटस्याचे नाव “ बंडल्या ) टरून गेलं अन्‌ त्याला त्याच्या 
नटवेपणाचं पलिस्तर बरोबर बसाव म्हणून ' प्राफेसर बंडले ? झशी दुरुस्ती 
लवकरच करण्यात झाली. 

हळूहळू बंडले प्रकरण जास्तीच चर्चेला यायला लागलं तेव्हां चची- 


लवणाची मासोळी १२५ 
कु्बांत पंढरपूरकर जोशानं त्याबद्दल तक्रार केली. शेवटीं त्याच्यावर तडजोड 
करतां करता अस ठरल कीं, हजर असलेल्यांच्या वमोवर कुणी घाव 
घालायचे नाहींत, पण हं ठरताना ' प्रेझेंट कंपनी एक्सक्ळूडेड > या इंग्रजी 
वचनाचा उच्चार झाला अन्‌ त्याच्यावरनं फाटे फुटले, भिळासकर पाटाल 
म्हणाला, “' म्हणजे हजर असलेल्यानाच तेवढं वगळायचं असंच ना??? 
बाकीच्यानीं गिल्ला करून त्याला सुनावळं, “ काय पाटाळ, अजून तुमच्या 
वावरांत इंग्रजीचं पीक बरोबर उगवत नाहीं वाटतं १ ?? पाटलानं हसत हसत' 
उत्तर दिलं, “ वावरातलं तुमारी काय कळतंया - आमचा असूं द्याच आपला 
माळच कोरडवाद्दू असला तरी बी. पन म्यां विचारलं हातं बादाबद्दल ? 
:: अरे ग्रह्स्था, जरा सरळ कालेजांतल्या मराठींत बोळ की- तुझा तो 
ग्रामोद्ठार मागनं बघू ?” रघूनं त्याला डिवचलं, पंढरपूर-जाशीकरानी ' बरी 
सातारकरांची आपसांत जुंपली ? म्हणून खोटेच गंभीर चेहेरे कले. रघूकडे 
पाहून बिळासकर डोळे मिचकावीत म्हणाला, “' ज्याची खून त्येला मिडली. 
म्हणजे मला अर्स विचारायचं होतं की प्रेझेंट कंपनी एकस्क्ठूडेडमध्ये 
: प्रेझंटस-कंपनी ? हजर असलेल्याची सत्रंध कपनी धरायची की काय १ 
हो-केंपनी म्हटली की दोन यायचेच ! त्यांतल्या दुसऱ्या पार्टीचं काय १ नाहीं- 
तर आम्ही बापटनी कुणाच तरी नाव घ्यावं अन्‌ जोशीबुवान नियम माडला 
म्हणून आमच्यावर चिडावं-- ? 

“ वारे पटे | हा बिळाशीचा माळ चांगला सुपीक आहे की ! अगर्दी 
इरसाल लावणी करायला येतीय्‌ ?' रधूशिबाय बाकीच्यांनी बिळासकर पाट- 
लाला चढवला, 

:: आता बोला की जोशीबुवा. का पांग बिसरलेय्‌ १ ” 

“ अरे इथं पंचांग नाहीं. फक्त उत्तमांग ( बेटरह्ाफ्‌ ). बाशीच्या कुल- 
कण्योने आणखी चिडवलं. 

“: अरे जा, असे पाटील-कुलकण्यानी एक होऊन आमच्यासारख्या 
सामान्य जनतेला जनवायचे दिवस मेले. हा पक्षच चची-क्लगात येत नाही. !? 
स्थूनं कांहींतरी उडवाउडवी केली. 


५ नाहीं. बाकी कुणाच्या कंपनीचा सवाल येत. नाही हं खरं, तसा चंती- 


१२६ लवणाची मासोळी 
क्लब पूर्णपर्णे * ब्रह्मचारी ? आहे. फक्त जोशीबुवाचा अपवाद.?? पंढरपूरकरानं 
भर घातली. 


पंढरपूरकराला कल्पनाही नसेल. पण त्याच्या बोलण्यांतल्या ' ब्रह्मचारी 
या शब्दान आणखी फाटे फुटतील म्हणून रघू मनांतनं गडबडला होता. तो 
म्हणाला, ' आतां नो डिस्कशन ! एकदा ठरल ना-हा प्रश्न चंची-क्लबात येत 
नार्ही म्हणून. ? 

: तर तर - तूं नुसतं बोललास की ठरलं वाटतं. ” 

पण तेवढ्यावर बैठक मोडून रघू उठला देखील. 

त्या वेळीं चर्चा बंद करून रघू उठून गेला तरी आपल्या पाठीमार्ग “या 
जोशाची छपन्न लफडी अन्‌ सत्तावन भानगडी? असं एक-दोघांचं म्हणणं त्यानं 
ओझरतं ऐकलंच. त्यापेक्षाही अधिक म्हणजे इतरांना त्यानं चचा बंद करायला 
लावली असली तरी त्याच्या मनांत दबून राहिलेली शंका त्याला डिवचचूं 
लागली. गावातल्या हास्टेलमधल्या मुलीचे नांव पुढं करून यमूनं खरोखरी 
बापूबरोबरच सिनेमा पाहिला याविषर्यी त्याला संराय नव्हता. त्यामुळे अखेरी 
एक्स्टेंडानमधल्या बगल्याची ओढ दिखाऊ का होईना इनामदारीकडेच आहे 
असा त्याघा पक्का ग्रह झाला होता. अन्‌ एक वेळ कादंभरीतला ' व्हिलन ? 
बनून बापूच्या इनामदारीचा बुडबुडा यमूजवळ फोडावा असाही भेत त्यानं 
केला होता. पण त्यातला कच्चेपणा फार लवकर त्याच्या ध्यानांत आला. 
बापूनं कार्हीच बनवाबनवी केली नव्हती. उलट तो थोडासा हुरळला होता. 
यमूनं मात्र घरच्या माणसाना कळूं नये म्हणून असो, कीं रघूला डिवचण्या- 
साठीं असो, होस्टेळची कहाणी रचली होती आणि नंतर जण कांही झालंच 
नाही अश्या रीतीनं ती रखघू्शी पुनः बोळू लगली होती. त्यामुळे तो अधिकच 
बुचकळ्यात पडला हाता. तशा स्थितींत ' चंची-छुबा !तल्या उल्लेखानं त्याला 
उगीचच डिवचलं. 


---त्यामुळं त्याची पावलं आापोआप त्या दिवर्शी बापटांच्या बंगल्याकडं 
चळलीं. आणि आज तो अशा वेळीं बंगल्यांत पोंचला कीं त्यावेळीं चंदू नेमका 
झभांत गेलेला होता. खूनं मुद्दाम दारावरची धंटा मोठ्यानं वाजवली. 
जिन्यानं यमूच्या खोलीपार्थी पोचल्यावर दारावर चांगला ' टक्‌ टक्‌ ? आवाज 


-लबणाची मासोळी १२७ 
केला, “ कम्‌ इन्‌ ?? शाब्द ऐकल्यावरही थोडा वेळ तो स्वस्थ उभा राहिला 
आणि यमून पुढ होऊन दार उघडल्यावर सावकाश आत जाऊन लाब 
येंबलाजवबळच्या खुर्चीवर बसला - स्वस्थ बसला. चार-पाच मिनिटं तरी 
काय बोलायचं हें त्याचं त्याला समजेना. आपण आज इथ कां आलां हेंही 
त्याला सागता आलं नार्ही. 

“: आज काय मौनाचा वार आहे वाटतं १ माझ्या इथं पाटी-पन्सिलसद्धां 
नाही. ” यमू हसत हसत म्हणाली, 

“८: मी अजून मौन पाळण्याची जरुरी वाटण्याइका मोठाही झालो 
नाही कीं पुढाऱ्याप्रमाणं व्याख्यानं झोडायलाही शिकलां नाहीं, ? 

“: अजून नाही ! म्हणजे पुढ मागं तसा विचार दिसतोय ! हो, तसं 
आर्धीच कळलं म्हृणजे बरं. मोठ्या माणसाच्या आठवणी अन्‌ आख्यायिका 
प्रसिद्ध होतात. त्यासाठीं नोट्स तरी काढून ठेवायला सुरवात करता येईल,? 

“ तवढा तरी मी आठवणींत आहे म्हणायचा ! ?? 

५६ वा ! हं काय भलतंच £! मोठ्या माणसांच्या आठवणी का कधीं 
विसरतात १ पण आपला इतिहासाला धक्का नको म्हणून लेखी नोट्स 
ठेवायच्या. एकीकडून आता सुरुवात झालीच आहे भावती. भगत--गण जमा 
करायळा. कसला क्लब आहे तो १ चंची क्लच नाहींच का! 

“ त्याच्यावर कां आता तुमची संक्रात बळली १ ? 

6 संक्रांत नाही ग बाई. पण आपली एक सचना करू का ! - चंची 
कुब हे नाव कांही तितकसं शोभत नाहीं. आधी मेलं आहे थोडसं चमत्का- 
रिक अन्‌ दिसतं फारच साधं; मोठ्या माणसांचा लौकिक म्हणजे सगळं कसं 
६ अलौकिक ? आणि दिव्य' असायला हृवं.?? 

“: मग तुम्हीं शोधलंय का एखाद १ 

५६६ मी £ मला कसं तं जमेल £ एरवी मी चांगली प्रशस्त असले तरो 
€ तसला ? मोठेपणा कुठं आहे माझ्याजवळ १ आणि अलौकिक नांवं मोठ्या 
माणसांच्या तोंडून अचानक साक्षात्कार होऊन बाहेर पडावी लागतात. एरवी 
आम्हींही आमच्या 'ठेडीज रूम मध्यें भाईलुद्धीनं हवी तितकी नांवं ठेवीत 
असतोच म्हणा ! 


१२८ लवणाची मासोळी 
“ त्यांतलंच एखादे चालूं शकेल - निदान चालतंय का पाहूं तरी १ ” 
५६ झलतंच ! तीं नांव उच्चार्ळी तर मोटं पाप होईल, 
:: हूं तर फारच छान |! असं पाप जगांज वाढल्यादिवाय मोठ्या लोकाना 
मोठेपण दाखवायची संधि मिळेल कशी १ तेव्हां आता घडू द्यात थोडसं 
पाप--- 


“६ तर तर |! उद्यां तेवढंच घेऊन भांडायळा याळ आमच्या 'रूम'वर अन्‌ 
मी गुपित फोडलं म्हणून बाकीच्या माझी चागली करतील. > 

: तशी भीति नका ! मोठी माणस काही भांडत नाहीत-- 

“८ खोटं |! नुसती भांडत नाहींत. चांगटी अढी घरून बसतात. 

५६८ कारणाशिवायच १ ?? 

५: अर्धवट माहितीवर-- 

“- मग आयण तडजोड करूं या. तुम्ही तुमच्या लेडीज रूममध्ये आमच्या 
क्लबचा दाय काय उद्धार करतां ते सागा अन्‌ मीही तुम्हाला क्लब्रमधली 
आजची गंमत सांगतां - तुमच्या बद्दलची. ?? 

“आणि नंतर यमूनं त्याला या चंची कक्‍्लबाला “ कुटाळ कंपू ?? पासून 
: ह्री द्वे ) पर्यंत मिळालेली निरनिराळी नाव आणि ' ब्रिचाऱ्या आपट्यानं 
आनाद्दूतपणें कमावलेली सहानुभूति याच्याबद्दल सागितले अन्‌ रघूनंही तिला 
बिळासकराच्या खवचटपणान दोघाची झालेली चेप्टा ऐकवली. त्या आंघांतच 
त्याला कळून आलं की यमूला कल्यना नसताना बापूने 'माणूस? चित्रपटाची 
दोन तिकिटं कादून तिळा अचानकपणे सिनेमाला बोलावलं होतं. 
तिला बाटले बापू इतक्या धीटपणे बोलावतो तो बरोबर रघू असेल 
म्हणूनच. त्या नादात ती सरळ थेटराकडे गेली, आणि तिथं बापू एकटाच 
पाहून मख्खासारखी अडीच-पावणेतीन तास बसून स्वतःवर चिडून परत 
आली, अचानक रघूला आपल्या खोलींत अंधारांत बसलेला पाहून साऱ्या 
पुरुष जातीबद्दल उसळून तो राग तिनं रघूवर काढला होता--- 


तरुण ल्त्रियांच्या मनाची जवळून आणि सूक्ष्म कल्पना नसलेल्या रघूनं हे 
सार बिनतक्रार मान्य केलं, थेटरवर रघू दिसला नाहीं तेव्हां यमू तिथनंच 


लवणाची मासोळी १२९ 
परत कां फिरली नाहीं अशी दंकासुद्धां त्याला आली नाहीं. उलट नेहमीच्या 
संवयीप्रमाणं. आपणच काहीं तरी नसती कल्पना करून धेऊन डोकं पिकवून 
घेत होता असं स्वतःचं समाधान करीत तो बंगल्यातून बाहेर पडला, 

>< >< >< 


जूनियरच्या व्षीत खूप मजा करायची अश्शी बापूची इच्छा होती. 
नाताळच्या सुटीत चार-पाचजणानीं मिळून विजापूरची ट्रिप काढावी असा अत 
त्यानं आखला होता. पण घरचे अचानक पत्र आल की, यंदा गुऱ्हाळ लवकर 
उरकून सुरवातीचा चढाभाव पदरांत पाडून घ्यायचं ठरलं आहे. अप्पांची 
तब्बेत ठीक नसल्यामुळं गुर्‍्हाळाला यायलाच पाहिजे म्हणून नाताळच्या 
सुटींतच गुर्‍हाळ लावायचं ठरलं आहृ ? या पत्रानं बापू अगदी मटूल होऊन 
गेळा. आपलं खेडवळ जिणं आपल्याला मजा करून देत नाहीं म्हणून त्याला 
फार वाईट वाटलं, खरं म्हणजे त्याचा बेत होता रघूकडून चंदूला भरीला 
घालायचं अन्‌ “स्टाफ मेंबर? बरोबर आहे म्हणून यमू आणि जमल्यास तिची 
एखादी मैत्रीण यांनाही सामील करून ध्यायचं --- 

अखेर विजापूरची ट्रिप रद्द झाली तर झाली; निदान आपल्याला हर्वी ती 
माणसं आपल्या गावीच न्यावीत असा बेत करून बापूनं रघू अन्‌ कांतिलाल 
यांच्या मध्यस्थीनं बापट मंडळींना आपल्या गुऱहाळाचं आमंत्रण दिलं शास्त्राच्या 
ओढीनं चंदू बापट चटकन्‌ तयार झाला--- अन्‌ मग यमूही. 

इनामदाराच्या वाड्यांत आलेल्या या पाहुणीनं गावात बरंच कुतूहल 
निर्माण केलें. “' बापून कांहींतरी परस्पर भानगड करून इनामदाराच नाक 
कापलं अन्‌ हुंडाही गमावला. आता तर भाऊ तिला घेऊन सरळ दम- 
दाटीनं लयन उरकणार आहे; ? अशी गांबात चर्चा चालली होती. तर पाहुणे 
मंडळींच्या गैरहजेरीत अप्पा आणि आत्याबाई * हे काही ठीक लक्षण दिसत 
नाही ? असं म्हणत होते. 

या पाहुण्याच्या येण्यानं सगळ्यांत आनेद झाला होता कमळीला, दाहरां- 
तल्या वातावरणापासून तीन वर्षे वेगळी पडल्यापासून तिला कुणाशी मनमुराद 
बोलायला मिळालंच नव्हतं. बापू तिच्या बाबतीत पुष्कळ निवळला असला 
तरी त्याला ह्वतःला म्हणून तिची ओढ नव्हती, बरोजरीच्या मुलींची किंवा 

ल. मा... ९ 


$$. लवणाची मासोळी 
घ्रायकांची लग्नं, मंगळागौरी अन्‌ डोहाळजेबणं याशिवाय विषयच नसल्या- 
मुळें कुणाकडे बसायला जाणं नको असं तिला होऊन गेलं होतं. 
आत्याबाई-अप्पा तर गळ्याला लागलली कार्टी म्हणून शिडाशेडी करीत--- 
त्यांतून आत्यात्राईंच्या पुतण्याचं स्थळ कमळीनं नाकारल्यापासून ती अगदीच 
भिकार लक्षणाची ठरली होती. एकुण कमळीला मन उघडं करायला मिळालं 
नव्हतं. म्हणून यमू आल्यावर, आपल्या वर्गसोबतिणीची बहीण, आपल्या 
झाळेंतळी एक मुलगी भेटली यानं कमळीला भरत आलं. दोन दिवस 
दोघीर्नी हायस्कुळातल्या आपल्या जुन्या आठवणींना, खास मुलींच्या खोलींत 
चालणाऱ्या थट्टामस्करीला उजाळा दिला, आपल्या बोलण्यात लग्नाचा, पुरुषांचा 
म्हणून विषयसुद्धा येऊं द्यायचा नाहीं असं न ठरवता सुद्धा कितीतरी वेळ 
या विषयांचं आस्तत्व विसरून त्या रमून गेल्या. आणि त्या हितगुजाच्या 
भरात यमू खेड्यात वाटणारा अबघडपण| कारही वेळ विसरून गेली, 

गुऱ्हाळाची नव्हाळी दोन-तीनदा पाहिल्यावर यमू आणि कांतिलाल 
याना त्या चिकचिकींत जाण्याचा कंटाळा आला. त्यानी कमळी-रखघूच्या 
बेताप्रमाणे नदीवर अंघोळीला जायचा कार्यक्रम आखला. पोरं-पोरी एकदम 
अंघोळीला जाणार ही कल्पना अप्पा-आत्याबाईना डोळे मोठे करायला 
पुरेशी होती. पण ही सारीं आतां त्याच्या डोळ्यांत न मावण्याइतकी मोठी 
होऊन बसली होती ! “ शहरचं वारं बरं ह ! म्हणून बोटं मोडीत बसण्यापठीकडे 
त्याना कांही करतां येईना. नदीच्या घाटावरल्या गर्दीत उगीच चपेचा विषय 
व्हायळा नको म्हणून मुद्दाम घाटापासून थोड्या लांबच्या ठिकाणीं ही चौकडी 
गेळी. पण तिथं पोचल्यावर यमूचा उत्साह खलास झाला दोन्ही बाजूंना 
बायका-पुरुषांची सरमिसळ गर्दी असताना अंघोळीला नदींत उतरणं ही 
गोष्ट वाथरूमची दार बंद करून अंगावर पाणी ओतून घ्यायची संवय 
असलेल्या यमूला कशीशीच वाटली, खू, कातिलाळ आणि कमळीसुद्धा 
कमरेइतक्या पाण्यांत पोःचून तिची वाट पाहूं लागले. पण ती बसून राहिली. 
“अजून अंडी गेली नाही अंगांतली - थोडं ऊन खार्ते इथंच”; असं कांहींतरी 
तिनं सांगितल. 

८ येऊं देत सावकास. आपण पोहायला लागूं या ? म्हणून रघूनं प्रथम 
दाण्याखाली सार अंग दडवून अन्‌ नंतर नुसतं डोकें वर काढून हात 


लवणाची मासोळी १३१ 


शाल” क का. का का का ग्वा ७8 क ग्रह ४ का आ जा का का क्ला कका का झा अहा लाय जा झापा शि ्शाा्शा यात्रा शिश ड्या ञा्शाध्ांशाशा झि का का हा कह झे 


मारायला सुरवात केली. तो चार हात पुढं जातांच कमळीन त्याचं अनुकरण 
केलं. दोघंही मागं पाहत नव्हतीं. कांतिळलालनं उगीच दोन पावलं पुढं 
टाकलीं न टाकली असं करून, नाका-कानांत बोटं घालून शास्त्रोक्त बुडी 
मारळी आणि नंतर अंग चोळीत तिथंच उभा राहिला, मध्यावर गेल्यावर 
रघू-कमळींनं पाहिलं कीं आपण दोघेच इतके पुढं आलां. आहोंत. मागं 
वळून पाहिल्यावर त्यांच्या दृष्टीला पडलं -- कांतिलाल जागच्या जागी उभा 
होता अन्‌ यमू अजून ऊन खात होती. इकडे' यमू कातिलालला विचारत 
होती, ' तुम्ही कां गेला नाहींत पोहायला ? ? कांतिलालनं माधम उत्तर दिलं, 
५६ रात्रीच्या शेतातल्या वाऱ्यानं मला सर्दी झाली आहे. अन्‌ इथल्या नदीचा 
मला माहिती पण नाही, ” 

आपण अर्ध्यावरनंच परतावं अश्या विचारांत कमळी होती तंवर रघूनं पुढं 
हात मारायला सुरवात केली. त्याला मागे बळायला सागायसारठी म्हणून 
कमळी पुढं निघाली ती दुसऱ्या काठावर पोचल्यावर थाबळी. रप्‌॒ रप हात 
मारीत रघू बेदरकारपणे पुढं गेला होता. त्याच्याशीं बोलायइतक्या जवळ 
जायची सधि कमळीला पलीकडच्या कांठाला पाय लागेपर्यंत मिळालीच नाही. 
नंतर मात्र ती अगदीं भेंडाळून गेली. तिनं रघूला ते सागितलंसुद्धा. 


पलीकडच्या मळींतल्या विरळ शोवऱ्यांत गेल्यावर रघूनं विसाव्यासाठी नदी- 
कांठचा तांबडमा्तीत चक्क लोळण घेतली अन्‌ तो उताणा पडून राहिला ! 
कमळी संकोचानं पाय मुडपून बसली होती. तिची नजर अलीकडच्या काठावर 
रोखली होती. तिनं पाहिलं तेव्हां कातिलळाल पाण्यांतने वर निघाला होता 
आणि नंतरच यमू घावरत घाबरत एकेक पाऊल टाकीत पाण्यांत उतरली होती. 


रघू मट्रिक झाल्यानंतर कमळीला त्याच्याशीं बोलण्याची जवळ जवळ मुळीच 
संघि मिळाली नव्हती. गेल्या दोन वर्षोत तिच्या दाखवण्याची जी परवड 
झाली होती त्याची रघूला कांहींच कल्पना नव्हती. कमळीला इतकं सांगायचं 
होतं कीं - पण कुठं अन्‌ कशी सुरवात करावी हेंच कळेना ' बरं झालं-- 
पाहुण्यांच्या निमित्तानं तरी गांवची माणसं गांवांत असतात त॑ कळलं ) ती 
कसंतरी बोलून गेली. ' हं | ' एवढंच रघूनं उत्तर दिलं, “' हृछी बापू कर्धी तरी 
आम्ही दोघंच असलां म्हणजे कांही कांहीं सांगतो - त्यावरनं कळतं.!?? कमळीनं 


१२३२२ ळवणांची मासोळी 
पुनः बोलणं उकरून काढलं. “' बापूनं माझी किती बदनामी केळी हे एकदां 
त्याला विचारलच पाहिजे. रघूनं काहीं तरी उत्तर दिलं. 

५: माझ्यापाशी बदनामी करून त्याचं भागायचं नाहीं हे कांही 
सांगायला नको. अन्‌ दृ्छी अप्पा न्‌ आत्याला आम्हीं दोघं बरोबरीनं तोडी 
लावणं झारलोय्‌.?? कमळी अभिमानानं म्हणाली. 

५६६ घण दोघं काय अन्‌ तिघं काय ? हायकोर्टाचा निकाल ठरलेला ---?? 

“: नेहमींप्रमाणं माझ्याविरुद्ध,' आणि मग जुन्या आठवणींनी खदखदून 
तीं दोघही पोटमर हसली अन्‌ त्या भरातच परत निघाली. 

--- इकडे' यमूच्या त्या घाबरत घाबरत पाण्यांत उतरण्याची कातिलालला 
गंमत वाटली अन्‌ तो एकदम म्हणून गेला, “ पुटं जा की थोड्या - इतक्या 
घाबरताय काय ? ? माडीएवढ्या पाण्यांत थाबलेळी यमू एकदम दचकली, 
: हूं काय -- तुम्ही इकडे पाहूं नका ? अस थोडसं रुष्टपणान म्हणत यमूनं 
तिथंच गळ्यापर्यंत बुडी मारली, पाण्यांतल्या पाण्यांत अंगाला साबण लाव- 
तांना आणि आपल्याकडे कोणी पाहत तर तार्ही ना हे हेरण्यासाठीं चोहीकडे 
नजर फिरवताना ती अगर्दी कावरी-बावरी झाली, अंघोळ आवरून कांठावर 
परत येण्यासाठी ती उभी राहिली तेव्हां तिन दुसऱ्या काठाकडे पाहिलं. रघू 
अन्‌ कमळी जवळ जवळ मध्यावर आठी होती. त्याची डोकी तेवर्ढी बर दिसत 
होतीं. पण इतक्या लांबून पाहतांना तीं इतकों जवळ जवळ दिसली कीं यमूचं 
अंग शहारलं. डोकी इतक्या जवळ आहेत तर पाण्यांत काय अंगाला अंग 
खेटून पोहताहेत ! --तिला हे सारं विचित्र वाटलं, खेडेगांबातला हा 
अवखळपणा फारच चमत्कारिक म्हणायचा | 


ऱ्य 


जसजशी रघू अन्‌ कमळी जवळ येऊं लागलीं, तसं कुठ यमूच्या ध्यानात 
आलं कीं तीं दोघं पोहतांना एका रत असलीं तरी त्याचं पोहणं माग पुढं 
होतं अन्‌ दोघं चांगली सात-आठ हातांचं अंतर ठेवून पोहत होती. पण 
हं अंतर पहिल्यापासूनचं कीं कांठाजवळ यायला लागल्यावर मुद्दाम पाडलेल, 
ही दका तिला टोचत राहिलीच. 

कपडे बदलतांना आपली झालेली धांदल आठवून यमू कमळीकडे निरखून 
पाहूं लागली. पण पाण्यांतून पुरती बाहेर न येतांच काठच्या दगडावर उभी 


सूबणाची मासोळी १२३ 
राहून बाकीच्या जगाची दखल न घेतां कमळीनं साडी-चोळी बदललेली पाहून 
तिला आश्चर्य वाटल, घरी गेल्यावर तिने कमळीला याबद्दल विचारलंतुद्धा. 
पण कमळीच्या उत्तरानं तिळा भघिकच बुचकळ्यात पाडलं - कमळी म्हणाली, 
५६ अग मी एकटीच का नदीवर अंग धुगारी असते. इतक्या सगळ्या बायकांत 
माझ्याकडेच तेवढं कुणी निरखून पाहत असेल अशी समजूत मी कशाला 
करून घेऊ £ आम्हाला लहानपणापासून सवय असते. अन्‌ दुसर म्हणजे अशा 
संकोचानं अन्‌ लाजेने घरात अग धुवायच तर अध्या घागरींत कावळ्यासारखं 
खुडखुडायला पाहिजे अन्‌ तंसुद्धां स्वतःच्या कमरेवर घागर घेऊन नदीच्या 
या चढासने पाणी नेल्यावर - त्यापेक्षा हं बरं. ?? 

£ म्हणजे काय सगळ्या घरच्या बायकांना कडेवरने पाणी न्यावं लागतं ! 
हा जु2मच आहे म्हणायचा ! ?' 

५: अग बायकार्नी कडेवरनं नेळं काय अन्‌ पुरुषांनी खाद्यावरनं नेलं 
काय ! पाणी भरायचे काम हें कुणी तरी केलंच पाहिजे. त्याला जुलूम म्हणून 
तें थाबणार आहे थोडंच. ! 

“: त्यापेक्षा बोरिंग - निदान आड काढावेत. 

“६ माझ्यापाशी बोललीस तेवढं बोललीस यमू. बाकी कुणाजवळ बोललीस 
तर सारीजण हसतील तुला. अग कृष्णेचे वाहतं पाणी सोडन आडांतलं 
सांठवणीचं अन्‌ खारट तुरट पाणी हृबंय कुगाला ? आणि त्यासाठी मुद्दाम 
हजार-दीडहजार रुपये ख्चोयची एंयत तरी कुणाची आहे खेडेगावांत.?? 

“ तुम्हाला काय कमी आहे ! गुळाचे एवढे पेसे येतील, त्यातून एक 
वर्षी काढावा आड' नाहीं तर बोरिंग-- 

:: आम्हाला अजूनपर्यंत तरी त्याची कर्धी गरज पडली नार्ही.” कांही 
तरी बोलायचं म्हणून कमळी म्हणाली अन्‌ तं हसण्यावारी नेतां यावं म्हणून 
पुढं यमूकडं निरखून पाहत तिनं भर घातली, “' आतां आमची वबहिनीच 
आणली बापून शहरांतळी - नदीच्या पाण्याची संवय नसलेली - तर कदाचितू 
या वाटेला जावं लागेल ह मी बापूला सांगून ठेवीन, '? कमळीच्या बोलण्या- 
पेक्षां तिच्या पाहण्यानं यमूला कुठून हा विषय काढला असं होऊन तिनं 
दुसरा विषय काढला अन्‌ आपल्याला कमळीच्या त्या बोलण्याशी काही कतेव्य 
नाही हृ सुचवलं 


१३४ ढवणाची मासोळी 

आंघोळीसनं परत निघायच्या वेळेलासुद्धां यमूळा धक्का बसला होता. 

“ हू काय ? अशा उन्हातनं तूं अनवाणी का चालणार कमल १ चपला 
आणायच्या नाहींस का £१ ?? यमूने विचारल होतं. 

“६ वा | चपला घाळून पाण्याची ही कळशी घरांत कशी चालेल १ * 

:: अग पण हं असलं ऊन, हे वाळूचे खडे अन्‌ पलीकडची रेती-- 
पायाचे काय होईल त्या १ ? 

त्याना रोजचंच आहे हें. इतकं हळूबाई होऊन चालत नाही इथं---? 

त्या वेळीं रघू त्याच्यातून फुटून कव्हांच आपल्या देवळाच्या वाटेला 
लागला होता. कांतिळाळला नाइलाजानं का होईना अंतर ठेवून चालावं लागत 
होतं. त्या दोघींच्या बोलण्यातसुद्धा नदीची चढण लागल्यावर खंड पडला. 
कळशी कमळीच्या कडेवर होती पण घाप यमूला लागली होती. वाड्यात 
पोचल्यावर, माडीवर जाऊन तिनं चक्क अंग टाकून दिलं अन्‌ ती कमळीला 
म्हणाली, “ पुरे बाई, तुमचं नदीचं सुख. पुनः काहीं मी नांब काढायची 
नाही. ? 

> >९ >< 

दुसऱ्या दिवर्शींच यमूने परतायची घाई सुरू केळी. आता तिचे मन 
खेडेगांवात रमेनास झालं, कमळीन खूप आग्रह केला. सुट्टी संपेपर्यंत रहायचा 
कार्यक्रम ठरला आहे असं कांतिलालनं सांगितलं. चंदू आपण होऊन 
: आणखी थोडे राहूं या ? म्हणाला. पण यमूचा हृद्ट कायम होता. ' तुम्ही 
कोणीच येणार नसाल तर मी एकटी जाईन. मला स्टेशनची वाट सापडेल 
असंसुद्धां ती म्हणाली, “ पण आमच्या यथून तुम्हाला एकटं जाऊन देणार 
नाहींत. *? बापूनं ठेवणीतली अडचण सांगितली. तव्हा, “ जोशाचे कांहीं 
गुऱ्हाळ नाहीं. ते येतील माझ्यासोबत ?? असं यमूनं उत्तर दिल अन्‌ त्या 
दिवर्शी संध्याकाळी रघूची गांठ पडल्यावर त्याला ' उद्यां निघायचं ? हा बेत 
सांगून पक्कादेखील केला --- 

कृप्णेभटजीना रघूच्या बेताची काही. कल्पना नव्हती. इनामदारांच्या 
मंडळींत तो मिसळतो हं ठाऊक असलं, तरी ते सारं , हु; -- 7. आणि 
तेवढ्यापुरतंच म्हणून भटजी खपवून घेत होते. पण सुट्टी संपायला चार दिवस 


लबणाची मासोळी १३५ 
आअवकाद असतांनाच परत जायचा त्याचा बेत काही. भटजाना आवडला 
नाहीं. त्यानी बाळाकडून रघूला सुट्टी संपेपर्यंत रह्दायला सागून पाहिलं. खूमं 
तें ऐकल्यावरह्दि आपली तयारी चाळू ठेवली. “' परीक्षेचा अभ्यास राहिलाय. 
येणारच नव्ह्ता पण पाहुण्यांच्यासाठी याव लागलं---२? असं काही तरी तो 
दारांतून बाहेर पडतां पडतां उच्चारून गेला. 

तेवढ्यांतल्या तेवढ्यात इनामदारांची पाहुणी जायची म्हणून आत्याबाईनी 
आग्रह करून बैलगाडीची व्यवस्था केली. “' यायच्या वेळेला बापूनं बैजवार 
कळवळ असतं तर गाडी पाठवली असती -- पण त्याला सुमारच नाहीं. ही 
बापूची संभावनाही पाहुण्यांच्यासमोर झाली. गाडीत बसून जाताना पादीतल्या 
देकळावरनं गाडीला जे हादरे बसत होते त्यानी यमू खिळखिळी झाली; आणि 
निदान येतांना तरी गाडीचा सरजाम नव्हता म्हणून तिनं मनातल्या मनात 
बापूचे आभार मानले. गाडीच्या हिसक्यानं ती एकदोनदा कोलमडायलासुद्धा 
लागली होती -- रघूनं दंडाला घरून सावरलं म्हणून डोक्याला टंगूळ यायचे 
राहिलं एवढंच. प्रथम तिला रघूच्या त्या वागण्याचा अचंब्रा वाटला होता; पण 
पुढच्या संकटाची कल्पना आल्यावर ती थंड झाली आणि गाडीला निदार्नी 
घोंगडीचं झाकण आहे हें पाहून त्या भकास रस्त्यावरसुद्धा वाटणारा तिचा 
सकोाच पुष्कळ कमी झाला. तरी ती कांही बोल्ली नाहीं. स्टेशनावरनं 
गाडी सुटपर्यंत अगर्दी 'चूपचाप बसली होती. इनामदारांच्या भाग्यागड्यानं 
“ पाहुणीला गाडीत बसवून दिली ” हा आपल्या कामगिरीचा रपोट देताना 
दुसरे पाहुणे नाहींतसे बघून थोडी फोडणी दिली-- “' पाक हत गाडीत 
बसल्याधरनं आगीनगाडी चालाया लागस्तबर अंग आंकडून गप्प बसली हुती 
पावनीब्राई; आनिक खुनाथत्री गप गप हुता. नव्या न्हवरा-न्ह्वरीबानी 
दोगबी गेली जनूं---” त्याच्या या फोडणीनं “ भाग्या म्हणून बापू ओरडला 
अन्‌ “' चल, मूखासारखं कार्ही तरी बडबडू नकोस ? म्हणून कमळीने 
त्याला चापलं. 

आगगाडीनं एक स्टेशन मागग टाकलं तेव्हांच यमूचं तोंड उघडले-- 
: काय हे तुमच्या इनामदाराचं गाव ! आधी तिथे पोचायळाच सतरा विध्नं | 
अन्‌ तिथं गेल्यावर तरी काय - शिस्त म्हणून कांही नाहोंच. एक दीड वाजतां 
जेबायला मिळालं म्हणजे फार लवकर झाळ म्हणायचं |! आणि गुर्‍ऱ्हाळासाठी 


१२६ लवणाची मासोळी 
म्हणून काय ती भाकऱ्याची चवड बडवणं, त॑ नदीचे अवघड पाणी--- 
पुनः या गांवाचे तोड पाहणार नाही मी जोशी--” 

:: का हो, आमच्या गांवावर इतका राग |! अजून तिथलं अन्न आह 
पोटांत तोंबर तरी इतका त्याचा राग धरूं नका --? 


५६८ मी काही तिथल्या अन्नावर रागावले नाही की माणसांवरही नाहीं; 
पण अकराच्या आत आचवायची अन्‌ जन्मभर नळाच्या पाण्याची संवय 
असलेल्या माइ्य़ाठारखीला हा चार दिवसांचा पाहुणचारसुद्धां नकोसा झाला. 
आणि तो खेड्यातला भरमसाटपणा आणि गबाळेपणा मळा मुळींच सहन 
व्हायचा नाहीं. बाकी सार आयुष्य शह्रात गेल्याशिवाय माझे म्हणणं कळणार 
नाही म्हणा |! ?? 

५८: अन्‌ सारे आयुष्य खेड्यात गेल्याशिवाय त्यातली गंमतही कळायची 
नाहीं हें तितकंच खर. १० > १० च्या खोलींत भाडे परवडण्यासाठी 
जोडीदार घेऊन राहताना आम्हालासुद्धा शहरात असंच गुंदमरल्यासारखं 
होतं ? 


“ वा |! त्या इनामदारांची गोष्ट एक सोडा. त्यांचा वाडा, जमिनी 
त्याना इथं परत खचून आणतील. पण तुम्हाला कसलं एवढं आकर्षण आहे 
खेड्याचं जोशी ? तुमच ना तिथं घर, ना जमीन, मग तुम्हांला का एवढं 
प्रेम गावाचं १ * 


“ माझं प्रेम घरा-जमिनीवर नाहीं. पण माझा पिंड तिथे पोसलाय्‌ त्या 
पाण्याने, त्या मातीनं मळा घडवलाय. पोटासाठी बहुधा आपलं गांव मला 
कायमचं सोडाव लागेल. पण त्यामुळं मी तें विसरन किंवा माझ त्याच्यावर 
ग्रेम कमी होईल असं मात्र नाही --? 

“८: आओ हो ! तुम्ही माठ्या ततच्बत्तानात शिरायळा लागलात. मला 
त्याच्याशीं कार्ही कतेव्य नाहीं. मी आपलं रोजच्या राहण्यापुरतं बोलले. 

“६ वढी तरी मेहेरबानी आहे म्हणायची ! नार्ही तर मला वाटलं होतं 
कीं कांही लोक खेड्यांत चला म्हणून घोषणा करताहेत तशा तुम्ही आतां 
“ खेड्यातून चला ?' अशी एखादी नवी घोषणा जाहीर करणार की काय १ ? 


लवणाची मासोळी १२७ 
“: तर तर ! करा माझी चेष्टा - पण घोषणा करायला ' मोठं माणूस ! 
व्हावे लागते. २? मागच्या बोलण्याची आठवण यईल अशा सुरांत यमू म्हणाली --- 
“८ आता काय आमच्यावर अन्‌ आमच्या झुब्रावर वळली वाटतं दृष्टि १ ?? 

“६ छु बाई | मी कशाला तुमच्या त्या पुरुषी छुञाच्या वाटेला जाऊं १ 
पण आता तुमच्याकडूनच विषय निघालाय म्हणून विचारते, यंदा तुमचा बेत 
काय आहे १---? 

८: कशाभ्रह्दूलचा ते स्पष्ट करा नाहीं तर नुसतं * भेत काय ? म्हटल्यास 
त्याचा अथे आमच्या खेडवळ भाषत वगळाच होतो आणि तो तुम्हाला 
उगीच अडचणीत टाकील --?? 

८ कळूं द्यात तरी तुमचा खेडवळ अथ १ ?? 

:: माझा नव्हे. आमच्या खेडवळ भाषेचा. खेड्यातला स्थळांची चौकशी 
करायला निघालेला मुळ चा ब्राप पहिल्यादा तुमचा प्रश्न विचारून ' यंदा 
कतव्य आहे की नाही ? ते वरपक्षाकडून समजावून घेतो.?? 

“: पुण मी काही मुलीचा बाप नव्हे. मी आपलं सरळ विचारळं, तुम्ही 
सारखे त्या ळुबरात गुरफटलठे असता, तेव्हा यंदा अभ्यासाचा बेत आहे की 
नाही ? कां तुम्हीही आपल्या गावच्या सगळ्या शहाण्या माणसासारखे 
' पाहुणी ? आढी की ती कुणाची बायको व्हायला आली अश्या वृ्तीत 
शिरलात £ ?? 


:: अरे बापरे ! अजून आमच्या गावावरचा राग कांही गेलेला दिसत 
नाही. 

:६ पुण मी बिचारल त्याचं उत्तर द्याल की नाही---? 

५ अभ्यास काय; चाललाच आहे ! जूनियरच्या वर्षात चालायचा तसा ? 

“: छान ! हा अप्पलपाटेपणा बरा नाहीं. तुमची मदत होईल म्हणून मी 
मराठीच्या जोडीला इंग्रजीएव्जी संस्कृत घेतल. अन्‌ तुम्ही मात्र एकटे 
अभ्यासाचा फडशा पाडून मला तांडघर्शी पाडा. तो * काव्यप्रकार ? उघडला 
की काटाच येतो माझ्या अंगावर ? 

५६ डूतकं काहीं भयंकर नाहीं त्यात. काव्यप्रकाश म्हणजे नुसत्या चटणी - 
कोडिंबिरीसारखा सपबायचा विषय. माफक आणि वर खमंग--? 


शर्ट लवणाची मासोळी 


“६: आम्ही स्कालर नाहीं म्हटलं तुमच्यासारखे. ? 

“६ हूंच पहा ना; ही तुम्ही आतां दिळीत ती उपमा फोड करूं का 
इथच ! ” 

“ चावटपणा नको. ही आगगाडी आहे म्हटलं. उद्यांपासून अभ्यासाला 
सुरुवात करायची. उद्यां दुपारी बंगल्यावर या. ? 

६ वा! वा |! उद्यां बंगल्यावर यायचं. म्हणजे आज बंदीच काय? ”? 

ट्ट हं हो काय---- १9 

गांवांत आल्यावर रघूला आपल्या खोलीवर एकदम जायचा विचार सोडून 
द्यावा लागला. सध्याकाळच्या जवणालाही तो बापटांच्या बंगल्यात राहिला, 
तिथल्या बेतानं रघूची जी तिरपीट उडाली त्यावरनं त्याला यमूचे इनामदारांच्या 
इथं काय हाल झाल असतील याची कल्पना आली. बायका-पुरुषाचं एकत्र 
जेवण -- जेवण कसलं, पानावर बसून सुपारीएवढा भात आणि अर्धी पोळी 
चाखत माखत खातांना “ भूक नाहीं, चव नाहीं.” या सब्बींचा उच्चार यसू, 
तिर्ची धाकटी बहीण-भावंडं सारखा करीत होती; आगि खूच पोटभर 
जेवण होतांना त्याला संकोच वाटूं नये म्हणून पानावर बसून रहायची धडपड 
कर्रात होतीं. रघूचे जेवण त्या सगळ्याच्या मानानं भरपूर हातंच - आणि 
यमूचे घाकटे बहाणभाऊ पांच मिनिटानं पानावरन उठल्यावर 'तुम्ही सावकास 
जेवा - ती तस्लींच ! ' अशी संपादणी करतांना यमूची अन्‌ तिच्या आईची 
भलतीच ताराभळ उडाली होती तिथलं जेवण पोटांत ढकलतांना खूला त्या 
जगाचा वेगळेपणा अगदी निराळ्या संदर्भात समजूत आला. 


मग मात्र तो तिथं थांबरळा नाहीं. चंदूची खोली रिकामी होती. स्त्रतःच्या 
खोलीवर आठ दिवसाचा धुरळा सांठडेला असणार, पण हीं सारी कारणं 
त्यानं धुडकावून लावली. अन्‌ तो आपल्या खोलीवर आला. यायच्या आधा 
यमूनं त्याला * काव्यप्रकाह 'च्या शिकवणाची आठवण करून दिली. त्या 
शिकवणीचा विचार करता करतां त्याला कातिलालच्या शाळेतल्या शिकवणीची 
आठवण झाली. माधुरीचा ' प्यारी मोहब्बत ' सिनेमा दिसू लगला. कृष्णेच्या 
पात्रांतलं ते सरसर पोहणं, ताबडमातीत लोळत असताना “' माझ्यापार्शी 
बदनामी करून (याचं भागायचं नाहीं ?? ही कमळीची ग्वाही, गाडीचा घक्का 


लवणाची मासोळी १२९ 
बसल्यावर ओढलेला मासलळ गोरा दंड, विज्ञापूरच्या गोलघुमटाची ट्रिप, 
कुणाच्या तरी थडग्याचं दर्शन. 'कशाला उद्याची बात?---।सुटी सपपर्यंत रहा 
ना ? म्हणणारा बाळचा किरकिरा आवाज - चंची छुत्रात * टू इज़ कंपनी ? 
वर बिळासकर पाटलानं केलेलं माष्य, पाडुरंग सावंताचं आयत्या पेशावरच्या 
हक्काचं तत्त्वज्ञान - पाणवठ्याच्या मळींत उताणं पड्डून पाहिलेली अंग चोरून 
बसलेली कमळी -- 

आढ्याकडे पाहत रघू मार्गपुदं आडवा-तिडवा भरकटत होता. आढ्या- 
वर दोन कोळ्याची जाळीं जवळ जवळ विणलेली दिसू लागलीं त्यानं रघूला 
“एका कोळियाने--? या मराठी शाळेतल्या कवितेची आठवण झाली. कविता- 
“अजामिळ, अघासुर, त्रजवधू , बकी पिंगळा? कोण ही पिंगला ! कोरगावकर 
बुवांची शिदढोरीच उपयोगी पडते. काव्यप्रकाशातळा तिसऱ्या उल्लासातला 
ठांगार, तिथं कोणती शिदोरी १ भरकटतां भरकटनां रघूला केंव्हा झोप लागली 
तें कळल नाहीं. 

>< >< >< >< 


परिक्षेचे पेपर लिहितांना रघूच्या अंगांत एक प्रकारची मस्ती आली होती. 
सारे प्रश्न किंवा प्रत्येक उत्तर तव्याला हवं तसंच होतं असं नाहीं. चार-दान 
वेळां तरी गडबडगुंडा करून वेळ मारून न्यायचा प्रयत्न त्यालाही करावा 
ळागळढा होता. पण तं करताना रघू भाबरावला नाहीं. परीक्षकाच्या डोळ्यात 
आपण सफाईनं घूळ टाकली अशी त्याची खात्री होती. ही मस्ती अंगात 
बाणायला कारणही तसंच घडलं होतं. ऑनसंच्या पेपरातला भाषातराचा भाग 
म्हणज बिनअभ्यासाची सोडत होती. सहजी बाण लागला तर लहान-सहान 
कसर तेव्हांच निघून जायची. नाहींतर अनुमानधनक्यानं बाकीच्या पेपराच्या 
बरोबर यायला घडपडायच अशी स्थिति. तो पेपर दुपारी तीन वाजता होता. 
जेवग लवकर आवरून खूनं सतरजीवर अंग टाकलं. आदल्या दिवशी 
जागरणामुळं डोळा लागला तर घोटाळा व्हायला नको म्हणून त्यानं पावणे- 
दोनाचा गजर लावून ठेवला अन्‌ मग तो स्वस्थ पडला. 

रघू जागा झाला तेव्हा गजराची दोवटची क्षीण किणकिण सपत आली 
होती. आपण पर्राक्षच्या हॉलमध्ये नसून खोलींत झोपलो होतों हं ध्यानात 


(%. 


१४० लवणाची मासाळी 
आपल्यावर त्याला आपल्या स्वझाची गंमत वाटली. ती गजराची किणकिण 
म्हणजे पेपर संपायच्या आधा दहा मिनिट होणारी सूचक घटा समजून त्याची 
घादल उडाली होती, त्याआधी त्यान भाषांतराचा पेपर सबंध वाचला होता- 
किंवा पाहिला होता. त्यांतल्या दशकुमार-चरितामधल्या उताऱ्यानं त्याचं 
लक्ष बेधून घेतलं. तो सारा उतारा मार्ग एकदा मॅट्रिकच्या वेळी रघूनं चागला 
तयार करून ठवला होता. त्या बेळी ते श्रम वाया गेले होते. आज नेमका 
तोंच उतारा पेपरांत कां दिसला १ 

त्या स्वझाशी चाळा करीतच रघू परीक्षेच्या हालमध्यें गेळा. शेजारच्या एक- 
दोन विद्यार्थ्यांना त्यानं अधवट चेष्टेने, अधवट गभीरपणे सागितलं ' भाषां- 
तराला दशक्रुमार येणार आहे? आणि प्रत्यक्ष हातांत पेपर पडल्यावर नुसता 
दशकुमारातलाच नव्हे तर सहासही स्वमतात पाहिळेला उतारा वाचून खघूला 
विप्मय़र वाटला ! साऱ्या परीक्षेतली मस्ती एकवटून त्यान पेपर लिहायला सुरवात 
केली. झोपेमुळे आळसावून गेलेलं त्याचं अंग हलकं झालं - त्याचा विश्वास 
वाढला. एकट्या या पेंपराच्या बळावर थापा मारून झाकलेली कसर भरून 
काढून पहिला वर्ग मिळवीन अशी हिंमत त्याला आली, सगळी परीक्षा संपून 
गेली तरी रघू अतराळी तरंगत होता. स्वतःचं दुबार समाधान करण्याकरतां 
त्यानं आपल्या साऱ्या पेपरांच्या माकोची बेरीज केली. पाचदादहाच्या 
ठिकाणीं निदान पाचर्शे पंचवीस माके मिळतील अशी त्याची खात्री झाली. 
पंधरा मार्काच अंतर राखून पहिला वर्ग हातात आला अशा हुरुपात तो होता. 
त्या भरात त्यानं गावी जायचा भेच चार दिवस पुढं ढकलला. 

परीक्षा संरल्य़ावर तीन-चार वर्षांचे जोडीदार, वेगवेगळ्या वाटा फुटून 
विखरून जाणार म्हणून दोस्ताबरोबर अखेरची गंमत करीत होते. चचीछुजचे 
उरले-सुरळे चार लोक रखघूच्या खोलींत एकत्र जमले. पंढरपूरकर जोशी 
म्हणाला, ““ आता छुब खराखुरा फुटला - बंद झाला, आपल्या रगीनं पान 
खात मजा मारणारा कंपू आता कॉलेजांत दिसायचा नाहीं यापुढं. ?? 

५: इतका रड्बाई होऊं नकोस. तूं काय काळेजचा “ लाइफ-मेंभर ' होणार 
होतास १६ '? रघूनं त्याला चिडवलं. 

: तसं नव्हू २ ! पण जाऊं दे. आतां आमचं आपलं पंढरपूर एके 
थंदरपूर, ?) 


लवणाची मासोळी १४१ 

“ तुं कसं काय ? तिथं राहून काय घंटा बडवगार आहेस ? ?? 

५६६ घेंटा बडवील छाळेचा शिपाई. आम्ही आतां आमच्या * अल्मा 
मंटरांत ? मास्तरकी करीत बसणार. आमच्या हेडमास्तरानीं दिवाळीच्या 
सुद्टींतच सांगून टाकलं होतं --? 

:६ हातू रड्या |! कार्दी हातपाय हलव, पुढं जायची हिमत घर. ” 

“६ पुढं कुठं जाऊं £? मी तुझ्यासारखा स्कालर थोडाच आहे; कुठं तरी 
मास्तरकी नाही तर कारकुनीच आमच्या वाट्याला यायची. मग ती पाच 
रुपये कमी असले तरी गावच्या गावात राहून केलेळी काय वाईट १ पाच 
मैलावर खेडं आहे. तिथल्या जमिनीवरही थोडंफार लक्ष राहील-- 

:: आणि असं बस्तान बसलं की, विठोबाच्या जोडीला एखादी रखुमाईही 
येईल 99 

“६ तं व्हायचंचू रे. आमची ही थड छछासची बार्शी-लाईट्ची गाडी आहे. 
ती तशीच रं रें करीत चालणार - आम्हाला तिची पहिल्यापासून संवय 
झालेली आहे.?? 


पंढरपूरकरानं आणलेला खिन्नपणा टाळायसाठीं म्हणून सगळ्यांनी फिरायला 
जायचा बूट काढला. फर्ग्युसनच्या टेकडीवर एका कोपऱ्यात जाऊन हा कंपू 
बसला. इकडे तिकडे न्याहाळतां न्याहाळता रघूला प्रो० बंडले दिसला. तो 
होस्टेलमध्ये उतरून एकटाच किरायळा आला होता. रखघूनं पंढरपूरकराला 
खुणावलं अन्‌ तो स्वतः '* प्रो० बंडळे ? म्हणून मोठ्यानं हाक मारायच्या 
विचारात होता. तेवढ्याच पंढरपूरकर जोशानं त्याला दाबलं अन्‌ * आपटे ' 
या त्याच्या खऱ्या नावानं पुकारलं. झापटे चमकला, पण त्याला या कंपूकडे 
यावसं वाटायला लागलं. उभ्याउभ्याच तो जबळ येऊन म्हणाला, 

५: आता चेष्टा बंद; काळेज सपल. आता सभ्य माणसासारखं बोलणार 
असलां तर मी थाबतो--*' 

* म्हणजे आम्ही काय असभ्य आहोत ? ?' साऱ्यानी गिला केला. 

काय वाटेल तीं नांवं ठेवत होतां आम्हाला. आतां ते चालायचं नाही --?? 

“५ अच्छा ! आज सगळ्यांची खुषी ! बोला आपटे, तुम्ही काय करणार 
आहांत १ पुढचा ब्रेत ठरलाय की नाहीं ! ?? 


१४२ लवणाची मासोळी 

6 तुम्हांला कशाला सांगायचं ? तुम्हांला माझ्या साऱ्या थापाच वाटतात./? 

“। नो-नो, नो थापा, अगर्दी गंभीरपणे सांगा तुम्ही --- 

“: माझा बेत आहे * कास ? मिळाला तर इंडियन आय. सी. एस्‌. ला 
बसायचं ---?? कोणालाच हसू आवरेना, 

“८ हुसताय्‌ काय १ ?? आपलट्यानं चिठ्ठून विचारलं. 

पंढरपूरकर जोशानंच भाडं फोडलं. ““आपट्या लेका, गांवच्या गल्लींत तरी 
असल्या बाता मारायच्यास. तूं बसला आहेस पास कोर्स घेऊन आणि झास 
मिळायच्या अन्‌ आय्‌. सी. एसच्या गोष्टी बोलतोस. अन्‌ बंडल्या म्हटलं तर 
राग येतो.?? 


६८ यात कसले रे बंडल मारलं १ पंढऱ्या, तूंसुद्धां बाकीच्याना सामील 

होतास १ आम्हीं पास कोस घेतला म्हणजे आम्हाला कास मिळू नये असं 

थोडंच आहे १ उलट कास मिळायसाठीं तर आनर्सची भानगड' न ठेवतां पास 
कोस घेतला --?? 

“ तुझ्यासाठी युनिव्ह्सिटीनं नियम बदळून पास कोसेला छासेस्‌ द्यायचं 
ठरवलंय कायरे £ ” 

“६ नियम कशाला बदलायला हवेत ? आम्हाला काही पहिला, दुसरा 
तिसरा असे वगवेगळे ' छासेस ? लागत नाहींत आनरसंवाल्यासारखे. पास 
कोर्स घेतला कीं कास आणि प्रश्न एकच - क्लास मिळती की नार्दह्दी ! 

“६ हुं कांहीं तरी नवीन दिसतंय आपटे---?? 

: नवीन कुठलं काय १ पास झालो तर छासात नांव - नाहीं झालां तर 
पुढच्या वषी पुनः प्रयत्न. छास मिळेपथत आमचे प्रयत्न चालू--? 

“६: ह्यालाच बंडल म्हणतात. पास झालास की तू क्लासांत नांव आलं 
म्हणून जाहिरात करीत सुटणार. ?? 

:< तुम्ही काय वाटेल तें म्हणा ! पासक्ञास हा “' कास ? च आहे मग 
€ कास ? मिळाला म्हणून सागितलं तर बिघडलं कुठं ! 

“: बरोबर आपटे. यू आर्‌ राईट, आणखी तुमच्या त्या आय्‌ सी. एस. चे 
काय १ ?? खूनं मधेच विचारलं. 


छबणाची मासोळी १४३ 
“६: तो आपला राखीव बाण. आर्थी सेक्रेटरीएटमध्ये प्रयत्न करणार आहे. 
काका म्हणालेत बहुतेक जमेल म्हणून, ? 
८ तुझ्या काकांनीं गावच्या सोमा सोडून मुंबईचे सेक्रेटरीएट रे केव्हा 
गाठलं £ ? पंढरपूरकरानं पुनः डिंवचलं. 
तुमची मंंबद्द तुम्हांला लखलाभ, आम्ही कांही. परक्या ब्रिटिशांचे 
प्रजाजन नाहीं -- आमचं स्वतंत्र राज्य आहे. ? 
५८ म्हणजे डेका सरळ साग की जहागिरीच्या दिवाण-मामलेदार कचेरीत 
किंबा त्याहीपेक्षा म्हणजे कुठं खाजगींत कारकुनी करणार आहेस म्हणून, ?? 
आता तुम्हाला कारकुनी वाटते. पण बघतां बघतां मामठेदार होऊत 
जाईन. वेळेला त्याच्यावरसुद्धा चेन, उगीच नाहींत आमचे महाराज महा- 
राष्ट्राच्या टीममध्ये खेळत -- माझं क्रिकेट मळा हात दिल्याशिवाय रहायचं 
नाही. !' 
“ तू काय खेळतोस त॑ कळण्याइतकं क्रिकेट तुमच्या महाराजांना नक्की 
येत. महाराद्राच्या संघात खेळलेत ते. ? 
“ तुम्दी असेच ! तुम्हाला आमचं बरं बघवायचं नाहीं. ? 
:: घुघवायचं कां नाही £ जक्‌ अपू बंडले - अरे तिथे कालेज काढायची 
स्कीम कर आणि खराखुरा प्रोफेसर होऊन जा ?' खून दोबटचा टोला मारला. 
५: तुमच्याशी बोलण्यात अथे नाही. उगीच आला इथं. ?? 
बंडळे ताडू ताडू निघून गेल्यावर रखघूनं बिळाशीकराला पान काढायला 
सांगितलं. त्या दिवशी अर्ध्या समासदार्नी समारंभपूवेक पान खाण्याचा 
कार्यक्रम उरकून ' चंची छुव्ा *च॑ अधिकृत विसर्जन केलं. पानं चागली 
जमून चर्वण करीत असताना सगळेजण उगीचच टेकडीवर आल्यागेल्याची 
दखल घेत होते. शेवटची पिचकारी मारल्यावर बिळाशीकराने सूचकपर्णे 
रघूकडं पाहिलं. रघूनं उलट त्यालाच म्हटलं, “' काय पाटील, असे बघताय 
काय ? आतां तुमची पाळी आहे. ” 
आमचं काय भटा |! तूं पंचांग सांगशोल त्यावर सारं - म्हातारा तर 
आतां खचानं टेकीला आलां म्हणून कुरकुर करतोय कवाधरनं. 
६ पंचांगांत काय आहे ? दोतकऱ्याचं बळ मनगटांत--- ?? 


१४डडँ ळलवणाची मासोळी 
मंजी काय मी बी. ये. होऊन नांगुर धराया जायचं पुना १ काय करावं 
तें तूंच सांग की जरा -- ?? 

“८ घाट कसली आळी आहे पाटील ? अजून दोन वर्षे कुस्तीची गदा 
मिळवायची आहे तुम्हाला. घाला लो-काळेजात नांव अन्‌ कचकचीत आठ 
वष नाव कोरून ठेवा गदवर---?” 

८ त्ये जमल म्हणा. कोलापूर आपलंच हाय कीं -- ? 

मग झालं तर. एळएल. बी. झाल्यावर तुम्हाला काय पंचाईत ? 
व्हाळ कुठं तरी सबजज्ज -- नाहींतर आपली आमदारकी आहेच की.? 


: बम भटा - कसं माज्या मनातलं बोललास |! सांगतुच म्हाताऱ्याला --- 
जोशानं पंचाग बगून असं सागितल्या म्हनून, मंजी मग म्हातारा काय नगो 
म्हनायचा न्हाई -- 

ठरलं तर, ? आमदार बापूसाहेब पाटील बिळाशीकर यांच्या हस्त 
कुभाचं विसर्जन झालं. “ उठूं या. खूप उद्यीर झालाय्‌ आतां ” खूनं 
बठक मोडण्याच्या तयारीनं माडी बदलला--- 

“बावा | जोशीबुवा. आमची सगळ्याची हजेरी धेऊन आपण मात्र 
अचूक निसटायचा डाव करताय. पण तें जमायचं नाहीं. ?? 

:: काय जमायचं नाही १ ” 

“६ तुमचे बेत कळूं द्यात को आम्हांला --! ? 

५६ माझा कसला बेत ? मीं कांहीं ठरवलच नाही. ” 

:६ अक्शा थापा पचायच्या नाहींत. ” 

५: शापा नाहींत - पण माझा आपला रोकड व्यवहार. परीक्षेचा निकाल 
होईल त्यावर झवलबून सार. 

५६ परीक्षेचा निकाल ठाऊक आह आम्हाला, फस्ईछास ठरलेला 


: हो. फस्टेळास मिळेल बहुतेक, मग एक वर्षे आहेच कालेजात. 
पुढचं पुढं. एवढाच माझा भेत.? 

---अंधार पडायला लागला होता. त्या अधारात कालेजच्या पुढच्या 
वर्षोत.अग्रपण “ फेलो ' म्हणून वावरणार अश्या सुखद कल्पनेंत रघू इतरांच्या- 
बरोबर टेकडी उतरू लागला. फूट-वाटेला लागायच्या वेळीं पंढरपूरकरान 


लवणाची मासोळी १४५. 
तांड उघडल, “' अर पुनः केंव्हा भेटू कुणास ठाऊक ? या जोशीबुवाची 
फस्टक्कासची फीस्ट कांही सगळ्यांना मिळणार नाहीं तेव्हा आजची पार्टिग 
काफी तरी याच्याकडनं काढली पाहिजे -- 

लकीच्या माडीवर गदांत कशीबशी सगळ्याच्यापुरती जागा मिळवून त्यानीं 
काफीपानाला सुरवात केटी. आनंदानं हरळून जावं असं त्याना वाटत होतं. 
पण तिथल्या गलक्‍्यात घरून आणलेल्या मुशाफरासारखी त्यानीं मुकास्यान 
आणि घाईबाईने काफी संपविली. 

रघू खोलीवर आला त्या वेळी आठ वाजून गेले होते. खोलीच्या दाराशी 
टृंक पडलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं. दार उघडून तो आत जातों तोंच 
कुठून तरी अचानक यावी तशी यमू तिथं दत्त म्हणून हजर झाली. 

“८ किती वेळ बाहेर भटकत होतात १ दीड तास होऊन गेला, मी इथे 
तुमची वाट पाहते आहे. ती बाहेरची टंक तेवढी आत ध्या आधी. 

£: पण हा प्रकार आहे तरी काय १ ? 

:८ मुला आज दिवपूरला गेलंच पाहिजे. तेव्हा मी विचार केला होता की 
संध्याकाळच्या सिनेमा पाहून परस्पर ' मेळ ' गाठावी. म्हणून मी होस्टेलमधनं 
टृंक घेऊन बाहेर पडलें, इथं तुमचा पत्ता नाही. आतां साराच घोटाळा 
झाला. ?? 

£६ मेळला अजून खूप अवकाश आहे---?? 

५: घण सिनेमा बडला ना संध्याकाळचा. त्याची वाट काय ? * 

५“ आता दोन्हा कसं साधगार १ ?? 

“ खरंच. कसं साधणार ? ?? 

-र्‍दोघांनीं जवळच्या खानावळीत जेवण उरकून घेतलं अन्‌ तशीच तीं 
दोघं टांगा आणायला म्हणून मोठ्या रस्त्याला लागलीं. एक-दोन ठिकाणी 
टागेबाल्याशी हज्जत घातल्यावर रघू एकदम म्हणाला, “ रात्रांच्या वेळीं या 
टांगेबाल्याना मळताच भाव चढतो. त्यापेक्षा आपण आता सिनमाला जाऊं 
या सकाळी जाता येईल तुम्हाला. ?? 

६: घण सिनेमा सुटल्यावर काय करायचं ? ?? 

ल.मा,..१० 


१४६ लवणाची मासोळी 


“ बघू पुढच्या पुढं ? 

तशींच भटकत भकटत तीं दोघं गांवातल्या थेटराकडे गेली, जिथं त्यांतल्या 
त्यात कमी गर्दी दिसली त्या थेटरात जाऊन सिनेमा पाहिळा. तो चित्रपट 
पाहतांना रघूच्या डोक्यात चित्रपट आणि चेष्टा यांची जी सांगड बसुन गेली 
होती, ती पुनःपुन्हा डोकावली, साडेबारा वाजल्यावर रात्रीच्या थंड वातावर- 
णात परत फिरताना खघूनं चित्रपटाच्या वेळच्या गंमती त्यातला चावटपणा 
शाक्य तितका सौम्य करून यमूला ऐकवला. “' चला काहीतरीच ? या दोन 
शब्दांत यमूनं त्याची बोळवण केळी, लकडी पुलावर आल्यावर मुद्दाम वाकडी 
वाट करून जंगलीमहाराजाच्या रस्त्याने रमतगमत येईतोपर्यंत दोन वाजून 
गेले होते--- 

££ आतांपर्यंत ठीक झाल. पण आता मात्र पंचाईत आहे. तुम्हांला 
बाहेरच्या व्हरांड्यात झापलं पाहिजे, ” खोलीचं दार उघडल्यावर यमूनं 
रघूला सांगितलं. 

८: आता काय म्हणाल तं ऐकलं पाहिजे. बाकी बाहेर चादणं झक्क पड 
आहे. बाहेर झोपण्यातच खरी मोज. ? 

५: करा खुशाल उजाडेपर्यंत हवी तितकी मोज, ? 

--रघूनं आपला जिस्तरा बाहेर लोटून दिला. यमूनं लवकर उठायला 
पाहिजे म्हणून गजर लावून ठेवला आणि ' गुड नाईट ? म्हणून दार ढकललं. 
रघू बाहेरचं पीठासारखं स्वच्छ चादणं पाहत होता. 

थोड्या वेळानं खघूनं यमूळा बाहेरूनच हाक मारून विचारलं, “' मला 
तेवढं * काव्यप्रकाशां ) चे पुस्तक देता का १” 

“ कशाला १? आतां काय पुनः बी. ए. चा अभ्यास करायची लहर 
आली का तिसऱ्या उल्लासांतली एखादी चावट नायिका आठवली ? - 
मुकाट्यानं झोपा बघू आतां. नाहीं तर माझी सकाळचीहोी गाडी चुकेल---* 

५: पण झोप तर यायला हवी ? आज बहुतेक जागत जागतच उजाडणार. 
मधांच्या फिरण्यानं झोंप पार उडून गली आहे. तेव्हां कांही तरी करून वेळ 
काढला पाहिजे. 


लछवणाची मासोळी १४७ 


६ काव्यप्रकाश हें काय वेळ काढायचं साधन वाट्तं ? ? 

“ संस्कृतच्या अभ्यासांत दुसर कमी नीरस पुस्तकच नाहीं. त्याला काय 
करायचं ? तेवढं पुस्तक द्या बघूं लवकर.) 

“६ अगदीं अप्पलपोटे आहांत - तुम्ही तेवढे पुस्तक वाचून वेळ काढा." 

:६ मृग आपण गप्पा मारीत बसूं या चांदण्यांत. पहाट झाली की स्टेशन- 
वर जायच्या नादाला लागू, ? 

६: आप्पा मारीत बसूं या ! पण चांदण्यांत कुर्गी पाहिलं तर! 

पाच-दहा मिनिट त्यांनीं खोलींत गप्पा मारल्या. 

रघूच्या खोलींत पुनः दिवा लागला तेव्हा साडेंपांच वाजून गेळे होते. 
यमू कपडे बदलून टाग्याची वाट पाहत होती. रघूनं टांगा आणल्यावर वर 
येऊन दिव्याच्या प्रकाशात आपला अवतार पाहिला अन्‌ तो यमूला म्हणाला, 
“: आतां जवळ जवळ उजाडत आलंय -तेव्हा स्टेशनवर मी यायलाच पाहिजे 
काग??? 

५ कशाला उगीच हेलपाटा, जाईन मी तिकीट काढून. * 


टांगा निघून गेला. यमूच्या हातातला रुमाल फडफडत होता. रघू परत 
खोलींत आला. डोळे चुरचुरत होते. त्यानं अंगावर पाघधरूण ओढलं, नऊ 
वाजून गेल्यावर तो जागा झाला, अवेळी झ्षोपेने डोळे तारवटून लाल झाले 
होते. अंग गळून गेलं होतं. तद्या स्थितींत त्यानं होईल तितक्‍या घाईनं 
सामान आवरलं. जेवण उखलं. पुण्याला दोवटचा रामराम ठोकला. 
पुनः तीच एम्‌. एस्‌. एम्‌. ची गाडी, तेच डोंगर - तोच घाट -गाडी 
नेईल तसा डग डग करीत जाणारा प्रवासी - रघू स्टेशनवर उतरला तेव्हां 
र्य मावळतीच्या डोंगरावर पाचला होता. झप्‌ झप पावलं उचलून त्यानं 
आपलं घर - देवळाची ओरी गांठली -त्या वेळी चांगलाच अंधार पडला होता. 


४२ (टं 


रघूनं आतां नोकरीच्या शोधाला लागाव हा विचार कृष्णेभट्जींनीं त्याला 
दोन-चार वेळा सहर्जी बोळून दाखवला. बाळाने आता राहरात गेल्यावर 
काय काय गंमती करायच्या याची यादी रघूला सागितली. खघूनं, “ असं 
का ? छान ! ” एवढंच उत्तर देऊन बाळाच्या फिकट गालावर हलकेच 
थापटी मारली. पण वडलांना कश्याचाच थाग लागू न देतां. चटकन्‌ बाहेर 
पडायचं धोरण पत्करलं. 


कुठल्याही संबयीच्या आहारी जायचं नाही ससं रघू ठरवीत होता. तरी 
कधी कर्घी आपोआप त्याचे पाय रगरावच्या मळ्याच्या वाटेला लागत. तिथं 
गेलं की तासभर पेलवानाशीं इकडच्या-तिकडच्या गोष्टी बोलायच्या. त्याचं 
रानांतलं काम आवरून त्यानं विहिरींत पाय खंगळले कीं त्याला “' पैलवान, 
काढा आता पान ” म्हणून ऐसपैस विहिरीच्या मखरालगत पाटवणात पाय 
सोडून बसायचं, असं तो कित्येक वेळां करी. पेलवानानं एकदा त्याला 
विचारलं, “' रघुनाथ, पानाचा चागलाच नाद लागलाया की तुळा. भटजी 
बाबास्नी ठावा हाय का? ”? 

“६: मी कशाला मुद्दाम सांगूं पैलवान १ पण त्यांना काय रंगलेले दात 
दिसत नसतील थोडेच १ त्यार्मी कर्धी विचारलं नाही म्हणा - मग आपण 
तरी मुद्दाम बोळून त्यांच्या डोळ्यावर कशाला आणायचं ? ? 

“ अनू आलं डोळ्यावर म्हनून आतां काय म्हनत्याळ ? आमापरास लई 
दीस कड काडलास त्वां. आता तूं चांगला बापई झालास की-- ?? 

“ म्हणून तर समजून उमजून काही बोलत नसतील. जुन्या माणसांचं 
एक चागलं असतं पैलवान. आपण आपल्या लहानपर्णी काय काय केलं तें 


*लवणाची मासोळी १४९ 
आठवून पोरं आपल्या पुढं गेलीं नाहीत एवढे जघितलं तरी त्याचं त्यांना 
बरं वाटतं.? 

६ ह्ये मातर खरं रघुनाथ, म्या तमास्वू रायाला लागलां तवा पाहिल्या 
पहिल्या डावाला आईला चोरून वाईच चुरा घ्यायचा गाडग्यांतला; पर 
एक दीस आईनंच माज्या पिशवीत एक आखं पान चुरून ठेवलं बघ.” 

८८६ हं | १9 

“८ ऑ £ एकदम गप का र झालास ? आपल्या आईची आडटवान झाली १ 
गमतं का र हतं तुला १ ” 

६ न॒ गमायला काय झालं ? 

(६: इयरेरांत ऱ्हाया लागल्यावर हतं कुटळं गमाया १ उगाच काईच्याबाईई 
सागू नगस. न्हाइ काई काम, न्हाहू धंदा. वकुत तरी कसा जायाचा £ ? 

“: असा आज जातोय्‌ असाच. तुमच्याकडे येऊन ? 

“६ काय मर्दा | काय सागतुयास १? कबा तरी येतुस पर आता व्ये्वी 
जुळायचं न्हाइ हतनं म्होरं. ? 

“६ तृ काय म्हनून १ ” 

:€ का मंजी ! आतां आवारली माजी मेहनत. मिरगाच्या टिपनापावतर 
काय ओढगस्त न्हाई. तवा म्या आता जत्रवर जायाचं यवजल्या. हायेत 
चार-पाच जत्रा. दोन तीन जाग्याला कुस्तीबी ठरलीया, फडांत कुस्ती करायची. 
जत्रा बगायची. जरा येवावं म्हनता चार गांवं करून. ? 

: अरेच्चा, मग माझी पंचाईतच आली म्हणायची, 

:£ तर १ खऱ्याच्यानं सागतुयांस जनू ? मग चल की बगाया मजी संग, ?? 

“५: आलो असतां पेलवान, पण-- ? 

£: पर न्हाई न्‌ काय न्हाई. तसं चालायचं न्हाई. मीच येता. भटजी 
बागास्नी सांगाया, रघुनाथ बगाया येतोय म्हणून,' 

“६ त्स नको. मीच विचारीन सबडीनं. नाहीं तर दादांना वाटेल की, 
मी त्यांना न विचारतां परस्पर सगळं ठखून, तुम्हांला पुढं करताय. ? 


१५० लवणाची मासाळी 


अधा का आळा ला जा भा छा ५७ आ. गा क ७5 आरि आ धड करा छन गाड क खा ज्ञा ग्रा अ”... ७६८6. हकक कढी अह आड लाह ॥% हळ मळ ७ हा ॥७ क आ हहे छी क्रि ल धरा भ्या चि 


“६ तूं म्हनशील तसं. पर याया होवं. ” 


रघूनं मनाशी खूप हिशोब केला. पण वडलांना पटेल अशा रीतीने हा बेत 
सांगायचं त्याला जमलं नाहीं. रंगराव बाहेर पडणार त्याच्या आदल्या दिवशी 
त्यानं हिय्या करायचं ठरवलं तर नेमका त्याच दिवशी त्याच्या इथं निरोप 
आला---' उद्यां पाहुगे येणार आहेत, खघूला घरी राहायला सागा. 
इनामदाराच्या भाग्यानं तो निरोप आणला तेव्हां रघूपेक्षाही भटजींना जास्त 
आश्चये वाटलं होतं. पोरा-पोरांत बोलणं चालणं होतं एवढ त्यांनाहा ठाऊक 
होतं. पण या निरोपांतळे पाहुणे म्हणजे रघू-बापूचे कोणी मित्रच होते की, 
आणखी दुसरे कोणी याची त्यांना खात्री पटेना, 

-णकारण मागच्या उन्हाळ्याच्या मोसम ासून गावात येणाऱ्या पाहुण्याची 
पद्धति ठरून गेली होती. स्थळे पहायला बाहर पडणारे पाहुणे इनामदाराचा 
बापू आणि मास्तराचा बड्डूं यांच्याबरोबरच रघूचीही चौकशी करीत. कधी 
इनामदाराचं स्थळ न झेपणारं म्हणून, बंडूच्या नॉन-मंटिकनंतरच्या उनाडक्या 
कानावर येत म्हणून आणि रघू भट असला तरी हुशार आहे म्हणून त्यालाच 
जमेत घरणारे अनेक होते. कोणा एकासाठी म्हणून आलेलेही “ इतर ? 
स्थळांची सहजी चौकशी करीत. या चौकशीनं बापूच्या आत्याची काहिली 
व्हायचा. मेल्यानी भट-ग्रह्स्थ-इनामदार सारे एका मापानं मोजायला सुरुवात 
केळी. ही त्याची तक्रार, त्यांतून यंदा बापूनं मनःपूर्वक अभ्यास केला होता 
तरी छासची खात्री नाहीं म्हणून ड्राप्‌ घेतला. त्याबुळं बपूयेक्षाही रघू उजवा 
ठरूं लागला. रघूसाठी येणारेही एकदम भटजींच्या घरी न जाता इनाम- 
दारांच्या नांबामुळे त्यांच्याकडं उतरत, नाइलाजानं कां होईना त्यांना भटजी- 
कडे निरोप कळवावा लागे. अद्या दोन-तीन लोकाना रघूनं परस्पर बापूच्या- 
मार्फत वाटेला लावलं होतं, पण या खेपेचा निरोप तो घरात नसताना सरळ 
भटजींच्याकडं आला होता. 

५ घरात कशाला थांबायला हबं ? यंदा बेत नाहीं म्हणून त्याना कळवून 
टाकायचं. उगीच नसती कटकट नको. ” या खेपेला धीर करून खूनं 
वडलांनाच सागितलं, “ ती कुगकुण माझ्या कानावर आठी रे, पण एकदा: 
तुझं म्हणणं काय तें मला तरी स्पष्ट कळूं देशील कीं नाहीं १ ? 


लवणाची मासोळी १५१ 

६ झहुणणं काय ? आतां सागितलं तंच. 

८६ ते कळलं मला, पण असं किती दिवस सांगायचं ? इतके दिवस 
शिक्षण चाललं होतं म्हणन टीक हात. आता कश्यासाठी ? घरात जेवणाची 
काय तऱ्हा आहे ती तुला दिसते ना १ ? 

५६ दिसते करी - नुसती तीच अडचण असली तर स्वयंपाकाला बाई ठेवतां 
येईल, त्याच्यासाठी मळा कशाला इतक्यातच ---?? 

“ तुझी मजल फार पुढची आहे रघू. पण ती आपल्याला झेपायला नको 
का ? अन्‌ ' नाहीं ? म्हणायला तुला तरी दुसर काही कारण आहे का? ? 

५ कारण १ अजून कश्याचाच पत्ता नसताना हे लफडं नको. परीक्षेचा 
निकाल व्हायचा आहे. मग पुढं पोटापाण्याचा प्रश्ष--? 

“६ म्हणजे आतां निकाल लागेपर्येत तूं स्वस्थच बसणार का १ मला वाटलं 
होते, कुठं तरी नोकरीसाठी हातपाय हलवायला लागला असशील. ? 

“ त्याची इतक्यात काय घाई आहे र? आतां कुठं तरी घाईने नोकरी 
पत्करायची अन्‌ मागून पश्चात्तापाची पाळी यायची --“-? 


“ ते मळा काही. कळत नाही. तुला घरची स्थिति ठाऊक आहे. 
तुझ्याआड कांही मी यायचा नाहीं. पण तू काय करणार ते॑ नक्की कळलं 
म्हणजे तसं वागायला - सांगायळा बरं. ?? 


६ नक्षी मी तरी काय सांगणार आताच १ पहिला वर्ग मिळेळ बहुतेक. 
तसं झाळं तर एक वर्षे काळेजात राहता येईल. ? 

--“-कृष्णभटजींनी तेवढ्यावरच बोलणं सोडून दिलं. दुसर्‍या दिवशी 
आपल्याला इनामदाराच्या वाड्यात पाय टाकायला लागूं नये म्हणून मटजी 
सकाळचेच कुठं तरी निघून गेले. रघूनंही “ दादा घरी नाहीत ? एवढ सागून 
भाग्याला टोलवला., पण थोड्या वेळान खेडेगावची रीत सोडून कमळी त्याला 
बोलवायला आली, आणि पाहुण्याचा चिकट आग्रह सागून त्याला आपल्य़ा- 
बरोबर यायला लावलं. बापूचा प्रश्नच नसल्यामुळ पाहुण्यानं रघूबर हिंमत 
बांधली होती. रघूनं त्याला आपला विचारच नसल्याचं सांगितलं तरी 
£ मुलगी डोळ्यांखाळून घाळायळा काय हरकत आहे ? ? असा पाहुण्यानं 


१५२ लवणाची मासोळी 
*सवाल केला. “ उगीच देखावा करून त्याना कशाला दुखवायचं.?” यावर- 
' सुद्धां पाहुण्याचं उत्तर तयार होतं. “ आता चार वर्षे आम्हांला अन्‌ तिलाही 
नकार ऐकायची संवय झाली आहे. तुम्ही त्याची काही काळजी करूं नका, 
अगदी जुनाट पद्धतीने पाहण्याचा विधि झाला, पाहुण्यानं या निमित्तान 
रघू आणि बापू दोघाच्याही नजरखालन मुलगी घालून आपर्टी आमिधं पुढं 
केलीं--'' तुम्ही पसंती कळवली तर म्हणाल तितके दिवस थांबायला तयार 
आहोंत. एक-दोन वर्षे अजून तुमचं शिक्षण व्हायचं असलं तर तोंवर 
मुलगी आमच्या इथं राहील आणि आम्ही तुमच्या खर्चाचे बधूं-- ? हूं 
सगळं रघू-बापूंनीं मख्खासारखं बसून ऐकून घेतल. त्याचा नकार मूळचाच 
होता. रघूला राहून राहून सावंतानं सागितलली हकीकत आणि दिलेला 
सला आठवला. 


“पाहुणा निघून गेल्यावर, रघू फार दिवसानी घरी आलेला म्हणून 
बापूने त्याला बसवून घेतलं आणि कमळीला झकास चहा करायला सागितलं. 
अप्पा पाहुण्याना पचवायला बाहेर गेलेळे - तेवढी संधि अत्याबाईनीं साधली. 

“: काय बाबानो, तुमच्या तऱ्हा ! इतका काकुळतीला आला होता तो 
छवढा मोठा ग्रहृस्थ - पण अगदी राजेश्वर लागून गेल्यासारखे दोघंही काय 
वागलात त्याच्याशी, 

“£ मग काय आत्या ! जो तो काकुळतीला येऊनच येतो म्हणून आपलं 
आम्हीं माळ्याला हार तयार ठेवायळाच सांगायचं १ ?? ब्रापूनं हंसत हंसत 
टोला मारला. 


“ तू असाच आचरट पहिल्यापासनं बाप्या. तरी बर बहिणीच्या पायांत 
जोडे झिजवायची संवय झालीय. अन्‌ हासुद्धा आम्हीं जोळूं नये, पण जुनी 
माणसं, काहीं मनात न घरतां आपलेपणानं बघतो. या रघूला काय आता 
याच्यापेक्षा आणखी चांगलं स्थळ सागून यायचं आहे १ मला वाय्लं होतं 
रव्या, तू कांहीं जाणून वागशील -- ? 


€ त्यात काय चुकलं आत्या १ ? कमळीनं चहा आणतां आणतां मधंच 
म्हटलं, 


लवणाची मासोळी १५२३ 


का का का. शरिंश्ा रा ता शा ञा हा ख्या लाया आणा आ अड जाणि काका ता काशा शा धाशाा शाकरिता्खाञाशा क्रि शा शा क्ा्सा शा शा शा शा ७2 


५६६ उहणजे | तही यां । १ आपल्यावरनं तरी ऱो 1 
हणजे | तुंही यांना सामील का ? आपल्यावरनं तरी ओळखावं 

': ओळखावं काय १ वाटेवर पडल्यासारखं कुणी भेटेल त्याला हो 
म्हणावं १ *? 

१८६ "7 त्य १ य -्जे न चि % ज्ञ च न! 

भेटेल त्याला १ चागलं म्हणत होता दोन वर्सांचा खर्चे करतां म्हणून. 

: म्हणजे काय ९ खचाशी का लय्य लावायचं १ 

“ काय बोलणं तरी तुझ कमळे ! चागली घरंदाजाची मुलगी - काय 
बाईट होती १? नाक-डोळे सारं जिथल्या तिथं 

५६६ होय ग होय तिरळी री कांहीं दिसली नाही. एवढं मात्र खरं 
अन्‌ शिक्षणाचं तर विचारायचंच नसतं नाही का आत्या १??? कमळी खवचट- 
पण म्हणाल ४ 

: हू काय बोलतेस कमळे. तुझा तो व्हायचा होता तो नवरा, आपल्या 
आत्याच्या वडगावचा कुल्कर्णी, तो कुठं शिकला होता १? ?' कमळीनं 
नाकारलेल्या अन्‌ त्यामुळ आत्याला मिरची झोंबलेल्या स्थळाचा बापूनं मद्दाम 
उलेख केला. 


: ब्राप्या | बाप्या ! मेल्या पुनः माझ्या घरच्यांचं नाव काढतोस १ 
तुम्हाला काय चव आहे त्याची ! सगळी नवी थेरं भरलीत. नसता 
तिरकस तुंब्रा, मेळा सगळ्याचा एक कट. लावा जावा दिवे काय लावायचे 
असतील त---*? तणतणत आत्याबाई उठून गेल्या. 

८ झाल | आता हायकोर्टाचा निकाळ झाला ?? रघू हलकेच म्हणाला. 

“६ नेहमीप्रमाणं माझ्याविरुद्ध *' कमळीनं साथ कली. 

रघूला घरी परत येता येता त्या जुन्या संवादांची आठवण झाली, 
आजच्या नकारानं सगळ्यांत जास्त आनंद कमळीला झाला हं त्यानं पाहिलं, 
आपल्यासारखीच नकारानं बेजार आलेली पाहुणी - ती कमळीच्या अन्‌ 
रघूच्या दोघाच्याही गावी नव्ह्ती. रघू बेदरकारपणे वरी परत आला. 

सारी सुद्टी रघूने टिवल्याबावल्या करण्यांत काढली. रानात भटकावं, 
एखाद्या वळी बापूला अभ्यासातून ओढून पच्यांचा डाव टाकावा, त॑ नाहींच 
जमलं तर देवळाच्या मंडपांत जाळाबरोबर काहीतरी बालिश चाळे करावेत 


१५४ लवणाची मासोळी 


जास्तींत जास्त बेळ झोपून काढावा अन्‌ तरीहि वेळ जातां जात नाहीं म्हणून 
आळसावून कुरकुरावं - असं करीत जून महिना उज्ञाडला. त्या समारास 
: कसरी 'तून हंगामी येंगाऱ्या जाहिरातींचे पीक वाढलं होत. पण कठ 
एरंडोल, मालेगाव, मोडलिंब, देवगड असल्या दूरच्या आणि आयडगांवच्या 
मास्तरकीच्या जाहिराती करमणुक्रीखेरीज दुसऱ्या कोणत्याही हेतूनं रघूनं 
पाहिल्या नाहींत. युद्ध सुरू असल्यामुळं, आतल्या पानावर, महाराष्ट्रीय 
तरुणांना लष्करात जाण्याची संधि आल्याजदहलचीं निवेदनं आणि त्यातील 
आमिषह्ी मधून मधून येत असलेलीं त्यान पाहिली. पण ती कसली तरी 
आपला संब्रंध नसलेली त्रयस्थ बातमी वाचाबी त्या नजरेनं- त्या 
हिशोबानं. 

परीक्षेच्या निकालाचा दिवस जसजसा जबळ येऊं लागला तसतसा रघू 
दररोज पोस्टात जाऊन बसूं लागला. मंट्रिकचा निकाल किती टक्के लागला तें 
इतक्या वर्षात त्यानं प्रथमच मनःपूर्वक वाचलं त्यातल्या बक्षिसाच्या यदा 
चाळून तो खूष झाला. इंटर आर्टसचा निकालही त्यानं उत्सुकतेनं पाहिला. 
पण सगळ्यात गंमत म्हणजे आपण आरी. इचा निकाल पहायला विसरला 
ही आठवण होऊन त्यानं जुन्या ज्ञानप्रकाशच्या अंकाचा शाघ केला. त्याला 
सावंताचं नांव आढळलं नाहीं. तेव्हा कुठं त्याच्या ध्यानात आलं की, 
कदाचित्‌ मागच्या एकदोन वर्षातच त्यानं पदवी पदरात पाडून घेतली असेल. 

नी. ए. चा दानवारचा निकाल रविवारच्या अंकात आला नाहीं. नंतर 
मंगळवारी कां कुणास ठाऊक, खूला पोस्टात जावंसं वाटेना. घरी पत्र आल 
नाहीं तेव्हां तो चरकला; पण आपले सारे मित्र असच कुचकामी म्हणून 
त्यानं समाधान मानून घेतलं, संध्याकाळपर्यंत बापू तरी सागायला येईल असं 
त्याला वाटत होत. त्याची वेळ टळून गेल्यावर रघू एकटाच नढीकांठीं जाऊन 
बसला. तिथलं चिट्पाखरूं दिसेनासं होऊन रातकिड्यांचा किर॑ आवाज 
घुमायला लागल्यावर तो अंधारातन धडपडत धडपडत घरी परत आला अन्‌ 
वचावचा दोन घास खाऊन त्यानं अंथरुणावर अंग ठकळून दिलं. 


एक दिवस उश्शीर करून बुधवारी आलेला ज्ञानप्रकादा आणि त्यांतील 
निकालाची बातमी वाचून येणारे चार-दोन लोक यांनीं रघूला कळवलं कीं, 


लवणाची मासोळी १५५ 


दका पवा झर ज्य क १6 छा अ एका ५2 4७ आळ आढ. &8. ७७ का आ क आह लाह ७७ ४9 आ& ७७ ७७४ ७ ७४ ७ कः णि आ झा भरा आ आ १ आ. आ) &ळ ७ आ ७७ गक कक ७७ 25. आढ टि ७ 


तो दुसऱ्या बगोत पास झाला होता. आलेल्या लोकांना खूचा पडटला' 
चेहरा पाहून आश्चर्ये वाटलं. बाळनं मोठ्या आनंदानं दिलेल्या साखरेनं 
त्याला बेचेन केळ, भटजीनी देवाला अभिब्रेक केला. जेवण आटोपून ख्घू 
उन्हाचाच बाहेर पडला. पहिल्या दिवशी, शिकायला जायचं ठरल्यावर 
इनामदाराच्या घरी रहावं लागणार म्हणून तो जितका कातावला होता' 
तितकाच आतां कातावला. आता पुढ कुठं जायच, काय करायचं हे त्याला 
उमगेना. साऱ्या आयुप्यात प्रथम त्याने मोठा आत्मविश्वास बाळगून पुढच 
घेत रचले होते. कॉलेजात फेलो म्हणून एक वर्षे राहीन; तेवढ्यांत दुसर्‍या 
वर्षाची तरतूद करून एम्‌. ए. होईन अशी त्याची उमेद धावली हाती. 
ती खचली -- पंगू झाली, इतर शोंकडो पदबीघर परीक्षच्या चाकोरीतून बाहर 
पडतात, त्याच्यात एकाची भर. यापेक्षा अधिक काही घडलं नव्हतं. 

दुसऱ्या दिवसापासून तो नियमितपणे पोस्टांत जाऊन वर्तमानपत्रं वाऱ्चूं 
लागला. त्यातल्या * पाहिजे ) च्या जाहिराती लक्षपूर्वक टिपू लागला. फारशी 
चिकित्सा न करतां अजञ टाकू लागळा. पण वेळ निघून गेळी होती. अगदी 
अपरिचित अश्या रत्नागेरी जिल्ह्यातल्या एका शाळेनं त्याला पस्तीस रुपयावर 
यायला तयार आहात का म्हणून विचारल. एक दिवस थाबून रघून होकार 
कळवला, पण पुनः त्याला काही कळलं नाही. आठ दिवसानी पाठवलेल्या 
स्मरणपत्राचं उत्तर आल, “' तुमचा होकार दोन दिवस उशिरानं कळला. त्या 
आधीच जागा भरली गेली. ? 

गावात रिकामा राहून दिवसामागून दिवस ढकलणं रघूळा अशक्य होऊ 
लागलं. बाहेर कुणाकडे गेलं की, “' आता पुढं काय ? ? असं विचारून 
प्रत्येकजण बेजार करी. रधूनं बाहेर जायचं सोडलं. घरी वेळ जाण्यासाठी 
पत्त्याचा डाव माडायला त्यानं सुरवात केळी. बडील आणि दोघ मुल राज 
दुपारच्या वेळेला पत्तेकुटी करू लागले. सारा पावसाळा त्यानी अशा 
रीतीनं संपवला. 

गेलीं तीन वषे घरांत काय चाललंय याची फारशी दखल न घेतलल्या' 
रघूला या काळात नवनवे शोध लागले. पावसाच्या दिवसांत बाळचं दर 
आठ-पंधरा दिवसानी अंथरूण पडायचं. भटडींनी त्याला कसला तरी 


१५६ लवणाची मासोळी 
काढा करून द्यायचा, दिवसामागून दिवस एकभुक्त राहून काढायचे. जेवण 
म्हणून ताटांत पडणाऱ्या पदार्थात कधी नुसतीच भाकरी अन्‌ चटणी, कधीं 
नुसताच भात, कर्धी थालीपीट अशी भुकेची गरज भागवण्याची तऱ्हा 
रघून पहिल्यादा पाहिली. आपल्या घराचं हँ दर्शन रघूळा नुसत्या सुट्टीत 
कर्धी झालं नव्हत. कृष्णंमटजीनीं ते होऊं दिलं नव्हतं. पण दीड-दोन 
महिन्याच्या सट्टीची गोष्ट वेगळी अन्‌ सहा महिने सतत राहण्याची वेगळी. 
रघूला जीवनाची ही रोजची व्यवहारी बाजू डोळसपणे पहायला मिळाली 
तेव्हा तो एका दमात आपल कॉलेजच सारं जीवन विसरून गेला. 


>< > >< 


चार-दोघाच्या आळखी आणि प्रत्यक्ष गाटीभटी यावर मिनतवारीन 
रघून एका नव्या शाळेंत नोव्हूभरपासून मास्तरकी मिळवली आणि मग एक 
'दिवसाचाही उशीर न करता गावातलं आपलं निऱ्हाड हलवलं. सतत बाबीस 
वर्ष ज्या वास्तू्शी कमीअधिक सजंघ आला त्या गांवातन बाहेर पडताना 
वेळेवर मोटार गाठण्याच्या घाइडिबाय दुसऱ्या कोणत्याही विचाराभावनेनं 
त्याला स्पर्श केला नाही. कृष्णंभट्जीरनीं मात्र गाव सोडताना मागच्या साऱ्या 
गोष्टींची आठवण विसरून सर्व यजमानाचा निरोप घेतला, “' रघूला नोकरी 
लागली, आमची पळी-पंचपात्रीची मिरास संपली *' हे सांगण्यात त्यांचा 
अभिमानही होता आणि विषण्णताही होती. 


€"< 


तिथे गेल्यावर त्या बदलाने बराळची प्रकृति एकदम सुधारू लागली. नव्या- 
नवळाईत भटजीही पोथ्या-पुराणाच्या आवृत्त्या करण्यात वेळ घालवू लागले. 
शिक्षकाच्या नब्या पंशात, रघूचा खय वेळ तयारींत जाऊं लागला, 


शाळेचं वातावरण खवूला वेगळं वाटलं. शिवपूरच्या मानानं हें गांव किती 
तरी लहान. त्यांत ही नव्यानं काढलेली शाळा. जमतेम दीडशे मुल हार्ती 
ाळेंत. एका जुनाट वाड्यात कामचलावू बदल करून वर्ग भरायचे. खूच्या 
खेरीज बाकीचे बहुतेक सारे - म्हणजे सहा मास्तर गांबचेच होते. त्या 
प्रत्येकाची कुठं थोडी-ना-थोडी शेती किंबा भावाचं एखाद किरकोळीचं दुकान 
असं कांही तरी बाहेरचं आकर्षण होतं. गणितासाठीं मागवावा लागलेला 


लवणाची मासोळी १५.७ 


क ७७ कड 90 ७७ आ. आहा अक क डा क अ आ. चि शक अड धा &5 “क आड या गह. ७७ कड आढ अश बळा अळा अह आ कर क आळे हाड आक क आ. झा कका हक हक आ हह. झा काड. हले. ७७ 88 क 


जी. एससी. आणि संस्कृतसाठीं आलेला रघू हे दोघेच ब्राहेरचे. त्यातला 
गणिताचा मास्तर शास्त्राचाही बोजा उचलायचा. त्यामुळं तो चार उपकरणाच्या 
प्रयोगशाळेत बराच वेळ स्वतः गुंतून गेल्याच दाखवीत अस. 

“८ रामः रामी ?? - शिकवण्यात रघूला सुरवातीला कसलाही आनंद वाटत 
नव्हता. त्याची उणीव भरून काढायची त्याला इच्छा हाती. शाळेच्या या 
वातावरणांत त्याची इच्छा इतराच्या पथ्यावर पडळी. मलाचे खेळ घेण, 
त्याना भापणाची सवय लावणं, त्याच्यावर सवसामान्य देखरेख करण- या 
गोष्टी एकेक करीत खूकडे येऊं लागल्या. त्या निमित्तानं नव्या जागी- 
मास्तराचा उत्साह शाळेच्या चालकाना फार झावडला, 

फेब्रवारी माहिन्यांत दोन-चार मुलानी रखघूळा शिकवणीबद्दल विचारलं. 
शिकवणीच्या प्रातात तो अगदीच नवखा होता. त्या मुलाना शिकवणी सवे 
विषयाची हवी होती. रघू शिकवायचा संस्कून आणि मराठी, त्यानं आपल्याला 
सारे विषय शिकवायला जमणार नाहीं म्हणून सागितलं. मुलं खटटू झाली 
याची त्याळा कल्पनाही नव्हती. शिक्षकाच्या खोलींत रघूनं शिकवणी 
नाकारल्याचं कळलं तेव्हा त्याच्या सहकाऱ्याना आश्चर्य वाट्ल. पणतंन 
दाखवता त्यानीं मुलाच्या अडचणीविपर्यी कळकळ दाखवून त्याच्या नावाची 
चौकशी केळी. रघूला ती माहीत नव्हती हें कळल्यावर ते थक्क झाले. 

एप्रिलात शाळेच्या वषअखेरीच्या कामाचा बोजा वाढला. शिकवण्या न 
करणारा एकुलता एक मास्तर म्हणून मख्य शिक्षकानी त्याला मदतीला 
बोळावलं. रघून मुकाऱ्यानं सारी पत्रकं, नव्या वर्षांची पुस्तकं, ग्रॅटसाठी 
भरायची माहिती या बाबतींत करता येतील तेवटे कष्ट केळे. ते सपल्यावर 
मुख्य शिक्षकानी त्याला कपभर चहा पाजून त्याचे आभार मानले. 


जून महिन्यात रघू पुनः त्याच शाळेंत काम करूं लागला. त्याच्यावर 
मोठी मेहेरबानी केल्याचा किंबा करण्याचा देखावा मंडळान केला असला 
तरी अदरकी बात बाहेर झालीच. युद्ठाच्या काळात शाळातल्या नोकऱ्याकडे 
वळणाऱ्य़ांची संख्या रोडावली हांती. अन्‌ त्यांतल्या त्यात आडगावाला 
यायला कोणीच तयार नव्हते. रघूच्या शाळेतला ब्री. एससी. खडकाला 
मोठ्या पगाराच्या नोकरीवर निघून गेला होता. गावच्या एका दुसऱ्या 


१५८ लवणाची मासोळी 


मास्तरानसुद्धां रोशनिंगमध्ये इन्स्पेक्टरची नोकरी मिळाल्यावर राजीनामा दिला 
होता. तेव्हां घाईनं मंडळानं रघूला नेमणुकीचा हुकूम देऊन त्याचं काम 
मुद्दाम केल्याचा देखावा उरकला होता. 

त्या वेळी खघूला हें कळलं नव्हतं. पण कळल्यावरही त्यानं तिकडे विशेष 
लक्ष दिलं नाहीं. सहा महिन्याच्या जुन्या अनुभवामुळं, त्याच्या कामसू वृत्ती- 
मुळे, शाळेच्या जगात त्याचं एक स्वतःचं लहानसं स्थान निर्माण झालं होतं. 
नोव्हूंबर महिन्यांत दहा पुस्तक वाचून, बिचकत बिचकत वर्गोत शिरणारा 
रघू जूनमध्ये घडाक्यानं आपले तास घेऊं लागला. त्याला शिक्रवण्याची, 
बर्गोतल्या मुलात मिसळण्याची गोडी लागली. निरुपाय म्हणून पत्करलेली 
नोकरी हाच आपला आवडता व्यवसाय आहे हें त्याला कळून चुकलं दोन- 
तीन वर्षे उसन्या ऐटीनं दाखवलेला रुबाब उतरून गेला आणि ज्या स्थितीं- 
तून आपल्याला जावं लागलं तिची जाणीव प्रबल झाली. 


आज ना उद्यां बी. एस्सी. मिळेल या आठदोवर दोन महिने गणित आणि 
शास्त्रांच्या तासांची विल्हेवाट लावण्यात आली होती. ऑगस्ट महिना 
उजाडून गेला तरी गणिताची पुस्तकं उघडली जायर्ची चिन्हं दिसेनात तेव्हां 
शाळेचे हेडमास्तर बेचेन झाले. त्यांनीं आलेल्या चार अजेंदारांना बोलावणं 
पाठवलं. त्यांतले दोघेजण आधीच दुसरीकडं लागले होते. शेवर्टी एक 
गावांतला इंटर नापास हजर झाला. आणखी एक जागा भरायची होती. 
हेइमास्तरांनीं सगळ्या शिक्षकांना बोलावून कोणी ओळखीचा माणूस 
असल्यास त्याला सरळ बोलावून घ्या म्हणून सांगितलं. 

रघूच्या डोक्यांत उगीचच कल्पना आली. त्यानं बापूला भेटायला येऊन 
जा असं कळवलं, बापू आला, 'सध्यां रिकामाच आहे. जुळल्यास चार महिने 
काम करीन * असं त्यानं सांगितलं. रघूच्या ओळखीनं बापू त्या शाळेंत 
मास्तर झाला. तो उतरलासुद्धां दोन दिवस रघूकडे. 

वेळापत्रकांत फेरबदल करतांना पुनः गणिताची अडचण आली. खघूचं 
इंटरपर्यंत गणित झालेलं म्हणून मराठीच्या ऐवजी गणित शिकवायचं त्यानं 
कबूल केलं, त्यानं आपण होऊन सांगितलेल्या या माहितीनं त्याचा भाव 
बाढला. पण पगार मात्र शाळेला परवडेल असाच पस्तीस रुपये होता. तरी- 


छवणाची मासोळी १५९ 


बढा्ाजा ७ छा. या का ७ काता प्र त्रा काळा ळ्राछा का आका का का का ळा 98 ग्र क का झा छा हड घड छा छा घा घड छा घ्य छा ७६ ह झा त घे ताड त तल पळ ताळे 


सुद्धा रघू खुषीत होता. बापूनं वेगळी खोली घेतली असली तरी त्याचा 
बहुतेक वेळ रघूच्या संगतीत जायचा. त्या संगतीनं रघूला चाळूं घडीत आराम 
वाटूं लागला. 

बापूच्या येण्यानं, एक वर्षातल्या कालेजमधल्या किंवा त्यापेक्षाही आधिक 
प्रमाणात कालेजमधल्या जुन्या जोडीदारापैकी कांहींच्या हकीकती रघूला 
ऐकायला मिळाल्या -- 

गांवाच्या हद्दींतनं बाहेर पडून नाक्‍यावरनं माठ्या रस्त्याच्या बाजूनं खुप 
लाज किरायला गेल्यावर रघूनं बापूला विचारलं--- “' काहीं नवी-जुनी 
हकीकत सांग कालेजची---?? 

' तुला कांहींच पत्ता नाही ? सांगण्यासारखी एकच फार मोठी हकीकत 
घडून आली शिवपुरांत, तिथल्या वर्तमानपत्राना दोन महिने पुरठी होती. 

“६: घण इथं तिकडची वर्तमानपत्रे कशाला येताहेत १ ” 

८६ कुणासंबंघी हकीकत असेल याची तरी तुला कल्पना येते £ * 

“ काही सागतां येत नाही. असेल तुझ्या बंगल्यांच्या जगांतली एखादी 
भानगड. दुसरी कुठली असणार १? 

“ अगर्दी फसलास |! 

“६ शक्य आहे. कालेजच्या जगापासून गेल्या वर्षोत मी इतका वेगळा 
पडलो आहे की मला त्या वातावरणाचा विचारच करतां येईनासा झाला आहे.!” 

“ तुं दिसतंच आहे. मी तर आठ दिवसांतच या गांबाला कंटाळून 
गेलांयू. पण तूं मात्र अगर्दी रमून गेलेला दिसतास-- 

*' त्यांत काय विशेष ! पण विषय पालटू नकोस. ? 

“ ब्रातमी एवढीच की कात्यानं लय़ केलें एलएल, बी, झाल्याबरोबर- ?? 

“६ हाक्त्याच्या, मागच्या वर्षी बायको मेल्यावर तो परीक्षा होईपर्यंत थांबला 
हच जास्त. पण मला वाटलं वर्तमान पत्रांना खाद्य पुरषणारी बातमी 'तक्षीच 
खमंग असेल. ?' 

“६ घण ते कुगा्शी ठाऊक आहे का ? त्यानं हवा तेवढा खमंगपणा 
मिळाला वतेमानपत्रांना--- ?? 


१६० लवणाची मासोळी 


काक.» »५॥ करा धा लभ जं डि अ क करा आ रि क क ॥8 ७७ करा काशा का शि तरा आ का का कि ७ क त्रा & करा ळा शा ला ळा. ओो. १ आ कहे क शी का आ या का आ ७७ ७७13 


५६ असा काय दिवा लावला त्यानं १ ? 

£ कात्यान लय़ केलं तं त्या खानावळवाल्या अंबूशी. साग आतां, आहे 
की नाही खमंग बातमी £ ? 

“६ म्हटलं तर आहे. शिवपूरच्या वातावरणाऱ व्यापाऱ्याच्या मुलानं त्राह्म- 
णाच्या मुलीशी लय़ केलं तर त्याचा मोठा बाऊ व्हायचाच ! ?? 

“६ तूं तर अगदीं स्थितप्रज्ञासारखा बोलतोयस - पण यांत नुसता मिश्र- 
विवाह नव्ह्ता. जऱ्याच भानगडी होत्या-- ? 

:६६ भानगडी काय असणार ? आर्था बरच दिवस जमवलं असेल. फारतर 
दोघंही जोडीने फिरायला जात असतील. हच कीं नाहीं £? 

६ मुला बनवू नकोस रघू, अंबू कुंकू लाबीत नव्हती हें सगळ्यांना ठाऊक 
होतं. तूं तर तिथे केक दिवस जेवीत होतास --? 

६ म्हणजे काय, मिश्रविवाह अन्‌ पुनर्विवाह एकदम झाले हेंच ना?? 

६ शहाणाच आहेच ! पुनर्विवाह करायला अंबूनं आरघी कर्धी अन्‌ 
कुणाशी लज केलं होतं १? 

:£ पण ती कुंकू लावीत नव्हती म्हणन पुनर्विवाह आहे असाच देखावा 
केला असेल-- ” | 

 छटू ! तिचं टय़ झालेलं नव्हतं ही ह॒कीकतही अचानक मागाहून वाहेर 
पडली. ती कुंकू पुसून रद्दात हाती ते उगीच नाही. तिच्या कुकू पुसण्याचा 
मोठा इतिहास होता. शिवपुरात यायच्या आधी तिनं गुण उघळले होते. ते 
निस्तरतांना तिळा कुंकू पुसून पंढरपूरची बारी करावी लागली होती. याचा 
कुणालाच नव्हता. पण काल्याच्या लज्लानंतर त्यांचा फोटो प्रसिद्ध झाला. 
कुठून तरी तो आपल्या तुमच्या चंची छुञ्रांताचा पंढरपूरकर जोशाच्या पहाण्यात 
आला अन्‌ त्यानं पंढरपुरातनं पत्न पाठवलं. त्या पत्राने अबूचं सारं वेड 
बाहैर फुटले---?? 

आता खरोखरी धक्का बसण्याची पाळी रघूची होती. तरीसुद्धा एकदम 
सावरून तो एवढंच म्हणाला, '“ या पढऱ्याला कुणी सागितले होते नसते 
उद्योग करायला ? ?? | 


लवणांची मासोळी १६१ 


“6.5 ७ ७७ ५४ 98) ७ ७ धरा क ७ ७७ ७ ७७ ४७ 8७ 48 ४99 ,% केशरी १७७ कि १७% ४ क्रि किं % 858 8 ”8ि किं कॉ ७ 850 &७ ७७ ७३ छा 34 झो 8७ कक करक शा अक छे 


“ त्यानं तं गंमतीनं म्हणून कळवलं. ते कात्याच्या कानावर मेल्यावर 
त्याची फारच पंचाईत झाली. कारण हृ बाळ, घरातल्या धसपु्लीनं कर्धी कधी 
खानावळीत जेवायला जायचं, तिथं त्यान जमवलेलं, अन्‌ ते जमतांच अंबूनं 
घाईनं लय़ करायचा हृट्ट घरला, ' लय केळं नाही तर पंचाईत होईल असा 
धाक घातला ) --लञ्म झाल्यावर कांत्याच्या ध्यानात आलं, ती पंचाई 
बिंचाईत सारी खोटी होती. खरी ती आधीच होऊन गलेळी होती. पण 
आईंजापाना न जुमानता कलेल्या लम्नामुळे त्याला तोंड उघडायची सोय 
राहिली नाही. 

€ चालायचंच. जातील चार-दोन वर्षे तस सारं थंडावून जाईल. कशाला 
त्याच्याअर एवढी चर्चा हवी ? ?? 

“बा |! हा नवीनच अवतार दिसतोय तुझा ! ?? 

“ हृ | अनुभवान दाहाणपण येतं. नको असलं तरी येत---*? 

“८ असे काय अनुभव घेतलेस माझ्यापेक्षा जास्ती १? * 

“६ लो प्रश्न निराळा आहे. पण माणूस जोपयंत काहीच करीत नाहीं, 
तोपर्यंत धडाकून मोठमोठी तत्त्व आणि शुद्धाथुद्धतेची महृती सागण्यात 
आनंद मानतो. पण आपण माणूस आहो हें विसरतों, चुकणं हें माणुसकीचे 
लक्षण द्दी अगदी नेहमीच्या परिचयाची व्याख्या ! पण ती डोळ्याआड होते.?१ 

“ ए, तुझी व्याख्या अन्‌ व्याख्यान राहू दे--? 

£ व्याख्यान नाही. पण आहे इं असं आहे. चुकणे हें माणुसकीच लक्षण 
म्हणा की चुका केल्यानं माणुसकीचं मोळ कळतं म्हणा---पण त॑ कळल्या- 
शिवाय भागणार नाही. प्रत्येकजण कर्धा ना कधी चुकतोच; तशी अंबूही 
चुकली असेल एखादे वेळी, तेबढ्यावरून ती कारही सदाची पापी ठरत नादी . '? 

: हृ कात्याला ऐकव कर्धी तरी, छाती झाली तर-- ” 

6: ऐेकवायला माझी काहींच हरकत नाहीं, पण तशी बेळ येईल असं 
मात्र वाटत नाहीं, त्याचं जग निराळं, माझं निराळं--” 

£: हतका वबिटलास काँ रघू १? मला तर बाटत होतं इथं तूं चांगला रमला 
आहेस. आनंदात आहेस. शाळेंत तरी तसा दिसतोस. मग एरवीच अल्ला 
का? तुझी तब्धेत ठीक नाही का १ 

ल. मा...११ 


श्ड्रे लवणांची मातोळी 
अगाथा क “4. जा शक 5 आहे गक 9६ 98 ७७ ०७ ०5 20 ८ आ ळा मढ आभा क. ४६ >. हा. 5 ळा. अ. 88 70 & आयो छो आ सि. आ. जा. कह आवा. -मो अ. आढ. शड घ्या अक आह घ्या कळे हक कक 

तब्मे॥थला काव साल्य ? अन्‌ मी तरा विटलळा अस कशयावरन म्हणतास 
धापू ? माझी तूरतच दी अश --- 

"६ ही मात्र बराय हं. तुळा मी कठिजात बघितला नसता तर हंपद्धा खरं 
मानल असत. पण मी खर सागू 

: साग. माझ्याबद्दळ माझ्यावेक्षा तुलाच अधिक कळत असलं तर ते 
ऐकायला माझी ना नाही. झाळेवल्या मास्तरकीनं म्हण की. आतापर्यतच्या 
नथनुभवानं म्हूण - काहीही नर्व एकायला माझी तयारी आहे.” 

“६ रचू , मळा वाटतंव दुस काढी तरी बिनसले आहे. पदिला वर्ग न 
एमेळाल्यानं इथ खितगताये लागत म्हणून असा का दुसऱ्या काही कारणानं 
असो, तुजा शाळेतला उ साह वरवरचा आहे. तुळा आयुष्यात खरांखरी राम 
वाटत नाही. कश्यासाठी आपग ह्‌ करता याचा उळ्गडा होत नाही, म्हणून 
पुदी तळमळ चालली आहे. 

८: असेल कदाधित्‌, पण असळीच तर हा. तळमळ माझ्यासारख्या 

काची आहे; माझी एकट्याचा नाहा ा. 

५ अगदी बरोबर, तुथी तळमळ दी तुझ्यासारख्या प्रत्यकाची आहे; अन्‌ 
-म्याचा उपायही ठरलेला आहे. तोच तूं करायडा हवास, 

५: साग ना. करायसारखा असला तर अवश्य करीना) 

८ घा वयात अक्षी विषण्णता येते. निरथेकता वाटायला लागते. तेव्हा 
उरा पुण्या वला गमावलेला अर्थ शोधून जवळ करावा लागतो. आपल्याला या 
घा हीत फारसे कष्ट करावे लागत नाहीत, पण फक्त उमज पडायला वेळ 
झाराती एवढंच. 

“६ ब्रापू , आतां तूंच कसल्या तरी गूढु तत्त्वशानात शिरलेला दिसतोप. !' 

८ छे | अगदी साच्या माघेत सांगायचं म्हणने कशासाठी - कुगासाठी 
था प्रश्षाचं व्यवहारी उत्तर जवळ केलं पाहिजे, तूं आता लय़ाचा विचार कर; 
उड्दणजे तुझी सारी तळमळ दात होईल--” 

*६ हृतू ठेका ! दोबटी डोंगर पोखरून हाच का उंदीर बाहेर काढलास | "' 

4६ तूं वाटेल ते म्हण पण मला आपलं वाटतं - तुझी स्थिति सुधारायचा 


रछवणाची मासोळी १६३ 
हीच उपाय आहे. निष्कारण अंगाबाहेरच्या गोष्टींचा विचार डोक्यांत 
घोळायला नको असेल तर मन रोजच्या संसारात रुंतलं पाहिजे.!' 

:: मग तं हा उपदेश कुतीनं खरा करून दाखव की. ! 

“६ प्री काहीं अजन तुझ्यासारखा तळमळत उदास हाऊन राहिला नाहीं 
अन्‌ मला सध्या हा विचारही करतां येत नाहीं कमळीचं लग्न होईपर्यत. 

का ? कमलनं तशी अट घातली आहे कीं आत्याबाईनी ? *' 

'। अट कोणींच घातली नाही. पण मी अजून मास्तरकींत रुतर्ला नार्ही. 
माझा विचार कोणत्या ना कोणत्या रीतीने एम्‌. ए. व्हायचा आहे.! 

“: अस्सं ! अस्सं ! म्हणून माझ्यावर उदार झालास होय ? ?' 

: उदार होण्याचा प्रश्न नाही. हें बोलणं अगदी सहर्जा निघाल - माझं 
म्हणणं पटत नसलं तर सोडून दे. पण --? 

५: चृण काय ? आणखी काहा सागणार आहेस ? ? 

': तूं मला स्वार्थी ठरवणार नसलास तर | तसं कब्रूल करीत असलास 
तर सागतो. माझ्या मनात एक विचार आला आहे -- 

“ खुशाल साग. तुला कशाला स्वार्था ठरवू मी ! अन्‌ ठरवलं तर 
त्याचा अर्थ एवढाच की प्रत्येक मनष्य थोडाफार स्वार्थी असतोच.?!' 

५ साड्या मतात असं आलं आहे - तुला मधघाचं म्हणणं पटत असेल 
तर तं आमच्या कमळीशींच का लग्न करीत नाहीस १? नार्ही तरी लहानपणा- 
पासून तुमची एकमेकाना आढ आहे हे॑ निदान मला तरी पुरत ठाऊक 
आहे! 

:- ब्रापू, काय बोललास तें तुझं तुला तरी कळल का? का इथं येऊन 
वू इनामदार अन्‌ मी भट हं विसरलास १ *' 

५ र्या | उगीच टोचूं नकोस मला. मी कसला इनामदार आहे हे 
मला अन्‌ तुला दोघानाही चांगलं ठाऊक आहे. आज तुझ्या ओळखीनं 
इथं काम करतो म्हणून घरच्या कटकटी अन्‌ कर्जाच्या आठवी तरी विसरून 
जाता येतात.? 


५ भड 


ते खरं. पण हे तुझ्या अप्पाना आगि आत्याब्राईना पटलंयू का ? 


१६४ लवणाची मासोळी 


का ला ळा कशाचा आला शा झा क ७ ७ का हा ७ शा गक ७७ »8 कक “9 ७७ हहे क कर अ क का का आ आ क्या का ४७ ४७ 50 फा का ग्रा ळा का ७७ अ १७ एक अथे झा धक 


6६ त्याच्या पटण्याशी काय करायचं ? त्यांना पटून कमळीचं लब होई- 
पर्येत तुझा मुलगा येईल लग्नाला ! तूं हो म्हण; मी. कमळीला इथं हवा- 
पालटाला म्हणून घेऊन येता. परस्पर लन्न उरकून सावकास घरी कळवू.” 

६ तूं घोड्यावर बसला आहेस बापू, पण तं शक्‍य नाहीं. ? 

:: नसायला काय झालं १ तुझ्या वडलांची समजूत मी घालीन, हबं तर 
मुलींचा भाऊ म्हणून त्याच्यापुदं नाक घाशीन. 


०» 


:८ औ त्या अर्थानं म्हणाला नव्हता. ” 

* मग काय ? तुला एवढ दिसत नाही का १? कमळीचं मन तुला अजून 
कळले नाही असं का तूं मळा सागणार आहेस ? ? 

“६ छे | तसं कार्हींच म्हणणं नाहीं माझ. माझी अन्‌ कमलची ओढ त्रधु 
भगिनीच्या विशुद्ध नात्याची आहे असंही भांदूपणानं मी तुला सागणार नाही. 
आणि नुसत्या कमलच्या मनाचा प्रश्न असता तर तूं विचारायची वाट न 
पहाता मींच तुझी मदत मागितली असती. पण---?) 

“६ मग अडचण कसली उरली ? ”? 

“। अडचण हीच की, माझं मन तुला किंवा कमलला कुणालाच कळलं 
नाहीं. माझं मला सुद्धां इतके दिवस कळलं नव्हतं. ” 

“£ मग हा शोध केव्हा लागला ? ”? 

५६: सहा महिने त्रेकार राहिल्यावर, ? 

८ काय लाघ लागला तं तरी कळूं दे. 

६: दुसरा काय असणार ? तूं-मी मित्र म्हणून कितीही जवळ आलां तरी 
रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपल्यांतळं योजनाचं अंतर दूर होणार नाही. 
तें अंतर तुटल्याचा भास, हा नुसता भास आहे.” 

: काहीं तरी अधांत्री बोळू नकोस, कसलं अंतर आहे ? ”? 

££ भेतर परिस्थितीचं आहे, तुम्ही खालावलां तरी इनामदार आहात. 
मी कितीही वर चढला तरी माझा मूळचा पिंड दरिद्याचा आहे. कमल आज 
कोणत्याही स्थितीत आणि कितीही गरजू असली तरी ती इनामदारीण आहे. 
मी भट आई. ? 


छबणाची मासोळी १६५ 


“६ हू सारं तुझ्या मनचं - सांगायपुरतं निमित्त.? 

५ निमित्त नाही. मी मनोमन सांगतो. तुमच्या किंवा पाढरपेद्ाच्या 
कुठल्याही घरांत बायकांना काय किंमत असते ते मला ठाऊक आहे. त्रयांना 
शूद्रांच्या कोटीत घालणारा मनु अजून घरोघरीं बाबरतो आहे. त्या अर्थानं 
कमलच काय, कोणतीही स्त्री शूद्र, गुलाम आहे. पण ती कोणाच्या घरांत 
वावरणारी आहे यालाही महत्त्व आहे. मला ते परवडणारं नाही. मी आपली 
पायरी सोंडून वर जाण्याचा प्रयत्न केला नाही. असं नाही. तो साधला 
नसता असंही नाहीं. आज तूंच कमलबद्दल विचारलेस तेव्हां ते साधण्याचाही 
प्रश्न नाहीं. पण तें मळा करायचं नाहीं. मी जिथून आलां त्याला पारखा 
होऊं इच्छित नाहीं. गटेच्या फाऊस्टच सुख किंवा दुःख - जे काय असेल 
तें - ते घेण्याची माझी तयारी नाहीं. 

“६ तुझं बोलणं काही मळा कळळं नाही. पण तुझा नकार समजला. मी 
कमळीला जमेल तेव्हा कळवीन. तिला फार आशा वाटत होती.?? 

:: त्याची जाणीव मलाही आहे, पण माझा नाइलाज आहे. ? 

>< > >< 

गणिताचे मागासलेले अभ्यास भरून काढण्यासाठी मधली सुट्टी, शनिवार- 
रवित्रारचे जादा वर्ग या उपायांचा अवलंब रघू करीत होता. त्यामुळं पुष्कळशा 
विद्यार्थ्यांना हें ओझं पचेनासं झालं. रघूच्या शिकबण्याबद्दळ त्यांची तक्रार 
नव्हती. त्यांतल्या कांहींचे तर फारच हाल व्हायला लागले. त्यातल्या त्यांत 
सस्थितीत असलेल्या पाच-सहा विद्यार्थ्याच्या गटानं रघूला भीत - भीत 
विचारलं-'' सर, आम्हांला गणित जमत नाही वगीजरोबर खाजगी शिकरवाल 
तर बरं होईल--- ” 

६ पण सुद्टींत मी घेतोंच आहे. त्यातून तुम्हाला अडचणी असतील 
तेवढ्या विचारा म्हणजे झालं, ? 

“८ तसं जमण्यासारखं नाहीं सर. आम्ही हबी तर शिकवणी दंऊं. ? 

“६ मी. शिकवण्या करीत नाहीं. तुम्ही शिकवण्या करणाऱ्या शिक्षकांना 
बिचारा. आपल्या शाळेंत नसले तरी गांबांतल्या दुसऱ्या शाळेंत गणिताचे 
कोणी शिक्षक असतीलच शिकवण्या करणारे--- ? 


१६६ लवणाची मासोळी 

“' आम्हाला दुसऱ्या कोणाची शिकवणी नको. तुम्हीच आम्हांला शगिक- 
वायला हवं. तुम्ही सांगाल त्या तऱ्हेन-- ” 

£ ठीक आह. शाळा सुटल्यावर घरीं येत जा. आणखी ज्या कोणाला 
हवं असेल त्यांना यायला सांगा.? 

दुसऱ्या दिवसापासून जवळ जवळ सारा वर्ग रखूच्या घरी हजर झाला. 
बैठकीच्या लहानशा खोलीत दाटीवाटीनं बसून त्याचा अभ्यास सरू झाला. 
दोन-तीन दिवस गेल्यानेतर रघूनं घरी न येणाऱ्या दोन-तीन विद्याथ्यांना 
एकीकड बोलावून विचारलं, “' तुमचं गणिताचं ठीक आहे ? काही अडचण 
नाहीं ? घरी यायची जरुरी वाटतनारही ना??? 

ती मुळं ग'प राहिली. रघूनं पुनः त्यांना तेंच विचारलं त्यातल्या एकानं 
सांगितलं, “ जरूर नाही कशी सर १ पण आम्ही यणार कसे तुमच्या घरी १ 
आम्हांला ते परवडायचं नाही --- ?) 

: कां £ कुठून लावून - परगावाहून येता का तुम्ही ? लवकर जाव 
लागतं १ 

£ तसं काढी नाही. पण डिकवणी आम्हाला परवडायची नाही? 

यात न परवडण्यासारखं काय आहे ? 

६ शिकवणीचे पैसे--? 

६ तुम्हाला कणी सागितळ ? टिकवणीच्या पैशाचं मी नाव तरी काढलं 
होतं १ कुगाच्या डोक्यातनं निघाठी ही कल्पना ? ? 

५: आम्हाला ठाऊक नाहीं, पण ब्राकीच्य़ा मुलांच्या भोलण्यांत आलं, 
काहीं तरी दोन-दोन रुयये प्रत्यकानं द्यायचे दर महिन्याला, आम्हाला तें 
कुठून परवडणार ? म्हणून आम्ही आलों नाहीं. 


£ वेड झमाहात. आजयासून यायला लागा--? आणि त्या दिवशी 
भूमितीचं प्रमेय सांगायच्या आधी खून साऱ्या मुळांना दरडावून पण कुणाचं 
नांव न घेता म्हटळं, “' माझी बदनामी करणारे विद्वान कोण आहेत इथं 
मी शिकवणीचे पैसे घेणार आहे असं सागून, शिकवल्याची फेड करण्याची 

, कामगिरी कुगी अंगावर घेती आहे? ? 


लवणांची मासोळी १८५७, 

मुळ गप्प राट्िलीं, रघूडी गप्प राहिला. थोडा वळ थांबून तो म्हणाला, 
£ याचा छडा लागल्याठिवाय मी शिकवणार नाहीं. सांगा. कुणी माझप्रा- 
बद्दलचा हा शोध ळावळा आह? ? 


पांच-दद्दा मिनिटं अत्ना चूपचाप वातावरणात गेल्यावर एका मुळान 
रघूजवळ येऊन हळूंच म्हटळं, “ दिकवणी संपल्यावर मी सांगीन. आम्हा 
मुलाचा त्यात काही सतंध नाहीं ” तं खरं समजून रघूनं शिकवणी चालूं 
केळी, शिकवणी संपल्यावर त्या मुलानं सागितळं, र्घूच्या घरी सारा वर्ग 
जाऊं लागणार हें कळल्यावर एका जुन्या शिक्षकाने चौकशी केळी होती. 
आधी त्याची दुसऱ्या एका गिक्षका्शी कुजबूज चालली होती अन्‌ त्यांत या 
कानामागून येऊन तिखट झालेल्या जोशानं लाट मारल्याचा उल्लेख होता. 
मुलाशी बोलताना त्या शिक्षकानं, ' आधीं पेसे ठरवा - मागाहून तुमच्या 
आवाक्याज्राहेरचे पेसे द्यावे लागतील. नाही दिळे तर फार्मच्या बळेला 
काटा निघेळ -- ? अशी प्रेमळ सूचना देऊन, “इतक्या मुळांना एकाच धमडग्यात' 
शिकवायचं तर दोन रुपयाच्यावर देऊं नका? अशी मरस्वलाशी केली होती. 
तिच्यावर वर्गात मुल बोलली होती, एवढंच -- 

या माहितीचा रघूबवर पारिणाम झाला नाहा. असं नाहीं. पहिल्यादा 
त्याला वाटल होतं, वर्गातल्या मुळांना आपण नाव न घेता सुनावलं, तसंच 
एकदा शिक्षकाच्या स्वोलीत सुनवाव. पण ही त्याची उबळ फार वेळ टिकली 
नाही. काही झालंच नाही. अश्या रीतीने वागायच त्यानं ठरवले. श्रमानं तो 
पार दमून जात होता त्यामुळं शिक्षकाच्या खोडीत चुकून कारही. वेळ तो 
राहिला तरी गप्प-गप्य रहात असे टोबटी एकदा तो. विषय शिक्षकाच्या 
खथोळीत निघालाच. 


:' काय जोशी मास्तर - इतक श्रम करून चालायच नार्ही, आपल्याला! 
झपेल त्याच्याबराहेर जाऊन भागणार नाही, 

५६६ कसले श्रम १ जेवढं आवट्यक आहे तेवटंच मी करतो. ? 

६ ठेवढंच काय ! जादा तास घेता, शिवाय मुलाना घरी ब्रोलावता -- 
इतकं करायची काय जरुरी आहे ? ?? 

“६ त्यांचे अभ्यास मार्ग आहेत म्हणून करावं लागतं. ? 


१६८ लवणाची मासोळी 


५ अहो, त्यांच्या अभ्यासाची काळजी त्यांना. या पोरांना संवयच असते 
मटिकच्या वर्गात येईपर्यंत टिबल्या-बावल्या करीत एकेक व्ष काढ !यंच 
शेंबटच्या महिन्यांत कांहीं तरी गडघडगुंडा करून वरच्या वर्गात जायच, 
अन्‌ या साऱ्याचा वचपा मेंट्रिकच्या वगौत काढायला निघायचं |!” 

५ त॑ मला ठाऊक नाही. पण यंदा दोन महिने गणिताचे तास झाले 
नाहींत हा कांही मुलांचा दाघ नव्हे. त्याबद्दल त्यांना कां शिक्षा १ ? 

५: पण ता तुमचाही दोष नव्हे. तुम्हांला तरी कां शिक्षा ? ” 

“६ मी ही दिक्षा मानीत नाहीं --? 

५६ तसं असलं तर गोष्ट निराळी, तुम्हांला शिकजणी करायचीच असली 
तर तुम्हांला यांत शिक्षा वाटणार नाहीं. तें स्वाभाविक आहे. पण मग एक 
मात्र विसरू नका -- आपल्या धंद्याची नीति म्हणून सांगतों. * 


६६ वा | सागा ना. मी धंद्यांत नवीन आहे. तेव्हां धद्याची नीति वगरे 
जे काय असेल तें मला तुमच्याकडून शिकलंच पाहिजे. !' 

6 म्हणजे त्याचं असं आहे. आपल्याला या झाळांवून पगार काय मिळतो 
ते तुम्हांला ठाऊकच आहे. प्रत्येकाचा संसार आहे. म्हणून प्रत्येकाला 
पगाराच्या भर्रीला शिकवण्या कराव्या लागतातच. त्याबद्दल कोणाचं कांही 
म्हणणं नाहीं. पण त्या करतांचा आपण एवढं ध्यानांत ठेवायचं की शिकवणीच्या 
दरात कमी जास्ती करायचे नाहीं, एकाच धद्यांतल्या माणसांनी एकमेकांशी 
स्पर्धा करायची नाहो. एकस्र्या-दुकट्या शिकवणीला कर्मीत कमी पंधरा रुपये 
आणि क्लासांत प्रत्य्की तीन रुपये. हें इथळ ठरलेलं प्रमाण आहे. तेवढं 
ध्यानांत ठेवून शिकवणी करा म्हणजे झालं. 


“६ तुमचं म्हणणं ठीक आहे कुळकर्णी, पण हं प्रमाण ज्यांना शिकवणीचे 
पैसे घ्यायचे असतील त्य़ांना लागू. मी शिकवणीचे पैसेच घेत नाहीं. खरं 
म्हणजे, तुमच्या अर्थानं मी शिकवण्या करीत नाहीं. मागच्या वर्षी मी 
शिकवण्या नाकारल्या होत्या ह तुम्हांला ठाऊकच आहे -- ?! 


*' तं ठाऊक आहे जोशी. पण तुम्ही शिकवणी म्हणा की आणखी कांहीं 
म्हणा - शाळेच्या वेळाबाहेर तुम्ही मुलांना अभ्यास सांगूं लागलात कीं ती 


छवगाची मासोळी १६९ 


शिकवणी झालीच. तेव्हां तुम्ही ही नीति मोठ नका. तुम्ही पैसेच घेणार 
नाही म्हणालांत तर तुमच्या घरीं मुलांचे थवे जमतील. पण त्यामुळं तुम्ही 
शिक्षकवगीला कायमचे अडचणींत टाकाल. असं कुऱ्हाडीच्या दांड्यासांरर 
करणे बरं नव्हे. 

“ तुमचं म्हणणं मळा कळत नाही. मी धंदा म्हणून शिकवणी करीत 
नाही. मुलांची अडचण म्हणन त्यांना मदत करतो. आहे. यांत तुमच्या 
शिकवणीच्या नीतीचा प्रश्न येत नाही. ब्रिचाऱ्या मुलाचं नुकसान व्हावं हँ 
काही केल्या मला पटणार नाहीं. * 

“ तुमचं अजून विद्यार्थिदशोतलं गक्त आहे जोली. तुम्ही चुकता असं 
आम्ही म्हणत नाही. पण तुम्ही संसाराच्या व्यापांत पडला नाहींत म्हणन 
तुम्हाला अजून असं म्हणणं परवडत आहे. आम्ही कांही होसेनं शिकवण्या 
करीत नाहीं. पोटाच्या गरजेन करता. तुम्हीच असे आमच्या पोटावर मारू 
नका अस आम्हाला म्हणायच आहे. 


तो विबय अधेवट राहिला. रघूचा क्रम चालू होता. त्या क्रमामुळं बापूशीं 
व्हायच्या त्याच्या गप्पादेखील तुटल्या. बापूला रघूच्या वागण्यातला हा 
तुटकपणा जाणवला. तो तिथें आला ताच मुळी खघूमुळं. त्याचं मन त्या गांबात 
रमत नव्हतं. दिवाळीच्या सटीला तो घरी गेला तो काही परत आला नाहीं 
शाळत त्याने राजीनामा पाठवन दिला आहे एवढेच समजलं. ता कुठ आहे 
यांचा काहीं पत्ता नव्हता -- 

एके दिवशी ज्या कुलकण्योरनी रघूळा शिकवणीमद्दळ छेडलं होतं, त्यानीच 
त्याला शाळा सुटल्यावर आपल्याबरावर येण्याबद्दळ विवारलं., रघू चाळू 
ळागळा, कुलकर्ण्यांच्या घरीं गेल्यावर त्याना आंत चहाची आईर दिलो. 
रवून, घरी मुलं जमली असतील, उशीर व्हायळा नक्रो, चहाची जरुरी 
नाही. असं सांगायचा प्रयत्न केळा, पण कुलकण्यांनी त्याला आग्रह करून 
चसवून घेतलं. कसी दुवावा भडक तांबडा चा घेऊन झाल्यावर कुलफण्यांनी 
हळूच विषय काढला, “' जोशी, एक पांच रूपय्रे देता का? --अगदी 
रेशनची नड आहे.!? रघनं मुकास्यानं खिशातने पाचाची नोट काढून दिली 
अन्‌ तो काहीं न ञोलतां उठून चाळू लागला 


१७० लवणाची मासोळी 


“आर ७ का काया आ गह क्या 5 28 ७७ ७७ ७0 80 > आ आ 9 29 90 9 गा ७ बया 5 छा झा का का का हह वा कि आरा ह हा /३ &5 आ. अहा वड कक अ ह ७ हह 


दुसऱ्या दिवशी कुलकण्यीनीं आपण होऊन त्याला सांगितलं, “' एक 
तारखेला नक्की पैसे परत करीन. आजारीपणांत मलांच्या ओषधघाची बिलं 
द्यावी लागली, त्यामुळे फार ओढाताण झाळी, वीस तारखेला पाच रुपय 
द्यायला कुणी तयार नव्हतं; तुम्ही दिलेत म्हणून घरांत चूळ चाळू रादिली--?? 
रघू त्याचं हं सारं बोलणं थातवण्याचा प्रसत्न करता करता हृतबुद्ध झाला. 

>< >< >< 

थंडीच्या दिवसात रघूला आराम असायचा, पावसाळ्यांत हमखास 
उफाळणारा बाळचा आजार थंडोच्या दिवसांत दबून राढिल्यामुळं तेवढ्या 
प्रमाणांत कृष्णंमटजी आणि रघू दोघांनाही फुरसत मिळायची. पण या वषी 
कुठं दिवाळीच्या नतर एकदा अवळी पाऊस पडल्याच निमित्त झालं आणि 
बाळचं अंथरूण पडलं. नेहमींचा ताय-खोकळला आहे म्हणून काढा-गोळ्याची 
देशी औषधं सुरू झालीं, कृष्णमटडी बाळाची छाती दोेकू लागळे. दुखण्या- 
दुखण्यानं बेजार झालेल्या बाळानं निरनिराळे हट्ट करायळा सुरवात कली. 
कडू काढा घ्यायचा नाहीं म्हणून त्यानं दोन दिवस ओळीनं चुळा टाकल्या, 

बाळाचा खोकला वाढत होता. ठडिकवणीच्या वेळीं त्याच्या खोकल्यान 
शिकवणीत इतके अडथळे आले की, घोळायची सोय नाही. मुळामी अडचण 
ओळखून दोन दिवस सुट्टी घ्यायचं ठरवलं. रघूळा तेवढा मोकळा वळ 
मिळताच बाळनं आपल्याजवळ बसलं पाहिजे म्हणून आग्रह कळा, बाळच्या 
जवळ बसल्यावर रघू त्याला कुठळी तरी गोष्ट सांगून रंजबण्याचा प्रयत्न करू 
ळागळा पण बाळनं, ' गोष्ट नका. तू नुसताच वेस ? म्हणून सांगितलं. 
ओषधाच्या वेळीं त्यान पुनः काढा घ्यायच नाकारळं. ते नाकारताना त्याची 
ज्ञी अवत्था साळी ती पाहून रथूळा काय करा तें कळेना -- 

कृष्णेमट जीनी रघूजवळ डोक्‍्टरळा बोलवण्याची गोष्ट काढळी. ग्वूनं 
मुकाट्याने डाक्टर आगळा. डाक्टरांनी बाळळा चागळं अधी तास तपासळ. 
ओऔषधाची पाळी सुरू झाळी. दोन महिने नियमाने ओषध चाळू होतं. तोळा- 
मासा मागपुढं व्हायचं असा प्रकार चाळू राहिला, दोन माहेन्यात स्घूनं 
प्रत्येक पगाराच्या वेळीं जास्तीत जास्त रकम डाक्टराच्या बिलापो्टी दिली 
होती, बाळच्यासाठी म्हणून शाळेंतलीं मुल कधी एखादा खाण्याचा जिन्नस 
देत असत. ता खायला रघू बाळला नको म्हणत नव्हता. असं चालू राहिलं. 


लबवणाची मासोळी १७१ 


काळ ॥क आ हड खा ७७ का आह. ७७ ७७४ (4 आक टक बाढ क ७७ क ७० ७8 " ७ कक क क झि का «भा ळा ७» क अक आ का »७% क ७ ह कक कक क लक आळ हक हहे हळ शक छा अज काळे 


दोन महिन्यानंतर रघू-कृष्णंमटजी-ब्ाळ कोणालाच कळेना; या दोन 
महिन्यांत औषधांचा काय़ परिणाम झाळा आहे तो ? अंथरुणावर पडून आहे 
तावर त्याला काहावरी दय्यायळा पाहिजे यापेक्षा जास्त चिकित्सा करण्याची 
शक्तीच काणाय उग्टी नाहीं. त्याच्या रांगाच निदान अजून कोणाला समजल 
नव्हत, रघूच्या वगीतल्या एका मुळान सग्कारी दवाखान्यात बदळून आलेल्या 
नवीन डाक्‍्टराळा आणण्याची गोष्ट काढली. पण त्याला घरापर्यंत आणायची 
फी कोठून द्यायची हा प्रश्न पडला. शेवटी मुलानी बाळळला झोळीत बसवून 
आरामात दवाखान्याप्येत नेल, डाक्‍टरानीं त्याला तपासलं आणि या रुळाला 
अश्या स्थितींत दवाखान्यापर्येत आणण्याच्या पोरटकीबद्दलळ सर्वाना खप 
झाडल, त्यांना तिश्र आहढेल्या एका मोटारीतन बाळला घरी पोचवले आणि 
रघूला घालावून घेतलं. रघला हा प्रकार समञना. डाक्टर ताडताड त्रोळे 
लागले -- 


तुम्हा सुशिक्षित माणसं - इथपय्रेत पाळी येईतोवर गप्प बसशा 
"ण्ञआाता इथ डाक्टर काय करणार कपाळ ! तुम्हाला वेळेवर उपवार 
करायचं कळूं नये १ याला काय म्हणायचं १ *) 


* पण काय झालंय्‌ बाळाळा ! दोन महिने त्याला डॉक्टरच औषध 
पाळू. होतं गुण नाही म्हणून आज इकडे आणला ---?? 


: कोण दोता तो डॉक्टर ? कसळ॑ औषध देत होता ? ---आणि दान 
महिन्यांच्या आथी काय केलत ? हा झाजार दोन माहिन्यावला नाही --- ? 

“* त्याचा प्रकृतीच मळापासून अशक्त आहे. पावसाळ्यात ताप-खोकल्याचा 
त्रास होता --?? 

: हूं आतां सांगता आहात ! वेळच्या वेळी याची काळजी घेतली असती 
तर”? 


१ 


पण इतके दिवस आमचं बिऱ्हाड खेड्यात होते - तिथे कुठली व्यवच्था 
होणार १ *? 

* मग आतां तरी आलातच ना माझ्याकडे ? हं आर्थाच केल असतंत 
तर 2) 


२१७२ लवणाची मासोळी 


“६८ आता काय करता येईल ? ” 
काय करणार आतां ? त्याला क्षय झाला आहे-- 
--- रघूनं मटकन्‌ हातात डोकं खुपसलं. पुढं विचारण्याची त्याला शक्ति 
उग्टी नाहीं. 


:: फार पुढची अवस्था आहे. काय उपयोग होईल सागतां येत नाहीं. 
पण धोर सोडूं नका. अन्‌ घरांत सांगूं नका, आणखी त्याला मिरजे-बिरजेळा 
नण्याच्या मानगर्डीत पट्ट नका. मिरजेच्या नांवाने त्याच्या मनावर उलटा 
प"गशाम होईल. ! 

: आम्हाला त॑ शक्‍य नाहीं. इथच काय होण्यासारखं असेल तेवढं --? 


५: तेवदं मी करता. त्याच्या समाधानाकरता आठ-पंधरा दिवस त्याला 
टरथलं औषध द्या. मात्र आता त्याच्यावर, अंथरुणावरून उठायचं नाही 
यापेक्षा दुसरं काहीही बंधन घाळूं नका. तेलकट सोडून तो मागेल तं, मागेल 
वितरक त्याला खायला द्या. मनमुराद राहून आणि हृवं तितकं खाऊन 
कदाचित्‌ झाली तर कांहीं सुधारणा होईल - थोडासा संभव आहे. प्रयत्न 
करून पहा ---?' 

औषधाची बाटली घेऊन रघू उठला. घराकडे जाताना त्याचीं पावलं 
लट्यटत हाती. दाराजवळ आल्यावर त्यानं शक्‍य तितका हंसरा चेहेरा केला 
ब'ळन विवारळलं, “ औषध गोड आहे ? खायला सागितलं आहे ? *? 

“६ हो. ओषध गोड आहे. आणि तुला हब ते खायला सांगितलं आहे. ? 

कृुष्णंभटजींना दांका आठी. “ पथ्य नसलेलं औषध कसले ? ' खूनं त्यांचं 
समाधान केल. नव्या पद्धतीन पथ्यावर भर न देता डाक्टर औषध देणार 
आहेत. मध्येतरी वडलांच्या समाधानासाठी रघूनं डाकटरांना दोन-तीनदां घरी 
यायळा लावून ग्लुकोजची इंजेक्शने बाळाला दिलीं. पंधरवड्यानंतर एक 
शक्तिवर्धक आणून बाळाचं औषध बंद केलं. अजून तो अंथरुणावर पडून 
.होता. विश्रांतीन आतां उर्लेळा ताप जरा होईल असं रपूनं बाळाला सांगितलं. 


मळणीचा हंगाम आला तशी बाळाला गावाची आठवण झाली. रघू 
-नसतानातुद्धा रंगराव मधूनमधून घररी हुरडा आणून द्यायचा. गुऱ्हाळाच्या 


लवणाची मासोळी १७२ 


म धळ ७ क क झि का ह ७ का का ७३ ७७ ७०. & ८ अही. ०७ कळ भा छळ हह. अका आ. अव आही... » अ धक १-५ का ७ क क ७ ७७४ आठ. १७ आळ. “७. ७७ 60 हक आ & 98. ७ के अळी 


दिवसांत रस पॉचवादचा त्याचा बाळानं उच्चार केला. रघूच्या पोटांत 
कालवलं. त्यानं भाडोत्री गुऱ्हाळांतनं बाळापुरता पावशेर रस आणिवला, 
बाळानं आणखी पाहिजे म्हणून इदट्ट घेतला. सोसायचा नाहीं म्हणून स्घू 
त्याची समजावणी करीत होता --- 


दुसऱ्या दिवशी रघूला शाळेतून यायला पाच-दहा मिनिटं बेळ झाला. 
तेवढ्यांत आधी येऊन बसलेल्या मुलानी सहजी बाळाची चौकशी कळी 
अन्‌ बाळानं त्याना ऊस हवाय म्हणून सागितलं. शनिवारच्या सट्टीहून पर्त 
येताना त्यातल्या एकान आपल्या गावाहून पाच उसाची एक छाटी मोळी 
आणून टाकली. रघूने याबद्दल त्या मुलाला दटावळं. मुलानं “' त्यात काय 
आहे £ खेड्यांत ऊस तसाच कितीजण आणतात | ” म्हणून वेळ मारून 
नेली. पण रघूच्या दटावण्याने बाळांनं गळा काढला. “' आम्हाला कुणी' 
आणून दिलं तरी त्याला बोलतो ” म्हणून कृष्णभटजींजवळ तक्रार कली, 
रघूने ती ऐकली, त्याला कळेना. बाळाच्या या नाजूक प्रक्ृतीइतकच नाजूक 
झालेलं मन असं दुखाबेल ही आपल्याला कल्पनाही आठी नाहीं. बाळाच्या 
साठीं आपल्याला त्या मुलापषं ओशाळवाणं व्हावं लागल ही रुखरूख त्याच्या 
मनात शिल्लक राहिली. 


नंतर खूनं दुसरीच याक्ते काढली. इतके दिवस डाक्टराच्या सांगण्याकडे 
त्यानं दुलक्ष कळ होत. बाळाच्या खाण्यात फळं येतील तितर्का चागलीं अस. 
डॉक्टर म्हणाले होते. पण ते आपल्याला परवडणारं नाहीं म्हणून रघूनं 
टाळलं होतं. उसाच्या हकीकतीनंतर रघूने दररोज बाळाला एक-दोन तरी 
फळं आणून द्यायचा क्रम ठेवला. तार्जी फळं मिळाली नाहींत तर निढानी 
सुर्की फळं - सुका मेवा तरी चार आण्यांचा रोजचा आणायचा असा. 
त्याचा क्रम चाळू झाला, बाळाला त्यामुळं थोडं बर वाटायला लागलं, 


महिनाअखरीला रघूने हिशेभ केला. नियमितपणे रोजचे चार-सहा आणे 
खर्चायचे म्हटलं तरी दरमहा दहा रुपये बाजूला काढून ठेवायला लागत होते. 
उरलेल्या पंचबीस रुपयांत तीन माणसांचा खर्च चालवायचा |! बाळच्या 
खाण्यांत दूध पाहिजे म्हणून तें घेता येईल तितकं घ्यायचं. घरमाडं, बाणी 
कुणाची म्हणून उधारी ठेवून फट्‌ म्हणून घ्यायचं नाही, हा. जाणा बॉटल 


१७४ लवणाची मासोळी 


का शा ७ करा का शा आा शा आ का ळा तरा » आरा खा खा स्वा आ अ मा शा आका लहा ग्ला का 71 चा आ ब अ आशा का का कळ जा शा चरा आरा &ता कट का का ग्रा आ. ४84» 


च्या परिस्थि्वीत पाळायचा. दोन्ही टोकाचा मेळ कसा घालायचा या विवंचनेन 
रघू चूर झाला. 


-- दुपारी शाळेत त्याला अचानकपण पुण्याच्या शिक्कयार्च पत्र मिळाल. 
बापूनं पुण्याला मिलिटरी अकोटसमध्ये नोकरी धरली होती. नोकरी घरी 
ती पुण्यात रहायची सोय व्हाबी म्हणून. त्यातून वेळ काढून एम्‌. ए. 
व्हायचं या जिद्दीनं ब्रापू पुण्याला गेला होता. त्यानं लिहिलं होतं -- 
“ शाळेच्या पस्तीस रुपड्यात काय होणार १ टोथे कशाला खितयत पडतोस १ 
पुण्याला शितून ये. एम्‌. ए. च्या अभ्यासाला मिलिटरी अकॉटसची नोकरी 
सोयीची आहे. त्याहीपक्षा जमल्यास रेद्षानिंगमध्ये इन्स्पेक्टर होता येडे 
तेथें कम फिरतीच म्हणन दंगदगीच वाटलं तरी फिरती आपल्या हातात 
असते. सगळ्यात मुख्य म्हणजे दोन्हीयेकी कुठही नोकरी लागली तरी 
रेदनची विवचना नाही. मिठलिटरीत पेले देऊन मिलिटरीच्या रेशनमधला गह 
तादूळ मिळतो. आणि रेशनिंग खातं हे. तर अन्नाचंच खातं आहे. तुला 
नसली जास्त पेशाचीच तात्पुरती नोकरी करून सावकाशीने एम्‌. ए. चा 
अभ्यास करायच! असला देह्रोड-खडकीच्या कारखान्यातून सहर्जी 
पाच रुपये राजावर ओव्ह्र्टाड्मसुद्धा दोनशॉपर्येत जाता यईल. काढींदी, ठरव 
ण उगीच पिवत पडू नकास--' 


रघूच्या डाक्य़ात पत्रान घर केळ, त्याचा कल पुण्याच्या बाजूचा होऊ 
ळागळा. सध्याकाळी घर्री गेल्यावर नोट बिचार करून ठरत म्हणून त्यानं 
पत्र खिदयात टाकलं. आपली चलळ-भिचल कुणाला कळायला नको यासाठीं त्याम 
समोर पडलेल मासिक उचललं. आणि तो ते चाळूं लागला. खघूच्या हातात कर्धी 
नव्हे ने मासिक पाहून कुलकर्णी मास्तरांनी त्याला माहिती दिळी, “ गोष्टींत 
फारसा दम नार्ही. तुम्ही चित्रे पदा जोशी मास्तर--!? “' कतली पित्रे १ 
कुठं आहेत १ ? खघूनं चमकून विचारळ॑ ' ब्राकीर्ची राहूंद्यात, शेवटच्या 
पानावर पहा. ती चित्रं पहायचे तुमचे दिवस आहेत *? तरीही रघू उमगला 
नाहीं. कुलकर्णी मास्तरांची रघूच्या हातून अंक काढून घेतला आणि 
शेवटचं कव्हर मुडपून त्याला दाखवल. “' नादा सोख्य़ भर॑ '? या ठराविक 
सथळ्याखाली येगारी जोडप्याची पित्रे तिथं होती, खूनं तोंड फिरवलं. 


ख्वणाची मासोळी १७५ 
': अहो, नसती चित्रे बघायला काय हरकत आहे ? एकेकाची किंबा 
एऊकीची निवड पाहून सूय गमत वाटते. कुठे मुलगा झक्क असतो तर मुळसी 
काक याच्या उलट; आणि मथळा मात्र * नादा सोख्य भरं !--- 
असेनात का ! आपल्याला काय करायचं आहे १? * 

“ करायचे काय ? थोडीशी करमणूक. नघा तरी ही जोडी मुलगा 

किही ट्चात दिसतो मिलिटरी पोपाखात अन्‌ दोजारी मात्र दब्बी बायकी --- 
क लकण्यीनी बोट ठेवूनच चित्र खूच्या डोळ्यापुढं धरलं. डोळ्याना तें 
पढाव लागलं. तरीही रघळला फारसं काही. वाटलं नाहीं, कतृदलानं त्याने 
नित्राच्या खाळची नावे वाचली, लेफ्टनंट आपटे आणि रिवपूरच्या कु. यमू 
घाट > फोर्टोतेळा घडल्याचा स्मार्टपणा आणि लेफ्टनंटचा पोप्राख पाहून 
रघूलळा धक्काच बसला, मात्र या लय़ाने त्याच्यावर काहींच पारेणाम केला 
नाहा चित्र दूर करून त्यानं छलकण्यांना सांगितल, “' दोघंही माझ्या 
आळखीची आहेत. माझ्यावरोबरच काळेजात होती --?! 

" मग आ्धाच जमवळ असेल ? ही लव्ह मरजेस सरीस व्हायला 
लागली आहेत, फार पुढं गेठंयू जग ?? कुलकण्यांनीं टीका केली. 

“८ असेल कदाचित्‌. त्यात्रहूळ मला काही. ठाऊक नाही. बंगल्या- 
बंगस्यातल्या ळोकाचं लग्न आह्‌ ह. तें कसं जमतं ह माझ्य़ा तरी आकलनाच्या 
पळीकडचे आहे ”? 

५६ जोशी मास्तर, तुम्ही अलीकडे फारच विरक्त व्हायला लागलात. 
भत नाहीं हे तुमच्या वयाला. अहो, अडीअडचणी सगळ्यानाच असतात. 
आम्ही संसारी माणसं, तुमच्यापेक्षा अधिक गुरफटलेली; इतकं मनाला लावून 
घेऊन चालत नाहीं तम्ही भावाच्या आजारात्रदहूल अशी काळजी करूं नका.? 

“८ छे | काळजी करायचं मी केव्हांच सोडून दिलं आहे.!' 

आणखी तुम्हाला सागू जांशी-मास्तर ? दुष्ट, कठोर म्हणाल तुम्ही -- 
पण तुमच्या भावाच्या आजारानं एक गोष्ट चांगली झाली, जगाचा-या 
आयुष्याचा फार मोठा अनुभव मिळाला तम्हांठा. आतां तरी आमचं ऐका. 
नसत्या तत्त्वाच्या नादो लागन आपलं आणि भावाचं नुकसान करू नका 
अडचणीनं तरी तुम्हाला शिकवलं असेल. घाम गाळून शिकवणी करतां त्याचा 


१७६ ळवणाची मासोळी 
मोबदला घेतल्यावांचून राहूं नका तोच तुमच्या उपयोगी पडेल. सध्याचे 
दिवस रुपये, आणे, पैचे आहेत या महागाईन तर पैशाशिवाय सारं व्यर्थ 
झालं आहे. सार तत्त्वज्ञान भरल्या पाटाचं आहे 

रघू मुकाट्याने उठून तासाची पुस्तकं धेऊन बाहेर पडला त्या दिवशी 
शाळा सटायच्या आर्धीच त्यान मुलांना आज घरी तास घणार नाहो 
असं सांगून टाकलं. घरी गेल्यावर पाच-दहा मिनिट बाळाशी गर्‍्या 
मारल्या -- कृष्णभटांनी रघूला विचारलं, “' आजच्या जेवणाचं काय ? 
पीठ संपून गेलंय. १? किरायळा ज्ञायचा विचार गुडाळून ग्घू कोटाचे खिस. 
टूंकेंचे काने-कोपर धुंड्टे लागला, थोड्या वेळानं ता बाहेर पडला. त्याची 
पावलं कुलकर्णी मास्तरांच्या घराकड वळली, त्यान नाइलाजानं पाच 
रुपयांची मागणी केळी, कुलकर्णी तरी एकदम कुठून देणार ? त्यांनीं मुष्कीलीन 
एक रुपया रघूच्या हातावर ठेवून बाकीचे पुढच्या महिन्यात देईन म्हणून 
अजीजीनं सांगितलं. रुपया घेऊन तो बाजारांत गेला, हिंडून हिंडून तो 
शिणला. अखेरी जिवाचा धडा करून त्यानं सद्दा आण्याची दोरभर रताळी 
घेतली. घरी आल्यावर रघूनं होते त सार दूध बाळाला प्यायला दिलं 
थोडासा विस्तब पेटवून चार रताळी भाजून भटजींच्या पुढं टाकली. दान 
रताळी कचचींच स्वतः खाऊन टाकली, 

त्या रात्रीं रघूनं बापूच्या पत्राचा विचारच केला नाहीं. पुढं कित्येक दिवस 
तें पत्र तसंच त्याच्या सख्िह्यात पडून होत घरच्या रोजच्या विवंचनपुढ 
आणि दैनदिन कामापुडे रघूला विचार करायला सवडच नव्हती. उन्हाळा 
येऊ लागला तसतशी फळे महाग लागली, बाळाचा खर्चे वाढला, रेनच 
सगळ धान्य आणायलाही रघूजवळ पैसे उरेनात, बापलेक नियमाने एक वेळ 
जेवून काढू लागले. संध्याकाळचं जेवण आडवारावर आलं. कर्धी कधी दाक्‍्य 
झाळं तर रताळी आणावीत, नाही तर ताब्याभर पाणी भुकेच्या पोटात 
ढकलून, रात्री अथरुणावर अंग टाकुन द्यावं ही संवय खघूच्या अंगी पडठी, 
कृष्णंभटजींना ती संबग्र आधोपासूनच होती. त्यांनी “ असं कां ' म्हणून 
रघूला विचारायचं नाहीं हँ ठरवून ठेवलं होतं 

महिनाभरानं कळा खाऊ झालेला कोट रविवारी पाण्यात बुचकळून 
काढावा म्हणून मोकळा करायला रघूनं सुरवात केळी, तेव्हां चुरगळलेलं जापूर्च 


लबणाची मासोळी १७७ 


पत्र हाताला लागलं. रघूनं पुनः एकदां ते वाचून काढलं. अन्‌ तुकडे तुकडे 
करून ते तुकडे चुलखंड पेटवायला तिथं नेऊन टाकले. बाळाच्या या अवस्थेंत 
आपल्याला गांव सोडणं शक्‍य नाही हं त्याला उमगून आलें हातं. पुण्याच्या 
जागेच्या टंचाईत सर्वोनीं तिथे जाण्याचा प्रश्नच उद्‌भवत नव्हता. एकदोंवीस 
मैलाचं अंतर - हें आपल्या आवाक्याबाहेरचं आहे हें खघूला पटलं, 

अखेर मार्च महिन्याच्या दोवटीं बाळाचं दुखण विकोपाला गेलं. त्याला 
रक्त पडूं लागलं खोकल्यानं जीव कासावीस झाला, त्याचे ते हाल बघून 
रघूच्या डोक्यात अनेकदा विचार आला. याच्या या यातना एकदा संपतील 
तर बरं होईल, तेलळकट-तुपट न खाण्याच बधनसुद्धा आतां त्यानं शिल़ूक. 
ठेवलं नाहीं. बाळ मागील ते त्याला द्यायचं. खोकल्याने हैराण होऊन 
पडल्यावर त्याच्या छातीवर हलके हात फिरवायचा असं करीत बापलेक दिवस 
मोजीत होते 

रघूला शाळेंत बोलावणे आलं. खोकता खोकता छातीत बेडका अडकून 
बाळने यात्रा संपवली होती. कृष्णेमटजी एकदांच “ बाळ ? म्हणून टाहो 
फोडून चिप झाले, खघूच्या सहकाऱ्यांनी आणि कांहीं विद्यार्थ्यानी मिळून 
अखेरचं काम पार पाडलं. रघू घरी परत आला तरी कृष्णंभटजी बसल्या 
जागेवरून हलले नाहींत, त्याच्या डोळ्यात पाण्याचं टिप्पूस नव्हतं * अघोळ 
करणार ना ? ? खूनं भीत भीत विचारलं. 

“ आत्ता £ --संध्याकाळची अघाळ ? रघ्या, तुला काय बेडभीड 
लागलंय. ? 


>९ > >< 


परीक्षा संपून शाळेच्या कामातून सटका झाल्यावर रघूला त्यांतल्या 
त्यात स्वस्थता मिळाली, यंदा त्याला हंडमास्तरांची गाठ घ्यावी लागली 
नाहीं. सुशिक्षित माणसाच्या पुण्या-मुबईकडे माठ्या पगाराच्या आरडोनं 
जाणाऱ्या लोंढ्यातून ताल्क्या-जिल्ह्याच्या ल्हान-सहान गांवाकडे कोणी 
वळण्याची फारशी डाक्‍्यता नाहीं हें प्रत्येकाच्या ध्यानी येऊन चुकल होतं. 
त्यातही रेशनिंग खात्त्यानं, ल्हान गावाची आढ असलेल्या थोड्याशा 
ल. मा...१२ 


२१-७८ &्वणांची मांसाळी 
सुशिक्षिताना खं चून घेतळं होतं. पस्तीसा-चाळीसांची किंमत दहा पंधराच्या 
घराला आली होती. होते त्या शिक्षकाना पाच-दहा रुपयाचं प्रलोमन दाखवून 
राखून ठेवायचे दिवस होते. हेइमास्तराना जे भेटून गेळे त्याना त्यांनीं सर्रास 
दहा रुपये वाढवले होते. मंडळाच्या सभेची या खेपेला अडचण नव्हती. रघू 
भेटला नव्हता. त्याची अडचण सर्वोना ठाऊक होती. भ्रमिष्ट वडलांचं ओझं 
बागबीत तो बाहेर जाणे राक्य़ नव्ह्त. तरी त्याला उदारपणे पांच रुपयाची 
बढती देण्यात आठी, त्या कागदावर काय लिहिलं आहे. याची दखल न 
घेता रघू शाळेंतून बाहेर पडला, 

घरीं वडील स्वस्थ बसून होते. बोलणं त्यानीं टाकलंच होतं. त्याना प्रत्येक 
- गोष्ट करायला सांगावं लागत होतं. सागितल्यावरसुद्धा ती होईल अशी खात्री 
नव्हती, पुष्कळदा करवून ध्यावी लागत असे. बाळाच्या मृत्यूनं दृळका झालेला 
मेंदू काढातरानं ताळ्यावर येईल अशी समजूत करून घेऊन रघू वागत होता. 

रघू दोन दिवस घरी बसून राहिला. सकाळी उठण्यापासून संध्याकाळी 
अंथरुणावर पडेपर्यंतचा कृप्णंभटजींचा प्रत्येक व्यवहार तो स्वतः उरकवून घेऊं 
लागला. “' दादा, चहा घ्या ??, “' अंघोळ करायला उठा ?', जेवण झाले - 
आतां पानावर बसूं नका. ?' अस पदोपदी सांगण्याची पाळी होती. कृष्णं- 
भटजीर्मी दोन दिवस न बोलतां सारं रूच्या सांगण्याप्रमाणे केळे. तिसऱ्या 
दिवशीं तोच प्रकार पुनः व्हायला लागला तेव्हा कृष्णंभटजींनीं डोळे फिरवले. 
रघू घाबरला, पण पुनः त्यान मागल्या दोन दिवसांप्रमाणं वागण्याची तयारी 
केली - भटजींना बाचा फुटली. 

५८ रव्या, काय चालवलं आहेस हे £ मला काय तू कुक्कुलं भाळ 
समजतोस ? नोकरीवर जायचे सोडून दिलंस आणि माझ्यामागे कटकट 
'छावतोस ! ” 

५ दादा, शाळेला सुट्टी आहे आतां--? 

५ कांहीतरी सांगू नकोस मला. माझ्यावर पोलिसी पहारा करायसार्ठी 
मतं मुद्दाम घरीं राहिला आहेस, चांगलं नव्हे ह. ? 

“तसं नाही दादा. तुम्ही उगीच---?' 

"६ गप्प बस ! तुझी लक्षणं कळलींत मळा. अलीकडे फळे आणायर्ची 


रवणाची मासोळी १७९ 


१७७ ७७» ७७ ७ मक्याला काळा आखा छा आशा शी आशा ळा शा ा्क्ा शा हक & ७8 का अ ७ &5 का को भा जी आ अ शा आ शा का अठ ७ ह कहे आह. 


सोडून दिलीस. तुझ्या डोळ्यावर खर्च येतो आहे. धाकटा भाऊ मात्र दिसत 
नाहीं - तुला माया नाही. 


:' दादा ! दादा! ? 


'* चूप. त्याला कुठं धर्माथ दवाखान्यांत नेऊन टाकलास, मला सांगितलं- 
सुद्धां नाहींस. तुला जड झाला ना £ मीसुद्धा जड झालाय, म्हणून असा 
छळून मला दूर करायला बघतोस पण मी तुझा बाप लागून राहिलो आहे.?” 


“: दादा, आता जेवण करून मुकाट्यानं झोपा बधू-- 


“८ तर तर मला झोपा म्हणून सागायचे अन्‌ दाराला कडी लावून 
बाहेर आपण उंडगायला जायचं असंच की नाहीं १ जायचं असेल त्या 
बाप्याच्या वाड्यात इस्पिटं कुटायला, नाहीं तर रग्याच्या मळ्यांत पान 
चघळायला ! 


ग्घूनं जबरीनं कृष्णंभमटजींना अंथरुणावर लोटलं. तिथच तो कसलं तरी 
पु'तक उघडून बसला. अक्षरांबरनं डोळे फिरत होते. पण काय वाचतो आहे 
याचा रघूला पत्ता नव्हता. आपल्या वडलाचं बोलणं ऐकून विचारानं त्याला 
हैराण केळ. इतके दिवस वडील तांड उघडीत नव्हते या चिंतेनं त्याला 
व्याकूळ केळं होत आज त्यानीं तोंड उघडलं - पण ते असल्या विचित्र 
बोलण्यासाठी - इतके दिवस दबून राहिलेली वाचा परत आठी म्हणून आनंद 
मानावा कीं त्या बाचेन जे असंबद्ध भाषण केल त्यामुळे खत करावी हें 
रघूळा समजेना. त्यानं स्वतःची कशीबशी समजूत घातली. बाळाच्या मृत्यूनं 
बाचा आणि स्मृति दोन्ही काम करीनातशी झालीं होती. वाचा परश आली. 
साठवलेली, गोठलेली भावना वेड्यावाकड्या शब्दांनी बाहेर पडून तिचा 
निचरा झाला म्हणजे वडलाची स्मृति आणखी कांद्रीं दिवसांनीं परत येईल. 
आणखी कांही काळ जाऊं द्यावा. इतक्यांतच त्याना बाळाच्या बाजतच्या 
बस्तुस्थितीनं भेडसावण्यांत अथे नाही. 

आणखी चार दिवसांनीं कृष्णंभटजींचा नवा गांधळ सुरू झाला ते 
म्हणाले, ““ आपण दोघानींच इथं जेवायचं १ ते पोर तिकड धर्माथं 
दवाखान्यांत तळमळत असेल, त्याला इकडे आण, सुट्टी आहे ना सातां १ 


१८० ढवणाची मासोळी 


मग आतां कशाला दवाखान्यात ठेवतोस त्याला ? त्याला आणल्य'शिवाय 
आज जेवण नाही. 

रघूनं त्याची समजूत घाळायचा प्रयत्न केला. “' आता बाराच्या वळला 
दवाखाना बंद असतो या वेळी भेटसुद्धा घेऊ देत नाहींत. सध्याकाळी पाहूं. 
आता जेवून घ्या -- 

“६ ह्या, ह्या अन्नाची शण्थ आहे. मी तर त्याला हात लावणारच नाही. 
पण तू भावाला टाकून एक घास तोंडात घालशील तर या अन्नाचं गोण 
होईल तूं नरकांत पडशील. 

६ तुम्ही मुकास्याने जेवता की नाही आता ? ?? 

५८ माझ्याशी ही मुजोरी-प्रत्यक्ष बापार्शी ? कळलं त्याचं काय केळं 
असशील तं. उद्या तो दवाखान्यात मेढा म्हणूनसुद्धा मळा सांगनील, *? 
कृष्णंभटजींचा अबतार अनावर झाला. खूच्या अंगावर जायचं अवसान त्यानीं 
आणलं, उचललेला हात वरच्यावर धरून रघून त्याना बैठकीच्या खोलीत 
ढकललं. मातीच्या चवीनं ताटातली भाकरी बचावचा तोंडांत घाळून गिळली. 
अन्‌ आाचवून ता तिथेच पाटावर स्वस्थ बसला. बाहेरच्या खोलींतली धडपड 
थोडी शांत झालेली दिसली म्हणून दारांतनं पाहिलं. कृप्णंभटजी सतरजीवर 
स्वस्थ पडून राहिले होते. त्याचा डोळा लागला होता. 

त्यांना जाग आल्यावर रघूनं हात घरून पाटावर नेलं. भटजीर्नी मुकाट्यानं 
चार घांस पोटात घातल. पुनः ते सतरंजीवर येऊन पडले. असा प्रकार 
वरचेवर व्हायला लागला. दोन वेळचं अन्न पोटात जाणं ही मोडी कसरन 
होऊन बसली. भटजींची प्रकृति खंगूं लागळी तसतशी त्याची दांडगाई कमी 
झाली. पण वाढत्या अशक्तपणानं रघूला दुसरी चिंता लागली. त्यानं हिमत 
घरून, आधीं न सागतां, डाक्टरांना बोलावून आणलं. ते तपासून जाईपर्यंत 
भटजी गप्प होते. रघू औषधाची बाटली घेऊन आला तेव्हां ते. क्षीणपणानं 
म्हणाले-- 

६ आणलंस ओषध. बर झालं, पण फळे नादी आणलीस? ती तोषट्टू 
नकोस, त्याला फळं फार आवडतात. आपण हाल काढूं. पण त्याचीं फळं कमी 
करू..नकोस. ? 


छबणाची मासोळी १८१ 


रघून मुकाट्यानं बाजारांतून मिळाली तीं चार-सहा फळे आणली. भटजींनी 
तीं गुंडाळलेल्या अंथरुणाजवळ व्यवस्थित ठेवली, औषधाची बाटली पण 
तिथच ठेवली होती. चार दिवस फळे नुसतींच सुकून गेलीं. तेवढ्यांत रघूला 
एकट एकटं दं सारं निस्तारणं जड वाटूं लागल. म्हणून शेजारच्या खेड्यातल्या 
आपल्या एका विद्यार्थ्याला त्यानं सोबतीला बोलावून घेतळं -- 

रघू आणि त्याचा विद्यार्थी माने बाहर सोप्यांत बसून दुपारचा वेळ काढूं 
लागल कधीमर्धी मान्याला अभ्यास सागावा, कर्घी नुसत्याच हलके हलके 
त्याच्याशी गप्पा माराव्य़ात आणि त्यांत विरंगुळा मानावा असा क्रम रवूनं 
चाळ केला, मध्ये दोन दिवस फळं बेद केल्यावर भटजीनी रडायळा सुरवात 
केरी, रघून पुनः फळ आणायला सुरबात केली : 

दुपारच्या वळेला रघू अन्‌ माने बाहेर असताना हळूच भटजी काठी टंकीत 
टेकीत उठले. त्यांनी दाराला कडी ळावळी., ओष्थाची चाढळी जमिनीवर 
आतून टाकली अन्‌ ती ओल दाडोवरच्या पंच्यान पुसन तो एका कोपऱ्यांत 
ककल. नंतर हात नेसत्या पंचाला पुसन फळे सोळायला सरवात केली. एक 
दोन फळे खाऊन पाहिली, बाकीची फळं नुसताच सोळून पिळून चोथा 
विस्कटून टाकला - अन्‌ एवढ्या श्रमाने मठूळ होऊन ते आडवे झाले, 

पांच वाजता चहा करायसाठी रघू उठला. त्याला दार खडखडाव लागलं. 
भटजींनी दार उघडलं तव्हा त्यांच्या मुद्रवर कारुण्य होत. “ अरे, हळू नाही 
का दार वाजवायच ? आजाऱ्याला त्रास होतो आवाजान., आज कित्येक 
दिवसानी जिभेळा फळांची चव लागळी अन्‌ तेवढ्यानं बर वाटून डोळा 
छागला होता, आता तरी अ्रंतान वावर, त्याची झोपमाड करूं नकोस, तुला 
अजून कळत कसं नाहीं रघू ९ आपलं घर मोठं आहे का! खद्ट झालं तरी 
त्याचा फार फार त्रास होतो बर का £ ?? 

मान्याचा चेहरा चांगळा नजरेत असल्यावर भटजींनी त्याला एकटा पाहून 
एक दिवस विचारलं, “' काय रे, तूं रंगरावाचा भाऊ ना ? मग एवढं कसं 
विसरलास ? बाळाला कांही ऊंस, हुरडा आणून द्यायचा नाही १ त्याला फार 
आवडतो.! 


“ पूण - पण--- ?? 


१८२ लबणाची मासोळी 


५ मला ठाऊक आहे तूं काय म्हणणार आहेस ते. बाळ इथं कुठं आहे 
असंच की नाहीं १ पण त्याची पंचाईत तुला का - आम्ही जिवत आहोत 
अजून. आमचे आम्ही समथ आहोंत. पण तुम्ही अशी दानत सोडूं नये. 
तू आणायला हवंस. तुला सगळं नवीन असलं तरी रंगराव तर रघूचा मैतर 
आहे ना ? त्यानं नाही. का तुझ्या हाती पोचवू ? आम्ही काय इतके. 
अगर्दी परके झालां ? ?? 

माने कांहींच न बोलता नुसता उभा राहला. 

' तूं घाबरू नकोस. रघू तुला कारही म्हणायचा नाहीं. शेतावर जाऊन 
यायला वेळ लागला तर मी सांगीन त्याला. उद्या घेईल जास्त अभ्यास जा 
आतां - उशीर करूं नकोस, रात्री-अपरात्री पांदींतनं यायला नको. दिवसा 
उजनेडी जाऊन ये. उभा राहू नकोस इथं--? 

तेवढ्यांत रघू बाहेरनं आला. तो आल्याबरोबर भटजी गप्प झाले. 

सुट्टी संपायच्या वेळेला माने चार दिवस गांबाकडे निधून गेला. तो दोन 
दिवस दिसला नाहीं, तव्हा भटजींनी रघूला जवळ बोलावलं, ते ओक्साबोक्शी 
रडूं लागले. रघू पिळवबट्टून गेला, त्यानं कसंबसं विचारलं --- 

५ काय पाहिजे दादा तुम्हांला ? कशाला हांक मारली मला ? ” 

:: अरे नुसता जवळ बैस. दुसरं कांहीं नको मला, तुझ्याशिवाय कोण 
आहे मला जिबाचं ? तुझ्याशिवाय कुणापार्शी मागायचं मी? माझं एवढं 
मागणे पुरव--? 

: तुझ्याशिबाय कोण आहे मला ? ? या भटजींच्या गाब्दाने रघूला भरतं 
आलं. त्यानं सारी व्यथा गिळली अन्‌ तो म्हणाला, “ सागा ना दादा, काय 
हवं ते करीन. कुठनं हवं तिथनं आणून देईन. तुम्ही काय तं नुसतं सागा.?? 

५: सागता रे - मला खात्री आहे, माझा रघू शहरांत राहहला तरी बाया 
जायचा नाहीं. इनामदाराच्या अन्नानं तो मुदोंड बनायचा नाहीं. माझ्या 
शब्दाबाहेर जायचा नाहीं - नारद्दी ना जायचास खू ? ” 

6 नाही. पण काय हवंय तुम्हांला १ ?? 

“६ अरे, मला काय हबं असणार £ माझ्या गोंबऱ्या गेल्या आतां 
पण त्याच्यासाठी जीव तिळतिळ तुटतोंय्‌ २. त्याचा इद्ट आहे. कोण करणार 


लवणाची मासोळी शटर 


८ ७७% ७ ७ %७ ७७ "१७७ %७%७ आळा ळणाळका० रात आाळळ्रा आका आआळाआा् आशा क्क्ालाआक्ञालाका कक. 


आपल्या घरांत आतां दिवाळीच्या फराळाचं ? तुझे डोळे हे असे दुखरे! 
पण त्याला अजून कळत नाही - लहान आहे -- रागावू नकोस. त्याच्यावर. 
त्याच्यासाठी, त्याच्यापुरत घेऊन ये जा फराळाचं - पण ब्राह्मणाच्या होटेलातनं 
आण जरं का. तेबदं पाळ माझ्या हयातीत. अन्‌ हें बघ, असा मख्खासारखा 
बसूं नकोस. लवकर जा अन्‌ दिवसा उजेडीं परत ये. ? 


रघू जागचा हलेना, तेव्हां मटजींनीं उसनं अवसान आणलं. 'कार्ट्या 
म्हणून त्याच्या अंगावर धावून, एक सणसणीत मुस्कटांत दिली, कुठलं जळ 
त्यांच्या अंगांत संचारलं होतं कुगास ठाऊक ! त्या थपडेनं रघू कोलमडला - 
भरजींच्या डोळ्यांत इंगळ फुलला होता. त्यांनीं पुनः हात वर उचलला. 
आतां मात्र खूच्या सहनऱक्‍तीची सीमा झाली. त्यानं भटर्जीचा हात वरच्य़ा- 
बर घरला. तरीही भटजींची नशा उतरली नाहीं. तेव्हा खघूला त्याचे दोन्ही 
हात धरून ते पाठीशी बाघावे लागले, तशा स्थितीने त्यानं भटजींना ओढून 
अंथरुणावर नेलं आणि खूप खंकसून तो म्हणाला, “' दादा, आतां सागितल्या- 
शिवाय तिथनं हललात तर बघा. कोपऱ्यात सोडगाच ठेवता. ) पण त्याचं 
तें बाक्य व्हायच्या आधी मटजी अंथरुणावर विकल होऊन पडले होते. 


त्या दिवसापासून कृष्णमटजींनी रघूची भीति घेतली. तो सागेल त्याप्रमाणे 
ते निमूटपर्णे बागू लागळे. पण याचा वचपा काढल्याशिवाय ते राहात नसत रघू 
कुठं बाहेर गेला किंबा शाळेत गेला कीं तिथे कोण असेल त्याला भेडसावीत. 
त्याचा प्रथम प्रथम त्रास होऊन बिऱ्हाड सोडावं लागतं की काये अशी वेळ 
आढी. पण खुन बाकीच्यांना सांगून ठेवलं, त्यानीं असं कांहीं केलं की, 
£ रघू आला ?' किंवा “ रघूला हाक मारू का? ?' अस म्हणत चला, 
तेवढं एकलं की भटजी मुकाट्याने आपल्या अंथरुणावर जाऊन पडत अनू 
कर्धी कधीं रडायला लागत. 


शाळा सुरू झाल्यानंतर माने शाळेच्या दिवशी रघूच्या घरीं राहून फक्त 
दानवार-रविवारच्या सुट्टीला आपल्या गांवाकडे जायचा. त्यान भटजींचा स्थिति 
बदललेली पाहिली, रधूच्या विरोधाला न जुमानतां तो दर सोमवाररी येतांना 
कांहींतरी भाजीपाला दोतावरनं घेऊन यायचा. एक-दोनदा त्यानं मक्‍याची 
चार-सहा कणसंसुद्धां आणली, मक्याला भलताच भाब होता. ओले कणीस 


ऱ्ट्४ लबणाची मासोळी 


३ चा शिळा 9 51% 60 काळा आ का झा भा 1 आ झरी व्या आह भे का आ) ०0 ७” ५४ अ क्ती इश्क का क 0. तह ७७ शा आ. ७8 ग ७ आ ळा ७७ मळा शा का का छे 


काढायला दोतकरी तयार नव्हता. तरी मान्यानं दहे काम उरलं होतं. त्याचे 
आईबाप रोतावर रोजानं राबणारे, त्याला एवढा भाजीपाला अन्‌ ही कणसं 
कर्शी मिळाली याची शंका रघूला आली पण मान्यानं दाद लागूं दिली नाही. 

तीं कणसं पाहिल्यावर भटजींचा क्षीण चेहेरा खुलला. त्यार्नी उसळ 
खायचा हट्ट घेतला. तसा आजार काहींच नसला तरी त्याची प्रकृति 
कार अशक्त झाली होती. रघून त्याना दुटावळं. मान्याला सुद्धां ते ऐकवेना. 
त्यानं हलकेच म्हटलं, “ सर, कशाला आता धाक घालता ? कसलं पथ्य 
अन्‌ पाणी - होऊं द्यात त्याच्या मनासारखं तेवढंच त्याना समाधान बाटेल.? 
पण खून त्याचं ऐकलं नाही 


>< >< >< 


शाळेत ताराबळ उडाली होती. दोन दिवस गड्याचा पत्ता नव्हता. 
असेल कुठंतरी किरकोळ रजवर, देईल मागाहून अज असं समजून, गरीब 
मुलाना नादारीच्या धाकानं, थोडं चुचकारून दोन दिवस शाळेची कशीबशी 
व्यवस्था चालली होती. तिसऱ्या दिवशीं गडी आला नाहीं तेव्हा त्याचं 
घर हुडकायला मुलांना पाठबळं, त्यानी परत ग्रेऊन सागितळल, तो भरती 
झाला फोजेत - आतां येणार नाही. कांही न कळवा सवरता गेला म्हणन 
हेडमास्तर चरफडले. दुसऱ्या गड्याची शोधाशोध सुरू झाली. दोन-चार 
माणसं येऊन गोडी. हेड्मास्तरानी दहाच्याऐवजी एकदम पंधरा रुपये देण्याची 
तयारी दाखवली तरी ते सारे परत गेले, त्यायल्या एकानं त्यांना एकवल - 
“* पुंद्रा रुपड्यांत कोन इल १ रानांत रुपाया रोज मिळतो. अडुयथावर बरी 
मोटरीचं पार्सिजर डागाला चार-चार आन देत्यात - पुना आपल्या मनात 
ईल तवा काम हतल्या बादल्या कामाला आट आने रोजानं कोन येतो 
बगूं या - ?' आणखी दोन म्हातारे येऊन गेले, त्यांनीं वेगळेच सुनावलं. 
रानात कामाला गेलो तर पोटाला दाणादुणा मिळतो. तुमच्या नोटाचा काय 
चुद्टा करायचा हाय १ ?? पंधरा दिवसांत शाळेचा गोठा व्हायची पाळी आली. 
त्यातून सक्राळ-संध्याकाळी हेड्मास्तराच्या घरी कांदी पडलं अडलं - 
म्हणजे नियामित काम व्हायचं त॑ अजिञ्रात थामलं. त्यामुळें तर गड्याची 
निकड फार भावू लागली 


ळ्बणाची मासोळी १८५ 


छे ! या युद्धाने नसत्या माणसांना फार भाव आला | शाळेचं सार्वजनिक 
कार्य. शिक्षणदानाचं पवित्र कार्य - पण त्याची बूज कोणाला राहिली नाही. 
हेडमास्तर तत्त्वतञान ऐकवीत होते. खरं म्हणजे ते जिकिरीला आले होते. 
त्यानी आपल्या परीन शक्‍य होती ती सारी आमिषं शिक्षक-विद्याथ्यीच्या 
करवी जाहीर केलीं होतीं. त्याच कुगाला प्रलोभन वाटेना. अखेरी नाइलाजानं 
पस्तीस रुपयावर एकजण तयार झाला. त्याला दम्याची व्यथा होती; तरी 
“साळचं? काम म्हणून तो निभावून नणार हाता. त्यानं अट घातली -' साळच्या 
भाइर आपुन काय धी काम करनार न्हाई. कुनाच्या घरला जानार न्हाई. 
सगीच्या दिवसात वेळ झाळा तरी त्यागदली पगार कापायचा न्हाई.' त्याच्या 
साऱ्या अटी कबूल करून शाळचा गाडा चाळ करण्यात आला. 

दिवसभर शाळत काम करून वह्याची ओझी वाहून नेणाऱ्प़रा शिक्ष- 
फाना या बनायानं हतजुद्ध कलं सहीच्या जागी अंगठा उठवणारा हा 
दमेकरी पस्तीस र्पय़ घेणार |! होय, पस्तीस रुपये. पहिल्या तारखेला 
पावतीच्या तिकिटांचा एक आणा मागितला तर उसळून म्हणाला, “' त्ये काय 
ठाव न्हाई. नगद पस्तीस हातात पडाया हुवती. त्यो आना बिना तुमचा 
तुमी बगा कुटनं घ्याचा त्यो - मजीकड मिळायचा न्हाई ! ? 

शिक्षकाच्या स्थाळीत कुजबूज सुरू माली. गड्याला दहा रुपये होते तिथं 
परीस झाले - आपलं काय ? बाकीच्या खात्यातून महागाई मिळूं लागली. 
मूळ पगार तर सगळीकडेच शिक्षकाच्या दिढी-दुपटीने वाढलेले - आपणच 
या अधेदाटी पगारावर किती दिवस खितपत रहाबच १? पण आपण 
सुरिक्षित माणसं. विद्यादानाच्या कार्यात गुतठेळी. नवी रिक्षण-संस्था -- 
एकदम काही करून थोटाळा तर व्हायचा नाही ? काय करावं ! कसं करावे १ 
त्याचा विचार चाट होता. शिक्षणान त्याना सुसंस्कृत बनवलं होत. अविचार 
घारे करणं त्याच्या रक्तात नव्ह्त. खरं म्हणजे जेवढे खरेखुरे अडलेले होते 
तवढेच शाळेंत राहिले होते. चाळिशी उलटायलळा आलले, संसाराचा न 
आवरणारा पसारा माडलेले, गावांत सारी पाळंमुळ रुतलेले, युद्धाच्या 
घकाधकींतल्या आठ-आठ, नऊ-नऊ तासाच्या शारीरिक कटाच्या नोकऱ्या 
झेपण्याच्या पलीकडे गेलेले, जुन्या भाबेत सांगायचं तर “ सटवाईला नाहीं 
नवरा, म्हसोबाला नाहीं बायकी ' अशा नात्यानं शाळा सुटण शक्‍य नार्ही 


१८६ लवणाची मासोळी 


गराळ णा ७७१७ % ७ कळळकाआक्रा ला करा कळा क्ाग्काळ्ा यावा ाधाधि क छा ळा का काला का क क ७) का 90 ७७ ७७ ७ झा अ क य क ७» बक 


तेवढेच शाळंत राहिले होते. त्यामुळं हेडमास्तरांनीं शिक्षकांच्या खोलींत काय 
चालतं याची कधी चौकशीसुद्धां केली नाही. पण वातावरण धुमसत होतं. 


त्या सगळ्यांत तरुण रघू. पण उत्साहाच्या बाबतीत तो म्हाताऱ्याहून 
म्हातारा झालेला होता. त्यानं या कुजबुजींत कधीं फारसा भागही घेतला 
नाहीं. शाळेंतलं काम कसंबस उरकावं अन्‌ घराची वाट धरावी .हा क्रम 
चाढलेला. अशा कुंद वातावरणांत दिवसांमागून दिवस चालले होते. 


कुळकर्णी मास्तर म्हणजे शाळंतल्या शिक्षकांचा अक | नवीन शिक्षकांतला 
कुणी सुटा-बुटात आला कीं, त्याची हजिरी घेऊन त्याला माणसाळून टाकायचं-- 
शिक्षकांच्या कळपात साजेलशी रहाणी पत्करायला लावायचं या कामांत त्याचा 
हातखंडा - अशी त्यानीं नोकरीनिमित्त पाहिलल्या चारी शाळात त्यांची कीर्ति 
होती. त्या कुळकर्णी मास्तराचा अवतार पाहून मुलंच काय, हेडमास्तरसुद्धा 
हादरले, नऊवारी धोतर-उपरणें अश्या थाटांत नेहमी येणारे कुळकर्णी 
मास्तर पायजमा नेसून शाळेंत आले. मधल्या सुट्टीत हेडमास्तरानीं शिक्षकाच्या 
स्वोलींत अचानक प्रवेश केला. “' काय मंडळी १ कसं काय १ २ त्यानी 
सहर्जी विचारण्याच] देखावा केला. 

५ हु-हुं-हं--?? खोटं हसून सरळ्यांनी साद केली. 

थोडा वेळ पुनः शांतता होती शोबटी हेड्मास्तरानींच तोंड उघडलं-- 
६८ आपली सगळ्यांचीच आढाताण होते हे मला दिसतंय. पण शाळेचा 
बिचार करायला हवा. कुळकर्णी, तुम्ही तरी असं कांही विपरीत कराल असं 
वाटलं नव्हत --- 

“ कद्याबद्दल म्हणतां आहांत आपण ? १? कुळकण्यानी मख्ख पणे विचारलं. 

“ अहो, हें काय विचारणं १--असा पोरा-सारासारखा लगा घालून 
शाळेत आलांत. हृ बरं दिसत नाहीं. निदान या वयांत तरी शोमत 
नाही --? 

“ माझा पोशाख ही खाजगी बाब आहे --? 

“ “सं म्हणून कसं चालेल १? शाळेंत तुम्ही शिक्षक म्हणून वावरता --?? 


वी 


“ ह, मी बाकावर मुलांच्या बराबर बसत नार्ही, खुर्चीबर बसूनच 


लवणाची मासोळी १८७ 


शिकवलं आजसुद्धा, अन्‌ लेंगा घातला म्हणून कांही एलिझाबेथला बर्लिनच्या 
गादीवर बसवलं नाहीं को शिवाजीकडून अमेस्किचा शोध लावला नाही - 

“ असं बाकड्यांत शिरू नका कुळकर्णी माझं म्हणणे तुम्हांला कळलं 
आहे. उगीच वेड पांघरण्यात काय अथ १ ? 


&६ आतां पाघरायला तेवढंच उरलं आहे. तेसुद्धा नको असेल तर स्परच 
बोळून दाखवू का! ? 


६ वा |! बोला ना. आपण सगळे सहकारी; एकमेकांच्या अडचणी 
नाहींत ओळखायच्या तर दुसरं कोण येईल मदतीला ? ?? 


६ ठीक आहे ! तुम्ही येत असला मदतीला तर त्यात आनंदच आह, 
माझा सगळा उघडा व्यवहार. या जोवश्याना विचारा. मी आडपडट" 
पाळणारा मनुष्य नाहीं, त्याचं वागणं आवडलं नाहीं त्या वेळी त्याना स्पष्टपण. 
तसं सागितलं. आतांही हवं तर तुम्हाला सागता --- 

£ सागा ना--?) 

५ माझ्या टेंग्यावर तुमचा रोख आहे. मी. आयुष्यात कर्धी लेंगा वापरला 
नव्हता - कोलेजांत एक वर्ष होतों तेव्हासुद्धा, आज काय मला होस आली 
म्हणून लगा नेसला कीं पोरटकी करायचे दिवस आहेत म्हणून नेसला ? 
काय वाटतं आहे तुम्हांला ? पंचवीस रुपये देऊनसुद्धा उघड्या बाजारात 
धोतर दृष्टीला पडत नाहीं. आडवाटेनं घ्यायची एऐय्त नाही. तुम्ही काथ 
पगार देता ते तुम्हाला ठाऊक आहेच. तुम्हा धोतरं आणून द्या; मी वापरा पळा 
तयार आहे.?? 

“६ माझी काय गिरणी आहे कीं कापडाचं दुकान आहे? ” 

£ अन्‌ माझं तरी कुठं आहे! ” 

“: पण हृ बरं दिसत नाहीं -- ” 

६ ते मला ठाऊक आहे. तरीसुद्धा ते मी करतो. या टेंग्याच्या जोडीला- 
देखील वीस रुपये खर्च आला. हा खडा कसा भरून काढायचा ते सागा ? 
तुम्हांला शिक्षकाचा दर्जा रहायला पाहिजे. तो त्यानं कसा राखायचा हू मात्र 
सांगायला तुम्ही तयार नाही, पण मा विचारणार आई. एकदम वीस रुपये 


२८८ लवणाची मासोळी 


या लाज राखणाऱ्या लेंग्यांना दिल्यानंतर महिनाभर - दर्जा सोडाच नुसत 
गरीर पोषण कस करायचं तेवढं आम्हाला शिकवा, गडी निघून गेला; दुसरा 
पस्तीस रुपयावर नेमलात, तेव्हां आमचा काही विचार केळात ? ?' 

“६ हृ काय - काय बोलताय कुळकर्णी ? अडाणी माणसं ती; त्याना या 
वेळेला पैसा दिसतो आहे. आपला उपाय नाहीं म्हणून ते पत्करावं लागत. 
यण आपण सुशिक्षित माणसं. पायापुरतं पाहून भागणार नाही. संस्था 
जगली तर आपण आहात. आपल्यासाठी तरी संस्था आधा जगवली 
पास्हिजे 

हे तुम्ही आम्हाला सांगणार हें ठाऊकच होतें आजपर्यत कर्धी संस्थची 
खटना काय ? तिच नियमन कोण करतं ? हु कधी सागण्याची तुम्हाला गरज 
बाटडी नाही. माणूस नकोसा झाला कां संस्थेचं नांव सागायचं: हवा असला 
कीं, संस्थेचं नांव न काढता भरुदत वाढवून मिळायची, हे काय आम्हाला 
कळत नाहीं असं तुम्हाला वाटल १ ?? 

: छु | छे |! भलतंच काही तरी ! तुम्ही कांही तरी गेरसमज करून 
घेतला आहे. अहो संस्थेची लफडी म्हणजे साधी का बात्र आहे ? आपल्या 
कामाखाठी बेजार होणाऱ्या तुम्हा शिक्षकाना उगीच आणखी संस्थेची 
बेबवना नको म्हणून तुम्हाळा त्रास दिला नाही. माझं मला टाऊक - एक 
तारखेला पगाराची भरती करतांना इकडची टोपी तिकडं कशी करावी 
लागते ती. ! 

“६ यात कार्हीच नवीन नाहीं. पण आम्हाला कळत नाहीं की, इतक्या 
अडचणींचा बोजा तुम्ही एकस््रानेच उचलायचा हट्ट काँ घरावा ? आहेत त्या 
साऱ्या अडचगीच आहेत अन्‌ त्यात फायदा कसलाच नाहीं हें उघड आहे 
असे तुम्हाला वाटं तर सस्था चालवायचा भार चारजणानीं - सगळ्यांनींच 
का वाटून घेऊ नये ? संस्था अशी मोजक्या अन्‌ ठरलेल्या लोकाच्या हातीच 
क| असावी ? त्याबद्दल दका का येऊ नये ? ? 

“६: हा चालू मुद्दा नाही कुळकर्णी. सस्थेचं काम घटनेप्रमाणं चाललं आहे. 
अन्‌ त्यांत काही चुकलं नाही तोपर्यत मी इतरांना ठुडबुडूं देणार नाहीं, ! 

रघूळा एकदम बाचा फुटली, “' झातां तुम्ही वळणावर आलांत. जोपर्यंत 


लवणाची मासोळी १८९. 


नळ ७ आ. ७७ क झा ४ ४ का क ७७ 7 भि झा कि आ. क करा &७ 8७ ७० जि क हो आ. ह €७ झा अ» &७ %७ ७७ झे अहे का ७क आ). क्क अक अड अह. ७ हक का 8 ७ ७७ हक क 


तुम्ही नियमांवर भोट ठेवून काम चालवतां तापर्येत अडचणी तेवढ्या आम्हाला 
कशाला सागता १ त्या नियमाप्रमाण ज्याच्या त्यार्नी बवून घ्याव्यात, ? 

६ त्या बघून घ्यायला मी समथ आहे. मी नियमाप्रमाणंच सागतो. 
असली थेरं माझ्या शाळेंत चालणार नाहींत. मळा असल शिक्षक नकोत-- ' 

:: मग नियमाप्रमाणे बाकी सगळ्या ठिकाणी मिळतात तसं पगार अन्‌ 
महागाईंभत्ता द्या म्हणजे वाढलेल्या पगारातून तम्हाला हवेत तसले कपडे 
करून येता येईल---?” रघूनं उत्तर दिलं 

६ ते काय तुमचं म्हणणे असेल ते लेखी ग्रा --?? 

: तुमचंही पोशाखाचं सर्क्युंलळर लेखी येऊं द्या--?” 

“णआणि लेखी कार्हींच झालं नाहीं. हेडमास्तर निघून गेल्यावर 
कुळकर्ण्यांनी रघूळा समजावलं, “ असं एकेरीवर यायला नको होतं जोशी. 
त्याची जिंगं आम्हाला ठाऊक आहेत तशीच आमची शोंडी त्याच्या हातात 
आहे. त्याला ठाऊक आहे आापण कोणी शाळा सोडून जाऊं शकत नाही. 
जाणारे वेळ येताच निघून गेले, झापण दुसरीकडे जाण्यांत अगतिक आहोत 
म्हणून इथं ख्ितपतां आहात. अन्‌ आज त्याला दुसरी माणसं मिळणार 
नाहीत हें ठाऊक आहे म्हणून तो सगळं ऐकून घेत होता पण वळ येताच 
हातांत नारळ - नारळसुद्धां नाही, नुसतं कागदाचे चिटोरं ठेवून मोकळा 
होईल--? 

शाळंतलं हें बादळ जसं उठल तसंच कांत झालं, दोन महिन्यानी र्घूही 
लगे नेसून शाळेंत येऊं लागला, त्याला कुणी कांहीं विचारल नाहीं. सारं आहे 
तसं चालणार. तच व्यवस्थित समजायचं अश्या वातावरणात दिवस जात होते. 

तेवढ्यांत गावांतल्या दुसऱ्या मोठ्या शाळत गडबड सुरू झाली. कर्धी 
नव्हे ते दोन शाळातले शिक्षक एकत्र आले, दोघानी एकजुटीने कांहीं तरी 
मार्ग काढून पगारवाढ, निदान महागाईभत्ता पदरात पाडून घेतला पाहिजे अशी 
भाषा निघू लागली, अनेकारची जेवणं एक वेळेवर आठी. श्रीमत ब्यापाऱ्या- 
खेरीज कोणी शिकवणीच्या वाटेला जाईना. अन्‌ या व्यागऱ्याच्या मुलाच्या 
शिकवण्या सुरू व्हायच्या त्या फक्त परीक्षेच्या आधी महिनाभर. कोणाकडे 
घेपर आहेत याचा पुरता कानोसा लागल्यानंतर ते॑ अळबावरचं पाणी - 


१९० लवणाची मासाळा 


स्यातही मखलाशी करून छपाईचा वाढता खर्च वांचवायसाठीं साऱ्या 
जिल्ह्याच्या हेड्मास्तरांनी एकत्र जमून एकच सर्वसाधारण पत्रिका काढायची. 
जास्तींत जास्त पेपर हेड्मास्तरानी स्वतः काढायचे अशी हूल उठली, 

अखेरीस सभेवर सभा बोलावून, चारचारदा विचार करून गांबातल्य़ा 
पंचवीस शिक्षकांनी मोठा महत्त्वाचा निर्णय घेतला. कांदींही घाईनं, अविचारानं 
करायचं नाहीं हा सशिक्षित पाटरपेशाचा बाणा पाळून, त्यानी ठरबलं -- 
प्रथम आपल्या संस्थेला परिस्थितीची विस्तृत जाणीब देऊन, महागाईभत्ता 
तरी दिल्याशिवाय शिक्षकाला जगणं अशक्य होईल असं नम्र निवेदन पाठवून 
त्याच्या उत्तराची महिनाभर वाट पहायची. 

रघूनं आपल्या सहकाऱ्यांचे निवेदन तयार केलं. कुळकर्णी मास्तरांच्या 
घरी सगळेजण गुपऱचूप जमले. रघूचे निवेदन वाचून साऱ्यानीं असमाधानानं 
माना हलवल्या, फारच जहाल - असं जिव्हारी लिहून कसं मागेल १ आपल्याला 
फक्त विनंती करायची आहे. तरणं रक्त फार लवकर तापतं, त्या निवेदनाचा 
काही उपयोग न होता, त्रास होईल असं साऱ्याचं मत पडलं. रघून परिश्रमानं 


७ ७७ ७७ 


तयार केलेले चारी कागद टरावून दिले. 


कुळकर्णी मास्तरानीं रघूच्या पाठीवरून हात फिरवून त्याला शांत करायचा 
प्रयत्न केला. त्यानी स्वतः दुसर्‍या दिवशी निवेदनाचा कच्चा मसुदा तयार 
करायचं आश्वासन दिलं. लाचारीनं, अजीजीनं भरलेलं त॑ निवेदन सगळ्यानी 
पसंत केलं. कुळकर्णी मास्तरानी रघूला मोठेपणा देऊन सागितल, “' जोशी 
मास्तर, तुम्हीं पहिल्या निवेदनासाठीं फार कष्ट केले होते. तेव्हां हे निवेदन 
तुमच्या हातूनच जाऊं द्या. तुमचं अक्षरही मोठं वळणदार आहे- ?' खूच्या 
मनात नव्हतं तरी मिडेला पडून त्यानं या निवेदनाची पक्की प्रत आपल्या 
हस्ताक्षरांत तयार केली. 

चार दिवसांर्नी हेडमात्तरांनीं रघूला बोलावून घेतलं, “' जोशी, तुम्ही हे 
उद्याग कशाला केलेत ! तुम्हांला एवढं कसं समजत नाही १ 

५ घण निवदन सगळ्या शिक्षकांचं आहे-- 

५ अशी तुमची समजून आहे. तुमच्या आर्धी मी प्रत्येकाला बोलावलं 
होतं. त्यांनी काय सांगितलं ठाऊक आहे ? हा सगळा तुमचा खटाटोप. 


छवणाची मासोळी १९१ 


तुम्ही कारही तरी मयंक्रर लिहन सह्या गोळा करीत होता. तेव्हां ते॑दरुस्त 
करायला लावून, तुमच्या समाधानाकरतां बाकीच्यांनी सह्या केल्या. पण 
त्याचं स्वतःचं यांत कांही नाही, त्यांचं असलं मागणं नाहीं. संस्थेची जुर्नी 
माणस आहेत तीं. त्याचं संस्थेवर प्रेम आहे-- 

“ पण त्यांच्या सह्या आहेत. ते काही अज्ञानी -अडाणी ना 

': होय ना |! अज्ञान नाहींत म्हणून तर तुमच्या समाधानासाठी त्यानी 
सह्या केल्या असल्या तरी मला खाजगी भेटून सागितलं कीं व्या सह्या परत 
घेतल्या असं समजा म्हणून.?' 

"* माझी सही मी परत घेतली नाही.! 

“८ आतांच काही सागू नका. जा, नीट विचार करा. तुमचंच नुकसान 
होईल. चार दिवसांनी सावकाद मला भेटा, ?" 

रघू संतापून गेला. शिक्षकाच्या खोलींत तो कोणाशीही बोलला नाही. 
त्याच धुसपुसणं चालल होत. कोणीं चौकशी केळी नाहीं. दुसऱ्या दिवर्शी 
त्यानंच सगळा राग गिळून कुळकर्णी मास्तरांना विचारलं, “' हा काय प्रकार 
आहे ? अस मला तोंडघशी का दिलंत £ *? 

कुळकणी मास्तरांनी संवयीप्रमाणें त्याच्या पाठीवरनं दात फिरवला, अन्‌ 
हलकेच सागितलं, “' जोशी तुम्हाला अजून कस कळत नाहीं ? तुम्ही त्याचं 
प्रत्येक वाक्य खरे समजून का चालता १? हा सारा फोडाफोडीचा खेळ आहे. 
त्यात हृ ग्रहस्थ तरबेज आहेत. तुम्ही भलतंच समज नका --?” 

“६ म्हणजे, निवेदनावरच्या तुमच्या सह्या कायम आहेत ना ? ?? 

अं १ म्हणजे त्याचं असं आहे - कलेली सही मार्ग का घेतां येते १ 
---पण आम्हीं आलं सांगितल, सस्था विचार करगार असली तर निवेदन 
केलंच नाही. असं समजा, संस्थेला मोठेपणा हबा असला तर तो द्यायला 
थय हरकत आहे ? ?? 

५: पण संस्था विचार करणार आहे का? ” 

“६ निवेदन मार्ग घेतलं तर सभा बोलावू असं ते म्हगाले.?' 

५६ निवेदन माग घेतल्यावर सभा कशासाठी १ बोडावगार याची खात्री 
काय £ कुणावर विश्वास ठेवायचा £ ”? 


१९२ लवणार्ची' मासोळी 


:£ विश्वासारीबाय काय होणार ? अन्‌ यात लेखी कांहींच नाही 
संस्थेने विचार केळा तर निवेदन परत घेतलं म्हणायचं -- नाहीतर 
आहेच तें ---१? 


० 


६ मला हे काही कळत नाही --? 
तुम्ही घाई करूं नका. सवे कांही व्यवस्थित होईल -- 


थंडीच्या दिवसात एका रात्री, कांहीं कल्यना नसतांना शातरणे झोपेतच 
कृष्णंभट्जींच अवसान झालं, एकुलत्या एक चादरीत कुडकुडायला लागलं 
म्हणून रघू जागा झाला. आपल्याला इतका थंडी वाजते तर बडलांचं पाघरूण 
नीट पहावं म्हणून तो त्यांच्या अंथरुणापाशी गेला. पाघरूण सरळ कर्ता 
करतां त्याचा हात भटजींच्या अंगाला लागला. त्या थेड स्पर्शानं तो चरकला. 
अंग उघडं पडलं म्हणून असं असेल अशी त्यानं समजूत करून घेतली. 
विटकरानं थोडा वेळ अंग शेकलं. चागल्या तापलेल्या विटकराच्या स्पर्शान- 
सुद्धां भटजी दू को चूं करीनात |! ता गोंधळला. त्या दिवशीं हाक मारायला 
मानेसुद्धां जवळ नव्हता. तशीच घराला कडी लावून तो बाहेर पडला. 
एकाला डोक्‍्टराकडे पिटाळला. दुसऱ्या दोघा तिघांना धेऊन तो बरी 
आला -- डाक्टरारनी दोन तास होऊन गेलेय म्हणून सागितल. 


समाधानाला आलेल्या माणसांशी. रघू इकडच्या तिकडच्या गोष्टी ब्राळत 
होता. वडलांचा विषय कोर्णी काढलाच तरी तो पुढं चालवायचा नाही. अशी 
त्याची वृत्ति होती, कुणी म्हणालं, “ कसंही असले तरी डोक्यावर छत्र होतं- 
ते आता गेलं ? तरी रघू हुकार द्यायचा. “ बिचाऱ्याचे हाल झाले. आता 
सुटका झाली तंच बरं - अन्‌ तीही तुम्हाला त्रास न होता ?' असं कणी 
म्हटलं तर त्यालाहि रघू ' हो ? म्हणून गप्प बसायचा, इतर विषय कुणी 
काढळेच तर मात्र आपले वडील होते, ते दोन दिवसांपूर्वी गेळे ह सारं 
विसरून तो मनःपूवक बोलायला ळागायचा. सुतकी चेढेऱ्याच्या लाचार 
वृ तीच्या देखाब्यासाठी आलेल्याचा अपेक्षाभंग व्हायचा, काहीचं तोच उलट 
समाधान करायचा, 


लवणाची मासोळी १९३ 


५७50: ७५. 5. आ ७8 का क 0 “5 अ हि अ 0 ॥७ ७७ 9७ अ &७ ॥5 ७७ ७७ ॥% ७७ 95 १७ 85 ७8 ७07 5 आ आ ७७ “0 55 ७0 आडे आ 5 90 अड अ ७ ७७ अळा आढे क 


पुष्कळांना आश्चये वाटायचं. रघूजवळ शिवाशिवीचं बंधन नव्हतं. 
: चहा घेणार का ? म्हणून आलेल्यांना तो विचारायचा, कुणी स्पष्टपणे नको 
म्हणाला नाही तर स्वतः चहा करून आणायचा. आलेले संकोचून जायचे. 
त्यावरही रघू सरळ सांगायचा - “ चहा करायला माझ्याशिबाय कोण आहे १ 
तुम्हांला चालत नसला तर माझा आग्रह नाहीं. ' अन्‌ तो स्वतः चहा 
प्यायचा. 

वडलांच्या मृत्यूने काय वाटलं त॑ त्यानं कुणालाच दिस दिलं नाही. त्याला 
कांही वाटलं की नाहीं हं त्याचं त्यालासद्धा कळत नव्हतं. साऱ्या आयुष्या'चा 
चित्रपट त्याच्या डोळ्यांसमोर होता, पण भावनेनं वाहून जाणं ह त्याच्या 
पिंडांत नव्हतं. आलेल्या प्रसंगाळा---काणत्याहि प्रसंगाला अनपेक्षित 
मानायच्या तो पलीकडे गेला होता, त्याचं कोणतंच वेळापत्रक आयुष्यात 
जमलं नव्हतं, अन्‌ तें जमलं नव्हतं म्हणून खंत मानावी अशी विपरीत 
अवस्थाही कर्धी झाली नव्हती. यश आणि अपयश दान्ही ख्टा्थोर्नी त्याला 
स्प्चून गेलीं नव्ह्ती. यशाच्या वेळी यापेक्षां अधिक यह काय असतं 
याची जाणीव शिलूक राहिली; अपयक्याच्या वेळेला यापेक्षां अधिक अपयश 
काय असतं तं डोळ्यापुढं यायला चुकलं नाहीं. रघू स्वतःलाच एक कोडं 
होऊन बसला; पण हं सुद्धां खर नव्हे. त्याला कसल्ही कोडं पडले नाहीं. 
कांहीं तरी भावनेच्या, विचाराच्या, अनुभवाच्या पळीकडची असली कांही 
अवस्था असली तर तींत रघू होता-- 

सगळे व्यवहार पहिल्यासारखे चालूं झाले. वेळच्या वेळीं शाळेंत जाव, 
संध्याकाळी घरी आल्यावर त्या मुक्तद्वार ठिकाणीं येतील त्या विद्याथ्यांना 
हवं तें शिकवावं. दोन वेळेला जेवावं; झोपावं असा रघूचा क्रम होता. 

पंथरा दिवसांनीं त्याच्या ध्यानांत आलं, मान्याचा पत्ता नाही. वडील 
गेल्यापासून दुसऱ्या माणसाची गरज संपली होती म्हणून म्हणा, की इतर 
कारणानं म्हणा, रघू त्याला जवळ जवळ विसरला होता. जसा अचानक 
विसरला तसाच तो त्याच्या आठवणीनं अचानक बेचैन झाला. त्यानं चार 
दिवस विश्रांतीसाठी म्हणून रजा काढली अन्‌ तो बाहेर पडला. 

मान्याच्या खेडेगांवाचं नांव त्याला ऐकून ठाऊक होतं. जवळच आहे 
हेंही माहीत द्वोतं, रस्ता विचारीत विचारीत तो बाट चाळला. तब्ञजल दोन 

ल. मा...१३ 


१९४ लवणाची मासोळी' 


१ १७ आह ह. क ४७ र 94 क. को 6 शा ता का का ७७ १5 ७७ ९७७ १५७० का छा आल छा आ&% ब शी ध्या की या अही शी कि ग्लो शिळी आक्रा आक्रा ७ अ म्म आर आडे 


तास चालल्यावर, सहा मैल दूर असलेल्या गावांत तो पोचला. त्या अंतराची 
जाणीव मनात राहिली. रघूच्या घरीं रहावच्या आधी माने दररोज इतक्या 
लांज जाऊन येत असे. खूच्या घरी आल्यावरसुद्धां आठवड्यात कमीत कमी 
दोन फेऱ्या मारून तो चार दिवसाच्या भाकरी घेऊन यायचा. ह्या कष्टाला, 
ह्या श्रमांना आपण कधी टिकला असतों का ! असं रघूच्या मनांत राहून 
राहून यायला लागलं. ी 

-मान्झाचं घर विचारून तो कंटाळला. ' कचा मान्या ' म्हणून प्रत्यकानं 
इॅटकायंचं अन्‌ खून “ शाळेंत येता तो ? असं कांही तरी सांगून पहायचे. 
शेवटीं त्या शभर-सवार्शे घरांच्या खड्यांतली पंत्रत्रीस-तीस घरं टिपूनही 
शोध लागत नाहीं म्हणून परताव काय अशा विचारात तो होता. पण पाय 
कुरकुरत होते. आणखी थोडा वेळ प्रयत्न करायचे त्यानं ठरवलं. त्याच्या 
मनांत नसती दका आठी. पंधरा दिवस मुलगा आला नार्ही; आजारी 
पडून कांहीं बरंवाईट तर झालं नाहीं? अन्‌ ते सांगायचं टाळण्यासाठी 
:्याचं घर दाखवण्याच्या बाबतची ही युक्ति तर नसेल ना £ - कुणी सांगावे १ 

शेवर्री एकानं, ' हा, त्यो म्हाताऱ्या शिर्ष्याचा ल्योक असल ? म्हणून 
का दोनखणी छप्परवजा पडक्याकडं बोट दाखवलं. रखघूनं त्या पडक्यात 
भोतमीतच चौकशी केळी. शिरप्या म्हातारा अंगाखाली एक पोत्याचं पटकुर 
टाकून पडला होता. त्यानं पावण्याला आत बोलावलं--- 

५६ या, कुनीकडे येन केलसा £ ?? 

«८ मी शाळेंत असतो. तिथनं आलो-- ” 

५६ हं - आतां आलं ध्येनांत तुमी त्येचं मास्तर है जनूं ” म्हाताऱ्यानं 
आपल्या बायकोला हाक मारून चूळ भरायला पाणी आणायला सांगितलं. 
६ त्ये घोंगडं त्येवडं टाक बसाया, आन्‌ बामनाच्यातल्या तांब्या आन 
कुनाकडन- 

५ काला १ तुमच्या इथलं द्यार्की पाणी-- ? 

६६ तुप्तास्नी चालतं न्हवं £ ” 

५: चालतं कीं - त्याला काय झालंय ! ? 

"6 झालया काय £ चांगलं केळींतलं गार पानी है. पर कुनाला चालत 
वहाई - आमी कसं द्येवावं, ? 


लवणाची मासोळी १९५- 


4. आरा» ३ ४9 ७७ 95 शक हक आह अक अहे होड अठ शक अड अक आठ ग का क ७४ अक झा जक 25% »७॥ अ 98 म आ. छा ॥७» 5७ अक कक अकळ एक आह अकळ आहे 9७% शा अकळ अक कर आ आज 


रघूनं चूळ मरून घटाघटा तांब्या घशांत ओतला. हुद्दा करून तो त्या, 
मळकट, फाटक्या घोंगड्यावर शाक्य तितक्‍या मोकळेपणानं बसला. 

“ काय कामगिरी काडली हुती मास्तर ! काई शेरा-अडशिरीपाई 
आला असला तर पैसं ठिवून जावा. कुनाकडनं पोस्तं करीन. तुमास्नी त्ये 
जमायचे न्हाइ कमिटीच्या अन्‌ रासनाच्या लोकांतनं न्ह्याळा, ? 

: तसं कांद्दी नाही. पण तुमचा - तुमचा मुलगा-- १ *”? 

६ टक्शा व्हय ! त्येने साळा सोडली आतां-- '' 

५: घण अक्ली मधेच ? पराक्षा तोंडाला आली असतांना ! ” 


: त्ये सार खर मास्तर, पर आपल्या हातांतलं का है £ आमास्नी काय 
त्यो दिकाय नगो हुता ? पर ऐकना त्यो - काईबी ऐकना, 

££ पुण तो आहे तरी कुठं ? मी सांगतो त्याला समजून. ” 

£ कुनाला सांगंनार मार्स्तर आतां ! लक्‍्शा गेला - त्येच आईनं डोळं 
मिजवलं. पर त्येनं ऐकलं न्हाई. ? 

६ पण कुठं गेलाय्‌ तो ! 

६६ त्यो घरांतनं ग्येला. परवां कागुद आला. भरती झाला म्हनून, आतां 
कुटं खडकीला हाय, पैसं पाटवीन म्हनून लिवल्या एक तारकला. ? 

“६ पण तुम्ही कसं जाऊन दिलंत £ ? 

£ आर्मी काय करायचं £ गड्यासारका गडी, त्येला काय बांदून ठिवा- 
यचा. त्येच्या मनानं घ्येतलं. त्यो भरतीत ग्येला, ' 

“६ पण मलासुद्धा कांही पत्ता लागून दिला नाही. 

 म्हूनत हुता एक डाव मात्तरास्नीं इचारायचं. पर तुमच्या माग 
तुमचं हैच कीं. तसाच ऱहाइला अन्‌ हातनं पाटलाला सांगून ग्येला. *? 

“ एवढं काय त्याच्यावर आझं पडलं होत £ ” 

6 कसलं वझं न्‌ कसलं काय ! आमी आपलं कसं तरी चालवत हुता-- 
त्येला त्ये पटना. गांवर्ची चार पोरं फलटर्नीत गेलीं. त्यांच्या मन्याडरी याला 
लागल्या तबाधरनं त्येनं भरती हुयाचं घ्येतलं हुतं.?? 

रघूला अजून उमज पडेना. मिलिटरीच्या वाढत्या व्यापांत कारकुनी 
पेशाच्या नोकऱ्यांवर तुटून पडलेल्या सुशिक्षितांचं मन त्याला कळळं होते, पण 


१९६ लवणाची मासोळी 


अशा आकराआश्ाआ्ाळ्ाक्ा आआक ण काा्ळागवभागा््ागाागा्ी्भासाकासाधागोाग्र्शा्शाशागाधा क्क धा -॥_ ॥0.0 ॥॥ ॥0 जा छा झा झा कळ 


त्यांत धोका नव्हता. जिवाचा धोका पत्करून युद्धाच्या खाईत हदृंसत जायला 
जाणते लोक कां तयार हातात ? त्यांना कसलं आकर्षण वाटत आहे £ युद्ध- 
आघाडीची रेवडी उडवणारी चर्चा त्यानं ठिकठिकार्णी ऐकली हाती. मान्यानं 
बेचाळीसचा सत्याग्रह चालूं झाला तेव्हां केवढी छाती फुगवली होती -- 
बयाला न शोभणारी चमक बोलण्यात दाखवली हाती तं त्याला ठाऊक होतं. 
पण तोच भरती झाला--- 


लक्‍्शांच्या म्हातारीने हुडकून हुडकून दान रताळी काढलीं. त्यांतला 
किडलेला भाग खुर्प्यांन तासला. अन्‌ तीं खघूच्या पुढ्यांत टाकली. “ ध्या 
मास्तर, हतं ' चा ? कुटनं मिळायला. घ्या गरिबाचा मेवा.!? रघूने रताळी 
हातांत धेऊन त्याच्याशीं चाळा सुरूं केला, त्याला ज॑ डोलायचं होतं तें कसं 
बोलावं हंच समजेना त्यानं कसंबसं विचारलं -- 

“: घण लक्ष्मण कां गेला भरती होऊन ? मला अजून काही कळत नाही. !? 

“६ ट्रेब तुमचं भलं करील. तुमास्नी नगो कळाया |! ”” 

“: असं का? सागा ना मला. ” 


“ काय सांगायचं मास्तर १ मी ह्यो असा दम लागून पडतु वरचीवर; 
मग कामाला जाया येत न्हाई. खाडा पडल्यावर काय करायचं ! म्हातारी 
'एकली कुट कुटं बगनार ! त्येच्या पुरती भाकर द्येत हुती. आमी आपली 
कनसं, रताळं खाऊन येळ काडीत हुता - त्येच्याबरनं त्यो झिटीला आला. 
आज खाया मिळना तर शिकून उद्यांला काय हुयाचं त्ये कशाला होवं म्हनून 
फलटरनीत भरती हुयाचं म्हनत हुता. सा महिन त्येला वडून धरला. पर फुड 
निबना, त्यो आमच्या आराच्या भाईर ग्येला. तुमी भकं मरताय - मी न्हाइ 
शिकायचा म्हून हटून बसला. ऐकलं न्हाई त्येनं कुनाचं --? 


“ अन्‌ हदी रताळी ? असली रताळीं खातां तुम्ही रोज? ?? 
५६ वहूय - तर काय ? पोटांत आग पडल्यावर काय करायचं £ ?? 
५६ तीं बरी मिळत्याल तवा. एकेक डाव रताळ्यावर पर उडी पडतीया - 


'गरीबाच्या वाटनीला उरत न्हाईती. तांब्यामर पानी पिऊन भूक माराया 
"ळागती ?' म्हातारीने कळवळून म्हटलं. 


सूवणाची मासोळी १९७ 


ह क क करक क हा ह्या कत मा अ हय भा ७०७७ ६ आ “य. आह ह ध्या हह धा ७ र भाट” ७0 धी ११ धळ आ या ह “5 ळा ७ (क क आह का १ काया झि हा क व मकी 


५८ स्वर आहे ! नाहीतर तो पलटर्णीत जाणारा नव्हे. सत्याग्रहाच्या गोष्टी 
बोळत होता. सरकारी कामांत तो शिरायचा नाहीं.” 

“: अन्‌ कोन ल्योक सुकानं गेळाया ? चूल पेटनाशी झाल्यावर वनवन 
फिरून भरतीच्या कचिरींत जायाचं. कुनाला मरान हबया आपल्या हातानं-?? 

:६ सारे गेले ते असेच ? ” 

 कुना ल्येकाला ठाव हाय ? पर ह्या गांवांत पाटलाला योकबी गडी 
मिळाला न्हवता भरती दावाया वर्साखाली. आतां पांचजन ग्येल्याती. 
आपल्या पायानं कचिरींत हजर झाली. 

“ न हून सागतील कुनाला ? तारकच्या तारकला मन्याडर येतीया, 
अंगाला लावाया लंगुटी न्हवती तत॑ं काडावरची पंजी बोलावनं करून पाटील 
द्येताया, साकार आल्यावर हुवी का म्हून इचराया तराळ घराला धाडतुया- 
भरती झाल्याबिगार कुट्लं ह्ये सारं---? 

रघूनं ' भूक नाहीं ? म्हणून रताळी खाली ठेवलीं. म्हाताऱ्यानं अगर्दी 
अजीजीनं पायाला हात लावला तेव्हा एक तुकडा मोडून त्यानं तोंडांत घातला. 
मधाचे सारे श्रम विसरून तो परत निघाला. सहा मेलांचं अंतर त्यानं केव्हां 
तोडलं हं सुद्धा त्याला कळल नाहीं. उरलेली रजा रद्द करून तो दुसऱ्या 
दिवशी शाळेंत हजर झाला. 

अन्नासाठी - अन्नासाठी ! 

>< >< >< 

शाळेतले अभ्यास संपत आलेच होते. रघूनं उरलेले भाग झटकन्‌ संपवून 
टाकले अन्‌ त्याबरोबरच घरचा संध्याकाळचा वर्गही अंद करून टाकला. 
त्याचं संध्याकाळचं फिरणंही बंद झालं. त्या रिकाम्या वेळांत त्यानं घरच्या 
सामानाची उलथापालथ सुरू केली. वडलांच्या पोथ्या आणि पुस्तकं त्यानं 
प्रथमच धुंडाळली. त्यांतील कांही शाळेतल्या सहकाऱ्यांना, कांही घरवाल्याला 
आणि उरलेली वाण्याला रद्दीवारी देऊन टाकली. तीं द्यायच्या आधी त्यानं 
नेहमींच्या पारिचयाच्या भारत-मागवत आणि इतर धार्मिक पोथ्या पुरत्या 
उल्गडूनसुद्धां पाहिल्या नाहींत. पुस्तकं बहुतेक त्याचींच होतीं. ती मात्र 
त्यानं जुन्या आपुलकीनं चाळली, 


१९८ लवणाची मासोळी 


पुस्तका-पोथ्यांच्या मागोमाग जुने कपडे, डबे, फुटकी भांडी - साऱ्यांचा 
समाचार घेऊन रघून त्यांना दुकानाची किंवा बाहेरची बाट दाखवली. 
“ मास्तर, काय बेत आहे £ ? घरवाल्यानं ह्या प्रकार पाहून विचारलं, रघूनं 
हसत इंसत सांगितलं-“' बेत कशाचा ! घरांतली रिकामी अडगळ कमी 
करून टाकता झालं - आतां काय, मी एकटा जीव सदाशिव. काय करायचा 
एवढा पसारा ! त्यानिमित्तानं घर स्वच्छही झालं, बर वाटतं आता ?? 
ज्ञुेवायलाही तो आतां खानावळीत णायचा. त्यामुळे खरोखरीच घर कसं 
आरश्ासारखं लख्ख दिसूं लागलं-- 


मधेच एक दिवस रघूनं आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना चहाला बोलावलं 
६: आम्हांला सोडून जायचा विचार आहे काय ! ? हेड्मास्तरांनीं हसत 
चौकशी केली “ छे; हो | बाळचा आजार, वडलांचं दुखणं यांत सर्वोनीं 
हतकी मदत केळी पण मला फुकाचे चार भलेपणाचे शब्दही बोलायला झालं 
नाही त्या वेळी, जुन्या पद्धतीनं श्राद्ध - दिवस असल कांही मी करीत नाही; 
पण मनावर ओझं नको. म्हणून वाटलं एकदां सगळ्यांना चहाला 
बोलवावं. ' 

“६ सांगून सांगायचं तर हें दिवसाचं निमित्त कशाला सांगितलं £-- 
कधी कर्धी अगदींच विचित्र बोलतात जोशी मास्तर '' परतताना कुळकर्णी 
मास्तरांनी टीकेची फोडणी दिली. 

एप्रिल महिना उजाडल्यावर हेड्मास्तरांनी रघूला बोलावणं पाठवलं. 
रघूळा वाटलं कांहीतरी परीक्षेचं काम असेल, हेड्मास्तरांनीं त्या निवेदनाचा 
विषय काढला. रघू त्या निवेदनाचा विषय पार विसरून गेला होता. त्यानं 
अनुमानधनक्यानं विचारलं, “ काय करायला हृवं त्याच्याबद्दल ? ? 

६ तुम्ही त॑ निवेदन मार्ग घेतल्याबद्दल मला कळवलं नाहींत. आतां 
मंडळाची सभा घ्यायची वेळ आली. तुम्ही एकटेच राहिलेले आहांत तेव्हां 
काय करणार, जोशी १ ?? 

£ काय करावं अद्धी तुमची अपेक्षा आहे ! *? 

“ दुसरं काय £ ते निवेदन मार्ग ध्या. मागं घेतलं असं लिदून द्या. ?? 

£ काय पाहिजे ते तुम्हीच लिहून पाठवा. मी सही करतो --” 


छबणाची मासोळी १९९ 


शडे ७0 ॥0..७5. ॥8) झो 98 “७ ७४ अ ळा छा » शा का आ शाचाचा 569७ काका का का ७» ला काजा शाक्य कध सारा चचा क झा हह छो की था. अड. हाळ व्यकलळ 


थोड्या वेळानं शाळेचा शिपाई टाईप केलेलं पत्र घेऊन आला. तासावरने 
परत आल्यावर खघूनं तें घेतले. त्याचे तास संपले होते. त्यानं मुद्दाम ते पत्र 
मोठ्यान वाचले. त्यांत निवेदन मार्ग घेतलं एवढेच लिहिलेलं नव्हतं. ते 
पाठवण्यात मोठी चूक आणि अविचारीपणा झाला; त्याबद्दल मनःपूर्वक 
माफी मागून ते परत ध्यायला परवानगी द्यावी अशी विनती केली होती ! 

खघूनं त्या पत्रावर सही केळी, गडी कागद परत मागू लागला. जवळच्या 
ब्हीतला एक कोरा कागद त्यानं टरकावला. त्याच्यावर चार ओळी खरडल्या. 
अन्‌ सही केली, दोन्ही कागद गड्याच्या हाती देऊन तो बाहेर पडला. 

घरी आल्यावर खघूनं राखून ठेवलेली चार मोठी भांडीं होती त्यांची 
दुकानांत मोड घातली, आलेल्या पैशांत हाटेलांत काय तोंडाला आलं तें 
मागून पोटात भरलं. पानाचा विडा तोंडांत कोंबला अन्‌ तो रस्त्याला लागला. 

रघू ताडताड चालला होता. त्याला मागचपुढचं कांही दिसत नव्हत. 
जोडरस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरलेला भकास माळ झपझप माग पडत 
होता. उखडलेल्या रस्त्यावरची अपरंपार धूळ अंग माखीत होती; तरी त्याची 
पवी न करतां रघू अंतर काटत राहिला. 

नाक्यावरचा पोलीस दिसू लागला. रघून एक वेळ चारी बाजूंना दृष्टि 
फिरवली. अजगरासारखा पसरलेला पुर्णे-कोल्हापूर रस्ता, त्याला आडवी 
मिठी मारणारे दोन रस्ते; त्याच्यावरने मोटारी भरघाब घांबत होत्या, 
माणसांच्या पायरवाला खंड' नव्हता. आवतीभाोंबतीच्या या तुडुंब गदीत - 
जीवनाच्या घकाधकांत तो अगर्दी एकटा एकटा चालला होता. 

नाकं ओलांडून तो पलीकडच्या शेतांत जाऊन बसला, एकदम त्याला 
मोकळं वाटलं. माणसांच्या गर्दीतून बाहेर पडल्यावर वाटलेल्या या मोकळे- 
पणावरच त्याचं मन भरकटू लागलं, इतका वेळ त्याचं मन काम करीत 
नव्हतं, त॑ असं भरकटूं लागल्यावर त्याला उगीचच उपमा सुचली - समुद्रांतून 
बाहेर पडलेल्या माशाची. पण तडफड' ब्हायच्या ऐवजी आपल्याला मोकळे- 
पणा बाटतो-तोकां! 

आपली स्थिति लबणाच्या मासोळीसारखी आहे. ना पाण्यांत ना पाण्याबाहेर. 
आपल्याला जीवनच नाहीं. था नाही. आस्तित्व नाही, आस्तित्त नाही ! 


२०० लवणाची मासोळी 
मग गाढवा, त्या माफी पत्राच्याबरांबर राजिनामा कशाला खरडलास १ 
हाटेलांत तोंडाला आलं ते मागून पोटात का भरलंस १ तत्त्वज्ञानाच्या कशींत 
दडून उघड्या वस्तुस्थितीला पाठ कां किरबतोस ! 

पण तांड द्यायचं म्हणजञे तरी काय ! लवणाच्या मासोळीनं जगायचं 
म्हटलं तरी कसं १--कसं १ आधी उपमेच्या क्षीण प्रमाणाला कबटाळून 
बसायचं सोडून दे - शिकलास काव्यप्रकाश, अलंकार - ते असा दुरुपयोग 
करायला नाहीं. लवणाची मासोळी म्हणे ! कुठं आहे ती ! तिला आस्तित्व 
नाहीं - तुला आहे. तूं मासोळी असशील. पण नुसती सामान्य मासोळीच ! 
सुसंस्कृतपणाच्या, पांटरपेशेपणाच्या चवीच्या मिठाला अंग समजूं नकोस. 
तें मीठ साऱ्या पाण्यांत मिसळायचं आहे - समुद्राच्या खाऱ्या पाण्यातून 
काढलेलं मीठ - पुनः समुद्रात मिसळू दे - तुझ्या अगांत नव्हे -त्या 
खाऱ्या पाण्यात तुझं जीवन आहे - डबक्यात नाहीं, मिठांत नाहीं. खाऱ्या 
पाण्यांतल्या मिठाची हाव धर, ते वेगळे करण्याचा किंवा झाल्याचा कृत्रिम 
भास सोडून टाक. ऊठ, माणसातून बाहेर पडण्यानं माणूस उरत नाहीं. 

माणूस | -- कुठं आहे £! माणुसकी असलेला माणूस कुठं आहे ! काति-" 
लाळ, बापू , कुळकर्णी मास्तर, यमू बापट - सारे द्विपादांचे सांगाडे आहेत 
माणुसकीचा बहाणा व्यर्थ आहे. सारं कृत्रिम आहे. अशक्य तेच शकक्‍य* 
आहे. मी लवणाची मासोळीच आहे-- 


लबणाची मासोळी | 

पांढरपेशा माणूस | 

रघू जोशी ! 

उघड्या डोळ्यांनी सगळीकडे पहात, सुसंस्कृतपणानं रघूचं मन भरकटत 
होतं.